शेतकरी बापाचं अस्तित्व टिकवण्यासाठी,शेतकरी पुत्रांनो एक व्हा...समाजिक कार्यकर्ते आशिष जाचक, (वर्धा जिल्हा प्रतिनिधी(अब्दुल कदीर) वर्धा जिल्हा,तथा विदर्भातील सर्व शेतकरी,शेतमजूर,शेतकरी पुत्रांना. समाजिक कार्यकर्ते आशिष जाचक, समाजातील प्रत्येक घाटकाच्या न्याय हक्कासाठी,खम्बिर पणे उभे राहणारे,समश्या जिथे तिथे निवारण .,हेच आमचे ध्येय हेच आमचे धोरण म्हणारे ,वर्धा जिल्ह्यातील कुरझडी जामठा येथील रहिवाशी आशिष जाचक यांनी हे आव्हाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या एक वर्षा पासून हा लढा चालू आहे. आजही ह्या लढ्याला पूर्ण यश मिळाले नाही. ह्या विधमान महायुती भाजप सरकारने इलेक्शन मध्ये शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण पोकळ ठरली,शेतकरी,शेतमजूर,युवां वर्ग,लाडक्या बहिणीचे २१ शे रु देऊ सर्व जनतेला आशा दाखून,आश्वासने देऊन .गोरगरीब जनतेचे मत गुंडाळून सत्ता स्थापन करून आता ,बेधुंद सत्तेचा आनंद घेत आहे. शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा,कोरा,कोरा, अजूनही सातबारा कोरा झाला नाही.यांना ओला दुष्काळ अजूनही दिसला नाही.शेतकऱ्याच्या फाशीचा दोर यांना कळला नाही. तूट पुंजी जाहीर केलेली नुकसान भरपाई दिवाळी अगोदर देऊ कागदोपत्रीच आहे. शेतकऱ्याची दिवाळी गोड करणार सरकार शेतकऱ्याची दिवाळी काळी करून मोकळ झाल.महाराष्ट्राचे मुख्मंत्री साहेब स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका साठी साखर घेऊन फिरत आहे.आणी इकडे रोज शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकरी बापाचं अस्तित्व टिकवण्यासाठी भरपूर आंदोलने झाली ,मोर्चे उपोषणे झाली ,लाखो शेतकऱ्यांचे कर्ज माफीचे अर्ज भरून झाले.आता मात्र लढाई अंतिम टप्यात. आपल्या शेतकऱ्याची लढाई लढणार महाराष्ट्रात आता एकच नेतृत्व ते म्हणजे बच्चू भाऊ कडू शेतकरी मित्रानो,शेतकरी पुत्रानो आता आपल्या साठी लढाई लढणाऱ्या माणसाला ,मावळ्याला आपण साथ देण्याची गरज आहे. ते लढाई त्यांची नसून आपल्या हक्कासाठी लढत आहे. तेव्हा पक्ष्याचे झेंडे बाजूला ठेवा आणी आपल्या शेतकरी बापाच्या अस्तित्वासाठी लढाईत सहभागी व्हा आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय आणी मार्ग नाही.ह्या बेधुंद सरकारचं नाक दाबल्या शिवाय तोंड खुलणार नाही. बाळ रडल्या शिवाय माय दुध पाजत नाही याची जाणीव असू द्या येणाऱ्या २८आक्टोम्बर ला शेतकरी नेते ,बच्चू भाऊ कडू यांच्या बुट्टीबोरी ,नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनात लाखोच्या संखेने सामील व्हा.आमच ठरलं आहे.आपणही या .उठ शेतकरी पुत्रा जागा हो !बापाच्या लढाईचा धागा हो! असे सर्व विदर्भातील ,शेतकरी,शेतमजूर,युवां वर्गास समाजिक कार्यकर्ते आशिष जाचक यांनी आव्हान ,विनंती केली .
byMEDIA POLICE TIME
-
0