Read more

View all

गज़ल हजार जख्म जिस्म पर हर जख्म बोल सक्ता है।सिनाकत करने वाला करले दम बोल सकता है। जुल्मत की हद पार होगर्ई गव्हाई है आज।पुटपाथ पर लुटी दुकाने गम बोल सकता है।। जुल्मत से हुआ लहु लुहान  बुर्जुग बेबस बना।कागज पर लिखा बया और थम बोल सकता है।। तार तार हुई चुनरी  लुटी अस्मत अबली की।सुनने वालो सुनो लहजा नम बोल सकता है।। क्या नही जला बलवे मे क्या क्या बताये।जला हुआ जर्रा सारा आलम बोल सकता है।। मासूम बच्चों  की बिखरी वो लाशे कई पडी।सबूत लाशों का खून गया जम बोल सकता है।। हो गम देखलो नजारा आखों से जुल्मत का।जलता बिखरा नजारा आलम बोल सकता है।। 'शहज़ाद ' अब इन्सानियत ढुंढ़ोंगे सिहासत मे।गजब ढाये तुफानी बम बोल सकता है।। शायर:- मजीदबेग मुगल 'शहज़ाद हिगणघाट, जि, वर्धा  महाराष्ट्र      8329309229860505810

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणे ही पत्रकारांची जबाबदारी , प्रतापराव जाधव!वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात जेष्ठ संपादक अनुपम कुमार भार्गव व शंकर बोरघरे यांचा गौरव.. (महेश निमसटकर जिल्हा संपादक चंद्रपुर )भद्रावती दि.1:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ फेब्रुवारी रोजी वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार वितरण व पदाधिकारी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. प्रसंगी अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकार हा समाज व शासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगत, सत्य आणि निष्पक्ष भूमिकेतून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणे ही पत्रकारांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. शासनाच्या कामकाजावर लक्ष ठेवत समाजप्रबोधनाची भूमिका पत्रकारांनी कायम राखावी, असेही त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. दिनकरराव वाटाणे होते. प्रारंभी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून अधिवेशनास सुरुवात करण्यात आली. राज्यभरातील पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अधिवेशनात विदर्भ प्रमुख अनुपम कुमार भार्गव व चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शंकर नामदेवराव बोरघरे यांना राज्यस्तरीय “उत्कृष्ट संघटक” पुरस्काराने गौरविण्यात आले. संघटनात्मक बळकटी, तळागाळातील पत्रकारांना आधार, जिल्हानिहाय समन्वय आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली. हा राज्यस्तरीय पुरस्कार संघटनेचे मार्गदर्शक व राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे आणि कार्याध्यक्ष निलेश सोमानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने राज्यभरात संघटनात्मक उभारणीस गती दिली असून, त्याचाच परिपाक म्हणून विदर्भातील नेतृत्वाचा हा गौरव मानला जात आहे. दरम्यान, संघटनेचे मार्गदर्शक गुरुवर्य प्रा. महेश पानसे यांनी मूल्यनिष्ठ पत्रकारिता व शिस्तबद्ध संघटन हीच काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले असल्याची माहिती देण्यात आली. तसेच चंद्रपूर जिल्हा संघटक रूपचंद धारणे यांनी विदर्भातील पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक करण्यात आले. द्वितीय सत्रात “सायबर युगातील माध्यमे व मूल्यनिष्ठ पत्रकारिता” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सत्य, संयम आणि समाजहित हेच पत्रकारितेचे मूलमंत्र असल्याचा संदेश देण्यात आला. अधिवेशनात विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले तसेच राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. वाशिम येथे वर्षांनंतर पार पडलेले हे राज्यस्तरीय अधिवेशन पत्रकार एकतेचा आणि संघटनात्मक बळाचा प्रभावी संदेश देणारे ठरले असून, विदर्भातील नेतृत्वाचा गौरव संपूर्ण विभागासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणे ही पत्रकारांची जबाबदारी ,  प्रतापराव जाधव!वाशिम येथे राज्यस्त…

भरारी पथक बंद आणि रेती माफिया पुन्हा मैदानात? प्रशासनावर सवाल..!घाट लिलावात, तरीही नदीपात्रात अवैध उत्खनन सुरूच? (महेश निमसटकर जिल्हा विभागीय संपादक भद्रावती) दि.1 :- भद्रावती तालुक्यात अवैध रेती उत्खननाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून भरारी पथके बंद झाल्याची चर्चा आणि वाढलेली रेती वाहतूक यामुळे महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रसंगी तालुक्यातील पीपरी, जेना आणि पारोधी हे रेती घाट अधिकृत लिलाव प्रक्रियेत देण्यात आलेले आहेत. मात्र वायगाव नाला, आष्टा येथील ईरई नदी, चारगाव परिसरातील वर्धा नदी तसेच तालुक्यातील काही नाले व इतर नदीपात्रांमधून चोवीस तास मोठ्या प्रमाणावर जेसीबी आणि हायवा वाहनांच्या माध्यमातून रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. दरम्यान सध्याचे तहसीलदार शेतकरी आत्महत्या प्रकरण गाजत असताना सुमारे चार ते पाच महिने दीर्घ रजेवर होते. त्या काळात तत्कालीन तहसीलदारांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या संयुक्त विशेष भरारी पथकांची स्थापना केली होती. प्रत्येक पथकात एक मंडळ अधिकारी आणि तीन तलाठी असा समावेश होता. या पथकांनी अवैध रेती उत्खननावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करून शासनाचा महसूल वाढविला होता आणि अनेक ठिकाणी अवैध वाहतूक रोखण्यात यश मिळवले होते. मात्र सध्याचे तहसीलदार रुजू झाल्यानंतर ही भरारी पथके कार्यरत नसल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर तालुक्यातील काही नाले, नदीपात्रे व घाट परिसरातून अवैध रेती वाहतूक पुन्हा वाढल्याचा आरोप होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महसूल विभागातील एक कर्मचाऱ्यामार्फत चिरीमीरी गोळा केली जात असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. संबंधित कर्मचाऱ्याकडे गौण खनिजाचे काम सोपविण्यात आले असल्याचे सांगितले जाते. काही रेती तस्करांकडून अवैध उत्खननास मुखसंमती असल्याचे सांगितले जात असल्याची चर्चा असली तरी यास अधिकृत दुजोरा उपलब्ध नाही. दरम्यान, चंद्रपूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध उत्खनन रोखण्यासाठी भरारी पथके सक्रिय ठेवण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जाते. तरीही ती पथके सध्या बंद का आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि अवैध रेती उत्खननावर तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करून जनतेतील संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भरारी पथक बंद आणि रेती माफिया पुन्हा मैदानात? प्रशासनावर सवाल..!घाट लिलावात, तरीही नदीपात्रात अवै…

*ॲड. रूपाली राऊत पातूर विधीज्ञ संघाच्या महिला उपाध्यक्षपदी बिनविरोध* {पातुर अकोला प्रतिनिधी दुल्हे खान) माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया यांचे निवडणुकीच्या नियमाने प्रत्येक जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी होत असलेल्या निवडणुकांमध्ये महिला वकिलांना 30 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. उपरोक्त आदेशाच्या पालनाकरिता पातुरविधीज्ञ संघामध्ये महिला प्रतिनिधी नेमण्याकरिता पुन्हा निवडणूक प्रक्रिया पार पाडून पातुर विधीज्ञ संघाने अँड.रूपाली दामोदर राऊत यांना महिला उपाध्यक्षपदी अविरोध निवडून दिले.याप्रसंगीअँड.रूपाली राऊत यांनी माननीय सर्वोच्च न्यायालय,बार कौन्सिल ऑफ इंडिया, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तसेच पातुर विधीज्ञ संघातील सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले.पातुर विधीज्ञ संघामध्ये यापूर्वी त्यांनी पातुर विधीज्ञ संघाच्याअध्यक्ष पदाची सुद्धा जबाबदारी सांभाळलेली आहे. पातुर विधीज्ञ संघामध्ये प्रथमच महिला उपाध्यक्ष पदाची निर्मिती करण्यात आली आहे आणि त्या पदावर पहिल्यांदा अँड. रूपाली राऊत यांची निवड झाली आहे त्याबद्दल पातुर विधीज्ञ संघाच्या सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

ॲड. रूपाली राऊत पातूर विधीज्ञ संघाच्या महिला उपाध्यक्षपदी बिनविरोध*������������������������������…

कर्तव्यनिष्ठ सेवेचा गौरव; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा भावनिक सत्कार सोहळा........................................ वर्धा पोलीस दलात प्रदीर्घ व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावून वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा वर्धा पोलीस यांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. अनेक वर्षे जनसेवेसाठी कार्यरत राहिलेल्या अधिकाऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कारया कार्यक्रमात वर्धा जिला पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच वर्धा जिला अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती विशेष भावनिक ठरली.सेवानिवृत्त झालेले अधिकारीश्री. नारायण आर. कुंभलवार – ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, वर्धा – ३७ वर्षांची उल्लेखनीय सेवाश्री. धर्मपाल शंकरराव मानकर – श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन पुलगाव – ३५ वर्षांची निष्ठावंत सेवापोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शनयावेळी बोलताना वर्धा जिला पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले की,“पोलीस सेवा ही अत्यंत आव्हानात्मक असते. कुटुंब आणि कर्तव्य यांचा समतोल राखत तुम्ही दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. पोलीस दलातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि जनसेवेचा वारसा तुम्ही समर्थपणे जपला आहे.”तसेच त्यांनी सर्व निवृत्त अधिकाऱ्यांना निरोगी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.मोठ्या संख्येने उपस्थितीजिल्हा गुन्हे आढावा बैठकीनिमित्त सर्व वरिष्ठ अधिकारी मुख्यालयात उपस्थित होते. या सोहळ्यास पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. पुंडलिक भटकर, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सेवेचा प्रवास संपला असला तरी समाजासाठी दिलेला आदर्श कायम प्रेरणादायी राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.।।मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

कर्तव्यनिष्ठ सेवेचा गौरव; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा भावनिक सत्कार सोहळा.........…

पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे वरिष्ठांच्या आदेशाने पोस्टे परिसरात होणाऱ्या होळी सण उत्सव संबंधाने दारू, गांजा विक्री व वाहतूक करणाऱ्या इसमावर कार्यवाही करणे बाबत आदेशित केले असता व सदर कार्यवाही संबंधाने गुन्हे प्रकटीकरण पथक क्रमांक 01 हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मूखबीर कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, एक इसम त्याचे ताब्यातील दुचाकी मोपेड वाहनाने नागरी रोडनी हिंगणघाट कडे दारुचा माल घेऊन वाहतूक करीत आहे. अशा खात्रीशीर खबरे वरून सदर माहीती पोलीस निरीक्षक श्री अनिल राऊत यांना देवून त्याचे मार्गदर्शनात पंच व पोस्टाँप सह सरकारी दवाखाना रोडणी नाकेबंदी करीत असताना माहितीप्रमाणे एक मोपेड वाहन येताना दिसल्याने पो. स्टॉप चे मदतीने नाकेबंदी करून थांबवून पंचांसमक्ष मोपेड चालक या विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सुजल विनोद कडू वय 18 वर्ष राहणार तहसील वॉर्ड हिंगणघाट ता.हिंगणघाट यांचे ताब्यातून एक चुंगडीत1) प्रीमियम कंपनीच्या देशी दारू ने भरलेल्या 150 प्लास्टिक शिशा दारू किंमत 15,000रू, 2) डेस्टिनी प्राईम कंपनीची मोपेड क्र MH 32 AW 2465 कीं 70,000रू असा एकूण जुमला किंमत 85,000रू चा माल बिना पास परवाना अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने पोलीस ठाणे हिंगणघाट येथे कलम 65(अ )(ई ),77(A)दारूबंदी कायदा सहकलंम3(1),181,130/177 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या कारवाईत सोनू उर्फ प्रवीण ज्ञानेश्वर भांगे वय 33 वर्ष राहणार डांगरी वॉर्ड हिंगणघाट याच्या घरझडतीत दोन लिटरचे रॉयल स्टॅग कंपनीचे विदेशी दारू ने भरलेले पाच बंपर किंमत 15,000/रु चा दारुमाल तसेच तिसऱ्या कारवाईत संत चोखोबा वॉर्ड येथील राहणारा ओम सुपारे याच्यावर कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारूच्या रॉकेट कंपनीच्या 30 शिषा की.3000/रु दारुमाल जप्त करण्यात आला.तिन्ही कार्यवाही दरम्यान जुमला किंमत 1, 03,000/रु. चा मुद्देमाल जप्त करून आरोपींता विरुद्ध कारवाई करण्यात आली.ही संपूर्ण कारवाई मा.पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल सा , मा.अप्पर पोलीस अधीक्षक,सदाशिव वाघमारे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक व मा., पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे इन्चार्ज सपोनि पद्माकर मुंडे, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, रोहित साठे यांनी केली.

पाडळसे येथे होणाऱ्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या 'श्री शिवमहापुराण' कथेचे सविस्तर नियोजन आणि प्रशासकीय मागण्यांची माहिती खालीलप्रमाणे आहेप्रशासकीय विभागांकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या आयोजन समितीने दि. १६/०२/२०२६ रोजी विविध सरकारी विभागांना पत्र देऊन खालील सुविधांची मागणी केली आहे:सार्वजनिक बांधकाम विभाग तापी नदी पुलावर सुरक्षा जाळी बसवणे, तात्पुरते दुभाजक टाकणे, रस्त्यांची डागडुजी करणे आणि तापी पुलावरील भार कमी करण्यासाठी शेळगाव बॅरेजवरील पूल सुरू करणे.जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन तापी नदीवर NDRF टीमची नियुक्ती करणे आणि नदीपात्रात तात्पुरता घाट बांधणे.रेल्वे प्रशासन कथा काळात भुसावळ रेल्वे स्टेशनच्या उत्तर भागात भाविकांची सोय करणे आणि अतिरिक्त मेमू ट्रेन सुरू करणे.परिवहन व पोलीस विभाग अवजड वाहने अन्य मार्गाने वळवणे आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी ५ ठिकाणी ॲम्बुलन्स व अग्निशामक दलाची व्यवस्था करणे.* इतर सेवा MSEB कडून अखंडित वीजपुरवठा, नगरपालिकेकडून मोबाईल टॉयलेट्स व पाणी टँकर, आणि आरोग्य विभागाकडून अद्ययावत वैद्यकीय पथके तैनात करणे.कथा स्थळाचे नियोजन व व्यवस्थाभाविकांच्या सुविधेसाठी कथा स्थळावर खालीलप्रमाणे भव्य रचना करण्यात आली आहे:मंडप व्यवस्था १३२ x ६०० फुटाचा एक आणि १०० x ६०० फुटाचे दोन असे एकूण तीन जर्मन हँगर डोम उभारण्यात येणार आहेत.स्टेज रचना ४० x ८० फुटांचा मुख्य गुरुदेव स्टेज, संगीतकार स्टेज आणि आस्था चॅनेलच्या चित्रीकरणासाठी स्वतंत्र स्टेज असेल.भोजन व पाणी हॉटेल सहारा समोरील भागात भोजन व्यवस्था असून भाविकांसाठी जागेवर पदार्थ पुरवण्याची सोय असेल. पिण्याच्या पाण्यासाठी १,००० लिटरच्या टाक्या जागोजागी ठेवल्या जातील.* स्वच्छता व आरोग्य: अकलूद शिवारामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र अंघोळीची व्यवस्था आणि बॉक्स टॉयलेट्सची सोय असेल. कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी व ट्रॅक्टर तैनात राहतील.मदत केंद्रेHP पेट्रोल पंपाजवळ आणि कथा प्रवेशद्वाराजवळ पोलीस मदत केंद्र, मेडिकल टीम, सीसीटीव्ही कक्ष आणि स्टॉलची व्यवस्था असेल.कार्यक्रमाचे वेळापत्रक ९ मार्च २०२६ (सोमवार) सकाळी तापी नदीपासून कथा स्थळापर्यंत भव्य कलश यात्रा आणि दुपारी ४ वाजता पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे भुसावळ येथे आगमन.१० ते १५ मार्च २०२६ दुपारी २ ते ५ या वेळेत शिवमहापुराण कथा श्रवण सोहळा.१६ मार्च २०२६ (सोमवार) सकाळी ८ ते ११ या वेळेत अंतिम कथा सत्र होऊन दुपारी ३ वाजता गुरुदेव सिहोरकडे प्रस्थान करतील.पार्किंग व प्रवेश मार्गभुसावळ कडील पार्किंग दुचाकी वाहने संत आसाराम बापू आश्रमाजवळ, तर चारचाकी वाहने यावल रोडवर असतील.प्रवेश भुसावळ-जळगाव-यावल कडील भाविक हॉटेल सहारा समोरून, तर सावदा-रावेर कडील भाविक अकलूद गावाकडील रस्त्याने प्रवेश करतील

पाडळसे येथे होणाऱ्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या 'श्री शिवमहापुराण' कथेचे सविस्तर नियोज…

भद्रावतीत दुर्गा माता मंदिर फोडी प्रकरण उघड; आरोपी अटकेत, चोरीचा मुद्देमाल जप्त.. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.28:- भद्रावती शहरातील बाजार वार्ड परिसरातील दुर्गा माता मंदिर येथे मंदिर फोडून दानपेटीतील रक्कम चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबत भद्रावती पोलीस ठाणे येथे अप क्र. 425/2026 अन्वये कलम 331(4), 305(अ) B.N.S. 2023 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी राजेश गोपीनाथ दास (वय 62, रा. गजानन नगर, रेल्वे स्टेशन रोड, भद्रावती) यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीनुसार, दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी मंदिर बंद करून पुजारी घरी गेले होते. त्यानंतर दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता मंदिर उघडण्यासाठी गेले असता मंदिराचे कुलूप व दानपेटीचा तळ तोडलेला आढळून आला. दानपेटीतील अंदाजे पाच ते सात हजार रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे निदर्शनास आले.सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी संशयित शुभम विठ्ठल झाडे (वय 31, रा. झाडे प्लॉट, भद्रावती) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली 4,100 रुपये रोख रक्कम तसेच दानपेटी फोडण्यासाठी वापरलेली एक लोखंडी सब्बल (किंमत अंदाजे 250 रुपये) असा एकूण सुमारे 4,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुमुक्का सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल तसेच पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील जीपीएसआय गजानन तुपकर, पोहावा जगदीश झाडे, विश्वनाथ चौधरी, पो.अं. योगेश घाटोळे, संतोष राठोड व खुशाल कावडे यांनी केली. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

भद्रावतीत दुर्गा माता मंदिर फोडी प्रकरण उघड; आरोपी अटकेत, चोरीचा मुद्देमाल जप्त..����������������…

कर्तव्यनिष्ठ सेवेचा गौरव; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा भावनिक सत्कार सोहळा........................................ वर्धा पोलीस दलात प्रदीर्घ व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावून वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा वर्धा पोलीस यांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. अनेक वर्षे जनसेवेसाठी कार्यरत राहिलेल्या अधिकाऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कारया कार्यक्रमात वर्धा जिला पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच वर्धा जिला अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती विशेष भावनिक ठरली.सेवानिवृत्त झालेले अधिकारीश्री. नारायण आर. कुंभलवार – ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, वर्धा – ३७ वर्षांची उल्लेखनीय सेवाश्री. धर्मपाल शंकरराव मानकर – श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन पुलगाव – ३५ वर्षांची निष्ठावंत सेवापोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शनयावेळी बोलताना वर्धा जिला पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले की,“पोलीस सेवा ही अत्यंत आव्हानात्मक असते. कुटुंब आणि कर्तव्य यांचा समतोल राखत तुम्ही दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. पोलीस दलातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि जनसेवेचा वारसा तुम्ही समर्थपणे जपला आहे.”तसेच त्यांनी सर्व निवृत्त अधिकाऱ्यांना निरोगी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.मोठ्या संख्येने उपस्थितीजिल्हा गुन्हे आढावा बैठकीनिमित्त सर्व वरिष्ठ अधिकारी मुख्यालयात उपस्थित होते. या सोहळ्यास पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. पुंडलिक भटकर, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सेवेचा प्रवास संपला असला तरी समाजासाठी दिलेला आदर्श कायम प्रेरणादायी राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.।।मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

कर्तव्यनिष्ठ सेवेचा गौरव; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा भावनिक सत्कार सोहळा.....................…

Load More
That is All