Read more

View all

मा.जिला न्यायाधीश वर्षा बा. पारगांवकर के हस्ते अधीक्षक रविंद्र बाभुलकर का गौरवपूर्ण सत्कार.............................. , .मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक .................................हिंगणघाट - “बाभुलकर ने अपने संपूर्ण सेवाकाल में निष्ठा, ईमानदारी और कर्तव्यपरायणता का उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत किया है। न्यायालयीन प्रशासन को सुचारू रूप से चलाने में उनका महत्वपूर्ण योगदान रहा है। उनके शांत, संयमी और सहयोगी स्वभाव के कारण वे सभी के प्रिय बने रहे।”ऐसे उद्गार जिला न्यायाधीश-१ वर्षा बा. पारगांवकर ने व्यक्त किए। वे दीवानी न्यायालय वरिष्ठ स्तर के सेवानिवृत्त अधीक्षक रविंद्र बाभुलकर के सेवा निवृत्ति के निमित्त आयोजित कार्यक्रम में अध्यक्ष के रूप में बोल रही थीं।तसे ही उन्होंने आगे यह भी कहा कि, “ऐसे कर्तव्यनिष्ठ और अनुशासित अधिकारियों के कारण कोई भी संस्था समृद्ध होती है। वे संस्था की अमूल्य संपत्ति होते हैं।”स्थानीय वरिष्ठ स्तर के दीवानी न्यायालय में अधीक्षक पद पर कार्यरत रहे मा. श्री रविंद्र बाभुलकर का सेवामुक्ति का प्रसंग अत्यंत भावनात्मक एवं स्मरणीय वातावरण में मनाया गया।मा. श्री बाभुलकर की नियुक्ति दिनांक ०१/०९/१९९४ को कनिष्ठ लिपिक के रूप में हुई थी। लगभग ३२ वर्षों के दीर्घ सेवाकाल में उन्होंने वर्धा जिले के विभिन्न न्यायालयों में अत्यंत ईमानदारी, निष्ठा और कर्तव्यपरायणता से कार्य किया। उनकी अनुशासित कार्यप्रणाली तथा कार्य के प्रति अटूट प्रतिबद्धता के कारण उन्होंने न्यायमूर्ति, वकील वर्ग तथा पक्षकारों के मन में विशेष स्थान निर्मित किया है।इस निमित्त लीगल कल्चरल क्लब, हिंगणघाट शाखा की ओर से विदाई समारोह एवं सत्कार कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में मा. जिला न्यायाधीश-१ श्रीमती वर्षा बा. पारगांवकर के हस्ते श्री बाभुलकर को सम्मानपत्र, शाल एवं स्मृति चिन्ह प्रदान कर सम्मानित किया गया।इस अवसर पर मा. जिला न्यायाधीश-२ श्री धनराज वाय. काले, मा. दीवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री सैयद हसन, मा. दीवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्री गवई, अधिवक्ता संघ के सचिव एड. विजयेंद्र ढेकले, लीगल कल्चरल क्लब के शाखाध्यक्ष एड. इब्राहिम बख्श, सचिव एड. अस्मिता मुंगल खानेकर, एड. वर्षा नंदेश्वर, एड. गणवीर, एड. कुणाल दुर्गे, सहायक अधीक्षिका दुर्गे मैडम तथा न्यायालय के अधिकारी, कर्मचारी एवं अधिवक्ता बड़ी संख्या में उपस्थित थे।कार्यक्रम की प्रस्तावना एवं संचालन एड. इब्राहिम बख्श ने किया, जबकि आभार प्रदर्शन संदीप डोंगरे ने किया। कार्यक्रम के सफल आयोजन के लिए शिवानी पंडित ने विशेष परिश्रम किया।इस अवसर पर उपस्थित सभी मान्यवरों ने श्री बाभुलकर की सेवाभावी वृत्ति के प्रति कृतज्ञता व्यक्त करते हुए उनके आगामी जीवन के लिए उत्तम स्वास्थ्य, सुख एवं सफलता की शुभकामनाएं दीं।

मा.जिला न्यायाधीश वर्षा बा. पारगांवकर के हस्ते अधीक्षक रविंद्र बाभुलकर का गौरवपूर्ण सत्कार.......…

मा.जिला न्यायाधीश वर्षा बा. पारगांवकर के हस्ते अधीक्षक रविंद्र बाभुलकर का गौरवपूर्ण सत्कार.............................. , .मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक .................................हिंगणघाट - “बाभुलकर ने अपने संपूर्ण सेवाकाल में निष्ठा, ईमानदारी और कर्तव्यपरायणता का उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत किया है। न्यायालयीन प्रशासन को सुचारू रूप से चलाने में उनका महत्वपूर्ण योगदान रहा है। उनके शांत, संयमी और सहयोगी स्वभाव के कारण वे सभी के प्रिय बने रहे।”ऐसे उद्गार जिला न्यायाधीश-१ वर्षा बा. पारगांवकर ने व्यक्त किए। वे दीवानी न्यायालय वरिष्ठ स्तर के सेवानिवृत्त अधीक्षक रविंद्र बाभुलकर के सेवा निवृत्ति के निमित्त आयोजित कार्यक्रम में अध्यक्ष के रूप में बोल रही थीं।तसे ही उन्होंने आगे यह भी कहा कि, “ऐसे कर्तव्यनिष्ठ और अनुशासित अधिकारियों के कारण कोई भी संस्था समृद्ध होती है। वे संस्था की अमूल्य संपत्ति होते हैं।”स्थानीय वरिष्ठ स्तर के दीवानी न्यायालय में अधीक्षक पद पर कार्यरत रहे मा. श्री रविंद्र बाभुलकर का सेवामुक्ति का प्रसंग अत्यंत भावनात्मक एवं स्मरणीय वातावरण में मनाया गया।मा. श्री बाभुलकर की नियुक्ति दिनांक ०१/०९/१९९४ को कनिष्ठ लिपिक के रूप में हुई थी। लगभग ३२ वर्षों के दीर्घ सेवाकाल में उन्होंने वर्धा जिले के विभिन्न न्यायालयों में अत्यंत ईमानदारी, निष्ठा और कर्तव्यपरायणता से कार्य किया। उनकी अनुशासित कार्यप्रणाली तथा कार्य के प्रति अटूट प्रतिबद्धता के कारण उन्होंने न्यायमूर्ति, वकील वर्ग तथा पक्षकारों के मन में विशेष स्थान निर्मित किया है।इस निमित्त लीगल कल्चरल क्लब, हिंगणघाट शाखा की ओर से विदाई समारोह एवं सत्कार कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में मा. जिला न्यायाधीश-१ श्रीमती वर्षा बा. पारगांवकर के हस्ते श्री बाभुलकर को सम्मानपत्र, शाल एवं स्मृति चिन्ह प्रदान कर सम्मानित किया गया।इस अवसर पर मा. जिला न्यायाधीश-२ श्री धनराज वाय. काले, मा. दीवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री सैयद हसन, मा. दीवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्री गवई, अधिवक्ता संघ के सचिव एड. विजयेंद्र ढेकले, लीगल कल्चरल क्लब के शाखाध्यक्ष एड. इब्राहिम बख्श, सचिव एड. अस्मिता मुंगल खानेकर, एड. वर्षा नंदेश्वर, एड. गणवीर, एड. कुणाल दुर्गे, सहायक अधीक्षिका दुर्गे मैडम तथा न्यायालय के अधिकारी, कर्मचारी एवं अधिवक्ता बड़ी संख्या में उपस्थित थे।कार्यक्रम की प्रस्तावना एवं संचालन एड. इब्राहिम बख्श ने किया, जबकि आभार प्रदर्शन संदीप डोंगरे ने किया। कार्यक्रम के सफल आयोजन के लिए शिवानी पंडित ने विशेष परिश्रम किया।इस अवसर पर उपस्थित सभी मान्यवरों ने श्री बाभुलकर की सेवाभावी वृत्ति के प्रति कृतज्ञता व्यक्त करते हुए उनके आगामी जीवन के लिए उत्तम स्वास्थ्य, सुख एवं सफलता की शुभकामनाएं दीं।

मा.जिला न्यायाधीश वर्षा बा. पारगांवकर के हस्ते अधीक्षक रविंद्र बाभुलकर का गौरवपूर्ण सत्कार.......…

विकासाचा रथ अखंड धावत राहणार !**@) विकासपूरूष डाॅ. अकूंश लाड*. (मानवत / अनिल चव्हाण)———————————“विकासाची गती कायम ठेवत आश्वासन पूर्ण!”*उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते भगतसिंग नगरमध्ये मारुती मंदिर व भव्य उद्यानाचे भूमिपूजन करण्यात आले.शहराच्या सर्वांगीन विकासाला वेग देत दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवण्याची परंपरा कायम ठेवत उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १ मधील भगतसिंग नगर येथे हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर मारुती (हनुमान) मंदिर व भव्य उद्यानाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या दीर्घ काळच्या मागणीला अखेर मूर्त रूप मिळाले आहे.भगतसिंग नगरमधील मंदिर व उद्यान उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत डॉ. अंकुशराव लाड यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा प्रकल्प मार्गी लावला, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले.या कार्यक्रमाला प्रभागाचे नगरसेवक राजकुमार खरात व राजेश वासुंबे यांच्यासह संजयजी बांगड, दत्तप्रसादजी बांगड, ॲड. अनिरुद्ध पांडे, मोहनराव लाड, दत्तराव चौधरी, किशोर लाड, विनोद रहाटे, ॲड. गणेश मोरे, स्वप्नील शिंदे, गणेश वासुंबे, सत्यशिल धबडगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांच्या स्वप्नांना मिळाले प्रत्यक्ष रूपया ठिकाणी उभारण्यात येणारे मारुती मंदिर हे धार्मिक श्रद्धेचे केंद्र ठरणार असून, सोबतच विकसित होणारे भव्य उद्यान परिसरात हरित वातावरण निर्माण करून नागरिकांना विरंगुळ्याचे आधुनिक ठिकाण उपलब्ध करून देणार आहे. डॉ. अकूंशराव लाड यांच्या पुढाकारामुळे हा संपूर्ण परिसर विकासाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. पुढील विकासकामांची ठोस घोषणायावेळी नागरिकांशी संवाद साधताना डॉ. अंकुश लाड यांनी स्पष्ट केले की,भगतसिंग नगरला मुख्य रस्त्याशी जोडणारा डी.पी. प्लॅनमधील रस्ता लवकरच पूर्ण केला जाणार आहे. तसेच या भागातील दुसऱ्या ओपन स्पेसमध्ये बुद्ध विहार व आणखी एक उद्यान उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. “दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही”नागरिकांच्या सत्काराला उत्तर देताना डॉ. लाड म्हणाले,“शहराच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. निवडणुकीत दिलेली प्रत्येक आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. जनतेने दिलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणा आहे. काम करत आलोय, आणि पुढेही काम करत राहणार आहे.” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला राम कष्टे, सतीश मगर, नितीन मगर, नारायण गिरी, मुंजा कदम, मौली कदम, दत्ता बंडेवाड, भरत ढाले, प्रकाश ढाले, अशोक ढाले, असद खान, वाजेद शेख, समाधान साळवे, अमोल मगर, राजू चव्हाण, नितीन घनसावंत, प्रवीण मगर, विष्णू हरणे, नामदेव खताळे, गजानन बंडेवाड, रत्नदीप बोराडे, बाबासाहेब बोराडे, सुलतान भाई कुरेशी, श्रवण गायकवाड, सोनू अवचार आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, डॉ. अंकुश लाड यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग नगरमध्ये सुरू झालेला हा प्रकल्प केवळ एक विकासकाम नसून, नागरिकांच्या विश्वासाची पूर्तता आणि शहराच्या प्रगतीची नवी दिशा ठरत आहे.***

विकासाचा रथ अखंड धावत राहणार !**@) विकासपूरूष डाॅ. अकूंश लाड*.�����������������������…

*कारागृह लिपीक तांत्रिक कर्मचारी संघटनेचे अधिवेशनास उपस्थित रहा**@)> प्रमोद तारे.*. (मानवत / अनिल चव्हाण)——————————— कारागृह लिपीक तांत्रिक कर्मचारी संघटनेचे १ ले अधिवेशन दिनांक ४ एप्रील २०२६ रोजी भारतरत्न सर विश्वेश्वरया सभागृह, सिंचन भवन, मंगळवारपेठ पुणे येथे सकाळी १०.०० वाजता आयोजित केले असून सदर अधिवेशनास मा. डॉ. श्री. भुषण कुमार उपाध्याय, पोलीस महासंचालक (सेवानिवृत्त) होम गार्डस आणि नागरी संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई, मा श्रीमती स्वाती साठे सेवानिवृत्त विशेष कारागृह महानिरीक्षक आणि मा.श्री. विश्वास काटकर सरचिटणीस राज्य सरकारी कर्मचारी संघटना मुंबई आणि मा. श्री. अशोक दगडे अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी संघटना मुंबई हे मान्यवर उपस्थित राहणार आहेततरी सदर अधिवेशनास आपल्या वर्तमानपत्रास प्रसिध्दी देउन उपस्थित राहण्याचे आवाहनसरचिटणीस वसंत सपकाळ, परभणी उमेश देशमूख, प्रमोद तारे,जुनेद शेख यांनी केले आहे.***

* कारागृह लिपीक तांत्रिक कर्मचारी संघटनेचे अधिवेशनास उपस्थित रहा**@)> प्रमोद तारे.*.����������…

*स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेच्या वतीने आदर्श क्रिडा शिक्षक पूरस्कार माणिकराव सिसोदे माखणीकर यांना जाहिर*. (*मानवत / प्रतिनिधी.*)———————————* स्वामी विवेकानंद सेवा भावी संस्थे अध्यक्ष, प्राचार्य अनंत गोलाईतसचिव, श्रीमती अनिता अनंत गोलाईत यांच्या वतीने माणिक सिसोदे यांच्या निवडीचे पत्रमा. श्री. प्राचार्य, नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मानवत यांना देण्यात आले. मानवत येथील स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेच्या वतीने आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार २०२६ माणिकराव सिसोदे माखणीकर यांना जाहिर मानवत तेथील स्वामी विवेकानंद सेवाभाई संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक, संघटनात्मक आणि कलात्मक उत्कृष्टते ची दखल घेऊन, नेताजी सुभाष विद्यालयातील क्रीडा शिक्षक, श्री. माणिक शामरावजी सिसोदे माखणीकर, यांच्या कार्याची दखल घेऊन स्वामी विवेकानंद सेवाभाई संस्थेच्या विशेष समितीच्या शिफारशी नुसार, संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या 'आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार-२०२६' साठी माणिकराव सिसोदे माखणीकर यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा दिनांक १४/०४/२०२६ रोजी स्वामी विवेकानंद सेवाभाई संस्थेचे मुख्यालय असलेल्या अनंत हॉलमध्ये, माननीय श्री. अनंतरावजी गोलाईत साहेब आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. आपणास विनंती की, आपल्या नेताजी सुभाष विद्यालयातील माणिकराव सिसोदे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या क्रीडा शिक्षकांसोबत पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना उपस्थित राहण्या बद्दल कळवावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अनंत गोलाईत यांनी केले.***

स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेच्या वतीने आदर्श क्रिडा शिक्षक पूरस्कार माणिकराव सिसोदे माखणीकर य…

🚩🙏*अंधारवड मारोती मंदीरात हनूमान जन्मोत्सव साजरा*. (मानवत / प्रतिनिधी.)———————— हनुमान जन्मोत्सव आज संपूर्ण देशभरात अत्यंत उत्साह आणि भक्तिभावाने हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात आहे. अंधारवड मारोती मंदिरांमध्ये आज भल्या पाहटे पासून भक्तांची मोठी गर्दी, भजन-कीर्तन, आरती आणि रामनामाच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले आहे. तर शहरातील शिवाजी नगर या सह अनेक ठिकाणी महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.भगवंत हनुमंतराय यांच्या जीवनातून आपल्याला मिळणारे प्रेरणादायी गुण अखंड भक्ती – श्रीरामांप्रती अढळ श्रद्धा शक्ती आणि पराक्रम – धर्मासाठी वापरलेले अतुलनीय सामर्थ्य नम्रता – शक्ती असूनही अहंकाराचा अभाव बुद्धिमत्ता – संकटात योग्य निर्णय घेण्याची क्षमता सेवा भावना निःस्वार्थ समाजसेवाहनुमानजी आपल्याला शिकवतात की खरा बलवान तोच जो विनम्र, कर्तव्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठ असतो. त्यांच्या आदर्शांवर चाललो तर आपले जीवन नक्कीच यशस्वी आणि प्रेरणादायी होईल. याची श्वाशवती आज भाविकांना आली. मानवत तालूक्यातील पंचकोशितील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.**०

🚩🙏*अंधारवड मारोती मंदीरात हनूमान जन्मोत्सव साजरा*.���������������������…

रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भाषण करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी.. (प्रतिनिधी फैजपूर }रावेर व फैजपूर येथे रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आलेल्या कथित भडकाऊ भाषणामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाल्याचा आरोप समोर आला असून, या प्रकरणी जळगाव जिल्हा एकता संघटनेच्या व कौमी एकता फाउंडेशन चा वतीने पोलिस प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.तक्रारीनुसार, संबंधित कार्यक्रमात काही वक्त्यांनी समाजात वैमनस्य आणि द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.या संदर्भात रावेर व फैजपूर पोलिस स्टेशन तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार सादर करण्यात आली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत भारतीय कायद्यांतील विविध कलमांचा उल्लेख करून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा उल्लेख करत, अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून (सुओ मोटू) गुन्हा नोंदवून तात्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, तक्रारदारांनी व्हायरल व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून, पोलिस प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवेदन देताना फारुख शेख जळगाव शेख कुरबान फैजपूर कलीम मेमबर रियाज मेमबर शेख फारुख अब्दुला वसीम जनाब अ रजजक भाई अवेस भांजा असीफ मेकॅनिकल अखतर पहेलवान सुलतान चाईनीज जफर अली अमीन शेख अनीस शा ह ताहेर शेख जळगाव अड साब रावेर. तसेच असंख्य मुस्लिम युवक उपस्थित होते

रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भाषण करणाऱ्या विरुद्ध कठोर कार…

बेकिंग न्युज... रावेर शहरातील लक्ष्मी गॅस भारत गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार.. दोन दोन वेळा बुकिंग करून देखील घरगुती गॅस पुरवठा करण्यास एजन्सीचा नकार. गॅस एजन्सी सह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची जनतेची मागणी. (जळगाव जिल्हा प्रतिनिधी )रावेर तालुक्यात एक महिन्यापासुन ग्राहकांची पिळवणुक सुरु असुन भारत गेस एजन्सी रावेर कडुन कुसूंबा गावांसह अनेक गावांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा चा सेवा पुरविणाऱ्यास नेहमी नकार दिला जात आहे तसेच ह्या भारत गेस एजन्सी रावेर ने गावोगावी एजंट बनवले आहेत ..ह्या एजंट मार्फत जास्तीचे पैसे घेऊन भोंगळ कारभार सुरु असल्याची जनतेमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. आणि अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी करून ग्राहकांना लुबाडण्याचा धंदा जोरदार सुरू असल्याची चर्चा देखील जोर धरत आहे.. ग्राहक येजन्सी मध्ये गेल्यावर कर्मचाऱ्यांकडुन उडवा उड वीची उत्तरे दिली जात आहे.याकडे मात्र संबंधित अधिकारी का दुर्लक्ष करीत आहेत..असा प्रश्र्न देखील सध्या स्थितीत उपस्थित झाला आहे. शिपाई म्हणतो मीच मॅनेजर आणि एजन्सी मध्ये गेल्यावर ग्राहकांना सध्या स्थितीत सर्वच मेनेजर असल्याचे दिसत आहे आणि जनतेकडून बोलले जात आहे. तसेच. तरी संबधीत जिल्हा अधिकारी तालुका अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांनी या संपूर्ण प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन घरगुती गॅस अभावी होणारे जनतेचे हाल थांबवावे आणि सर्व ग्राहकांची होणारी पिळवनक देखील थांबवावी आणि ग्राहकांना घरगुती गॅस पुरवठा करण्यात यावा अशी जनतेची रास्त स्वरुपाची मागणी आहे आणि सबंधित भारत गॅस सिलिंडर देण्यासाठी नकार देणाऱ्यान्वर कठोर कारवाई करावी अशी देखील रावेर तालुक्यातील जनतेची मागणी आहे..

बेकिंग न्युज... रावेर शहरातील लक्ष्मी गॅस भारत गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार.. दोन दोन वेळा बुकिंग कर…

तहसीलमध्ये दिरंगाईचा खेळ उघड; इम्रान खान आक्रमक मुनगंटीवारांचे थेट आदेश! उंबरकर प्रकरणाला वेग.. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.31 :- गावराळा येथील रहिवासी व नगरपालिका भद्रावतीचे सेवानिवृत्त कर्मचारी राजू उंबरकर यांच्या जमिनीच्या दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या फेरफार प्रकरणाने अखेर निर्णायक वळण घेतले असून, राजकीय हस्तक्षेपानंतर तहसील प्रशासन अक्षरशः हलल्याचे चित्र समोर आले आहे. उपलब्ध कागदपत्रांच्या सखोल अभ्यासातून असे स्पष्ट होते की, संबंधित गट क्रमांकातील जमिनीच्या व्यवहारासंदर्भात आवश्यक असलेली नोटीस बजावणे, जाहिरनामा प्रसिद्ध करणे, अर्ज सादर करणे, तसेच पूर्वीच्या नोंदींची पूर्तता ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. तरीदेखील फेरफार नोंद मुद्दाम प्रलंबित ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून, यामुळे उंबरकर यांच्यासह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. दरम्यान, दि. ३० मार्च रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी थेट भद्रावती तहसील कार्यालयात धडक देत संबंधित बाबूंना जाब विचारला. कागदोपत्रांची प्रत्यक्ष तपासणी करून “प्रकरण इतक्या काळ का रखडले?” याचा खुलासा मागत त्यांनी प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून इम्रान खान यांनी तत्काळ महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना दूरध्वनीवरून संपूर्ण माहिती दिली. यानंतर मुनगंटीवार यांनी थेट हस्तक्षेप करत तहसीलदार भद्रावती यांना “फेरफार प्रकरण तात्काळ निकाली काढा” असे स्पष्ट व कठोर आदेश दिले.“क्षेत्र कोणतेही असो, कार्यकर्त्यांच्या हाकेला मुनगंटीवार धावून येतात,” याची प्रचिती पुन्हा एकदा या घटनेतून दिसून आली. वरिष्ठ पातळीवरून आदेश मिळताच तहसील प्रशासनात तातडीची हालचाल सुरू झाली. तहसीलदारांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आणि संबंधित कर्मचाऱ्यांना नियमानुसार फेरफार प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती पुढे आली आहे. कागदपत्रांनुसार, संबंधित प्रकरणात आधीच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली असताना देखील फाईल प्रलंबित ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा प्रकारच्या दिरंगाईमुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. भद्रावती तहसीलमध्ये यापूर्वीही फेरफार प्रकरणांतील दिरंगाईमुळे गंभीर परिणाम घडले आहेत. विशेषतः शेतकरी परमेश्वर मेश्राम प्रकरणात दीर्घकाळ चाललेल्या टाळाटाळीमुळे टोकाचे पाऊल उचलले गेले होते, ज्यामुळे महसूल यंत्रणेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर उंबरकर प्रकरण अधिक संवेदनशील व महत्त्वाचे ठरत आहे. आता मुनगंटीवार यांच्या थेट आदेशानंतर व इम्रान खान यांच्या धडक हस्तक्षेपामुळे हे प्रकरण मार्गी लागण्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकत असून, उंबरकर यांना त्यांच्या जमिनीचा कायदेशीर हक्क मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असली तरी भविष्यात अशा प्रकारची दिरंगाई होऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या घटनेमुळे भद्रावती तहसीलमधील फेरफार प्रक्रियेतील त्रुटी, दिरंगाई आणि कामकाजाची पद्धत पुन्हा एकदा चर्चेत आली असून, महसूल यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज स्पष्ट झाली आहे.

तहसीलमध्ये दिरंगाईचा खेळ उघड; इम्रान खान आक्रमक मुनगंटीवारांचे थेट आदेश! उंबरकर प्रकरणाला वेग..��…

Load More
That is All