Read more

View all

आदिवासी एकता परिषद प्रेरीत भिल प्रदेश क्रांती सेना द्वारा आयोजित ॳबरसिग महाराज प्रेरणादिवस.. 25 फेब्रुवारी निमीत्ताने स्त्री मुकतीचे प्रेरणास्थान आदिवासी महाराणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा. (यावल यासीन तडवी यावल तालुका विभागीय संपादक) आदिवासी समाजाच्या काही समशा सोडविण्यासाठीउपथीत मानेवर साहेब अरुण पवार धनंजय दादा ठाकरे भिल प्रदेश क्रांती सेना संस्थापक सुनिल भाऊ गायकवाड संस्थापक आनंद सिंग अध्यक्ष ठाकरे दादा प्रमोद ठाकरे यशवंत अहिरे मनिष सर आदिवासी एकता मंच हुसेन तडवी मुकेश वाघ सदाशिव भिल सिकंदर तडवी भुरा भिल नाना भिल मंगल वाघ अशोक भिल सलिम तडवी सरपंच फिरोज तडवी यासीन तडवी सुधाकर भिल खडु भिल कृष्णा भिल भगवान मोरे अतुल भिल बादल भिल प्रितम भिल खेमचंद भिल कलाबाई भिल विमल बाई भिल अलकाबाई भिल अनिता भिल गुडी भिल महिला उपस्थीत होत्या यावल तडवी कॉलनी मधी कारेकरम पार पडले

आदिवासी एकता परिषद प्रेरीत भिल प्रदेश क्रांती सेना द्वारा आयोजित ॳबरसिग महाराज प्रेरणादिवस..     …

रावेर पोलिसांचा मोठा विजय ६७ सीसीटीव्ही तपासले, आणि केला लुटाऱ्यांचा पर्दाफाश.. (जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे) रावेर तालुक्यात खळबळ उडविणाऱ्या ८ लाख रुपयांच्या लूटप्रकरणाचा रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने यशस्वी पर्दाफाश केला आहे. अवघ्या काही दिवसांत ७ आरोपींना अटक करून पोलिसांनी तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत समाधान व्यक्त होत आहे. बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचे कर्मचारी गौरव वाघ व तौफिक तेली यांना सावदा, फैजपूर व रावेर परिसरात वसुलीसाठी पाठवले होते. रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास खानापूर आरटीओ बॅरेलजवळ ८ ते ९ इसमांनी त्यांच्या दुचाकीला अडवून रोख रकमेची बॅग हिसकावून नेली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळी सीसीटीव्ही नसतानाही पोलिसांनी हार न मानता रावेर, सावदा व फैजपूर परिसरातील तब्बल ६७ सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच सायबर विभागाच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा माग काढण्यात आला.गोपनीय माहितीच्या आधारे रावेर येथील बंडू चौक परिसरातून ७ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.अटक आरोपी :फारुख शेख रईस (१९), अत्ताउल्लाह खान दाऊद खान उर्फ सोनू, शेख सईद शेख कादर उर्फ सुपडू, शेख समीर शेख कलीम उर्फ चिकू, राहील खान दाऊद खान, रहेमान खान अय्युब खान उर्फ भुऱ्या व अक्रम खान इस्माईल खान.आरोपींकडून २ लाख ५५ हजार रुपये रोख व ९५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शेख हसन शेख अफजल उर्फ हसन फावड्या हा सराईत गुन्हेगार असून तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत.न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या आरोपींना २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक अनिल बडगुजर तसेच मा. श्री अण्णासाहेब घोलप, पोलीस उपअधीक्षक (चोपडा विभाग – अति. कार्यभार) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील, गुन्हे शोध पथक व सायबर विभागातील अधिकारी-अंमलदारांनी मोलाचे योगदान दिले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे रावेर तालुक्यातील नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

रावेर पोलिसांचा मोठा विजय ६७ सीसीटीव्ही तपासले, आणि केला लुटाऱ्यांचा पर्दाफाश..������������������…

“संघटनेच्या कार्याचा विजय”; शंकर बोरघरे यांना ‘उत्कृष्ट संघटक’ पुरस्कार जाहीर..! महेश निमसटकर विभागीय संपादक भद्रावती )भद्रावती दि.26 :-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांना राज्यस्तरीय “उत्कृष्ट संघटक” पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. २८ फेब्रुवारी रोजी वाशिम येथे होणाऱ्या २७ व्या राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात संघटनात्मक बळकटी, पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा, ग्रामीण पत्रकारांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि डिजिटल माध्यमांमधून संघटनेचा विस्तार या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे. अनेक आव्हानांमध्येही संघटनेचा झेंडा उंच ठेवत त्यांनी सातत्यपूर्ण नेतृत्व दिले आहे. या प्रसंगी संघाचे कार्याध्यक्ष निलेश सोमाणी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शंकर बोरघरे यांचा सन्मान म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कष्टांचा गौरव आहे.”राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी त्यांच्या संघटनात्मक निष्ठेचे कौतुक करत, “त्यांनी पदाला नव्हे तर जबाबदारीला प्राधान्य दिले,” असे नमूद केले. तसेच राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी सांगितले की, “मूल्यनिष्ठ पत्रकारिता आणि संघटनात्मक शिस्त यांचा संगम म्हणजे शंकर बोरघरे. हा पुरस्कार त्यांच्या समर्पणाची साक्ष आहे.” आनखी विदर्भ अध्यक्ष अनुपकुमार भार्गव यांनी हा सन्मान विदर्भातील पत्रकार चळवळीचा अभिमान असल्याचे सांगितले. जिल्हा संघटक रूपचंद धारणे यांनीही बोरघरे यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील पत्रकार एकत्रितपणे कार्यरत असल्याचे नमूद केले. तसेच जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, युवा कार्यकर्ते व पत्रकार बांधवांनी शंकर बोरघरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. “हा पुरस्कार केवळ व्यक्तीचा नाही, तर संघटनेच्या कार्याचा विजय आहे,” अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. न या राज्यस्तरीय सन्मानामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारितेला नवे बळ मिळाले असून, संघटनात्मक कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

“ संघटनेच्या कार्याचा विजय”; शंकर बोरघरे यांना ‘उत्कृष्ट संघटक’ पुरस्कार जाहीर..!����������������…

“संघटनेच्या कार्याचा विजय”; शंकर बोरघरे यांना ‘उत्कृष्ट संघटक’ पुरस्कार जाहीर..! महेश निमसटकर विभागीय संपादक भद्रावती )भद्रावती दि.26 :-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांना राज्यस्तरीय “उत्कृष्ट संघटक” पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. २८ फेब्रुवारी रोजी वाशिम येथे होणाऱ्या २७ व्या राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात संघटनात्मक बळकटी, पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा, ग्रामीण पत्रकारांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि डिजिटल माध्यमांमधून संघटनेचा विस्तार या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे. अनेक आव्हानांमध्येही संघटनेचा झेंडा उंच ठेवत त्यांनी सातत्यपूर्ण नेतृत्व दिले आहे. या प्रसंगी संघाचे कार्याध्यक्ष निलेश सोमाणी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शंकर बोरघरे यांचा सन्मान म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कष्टांचा गौरव आहे.”राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी त्यांच्या संघटनात्मक निष्ठेचे कौतुक करत, “त्यांनी पदाला नव्हे तर जबाबदारीला प्राधान्य दिले,” असे नमूद केले. तसेच राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी सांगितले की, “मूल्यनिष्ठ पत्रकारिता आणि संघटनात्मक शिस्त यांचा संगम म्हणजे शंकर बोरघरे. हा पुरस्कार त्यांच्या समर्पणाची साक्ष आहे.” आनखी विदर्भ अध्यक्ष अनुपकुमार भार्गव यांनी हा सन्मान विदर्भातील पत्रकार चळवळीचा अभिमान असल्याचे सांगितले. जिल्हा संघटक रूपचंद धारणे यांनीही बोरघरे यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील पत्रकार एकत्रितपणे कार्यरत असल्याचे नमूद केले. तसेच जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, युवा कार्यकर्ते व पत्रकार बांधवांनी शंकर बोरघरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. “हा पुरस्कार केवळ व्यक्तीचा नाही, तर संघटनेच्या कार्याचा विजय आहे,” अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. न या राज्यस्तरीय सन्मानामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारितेला नवे बळ मिळाले असून, संघटनात्मक कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

“ संघटनेच्या कार्याचा विजय”; शंकर बोरघरे यांना ‘उत्कृष्ट संघटक’ पुरस्कार जाहीर..!����������������…

ब्रेकिंग न्युज....भावाकडुन बहिणीची हत्या.. भद्रावती शहर हादरले.*झिंगुजी वॉर्डमध्ये घरगुती वादातून 30 वर्षीय तरुणीची तलवारीने हत्या; आई गंभीर जखमी* (महेश निमसटकर विभागीय संपादक भद्रावती )भद्रावती दि.25:- भद्रावती शहरातील झिंगुजी वॉर्ड येथे घरगुती वादातून अत्यंत धक्कादायक घटना घडली असून भावानेच आपल्या 30 वर्षीय सख्ख्या बहिणीची तलवारीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आईलाही गंभीर जखमी करण्यात आले असून तिच्यावर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मृत तरुणीचे नाव संजीवनी भोंडे (वय 30 वर्षे) असे असून आरोपी भाऊ सुरज भोंडे याने तलवारीने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घरातील किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद अचानक चिघळला आणि संतापाच्या भरात सुरजने घरात असलेल्या तलवारीने बहिणीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या संजीवनी यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेदरम्यान मध्ये पडलेल्या आई पुष्पा भोंडे यांनाही तलवारीने मारहाण करण्यात आली. त्यांच्या हातावर व शरीरावर खोल जखमा झाल्या असून प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांना तात्काळ भद्रावती येथून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जखमी अवस्थेत पुष्पा भोंडे यांनी पती शंकर भोंडे यांनी मुलगा सुरज याला भडकावून ही हत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.महत्त्वाचे म्हणजे, कुटुंबातील वातावरण काही काळापासून तणावपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे. मुलगा सुरज भोंडे व वडील शंकर भोंडे हे दोघे वेगळे स्वयंपाक करून स्वतंत्रपणे राहत होते व जेवत होते. तर संजीवनी भोंडे आणि तिची आई पुष्पा भोंडे या दोघी बाहेर कामकाज करून स्वतःचा उदरनिर्वाह करीत होत्या. कुटुंबातील मतभेदांमुळे घरात कायम वादाचे वातावरण असल्याची चर्चा परिसरात आहे.संजीवनी ही अत्यंत बुद्धिमान व कष्टाळू मुलगी म्हणून परिसरात परिचित होती. तिने पदवी शिक्षण पूर्ण केले होते व नोकरीच्या शोधात होती. पोलीस भरती तसेच लष्कर भरतीसाठीही तिने प्रयत्न केले होते. विविध शासकीय व खासगी नोकऱ्यांसाठी अर्ज भरले होते. कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी ती ब्युटी पार्लरचे काम करून घरखर्चात सहकार्य करीत होती. तिच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार कुटुंबातील मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे. आरोपीला संपूर्ण मालमत्ता एकट्याच्या नावे हवी होती, अशीही माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सुरज भोंडे व त्याचे वडील शंकर भोंडे यांना ताब्यात घेतले असून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे झिंगुजी वॉर्ड परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरगुती वादाचे इतके भीषण रूप धारण झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

*                        ब्रेकिंग न्युज....भावाकडुन बहिणीची ह…

*ड्रग्स तस्करी में शामिल पुलिसकर्मियों की अब खैर नहीं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिए सीधे 'बर्खास्तगी' के आदेश* मुंबई/ठाणे: महाराष्ट्र को नशामुक्त बनाने के लिए राज्य सरकार ने अब तक का सबसे कठोर रुख अपनाया है। मुख्यमंत्री और गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट चेतावनी दी है कि यदि कोई भी पुलिस अधिकारी या कर्मचारी ड्रग्स तस्करी या ड्रग माफियाओं के साथ मिलीभगत में पाया जाता है, तो उसे केवल निलंबित (Suspend) नहीं किया जाएगा, बल्कि सीधे सेवा से बर्खास्त (Dismiss) कर दिया जाएगा मुख्यमंत्री ने विधानसभा और विभिन्न सार्वजनिक मंचों पर यह स्पष्ट किया कि नशीले पदार्थों के खिलाफ सरकार की नीति 'जीरो टॉलरेंस' की है उन्होंने कहा कि वर्दी की आड़ में अपराध करने वालों के लिए पुलिस बल में कोई जगह नहीं है दोषी पुलिसकर्मियों के खिलाफ भारतीय संविधान के अनुच्छेद 311 के तहत कार्रवाई की जाएगी, जिससे उन्हें बिना किसी लंबी विभागीय जांच के सीधे नौकरी से निकाला जा सकेगा मकोका (MCOCA) के तहत कार्रवाई: बार-बार ड्रग्स अपराधों में शामिल अपराधियों और उनके मददगारों पर अब 'मकोका' जैसे कड़े कानून लगाए जाएंगे ड्रग्स की होम डिलीवरी के लिए इस्तेमाल होने वाली कूरियर कंपनियों को भी अब सह-आरोपी बनाया जाएगा नशीले पदार्थों के व्यापार से अर्जित की गई सभी अवैध और बेनामी संपत्तियों को जब्त करने के निर्देश दिए गए हैं ड्रग्स के खिलाफ इस लड़ाई को और मजबूत करने के लिए राज्य भर के पुलिस थानों में विशेष 'एंटी-नारकोटिक्स यूनिट' का गठन किया गया है मुख्यमंत्री फडणवीस ने जोर देकर कहा कि ड्रग्स का यह संकट आने वाली पीढ़ी के भविष्य के लिए खतरा है, इसलिए इसे जड़ से खत्म करने के लिए सरकार किसी भी हद तक जाएगी

ड्रग्स तस्करी में शामिल पुलिसकर्मियों की अब खैर नहीं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिए सीधे …

*वेदांतिका कला व क्रीडा व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था,अकोला च्या विद्यमाने शासकीय विश्रामगृह अकोला येथे अर्ध नारीश्वर सन्मान सोहळा समारंभ संपन्न* (अकोला प्रतिनिधी राजेश अवचार)*वेदांतिका कला क्रीडा व शैक्षणिक बहुद्देशीय संस्थे च्या अध्यक्ष कु. रूखमाताई सदाशिव व संस्थेचे सदस्य व आयोजक महादेवराव (नानाभाऊ) सदाशिव सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे होते.* *सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून अकोला येथील गुरु सिमरन दीदी अम्मा व त्यांचे सहकारी अर्धनारीश्वर (तृतीय पंथी) परिवार सर्व उपस्थित होता. ह्या प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ, ट्रॉफी,व पुष्पहार देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.* *सदर कार्यक्रमा करिता सर्व श्री.ॲड.राजेश प्रधान,संजय भाऊ धनाडे,बाळकृष्ण गायकवाड,ॲड.आनंद तायडे,ॲड.दिपाली जानोरकर,प्रकाश दांडगे,गजानन दांडगे,अविनाश कांबळे, सुभेदार खंडारे,प्रभाकरजी लांडगे,योगेश सोनवणे,विष्णू शेलारकर,श्रीकृष्ण चव्हाण,मोहन तायडे,देवा वानखडे,पिंटू अंजनकार, दुर्गाबाई तायडे,सुनील अवचार,अशोक अंभोरे,उमाताई अंभोरे, रामकृष्ण बोदडे,गजानन दादा साठे,संजय तायडे (तलाठी),शैलेश तायडे, गणेश तायडे,रमेश तायडे,सुरेश जाधव,अशोक सदाशिव,भाऊराव साबळे, विजय बांगर,सचिन सरदार, दिनेश चंदन,परमेश्वर राठोड, शुभम गोटे,हर्षल पटले,अनुप देवर,भूषण शिंदे,मारुती उंबरकर,इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते.* *सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळकृष्ण गायकवाड यांनी केले*

* वेदांतिका कला व क्रीडा व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था,अकोला च्या विद्यमाने शासकीय विश्रामगृह अको…

* पातुर प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित * (दूल्हे खान युसुफ खान पातुर) प्राथमिक आरोग्य केंद्र पातुर टिमला वंदनीय बाळासाहेब ठाकरे महाआरोग्य सन्मान 2026 सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील प्रेरणादायी कार्याचा गौरवशाली पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र पातुर टीमला महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आदरणीय श्री प्रकाश आंबिडकर साहेबांच्या हस्ते गौरविण्यात आला.अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण व प्रभावी कामगिरीमुळे राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवे बळ मिळाले आहे.* दि. २२ फेब्रुवारी २०२६** — राज्यातील आरोग्य निर्देशांकावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॉ. बळीराम गाढवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांचा यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.राज्यातील आरोग्य संस्था, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांमधून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी **वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार** प्रदान केला जातो. यामध्ये सोहळ्यात एक लाख रुपये रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येते.या उल्लेखनीय यशामुळे जिल्हा परिषद अकोला आरोग्य विभागाचे राज्यभर कौतुक होत आहे.या सोहळ्यास मा ना प्रकाश आबीटकर (आरोग्यमंत्री), मा ना मेघनाताई बोर्डीकर (राज्य आरोग्यमंत्री) तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव व आयुक्त संचालक उप संचालक अकोला उपस्थित होते.राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पातुर (ता. पातुर, जि. अकोला) या संस्थेची निवड झाली. यानिमित्त वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश लोखंडे यांचा सन्मान करण्यात आला.अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण व प्रभावी कामगिरीमुळे राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवे बळ मिळाले आहे.

पातुर प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय  वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मा…

*आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत ऐतिहासिक विक्रम !**अर्थसंकल्पीय अधिवेशनात तब्‍बल ३९ अशासकीय विधेयके विचारार्थ**समृध्‍द लोकशाहीसाठी आश्‍वासक बाब* (महेश निमसटकर विभागीय संपादक भद्रावती )भद्रावती दिनांक ४ जुलै २०२५ रोजी विधानसभेच्‍या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी एकाच दिवशी तब्‍बल ३० अशासकीय विधेयकांची पुरःस्‍थापना करून महाराष्‍ट्राच्‍या संसदीय इतिहासात अभूतपूर्व विक्रम प्रस्‍थापित केला. पुरःस्‍थापनार्थ मांडण्‍यात येणा-या अशासकीय विधेयकांचा हा विक्रम पुढे नेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवा विक्रम २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रस्थापित केला आहे. त्‍यांची तब्‍बल ३९ अशासकीय विधेयके या अधिवेशनात विचारार्थ ठेवण्‍यात आली आहेत. अधिवेशनाच्या कार्यावलीत विचारार्थ दाखवीलेल्या एकूण ५० अशासकीय विधेयकांपैकी ३९ विधेयके आ. मुनगंटीवार यांची आहेत. अशासकीय विधेयके विचारार्थ ठेवण्‍याच्‍या प्रक्रियेत हा एक नवा विक्रम आहे. विचारार्थ असलेली ही विधेयके शेतकरी, विद्यार्थी, महिला, ग्रामविकास, पर्यावरण आणि लोकहिताशी संबंधित असून त्‍यामध्‍ये सामाजिक समतोल आणि प्रगतीचा दृष्‍टीकोन अंतर्भुत आहे. विचारार्थ असलेल्‍या या ३९ विधेयकांपैकी काही विधेयके या अधिवेशनातच चर्चेला येणार आहेत.विधीमंडळाच्‍या कामाकाजात अशासकीय विधेयकांना अनन्‍यसाधारण महत्‍व आहे. विधीमंडळ सदस्‍यांना समाजातील विविध प्रश्‍नांना थेट कायद्याच्‍या स्‍वरूपात मांडण्‍याची संधी अशासकीय विधेयकांमुळे मिळते. अनेकदा शासनाने विचारात न घेतलेल्‍या मुद्दयांवर विधायक पर्याय सुचविण्‍याचे साधन अशासकीय विधेयक ठरते. काही वेळा हे विधेयक शासनाला धोरणपर बदल करण्‍यात प्रवृत्‍त करते. एखादया अशासकीय विधेयकाला व्‍यापक समर्थ मिळाले तर ते जनभावनेचे निदर्शक ठरते व अनेकदा सरकार त्‍या विषयावर पुढाकार घेते. अशासकीय विधेयके काही वेळा कायद्यात रूपांतरीत होतात, परंतु चर्चा करणे, जनभावना मांडणे, शासनाला दिशा देणे आणि विधायक वातावरण निर्माण करणे यादृष्‍टीने त्‍यांचा प्रभाव अमुल्‍य असतो. त्‍यामुळे विधीमंडळाच्‍या कामाकाजात अशासकीय विधेयकांचे स्‍थान अत्‍यंत महत्‍वाचे व अपरिहार्य आहे. अशासकीय विधेयकांचे हे महत्‍व ओळखुन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्‍यांच्‍या ३० वर्षांच्‍या संसदीय कारकीर्दीत अशासकीय विधेयकांवर कायम भर दिला आहे. त्‍यांनी अशासकीय विधेयकांच्‍या माध्‍यमातुन मांडलेल्‍या अनेक प्रश्‍नांवर शासनाने निर्णय घेतले असून त्‍यामुळे लोकहित साधले गेले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांची ही कामगिरी केवळ विक्रम नसून जनतेच्‍या प्रश्‍नांशी असलेली त्‍यांची असामान्‍य तळमळ आणि संवेदनशीलता यांचे प्रतीक आहे.या अधिवेशात विचारार्थ असलेल्‍या ३९ अशासकीय विधेयकांमध्‍ये सुधीर मुनगंटीवार, वि.स.स. यांचे कारागृहे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र जमीन महसूलाच्या माफीबाबत (क्रमांक-१) (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र हिंसाचार व लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती व जाहिरात्न-फलक लावण्यास प्रतिबंध करण्याबाबत विधेयक, मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (तिसरी सुधारणा) विधेयक,महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (दुसरी सुधारणा) विधेयक, बाल कामगार (प्रतिबंध आणि विनियमन) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र अल्पभूधारक शेतकरी निवृत्ती वेतन, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र धुम्रपानास व थुंकण्यास मनाई करण्याबाबत विधेयक, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) विधेयक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) (सुधारणा) विधेयक, विवाह (महाराष्ट्र सुधारणा), मोटार वाहन (महाराष्ट्र दुसरी सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) विधेयक, मुंबई न्यायालय फी (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र राज्यात लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती व जाहिरात फलक लावण्यास, समाज माध्यमांवर व संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करण्याबाबत विधेयक, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (तिसरी सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) (दुसरी सुधारणा) विधेयक, औषधिद्रव्ये व सौंदर्यप्रसाधन (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (चौथी सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन (सुधारणा) विधेयक, मुंबई ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र गृहनिमार्ण व क्षेत्रविकास (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन (दुसरी सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, हिंदू अज्ञानात्‍व व पालकत्‍व (महाराष्‍ट्र सुधारणा) विधेयक, महाराष्‍ट्र भाडे नियंत्रण (सुधारणा) विधेयक या विधेयकांचा समावेश आहे.अशासकीय विधेयकांच्‍या माध्‍यमातुन नागरिकांना त्‍यांच्‍या न्‍याय्य हक्‍कांसाठी आवाज मिळेल. ही अशासकीय विधेयके केवळ आकडयांची मांडणी नाही तर सामान्‍य जनतेच्‍या वास्‍तविक गरजांवर आधारित ही विधेयके आहेत, असे मनोगत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केले आहे. जनतेच्‍या प्रश्‍नांसाठी आपला हा लढा असाच अविरत सुरू राहील असेही त्‍यांनी म्‍हटले आहे

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत ऐतिहासिक विक्रम !**अर्थसंकल्पीय अधिवेशनात तब्‍बल ३९ अशासकीय व…

Load More
That is All