Read more

View all

यावल मध्ये धुलिवंदनाचा जल्लोष आमदार अमोल जावडे तरुणासोबत रंगले नृत्यातमहाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा खानदेश उपसंपादक प्रवीण मेघे शहरात धुलीवंदनाचा सण यदा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला शहरातील द बेस्ट फ्रेंड्स ग्रुप आणि आर के फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू सम्राट मॉल परिसरात आयोजित करण्यात आलेल्या धुलिवंदन कार्यक्रमाला नागरिकांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रंगाची उधळण डीजेच्या तालावर नृत्य आणि आनंदाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला दरवर्षीप्रमाणे यदाही हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला कार्यक्रम स्थळी डीजेच्या तालावर युवक आणि बालमित्र मंडळ उत्साहाने नाचताना दिसत होते रंगपंचमीच्या निमित्ताने एकमेकावर रंग उधळत सर्वांनी जल्लोषात सहभाग घेतला परिसरात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमाला यावल रावेर विधान सभा मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी जवळपास एक तास तरुणासोबत धुलिवंदनाचा आनंद लुटला उत्साहाच्या भरात आमदार अमोल जावडे यांनीही डीजेच्या तालावर तरुणांसोबत नृत्य करत कार्यक्रमात रंगत आणली यावेळी उपस्थित युवकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढत आनंद व्यक्त केला या कार्यक्रमासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले होते कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे डॉ कुंदन फेगडे नगरसेवक उमेश फेगडे बाळासाहेब फेगडे योगेश चौधरी माझी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते आकाश चोपडे रुबाब तडवी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार तालुकाध्यक्ष प्रा मुकेश येवले रोशन येवले डॉ धीरज चौधरी खरेदी विक्री संघाचे व्हाइस चेअरमन अतुल दादा भालेराव गणेश महाजन भूषण फेगडे रितेश बारी उज्ज्वल कानडे चेतन आढळकर सरपंच परिषदेचे संदीप भैय्या सोनवणे विलास चौधरी चेतन फेगडे प्रशांत रणधीरे अभय शेठ जंगले आशिष पाटील दिलीप वाणी समाधान राजपूत संजय फेगडे गणेश येवले जुगल पाटील रमेश जोगी मयूर कानडे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित यासाठी गोड दुधातील बासुंदीची व्यवस्था करण्यात आली होती सर्वांनी एकत्र येऊन बासुंदीचा आ संवाद घेत धुलिवंदनाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या आणि उत्साह पूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली

यावल मध्ये धुलिवंदनाचा जल्लोष आमदार अमोल जावळे तरुणासोबत रंगले नृत्यात. धुलीवंदनाचा सण यंदा मोठ्य…

महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा खानदेश उपसंपादक प्रवीण मेघे भुसावळ तालुक्यातील राजोरा येथे साल बाद प्रमाणे यंदाही८मार्च, रोजी श्री मरी माता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने शांताराम धोंडे जीवन जावळे घनश्याम यांच्या मार्गदर्शनाखाली भगत आत्माराम बाबा दोडे हे बारा गाड्या ओढणार असून त्यांना भुरा सपकाळे व सोपान कोळी हे बगले राहणार आहेत यात्रेनिमित्त श्री मरीमाता मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली असून या यात्रेत खेळणे पाडणे मिठाई व सौंदर्य प्रसाधने विक्रीसाठी येणार आहेत यात्रेनिमित्त क्रांती सोनवणे डोन गावकर, यांच्या लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे यात्रेनिमिशिलिक धोंडे तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकासाचे चेअरमन व संचालक मंडळ तसेच गावातील सर्व ग्रामस्थ तसेच तरुण मित्र मंडळ सहकार्य करीत आहेत विशेष म्हणजे गावाची यात्रा वर्षातून एकदा येते त्यामुळे बाहेर गावाहून नोकरी निमित्त गेलेले नागरिक गावी येतात त्यामुळे यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन पोलीस पाटील विनोद सपकाळे व सामाजिक कार्यकर्ते लक्षमन कोळी यांनी केले आहे यात्रेनिमित्त भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुरा पानाचे असते ओट पोस्टाचे, पोलीस कर्मचारी चोक बंदोबस्त ठेवणार आहे

भुसावळ तालुक्यातील राजोरा येथे साल बाद प्रमाणे यंदाही८मार्च, रोजी श्री मरी माता यात्रेचे आयोजन

*सलग पाच वर्षे कॉलेज टॉपर ठरला एहतेशाम इब्राहिम बख्श*यशवंत महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात सन्मान*हिंगणघाट-* येथील यशवंत महाविद्यालय च्या विधी विभागातील विद्यार्थी एहतेशाम इब्राहिम बख्श याने पाच वर्षांच्या एल.एल.बी. अभ्यासक्रमात यंदाही आपली उज्ज्वल परंपरा कायम ठेवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, त्याने सलग पाचही वर्षे कॉलेज टॉपर राहण्याचा मान मिळवून एक उल्लेखनीय कीर्तिमान प्रस्थापित केले आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात संस्था अध्यक्ष समीर देशमुख यांच्या हस्ते एहतेशाम यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वर्धा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी सोमन, महाविद्यालयाचे प्राचार्य ठाकरे सर, संस्थेचे संचालक शशांक घोडमारे, प्रा. सिंघम मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.एहतेशाम हा हिंगणघाट येथील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. इब्राहिम हबीब बख्श यांचा सुपुत्र असून, आपल्या या यशाचे श्रेय त्याने आई-वडील आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाला दिले आहे.त्याच्या या यशाबद्दल शहरातील मित्रपरिवार, नातेवाईक व चाहत्यांकडून त्याचे मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे.. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

*५ वर्षांनंतर पातूरचा युवक घरी परतला**शांतिवनम आणि श्रद्धा फाउंडेशनमुळे कुटुंबाशी पुनर्मिलन**दोन्ही संस्थांच्या प्रशंसनीय कार्याची सर्वत्र चर्चा* (दूल्हे खान युसुफ खान पातूर) येथील काजीपुरा परिसरात राहणारा शेख अतीक शेख नसीर (वय ३३ वर्षे) सुमारे पाच वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. आता पूर्ण पाच वर्षांनंतर सामाजिक संस्था श्रद्धा पुनर्वसन संस्थेच्या प्रयत्नांमुळे तो सुखरूपपणे आपल्या कुटुंबीयांमध्ये परतला असून, कुटुंबीय व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आईच्या निधनानंतर शेख अतीक मानसिकदृष्ट्या थोडा खचला होता. त्याच दरम्यान तो हैदराबाद येथे राहणाऱ्या आपल्या काकांसोबत त्यांच्या घरी गेला होता. तेथूनच तो हैदराबाद रेल्वे स्थानकावरून बेपत्ता झाला. नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात शोधाशोध केली, मात्र त्याचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.श्रद्धा संस्थेकडून आलेल्या प्रतिनिधींनी सांगितले की, शेख अतीक भटकत भटकत तमिळनाडू येथे पोहोचला होता. त्यानंतर तमिळनाडूतील त्रिची येथील शांतिवनम संस्थेला तो भटक्या अवस्थेत आढळून आला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेऊन मागील पाच वर्षांपासून त्याच्या मानसिक आजारावर उपचार केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याने दिलेल्या पत्त्यानुसार त्याला अकोला विभागातील नागपूर येथील श्रद्धा फाउंडेशनकडे सोपविण्यात आले.तेथे उपचार व निगा राखल्यानंतर पूर्णपणे बरा झाल्यावर शेख अतीकने आपल्या घराचा अचूक पत्ता सांगितला. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी श्रद्धा फाउंडेशनच्या पथकाने त्याला सुरक्षितपणे पातूर येथे आणून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. संस्थेच्या टीमने त्याच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक औषधेही कुटुंबीयांना दिली असून पुढे नियमित औषधोपचाराची जबाबदारीही स्वीकारली आहे.पातूर येथे सोडण्यासाठी आलेल्या पथकामध्ये सुनील कुमार दास (सामाजिक कार्यकर्ता), नितेश शर्मा (सामाजिक कार्यकर्ता), चेतना नयतमकर (परिचारिका) तसेच पिंकी जेना (सामाजिक कार्यकर्ता) यांचा समावेश होता.शेख अतीकच्या घरी परतण्याने कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले असून परिसरात आनंदाची लहर पसरली आहे. सामाजिक संस्थांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.प्रतिक्रिया:"आमचं मूल आम्हाला सुखरूप परत मिळालं आहे. मी दोन्ही संस्थांचे मनापासून आभार मानते व त्यांना मनःपूर्वक आशीर्वाद देते." (अतीकची आजी)"आमचे आणि आमच्या संस्थेचे ध्येयच हे आहे की भटक्या व मानसिक रुग्णांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवणे." — नितेश शर्मा (सामाजिक कार्यकर्ता)

* ५ वर्षांनंतर पातूरचा युवक घरी परतला**शांतिवनम आणि श्रद्धा फाउंडेशनमुळे कुटुंबाशी पुनर्मिलन**दोन…

कुणाडा येथे पहाटे धडक; मनोज नंदीचे रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त! (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती, दि.7 :- भद्रावती तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीच्या वाढत्या प्रकारांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टरची वर्दळ सुरू असल्याने अनेक गावांतील नागरिक त्रस्त झाल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने मौजा कुणाडा परिसरात पहाटे धडक कारवाई करत रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त केले. भद्रावती तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने ७ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजता ही कारवाई केली. कारवाईदरम्यान फुकट नगर, भद्रावती येथील मनोज नंदी यांचे ट्रॅक्टर विनापरवाना रेती भरून वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित ट्रॅक्टर जप्त करून पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या कारवाईत मंडळ अधिकारी तथा गौण खनिज पथक प्रमुख अनिल दडमल, ग्राम महसूल अधिकारी संदीप मुरकुटे, तसेच महसूल कर्मचारी खुशाल तुरारे, राहुल भोंगळे आणि बंडू वेलफुलवार यांनी सहभाग घेतला. प्रसंगी सकाळी महसूल विभागाच्या सूत्रांकडून प्रत्यक्ष व्यक्तिगत व्हॉट्सअ‍ॅपवर कारवाईची माहिती व छायाचित्र पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली. या छायाचित्रात कारवाईनंतर पथक उपस्थित असल्याचे दिसून येते. छायाचित्रावर जीपीएस मॅप कॅमेरा द्वारे भद्रावती, महाराष्ट्र येथील लोकेशन तसेच ७ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.३३ वाजताची वेळ नोंद झालेली असल्याचे दिसून येते. त्यामुळे या कारवाईची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांनी भद्रावती तालुक्यातील पीपरी, जेना व पारोधी येथील लिलाव झालेल्या रेती घाटांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान नदीपात्राची स्थिती, उत्खननाची पद्धत तसेच रेती वाहतुकीचे मार्ग यांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पुढील आदेश मिळेपर्यंत या घाटांवरील उत्खनन थांबविण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी काही संवेदनशील मार्गांवर नाले खोदण्याबाबतही निर्देश देण्यात आल्याचे समजते. याचदरम्यान भद्रावती तालुक्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या मांगली (रै) नाल्यातून रात्रीच्या वेळी रेती उत्खनन होत असल्याची चर्चा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चारगाव परिसरातील वर्धा नदी व पारोधी परिसरातील ईरई नदी भागातही रेती वाहतुकीबाबत हालचाली असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामीण भागातील काही लहान नाल्यांमधूनही रेती उत्खनन होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. प्रसंगी अवैध रेती उत्खननामुळे नदीपात्रांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून नागरिक व शेतकरी वर्गाकडून यावर कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे. शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार व पर्यावरणीय अटींचे पालन करूनच पुढील काळात रेती उत्खनन व वाहतूक करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, परिसरात रात्री सुरू असलेल्या ट्रॅक्टरच्या हालचालींबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या हालचालींचा नेमका प्रकार काय, तसेच स्थानिकांकडून मिळालेली माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा सविस्तर खुलासा लवकरच पुढील भागात…

कुणाडा येथे पहाटे धडक; मनोज नंदीचे रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त!������������������������������������…

खड्डेमय रस्त्यांमधून रुग्णवाहिका व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणी,संबधित बांधकाम विभागाला जाग येणार की नाही? (जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे)नवीन निंबोल ते एनपूर विविध भागांतील रस्त्यांवर मोठमोठी खड्डे निर्माण झाल्याने नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शहरभर पसरलेल्या या खड्यांच्या साम्राज्यामुळे मनपा प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.शहरातील प्रमुख मार्गांसह विविध भागांतील अंतर्गत रस्त्यांची चाळणी झाली असून, पावसाळ्याअगोदरच रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे जलदगतीने सुरू होतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र वास्तव याच्या अगदी उलट दिसत आहे. अनेक रस्त्यांवर खोल खड्यांमुळे वाहनचालकांना समोरचा रस्ता दिसणेही कठीण झाले आहे. दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, अपघातांत वाहनांचे नुकसान होत आहे.शहरातील सर्वाधिक वाहतूक असलेला एनपूर रोड आज खड्यांमुळे जोखमीचा मार्ग ठरला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांची शक्यता सतत वाढत आहे. आजंदे ते जुने निंबोल परिसरातील परिस्थिती तर अधिकच बिकट आहे. काही ठिकाणी रस्ता आहे की खड्डे हेच ओळखता येत नाही. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांनी स्वतःहून खडी-मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून रस्त्यांची डांबरीकरणाची कामे केली जातात, तरी काही महिन्यांतच ती पुन्हा खड्डेमय बनतात.ठेकेदारांच्या हलगर्जी कामकाजामुळे आणि मनपाच्या देखरेखीअभावी ही परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. स्मार्ट सिटीचा विकास फक्त फलकापुरता राहिला आहे. चालण्यासाठीसुद्धा रस्ता शाबूत नाही, अशी प्रतिक्रिया शहरवासीय देत आहेत. शहराची प्रतिमा, नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी दर्जेदार डांबरीकरण करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

खड्डेमय रस्त्यांमधून रुग्णवाहिका व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणी,संबधित बांधकाम विभागाला जाग येणार…

पंढरपूर शहरातील संतपेठ परिसरात किरकोळ वादातून पत्रकारावर लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण करून जीवघेणा हल्ला. पाच जणांवर गुन्हा दाखल (पंढरपुर विशेष जिल्हा प्रतिनिधी)पंढरपूर शहरातील संतपेठ परिसरात किरकोळ वादातून एका पत्रकारावर लोखंडी रॉड व कोयत्याच्या मुठीने मारहाणपंढरपूर शहरातील संतपेठ परिसरात किरकोळ वादातून एका पत्रकारावर लोखंडी रॉड व कोयत्याच्या मुठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ४ मार्च रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास संतपेठ येथील न्यू बागवान मोहल्ल्यात साई किराणा स्टोअर्ससमोर हा प्रकार घडला. फिर्यादी रफिक अब्दुलरजाक अत्तार (वय ३६ व्यवसाय – पत्रकार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ तोफीक अत्तार व जुनेद बागवान यांच्यात व्यवहाराच्या कारणावरून वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या रफिक अत्तार यांच्यावर जुनेद अन्वर बागवान याने लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून जखमी केल्याचा आरोप आहे.तसेच उमर सिंकदर बागवान याने कोयत्याच्या मुठीने पाठीत व गुडघ्यावर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर मस्जित रहिमान बागवान, अमन अन्वर बागवान आणि मोहसीन मस्जिद बागवान यांनीही येऊन फिर्यादी तसेच त्यांच्या भावाला आणि वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगितले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या रफिक अत्तार यांच्यावर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांन्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पंढरपूर पोलीस करत आहेत.

पंढरपूर शहरातील संतपेठ परिसरात किरकोळ वादातून पत्रकारावर लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण करून    जी…

_साहित्य क्षेत्रातील ताऱ्याचा अस्तः सुनील पाल_**साहित्यकार कवि आरिफ काजी यांचा श्रद्धांजलि सोहळा सम्पन्न*हिंगणघाट:- मानवीय संवेदनशीलतेचे सृजनशिल अभिव्यक्ती दर्शविणारी बाब जर कुठली असेल तर ती म्हणजे साहित्य क्षेत्रातला काव्य प्रकार आहे. आपल्या वाणीने व लेखणीने साहित्य क्षेत्रात आपले स्थान देशभरात निर्माण करणारे हिंगणघाट येथील कवि आरिफ काजी या तारेच्या अस्त म्हणजे साहित्य क्षेत्राची मोठी हाणी आहे, असे प्रतिपादन लाफ्टर चैलेंज विजेता हास्य अभिनेता सुनील पाल यांनी व्यक्त केले. २ मार्च रोजी साहित्य रत्न मंच व्दारा जी.बी. एम. एम. शाळेच्या सभागृहात आयोजित श्रद्धांजलि कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून बोलत होते.श्रद्धांजली सभेच्या अधक्षस्थानी डॉ. शांतीलाल कोचर होते तर प्रमुख अतिथि म्हणून सुप्रसिद्ध साहित्यकार इमरान राही, अँड अमानी कुरेशी, प्रा. मजीद बेग मुगल, अँड उल्हास वाघ, एड. इब्राहीम बख्श आजाद, कवि मुरली लाहोटी, डॉ. रविपाल भालशंकर, 'अब्दुल कदीर बख्श, कविता बैस,मोहम्मद मकसूद बावा पत्रकार,अब्दुल कादीर शेख गिरड पत्रकार,सज्जाद बोहरा,चंगेज़ खान, मड़ावी सर,गोपाल, सागर व्यास, सोनल तिवारी,आम्रपाली पार्वे, मान्यवर प्रमुख्याने मंचावर उपस्थित होते, सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने जग संपत नाही पण हे कोणालाच समजत नाही की लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही. आरिफ काजी यांच्या अनेक अठवनीना उजाळा देत ईमरान राही यांनी त्यांना श्रध्दांजलि दिली. या प्रसंगी एड.अमानी कुरेशी प्रा. मजीद बेग, अब्दुल कदीर बख्श, कविता बैस, मुरली लाहोटी, डॉ शांतिलाल कोचर गोल्डी, आदीनी सुध्दा श्रद्धासुमन अर्पित केले. कार्यक्रमाचे संचालन एड. इब्राहीम बख्श यांनी केले..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

_साहित्य क्षेत्रातील ताऱ्याचा अस्तः सुनील पाल_**साहित्यकार कवि आरिफ काजी यांचा श्रद्धांजलि सोहळा सम्पन्न*हिंगणघाट:- मानवीय संवेदनशीलतेचे सृजनशिल अभिव्यक्ती दर्शविणारी बाब जर कुठली असेल तर ती म्हणजे साहित्य क्षेत्रातला काव्य प्रकार आहे. आपल्या वाणीने व लेखणीने साहित्य क्षेत्रात आपले स्थान देशभरात निर्माण करणारे हिंगणघाट येथील कवि आरिफ काजी या तारेच्या अस्त म्हणजे साहित्य क्षेत्राची मोठी हाणी आहे, असे प्रतिपादन लाफ्टर चैलेंज विजेता हास्य अभिनेता सुनील पाल यांनी व्यक्त केले. २ मार्च रोजी साहित्य रत्न मंच व्दारा जी.बी. एम. एम. शाळेच्या सभागृहात आयोजित श्रद्धांजलि कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून बोलत होते.श्रद्धांजली सभेच्या अधक्षस्थानी डॉ. शांतीलाल कोचर होते तर प्रमुख अतिथि म्हणून सुप्रसिद्ध साहित्यकार इमरान राही, अँड अमानी कुरेशी, प्रा. मजीद बेग मुगल, अँड उल्हास वाघ, एड. इब्राहीम बख्श आजाद, कवि मुरली लाहोटी, डॉ. रविपाल भालशंकर, 'अब्दुल कदीर बख्श, कविता बैस,मोहम्मद मकसूद बावा पत्रकार,अब्दुल कादीर शेख गिरड पत्रकार,सज्जाद बोहरा,चंगेज़ खान, मड़ावी सर,गोपाल, सागर व्यास, सोनल तिवारी,आम्रपाली पार्वे, मान्यवर प्रमुख्याने मंचावर उपस्थित होते, सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने जग संपत नाही पण हे कोणालाच समजत नाही की लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही. आरिफ काजी यांच्या अनेक अठवनीना उजाळा देत ईमरान राही यांनी त्यांना श्रध्दांजलि दिली. या प्रसंगी एड.अमानी कुरेशी प्रा. मजीद बेग, अब्दुल कदीर बख्श, कविता बैस, मुरली लाहोटी, डॉ शांतिलाल कोचर गोल्डी, आदीनी सुध्दा श्रद्धासुमन अर्पित केले. कार्यक्रमाचे संचालन एड. इब्राहीम बख्श यांनी केले..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

Load More
That is All