Read more

View all

रावेर तालुक्यातील आजंदे जि.प.शाळा : विद्यार्थ्यांनी घेतला आनंद मेळाव्याचा आनंद.. (जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे)आज दिनांक २७/२/२०२६ शुक्रवार रोजी आपल्या जि प शाळा अजंदे येथे सकाळी ठीक ११.३० वाजता बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला ..तसेच दुपारी ३.३० वाजता बाल रंगोत्सव आपल्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाआहे .आजंदे येथील जिल्हा परिषद शाळेत दि.२७ फेब्रुवारी २०२६ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.सकाळी मान्यवरांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक श्रीमती मनीषा प्रल्हाद पाटील व शिक्षक वृंदांनीक केले. तसेच विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करून आपल्या नृत्याचे सादरीकरण केले.गावातील प्रतिष्ठित नागरिक,उपस्थित पालकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणावर बक्षिसांचा वर्षाव केला.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य आणि गावकरी यांच्या कडून कार्यक्रमासाठी रोख बक्षिस 1140 रूपए व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या कडून 700 रूपयांचे बक्षीस देण्यात आले.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री जितु भाऊ रविंद्र इंगळे, उपाध्यक्ष श्री. अनिल अरूण कोळी, ग्रामपंचायत सदस्या व शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ.लताताई दत्तात्रय सुर्यवंशी यांचे आणि इतर सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच गावातील नागरिकांचेही सहकार्य लाभले.विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्रीमती मनिषा प्रल्हाद पाटील,उपशिक्षक श्री किरण चिंधूजी सावळे, शिक्षण सेवक श्री. विठ्ठल बबन धुमाळ यांनी विशेष परिश्रम घेतले..

रावेर तालुक्यातील आजंदे जि.प.शाळा : विद्यार्थ्यांनी घेतला आनंद मेळाव्याचा आनंद..�����������������…

समता फाऊंडेशन अंतर्गत टेलरिंग डे साजरा जि. प. शाळा मोहमांडली येथे आदिवासी विद्यार्थ्यांना कपडे वाटप* (मोहमांडली (ता. रावेर) :समता फाऊंडेशन अंतर्गत टेलरिंग डे निमित्त जि. प. शाळा, मोहमांडली येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे वाटप करण्यात आले.मोहमांडली हे गाव अतिदुर्गम आदिवासी भागात असून येथील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले कपडे मिळावेत व शिक्षणाबाबत त्यांचा उत्साह वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमास समता फाऊंडेशनच्या पदाधिकारी आशा सुनील तडवी, शिक्षिका रुबिना फिरोज तडवी, खुशाली जंगले, शाळेचे मुख्याध्यापक भूषण पाटील, शिक्षण समिती सदस्य विनोद पाचपोळे तसेच ग्रामपंचायत सदस्य जुम्मा तडवी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी समता फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

समता फाऊंडेशन अंतर्गत टेलरिंग डे साजरा जि. प. शाळा मोहमांडली येथे आदिवासी विद्यार्थ्यांना कपडे वा…

*नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये विज्ञान दिन साजरा** ( मानवत ( प्रतिनिधी. )* *{ }*——————————नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये मा. सुरेखाताई चंदाले यांच्या मार्गदर्शनाखाले "राष्ट्रीय विज्ञान दिन" साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील बालाजी गोन्टे सर , बाबासाहेब तेलभरे सर ,, एकनाथ मुळे सर , एस.एन. कच्छवे सर , सुबान शहा , कैलास अबूज सर , साईप्रसाद मुनलोड सर , वैभव होगे सर , संगीताताई थोरे मॅडम, मिनाक्षीताई कहात मॅडम , सोनालीताई माने मॅडम, आदीसह शालेय विद्यार्थ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी प्रयोगाचे सादरीकरण केले या वेळी विविध प्रयोगाचे निरिक्षण करून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगाचे पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतूक करण्यात आले.सविस्तर वृत्त असे की,२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर *सी.व्ही. रमन* यांनी रमन परिणामाचा शोध लावला होता, त्या निमित्त दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी भारतात हा दिवस साजरा केला जातो. मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये विज्ञान दिना निमित्त विविध प्रयोग सादर करून साजरा करण्यात आला.सी. व्ही रमण यांनी मानवतेला दिलेल्या या महान योगदाना बद्दल, सी.व्ही. रमन यांना १९३० मध्ये भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक सी. व्ही रमण यांना देण्यात आले.***

नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये विज्ञान दिन साजरा**����������������…

रावेर तालुक्यातील अजंदे गावात मुलांकडून आईचा शोध रावेर तालुक्यातील अजंदा येथील महिलेचा बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल.. (जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे)अजंदा (ता. रावेर) येथील शोभा रामा बिरपण (वय ४५) या दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घरातून निघून गेल्यापासून बेपत्ता आहेत. संबंधित महिला काही प्रमाणात मानसिक आजाराने त्रस्त असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.कुटुंबीयांनी गाव परिसरासह नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. अखेर हरविल्याची तक्रार रावेर पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल पी. जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संबंधित महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.राहुल शोभा बिरपण – ९६६५८ ४१२०० उमेश बिरपण – ९३२५३०३७४०कोणालाही शोभा रामा बिरपण दिसल्यास किंवा माहिती असल्यास वरील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

रावेर तालुक्यातील अजंदे गावात मुलांकडून आईचा शोध रावेर तालुक्यातील अजंदा येथील महिलेचा बेपत्ता;  …

यावल तालुक्यातील हिंगोणा येथे किरकोळ वादातून तरुणाची हत्या; परिसरात खळबळ.. (यावल तालुका प्रतिनिधी) यावल तालुक्यातील हिंगोणा येथे किरकोळ वादातून एका १९ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मृत तरुणाचे नाव प्रथमेश मुकेश महाले (वय १९) असे असून, किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या प्रथमेशचा मृत्यू झाला.या घटनेत रीना मोहित गजरे (वय १९), मोहित राजेंद्र गजरे (वय ३०) आणि निखिल राजेंद्र गजरे (वय २६) हे तिघेही चाकूच्या वारात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या प्रकरणातील संशयित आरोपी गौरव जाधव (रा. खर्डी, हल्ली मुक्काम हिंगोणा) याचे नाव समोर आले आहे. घटनेनंतर आरोपी फरार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

यावल तालुक्यातील हिंगोणा येथे किरकोळ वादातून तरुणाची हत्या; परिसरात खळबळ..�����������������������…

स्वयंपाकघरातील अन्न हेच खरे औषध; समतोल आहारातूनच आरोग्यमय जीवन शक्य- आहार तज्ज्ञ.. (प्रा. डी.सी.पाटीलनंदुरबार जिल्हा विभागीयउपसंपादक) शहादा : "देशातील स्वयंपाकघरात तयार होणारे अन्न हे केवळ शारीरिक गरज पुरविणारे इंधन नसून ते एक उत्तम औषध आहे. धावपळीच्या युगात आपण आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करत आहोत, परंतु समतोल आहारातूनच आपली प्रकृती सुदृढ होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी आरोग्यमय जीवन जगण्यासाठी आपल्या पारंपरिक आहाराला प्राधान्य द्यावे," असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ आहारतज्ज्ञ तथा निवृत्त उपप्राचार्य प्रा. डी.सी. पाटील यांनी दिला. येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात आयोजित 'टुडेज लाइफस्टाईल अँड आयुर्वेदिक डाएट' या विशेष व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. किर्ती महाडिक होत्या. व्यासपीठावर प्रा. डॉ. सौ. जागृती पवार, प्रा. ए.जे. पाटील, प्रा. मोनिका गावित, प्रा. माधवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.शारीरिक वयापेक्षा 'मेटाबॉलिक' वयाला महत्त्व द्या.- मार्गदर्शन करताना प्रा. पाटील पुढे म्हणाले की, "आनंदी व निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शारीरिक वयापेक्षा चयापचय (Metabolic Age) वयाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. शरीरातील चयापचय क्रिया जेवढी क्रियाशील राहील, तेवढेच शरीर दीर्घकाळ तरुण आणि निरोगी राहते. यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा आहे."यावेळी प्रा. पाटील यांनी उपस्थितांना व्यायामाची एक अनोखी पद्धत सांगितली. "प्रत्येकाने दररोज किमान ४०० टाळ्या वाजवल्या पाहिजेत. टाळी वाजवल्यामुळे शरीरातील सर्व महत्त्वाच्या अवयवांचे दाबबिंदू (Acupressure points) उत्तेजित होतात, ज्यामुळे अवयव कार्यक्षम राहतात आणि आजारांपासून बचाव होतो," असे सांगत त्यांनी टाळ्या वाजवण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.वाढत्या आजारांवर चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, आज ३५ ते ४५ वयोगटातील तरुणांमध्ये हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढत आहे. याचे मुख्य कारण जंक फूड आणि फास्ट फूड हे आहे. रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीराची कार्यक्षमता टिकवण्यासाठी बाहेरचे खाणे टाळून घरी तयार केलेले अन्न 'पूर्णब्रह्म' समजून सेवन करावे. तसेच, दुपारची झोप टाळून रात्री किमान ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रथम वर्ष बी.एड.ची विद्यार्थिनी निकिता पाटील हिने केले, तर उपस्थितांचे आभार द्वितीय वर्ष बी.एड.ची विद्यार्थिनी मोनाली अहिरे हिने मानले. या व्याख्यानाचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने घेतला.

स्वयंपाकघरातील अन्न हेच खरे औषध; समतोल आहारातूनच आरोग्यमय जीवन शक्य- आहार तज्ज्ञ..���…

*दारू पिऊन दारूच्या नशेत मोटार सायकल चालवीणारे चालकावर वाहतूक पोलिसांची कार्यवाही गुन्हा दाखल करून वाहन केले जप्त * *दि. 26/02/26 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सर यांच्या आदेशानवये वाहतूक पोलिसांची निर्मल बेकरी चौकात वाहन चेकिंग नाकाबंदी हि नेमण्यात आलेली होती तेव्हा एक मोटार सायकल चालक हा निर्मल बेकरी चौकात अतिवेगाने व अनियंत्रितपणे वाहन चालवीतना वाहतूक पोलीस अंमलदार यांना दिसून आला तो आपले वाहन व्यवस्थित चालवू शेकत नव्हता त्यावरून वाहतूक अंमलदार यांनी त्याचे जवळ जाऊन त्याचे नाव गाव विचारले असता तो दारूच्या नशेमध्ये बडबड करू लागला त्याचे तोंडाचा दारू पिल्याचा आंबट उग्रट वास येत होता त्यावरून त्याची मेडिकल तपासनी केली असता तो हिरो होंडा मोटार सायकल नंबर mh 32 f 4245चालक यास त्याचे नावं विचारले असता त्याने आपले नावं वैभव गजानन श्रीरामे वय 35 वर्ष रा कुरझडी जामठा वर्धा याची मेडिकल तपासनी केली असता तो दारूच्या आमलाखाली असल्याचे व त्याचे रक्तात 130 mg अल्कोहोल चे प्रमाण मिळून आल्याने सदर वाहन चालका विरुद्ध पो. स्टे. वर्धा शहर येथे मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा नोंद करून चालक यास अटक करून त्याची मोटार सायकल हि जप्त करण्यात आली आहे, सदर कार्यवाही वाहतूक शाखेचे Asi संजय भांडेकर पो. हवा. प्रदीप कोहळे महिला अंमलदार दर्शना वानखेडे . वैशाली लेंडे यांनी संद्याकाळी 6/00 वा निर्मल बेकरी चौकात केली आहे, तरी होळी रंगपंचमी सण उत्सव मध्येही कोणीही वाहन चालक यांनी हि आपली वाहने दारू पिऊन चालवू नये असे आवाहान पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी सर्व चालकाना केलेले आहे.. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

दारू पिऊन दारूच्या नशेत मोटार सायकल चालवीणारे चालकावर वाहतूक पोलिसांची कार्यवाही गुन्हा दाखल करून…

*भद्रावती तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियानास प्रारंभ**महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ घ्या - तहसीलदार राजेश भांडारकर* (महेश निमसटकर विभागीय संपादक भद्रावती )भद्रावती दि.27 :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा क्र. १)” अंतर्गत भद्रावती तालुक्यात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राजेश भांडारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही पत्रकार परिषद गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी तहसील कार्यालय, भद्रावती येथे पार पडली.शासनाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२६ च्या अध्यादेशानुसार हे अभियान दि. ७ मार्च ते १५ मे २०२६ या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळ अधिकारी क्षेत्रांत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश नागरिकांच्या प्रलंबित महसुली प्रकरणांचा जलद निपटारा करून शासकीय सेवा सुलभ व पारदर्शक करणे हा आहे.तहसीलदार राजेश भांडारकर यांनी अभियानाची सविस्तर माहिती देताना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शिबिरामध्ये प्रलंबित जमिनीच्या फेरफार प्रकरणांचा निपटारा, शासकीय अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायद्यानुसार तत्काळ सेवा, अकृषक (एनए) जमीन संदर्भातील मार्गदर्शन, तसेच गाव दप्तर अद्ययावत करण्याबाबत माहिती दिली जाणार आहे.यासोबतच ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी सेवा सुलभ करणे, ई-मोजणी प्रक्रिया गतीमान करणे, कृषी नोंदणी, तसेच पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.शिबिरात स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन करून नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण केले जाणार आहे. भोगवटादार वर्ग बदल, ‘जिवंत ७/१२’ मोहीम, सामाजिक व आर्थिक योजनांचा लाभ, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कामे, जमीन व्यवहार नोंदणी, शालेय दाखले, पांदण रस्ते प्रश्न आणि ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत पट्टे वाटप याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल.या पत्रकार परिषदेस सहाय्यक गट विकास अधिकारी डॉ. बंडू आकनूरवार, नायब तहसीलदार मनोज आकनूरवार, मधुकर काळे, सुधीर खांडरे, क्षेत्र सहाय्यक (वन) विकास शिंदे, दुय्यम निबंधक झाडे, मंडळ अधिकारी समीर वाटेकर, भूमी अभिलेख अधिकारी पारधी, देवानंद गावंडे, गट शिक्षणाधिकारी प्रकाश महाकाळकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.तसेच विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी दिलीप ठेंगे, प्रा. विवेक सरपटवार, दिलीप मांढरे, शाम चटपल्लीवार, महेश निमसटकर, लिमेश माणूसमारे, निलेश नवराते, राजू गैनवार, अतुल कोल्हे, उमेश कांबळे आदी पत्रकार उपस्थित होते.

भद्रावती तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियानास प्रारंभ**महसूल विभागाच्या …

आदिवासी एकता परिषद प्रेरीत भिल प्रदेश क्रांती सेना द्वारा आयोजित ॳबरसिग महाराज प्रेरणादिवस.. 25 फेब्रुवारी निमीत्ताने स्त्री मुकतीचे प्रेरणास्थान आदिवासी महाराणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मेळावा. (यावल यासीन तडवी यावल तालुका विभागीय संपादक) आदिवासी समाजाच्या काही समशा सोडविण्यासाठीउपथीत मानेवर साहेब अरुण पवार धनंजय दादा ठाकरे भिल प्रदेश क्रांती सेना संस्थापक सुनिल भाऊ गायकवाड संस्थापक आनंद सिंग अध्यक्ष ठाकरे दादा प्रमोद ठाकरे यशवंत अहिरे मनिष सर आदिवासी एकता मंच हुसेन तडवी मुकेश वाघ सदाशिव भिल सिकंदर तडवी भुरा भिल नाना भिल मंगल वाघ अशोक भिल सलिम तडवी सरपंच फिरोज तडवी यासीन तडवी सुधाकर भिल खडु भिल कृष्णा भिल भगवान मोरे अतुल भिल बादल भिल प्रितम भिल खेमचंद भिल कलाबाई भिल विमल बाई भिल अलकाबाई भिल अनिता भिल गुडी भिल महिला उपस्थीत होत्या यावल तडवी कॉलनी मधी कारेकरम पार पडले

आदिवासी एकता परिषद प्रेरीत भिल प्रदेश क्रांती सेना द्वारा आयोजित ॳबरसिग महाराज प्रेरणादिवस..     …

Load More
That is All