Read more

View all

*ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक पंचायत कार्यरत**@)तहसीलदार माचेवाड यांचे प्रतिपादन* (मानवत / प्रतिनिधी.)————————शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी, त्यांच्या अधिकारांची व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी तसेच ग्राहकांना न्याय देण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संघटना कार्यरत असल्याचे प्रतिपादन तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी केले. येथील तहसील कार्यालयात अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायत मानवत शाखेच्या वतीनेजागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्र कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सदरील चर्चासत्रास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष डॉ सचिन चिद्रवार, शहराध्यक्ष श्याम झाडगावकर हे उपस्थित होते. चर्चासत्राच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायत चे शहर सचिव प्रसाद जोशी यांनी त्यांच्या भाषणात ग्राहक पंचायतची स्थापना त्याचे उद्दिष्ट, ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांचे अधिकार व कर्तव्य याबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा गिरी यांनी तर आभार प्रदर्शन पुरवठा विभागाच्या वतीने सूरश्री मुदगलकर यांनी केले. कार्यक्रमास ग्राहक पंचायतचे डॉ विजयकुमार कहेकर, प्रकाश करपे, जयप्रकाश मिटकरी, प्रा गजानन आंबेकर, अनंत बंडे, संजय महात्मे, सूर्यकांत माळवदे, दिपक दुगाने, ऍड आकाश कडतन व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.***

ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक पंचायत कार्यरत**@)तहसीलदार माचेवाड यांचे प्रतिपादन*

संवाद’ उपक्रमातून पोलिस-नागरिक थेट संवाद................................ (मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक) :::::::::::::::::::::::::::::::::::पोलिस प्रशासन व नागरिकांमधील विश्वास, सहकार्य आणि समन्वय बळकट करण्याच्या उद्देशाने वर्धा जिला पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून ‘संवाद’ हा अभिनव उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत खरंगणा पोलिस ठाणे हद्दीतील मौजा काकधारा (ता. आर्वी) येथे विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाद्वारे पोलिस प्रशासन थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे हद्दीत २० हून अधिक संवाद कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.कार्यक्रमाला वर्धा जिला पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसात,उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना करखेले,आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी गीतांजली निकम,उपविभागीय अभियंता संजय मिसळ,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नितीन उके तसेच तहसील,आरोग्य, पशुसंवर्धन व वन विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.संवाद कार्यक्रमादरम्यान पोलिस अधीक्षकांनी गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक व युवकांशी थेट संवाद साधत त्यांच्या सुरक्षेशी संबंधित तसेच इतर समस्यांची माहिती घेतली.विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनीही नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न केला.विशेष म्हणजे, २०१७ मध्ये जलव्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी ‘पाणी फाउंडेशन’चा प्रथम पुरस्कार मिळविणाऱ्या काकधारा गावाचा यावेळी सन्मान करण्यात आला.तसेच गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या नागरिकांचाही सत्कार करण्यात आला.पोलिस अधीक्षकांनी नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी निर्भयपणे आपल्या समस्या पोलिसांसमोर मांडाव्यात.संवाद’ उपक्रमाचा उद्देश पोलिस व नागरिकांतील दरी कमी करून गुन्हेमुक्त व सुरक्षित समाज निर्माण करणे हा आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना करखेले,पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, महिला पोलिस अधिकारी शुभांगी जाधव,मनीष श्रीवास व सूरज शुक्ला यांनी विशेष परिश्रम घेतले.

संवाद’ उपक्रमातून पोलिस-नागरिक थेट संवाद................................�������������������������…

*रामनामाने दुमदुमली अवघी भद्रावती नगरी..* *गवराळा व भद्रावती येथे जय श्रीराम च्या गजरात भव्य शोभायात्रेचे आयोजन.* (महेश निमसटकर विभागीय ंसंपादक भद्रावती ) भद्रावती, दि.२७ : भद्रावती नगरी प्राचीन व धार्मिक शहर म्हणून सर्वदूर ओळखले जाते. सर्वधर्म निरपेक्ष भाव इथला प्रत्येक समाजातील नागरिक जोपासत असतो. प्रभू श्रीराम जन्मोत्सव अवघ्या देशात धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फेविविध ठिकाणी मंदिरात आज रोजी सकाळपासून भजन पूजन, किर्तन प्रबोधन आदींच्या आयोजनातून हा जन्म सोहळा साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. शहरातील विविध संघटना, मंडळ, व्यापारी, राजकीय पक्ष यांनी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिकृती व सहभागी सर्व भद्रवतीकरांना पाणी, अल्पोहार आयोजित करून आपले उत्तरदायित्व पार पाडले.सायंकाळी गणपती वॉर्ड गवराळा येथून अध्यक्ष शंकर ढेंगळे व युवा मित्र यांचे पुढाकारातून तर भद्रावती येथून श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे विठ्ठल मंदिर देवस्थान इथून भव्य शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील, विविध धर्मातील हिंदू, मुस्लिम, बौद्ध बांधवांनी आपला विशेष सहभाग नोंदविला. तहसीलदार राजेश भांडारकर, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे संयोजक चंद्रकांत गुंडावार, नगराध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, हाजी बबन शेठ, समाज सेवक सुशील देवगडे, उपाध्यक्ष सुधीर सातपुते, डॉ. विवेक शिंदे, नकुल प्रशांत शिंदे,अमित गुंडावार, सौरभ घागी,गुरुदेव भक्त विशाल गावंडे , विक्रांत बिसेन, प्रकाश पामपट्टीवार, भारतीय जनता पक्षाचे सर्व समर्थक आदी सह व्यापारी वर्ग , नगर सेवक, नगर सेविका विविध पक्षांचे पदाधिकारी, असंख्य रामभक्त तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.नटून थटून सजलेल्या स्त्री, युवती पुरुष, युवक, बाल मंडळी यांच्या श्री रामाच्या घोषणेने परिसर दणाणून गेला. विविध आकर्षक देखावे, चित्तवेधक रोषणाई, फटाक्याची गगनचुंबी आतिषबाजी पाहता भद्रावती मध्ये अयोध्या नगरी अवतरल्याचा अनुभव येत होता.ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलिसांनी तहान भूक विसरून सकाळपासून ते मिरवणूक पार पडेपर्यंत कायदा , सुव्यवस्था, व शांतता राखण्याचे उत्तम कर्तव्य पार पाडले त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अथवा कोणतेही गालबोट लागले नाही हे विशेष. भद्रावती नगर परिषद सफाई कर्मचारी यांचे दिनानिमित्त विशेष योगदान होते तद्वतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.तहसीलदार राजेश भांडारकर यांनी या तणावाच्या प्रसंगी जगात शांतता लाभो अशी कामना व्यक्त केली. तर पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी धार्मिक उत्सवाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नये असे आवाहन केले.शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत निघालेल्या शोभायात्रेचा शेवट विठ्ठल मंदिर देवस्थान येथे करण्यात आला.सहकार्य व योगदान देणाऱ्यां चे आभार मानून सोहळ्याची सांगता करण्यात आली.

रामनामाने दुमदुमली अवघी भद्रावती नगरी..*  *गवराळा व भद्रावती येथे जय श्रीराम च्या गजर…

दारू पिवून दारूच्या नशेत बुलेट वाहन चालवीणारे चालकावर वाहतूक शाखेची कार्यवाही गुन्हा दाखल करून बुलेट केली जप्त *********************** (मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक ) *********************** 26/03/26 रोजी मा पोलीस अधीक्षक सा श्री सौरभकुमार अग्रवाल सर यांच्या आदेशानुसार बजाज चौकात वाहतूक शाखेची नाकाबंदी मोहीम नेमलेली होती तेव्हा एक बुलेट चालक अतिवेगाने हलगर्जी पणे बुलेट चालवीतना दिसून आला वाहतूक पोलिसांनी त्यास नाव गाव लायसेन्स विचारणा केली असता तो दारू पिल्याचा वास येत होता त्यावरून त्याची मेडिकल तपासानी केली असता डॉक्टरांनी तो चालक आशिष बाबारावं सायरे वय 34 रा जामणी ता सेलू हा दारू पिवून दारुच्या नशेत असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट दिले त्यावरून सदर बुलेट चालक याच्यावर कलम 185 मो वा का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व सदर बुलेट ही जप्त करण्यात आली आहे सदर कार्येंवही पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनखली ASI धीरज पांडे, अनिल तिवारी, विजय डोळे.सय्यद शब्बीर यांनी बजाज चौकात केलेली आहे, वाहन चालक यांनी दारू पिवून वाहन चालवू नयेत असे आवाहन वाहतूक शाखे कडून करण्यात आलेले आहे.

दारू पिवून दारूच्या नशेत  बुलेट वाहन चालवीणारे चालकावर  वाहतूक शाखेची कार्यवाही गुन्हा दाखल करून …

सरपंच रहेरबर इनामदार यांच्या कडून गावातील पहिली महिला पोलीस पदी निवड झालेल्या अनुराधा आमेटवार यांचे सत्कार. (मारोती एडकेवार जिल्हा : प्रतिनिधी नांदेड ) नांदेड : महाराष्ट्रातील गृह खात्याने घेतलेल्या पोलीस भरती मध्ये प्रत्येक जिल्हामध्ये पोलीस भरती घेण्यात आली. त्या भरतीमध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलामध्ये देखील एकूण १९९ जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये हिप्परगा थडी येथील कु. अनुराधा आबन्ना आमेटवार यांनी प्राणाची आहुती लावून जिद्द, मेहनत, चिकाटीने आपल्या कौशल्याने त्यांची नांदेड पोलीस दलामध्ये निवड झाली.या निवडीमुळे हिप्परगा गावातील पहिली शासकीय महिला नौकरी मिळवण्याचे मान त्यांना मिळाले. त्यांच्या या यशबद्दल गावातील युवा मुले व मुलींना देखील शिकणाची आवड निर्माण होईल अशी आशा गावातील नागरिक व्यक्त करत होते. गावकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून हिप्परगा थडी गावची पहिली महिला पोलीस झाल्याचा मान त्यांना मिळाला.अनुराधा अमेटवार यांना शुभेच्छा च्या भरभरून वर्षाव वेगवेगळ्या स्तरावरून होत आहेत.नातेवाईक, पत्रकार, समाजसेवक यांच्या सर्वाकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे,यातच आज हिप्परगा थडी ग्रामपंचायतचे युवा ग्रामपंचायत कडून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित ग्रामसेवक श्री हंबरे साहेब, सरपंच रहेबर इनामदार, उपसरपंच सौ चंद्राबाई तुकडे, सदस्य सय्यद एजाज,शेख गौस, शरीफाबी मोमीन, ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक लतीफ इनामदार, ग्रामपंचायत सेवक राजू अंजनीकर, सय्यद इरफान,तंगनोड गजू पाटील,चिनोड कपिल,सय्यद अलावलीसाब,मोहम्मद बेनोलेकर, तुकडे साईनाथ, तुकडे व्यंकट,पठाण मुनीर, राजू अंजनिकर, इत्यादी मंडळी उपस्थित होते.कलर - माझ्या मेहनतीच्या मागे माझा मोठा भाऊ असून त्यांनी मला परिस्थितीची कुठलीही उणीव भासू दिली नाही. त्यामागे आई बाबा देखील अफाट कष्ट आहेत. - आमेटवार अनुराधा

सरपंच रहेरबर इनामदार यांच्या कडून गावातील पहिली महिला पोलीस पदी निवड झालेल्या अनुराधा आमेटवार यां…

यावल तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा संताप; ४३ महिलांच्या सह्या असलेले निवेदन, आंदोलनाचा इशारा (रविंद्र आढाळे यावल उपविभागीय जिल्हा प्रतिनिधी) यावल तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्र. १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या समस्येमुळे परिसरातील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अजूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.स्थानिक महिलांनी दिलेल्या निवेदनावर ४३ महिलांच्या सह्या असून, या समस्येची तीव्रता अधोरेखित करण्यात आली आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत अनेक वेळा गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही केवळ आश्वासने मिळाल्याचे महिलांचे म्हणणे आहे.परिणामी महिलांना दररोज सुमारे ५ किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असून, त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित महिलांनी प्रशासनाकडे तात्काळ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, येत्या ६ एप्रिल २०२६ (सोमवार) रोजी पंचायत समिती, यावल कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, “आंदोलनाची वेळ आमच्यावर येऊ नये आणि प्रशासनाचीही नाचक्की होऊ नये, यासाठी लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची सोय करावी,” अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनाची प्रत आयुक्त, जिल्हा परिषद जळगाव तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.

यावल तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा संताप; ४३ महिलांच्या सह्या असलेले निवेदन, आंदोलनाचा…

ग्रामसेवक संघटनेचे आधारस्तंभश्रीकांत बोंडावर काळाच्या पडद्या आड. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर )देगलूर तालुक्यातील शेळगाव (नृसिंह) गावासहीत ईतर गावातील विकासाचे स्वप्न रेखाटले, ज्या शब्दांनी ग्रामस्थांच्या अडी अडचणीत मायेची फुंकर घातली आणि ज्या कर्तृत्वाने देगलूर तालुका ग्रामसेवक संघटनेला एक नवी उभारी दिली, ते सर्वांचे लाडके श्रीकांत बोंडावर दिनांक, २४ मार्च रोजी सायंकाळी ०८ ते ८:३० सुमारास देगलूर-मिर्जापूर रोडवरील आर.टी.ओ. ऑफिस जवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात त्यांची प्राण ज्योत मालवली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देगलूर तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे. कर्तव्य दक्षता आणि माणुसकीचा संगम श्रीकांत बोंडावर हे केवळ एक शासकीय अधिकारी नव्हते, तर ते ग्रामस्थांण चे आधारस्तंभ होते. ग्रामपंचायत प्रशासनात त्यांनी आपल्या प्रामाणिकपणाचा आणि कशचा जो ठसा उमटवला, तो कधीही पुसता येणार नाही. 'कामा प्रती निष्ठा आणि माणसांप्रती जिव्हाळा' हेच त्यांच्या आयुष्याचे सूत्र होते. ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी प्रत्येक सहकाऱ्याला भावा प्रमाणे जपले. त्यांच्या जाण्याने संघटनेचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. ती 'काळरात्र' आणि सुत्र झालेला देगलूर नेहमी प्रमाणे उत्साहात असणारे श्रीकांत २४ मार्चच्या रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास आपल्या कामावरून परतत असताना, काळाने आर.टी.ओ. ऑफिस जवळ दबा धरून घात केला. हा अपघात इतका भीषण होता की, एका क्षणात एका उमद्या अधिकाऱ्याचा प्रवास घांचला, ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण तालुका सुत्र झाला. प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणि ओठावर बोंडाचारः इतक्या लवकर कसे जाऊ शकतात?' हाच प्रश्न होता. सदैव चेहऱ्यावर हस्, मदतीला धावून जाण्याची वृत्ती आणि प्रशासकीय कामातली तत्परता यामुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार असून, नियतीच्या या क्रूर खेळामुळे बोंडावर परिवारावर दुःखाचे डोंगर पसरले.

ग्रामसेवक संघटनेचे आधारस्तंभ श्रीकांत बोंडावर काळाच्या पडद्या आड

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. ( पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर)देगलूर राज्यातील वृत्तपत्रांना देण्यात येणाऱ्या शासकीय जाहिरात दरात वाढ करण्याबरोबरच अन्य विविध महत्त्वाच्या मागण्या व्हॉईस ऑफ मीडिया / इंटरनॅशनल फोरम, देगलूर (जि. नांदेड) शाखेच्या वतीने करण्यात आल्या असून यासंदर्भात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार, देगलूर यांच्या मार्फत संक्षिप्त निवेदन सादर करण्यात आले.दि. २५ मार्च रोजी व्हाईस ऑफ मीडिया शाखा देगलूर च्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या माध्यम ातून मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनानुसार - २०१९ पासून कागद, मुद्रण साहित्य, वीज तसेच इतर खर्चात सुमारे १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, शासकीय जाहिरात दरात त्यानुसार वाढ करण्यात आलेली नाही. परिणामी, विशेषतः लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले असून अनेक वृत्तपत्रे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनेने काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये शासकीय जाहिरात दरात किमान १५० टक्के वाढ करणे, ई-टेंडर व शासकीय जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, जाहिरातींसाठी किमान २०० चौ. से. आकार निश्चित करणे, तसेच जाहिरातींची देयके ३० दिवसांच्या आत अदा करणे यांचा सम वेिश आहे. विलंब झाल्यास व्याज देण्याची तरतूद करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, लघु व मध्यम वृत्तपत्रांना जाहिरात वाटपात समान संधी देणे, सर्व शासकीय जाहिराती माहिती खात्यामार्फतच देण्याची सक्ती करणे, प्रलंबित तपासण्या पूर्ण करून पात्र वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करणे या मागण्यांकडेही शासनाने लक्ष द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. पत्रकारांच्या हिताच्या दृष्टीने १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती देणे तसेच २० वर्षे सेवा व ५५ वर्षे वय पूर्ण झालेल्या पत्रकारांना पेन्शनचा लाभ देण्याचीही महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभअसल्याने तो आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणे आवश्यक आहे. अन्यथा जनतेच्या माहितीच्या अधिकारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने व्यक्त केली आहे. याप्रसंगी व्हाईस मीडियाचे तालुका अध्यक्ष प्रा. निवृत्ती भागवत, सरचिटणीस शेख सब्बीर, सल्लागार गौतम बनसोडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य अनिल कदम, उपाध्यक्ष सतीश पांडवे, दिगंबर जाधव, सुलतान पटेल, प्रा. भीमराव दिपके, संतोष मनधरणे, इसाक माली पाटील, वसीम शहापूरकर, माणिक सूर्यवंशी, नागेश पलपवार आदी पत्रकार उपस्थित होते.

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.���������������������…

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी तृप्ती देसाई यांची नियुक्ती करण्याची शेख मगदूम यांची मागणी. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर) देगलूर महाराष्ट्रातील होणारे अत्याचार अन्याय आणि भेदभाव अजूनही थांबलेले नाहीत रोज नवे प्रकरण समोर येतात अशा परिस्थितीत महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या नेतृत्वात फक्त पदभूषण करणारे नव्हे तर लढणारे, भिडणारे, आणि निर्णय घेणारे नेतृत्व असणे काळाची गरज बनली आहे याच पार्श्वभूमीवर एक नाव भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक सौ. तृप्ती ताई देसाई ठळकपणे पुढे येते तृप्तीताई देसाई तृप्ती ताईने केवळ भाषणे दिली नाही तर रस्त्यावर उतरून लढा दिला आहे मंदिर प्रवेश आंदोलन असो किंवा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न त्या नेहमीच संघर्षाच्या आघाडीवर दिसल्या त्यांनी केवळ प्रश्न उपस्थित केला नाही तर समाजाला जाग केलं आज अशाच निर्भीड बिंदास्त आणि दबावाला न घाबरणारी नेतृत्वाची महिला आयोगाला गरज आहे समाजसेवेच्या भावनेमुळे त्या या पदासाठी योग्य उमेदवार ठरवू शकतात कृपया या विनंतीचा सकारात्मक विचार करून तृप्ती देसाई यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावे असे मगदूम भाई शेख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना मेलद्वारे विनंती केली आहे

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी तृप्ती देसाई यांची नियुक्ती करण्याची शेख मगदूम यांची मागणी.�����������…

Load More
That is All