Read more

View all

साकळी मंडळात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” संपन्न.. (रविंद्र आढाळे उपविभागीय जिल्हा प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि.18 फेब्रुवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार,गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत तालुक्यातील साकळी मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर दिनांक 14 मार्च रोजी संपन्न झाले.या शिबीराचे उद्घाटन आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे, विजयकुमार ढगे.महसूल उपजिल्हाधिकारी,यावल तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी,विविध तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.शिबीरामध्ये दिले गेलेले ठळक लाभ :जिवंत सातबारा वाटप : एकूण वारस नोंदी 112 प्रातिनिधिक स्वरुपात वाटप 07 उत्पन दाखले वाटप प्रातिनिधिक स्वरुपात 09 शिधापत्रिका वाटप प्रातिनिधिक स्वरुपात 09,जात प्रमाणपत्र वाटप प्रातिनिधिक स्वरुपात 11,तुकडा शेरा कमी करणे सातबारा उतारा व आदेश वाटप एकूण तुकडा असलेले सातबारा : 914, तुकडा कमी करणे पात्र : 456प्रातिनिधिक स्वरुपात 11अधिवास (domecile) प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्र वाटप प्रातिनिधिक स्वरुपात 08,विशेष अर्थसाहाय योजना प्रातिनिधिक स्वरुपात 21,लक्ष्मी मुक्ती सातबारा वाटप 13,आदिवासी खातेदार नोंद 2,अकृषिक सातबारा शेतसारा माफी 22, पुनर्वसन शेरा कमी करणे 8,घरकुल लाभ 25,आयुष्यमान कार्ड – 11- आरोग्य विभाग बेबी किट 2,१) ट्रक्टर-4 शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर प्रदर्शनीय टेबल लावण्यात आलेले होते.एकूण 900–950 नागरिकांची उपस्थिती नोंदवली गेली.शासकीय सेवा थेट गावपातळीवर पोहोचवण्यात आली.विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव , श्रीमती मोहनमाला नाझीरकर, तहसिलदार यावल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.अतुल गांगुर्डे नायब तहसीलदार यांनी उपस्थितांचे आभार मानले

साकळी मंडळात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” संपन्न..�����������������������������…

विष्णुकांत पाटील खांडेकर यांच्यातर्फे इफ्तार पार्टी.. (पिंजरी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर ) देगलूर:देगलूर तालुक्यातील शहापूर येथे पवित्र रमजान निमित्य मुस्लिम बांधवांना काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विष्णूकांत पाटील खांडेकर यांच्यातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले, पवित्र रमजान मध्ये मुस्लिम समाज उपवास करून आल्हा ची पार्थना करतात, त्यामुळे, हिंदू मुस्लिम एकता ठेवण्यासाठी कांग्रेस पार्टी देगलूर, तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजाचे आदर करते व त्यांच्या सुखात व दुःख वेळोवेळी उभा असते,त्यामुळे आज पवित्र रमजान निमित्त देगलूर तालुका कांग्रेस अध्यक्ष विष्णूकांत पाटील शेखपूरकर, यांनी शहापूर येते इफ्तार पार्टी दिले त्यावेळी,तालुक्यातीलकाँग्रेस पार्टीचे शहापूर सर्कल,जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार रामराव विठ्ठलराव वाघमारे, नंदुरकर कांबळे सर,विलास यालावार, कोकणे सर, महेबूब केरूरकर सदर, मुनिरोदिन शेख, नजीर शेख, हाफिज हबीब शेख, आसिफ शेख, शकील शेख, युसूफ पिंजारी, मुलतानी शेख, सय्यद गौस, व युवक उपस्थित होते.

विष्णुकांत पाटील खांडेकर यांच्यातर्फे इफ्तार पार्टी..

संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा ग्रामीण उपध्यक्षपदी अमृत पाटील यांची निवड.. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर)देगलूर. येथील शासकीय विश्रामगृहात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पदनियुक्ती व पक्षप्रवेशसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात देगलूर तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या अनेक पदाधिका-यांनी व कार्यकत्यांनी संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करून संघटनेला बळकटी दिली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रम ास संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष जेजेराव पाटील शिंदे (करडखेडवाडीकर), याचा हस्ते अमृत सोपानरावं याची नांदेडजिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष. पदी निवड कारण्यात आली उपस्थिती पदाधिकारी. संतोष चिद्रावार लोणीकर, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जाधव (अंदेगावकर), जिल्हा संघटक दत्ता पाटील केरूरे (सुगावकर), विधानसभा अध्यक्ष देविदास थडके तसेच तालुकाध्यक्ष शहाजी बाबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांनी संभाजी ब्रिगेडच्या विचारधारेविषयी मार्गदर्शन करत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकत्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. यावेळी देगलूर तालुक्यातील विविध पदांसाठी पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या उपस्थित होती.

संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा ग्रामीण उपध्यक्षपदी अमृत पाटील यांची निवड..����������������������������…

येरगी येथे सिने कलाकारांची भेट... (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्राम विकासाला चालना मिळण्यासाठी आज शुक्रवार चालुक्य कालीन नगरी येरगी येथे अभिनेते संदीप पाठक व अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी भेट दिली व ग्रामस्थांशी विविध विषयावर चर्चा केली.१३ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता सदरील सिनेकलाकरांचे गावात आगमन होताच गावातील महिला व बालिका पंचायत राज समि तीच्या वतीने त्यांची ओवाळणी करून स्वागत करण्यात आले. यांच्यासोबत उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी, गट विकास अधिकारी श्रीकांत बळदे, जिल्हा परिषद नांदेड चे विस्तार अधिकारी दमकोंडवार, सरपंच संगीता मठवाले, संतोष पाटील, कृषी अधिकारी सजु लाहाणे, ग्रामपंचायत अधिकारी तथा राज्य प्रवीण प्रशिक्षक यशदा मधुकर मोरे, दत्तात्रेय कुरूदे, बालाजी कोटेवाड, आदी. उपस्थित होते. यानंतर लेझीम पथकाने नृत्य सादर करूनउपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. लेझीम पथकाने सिने कलाकारांचे लक्ष वेधून घेतले. तर प्रमुख पाहुण्यांना अभिजीत बरसमवार यांनी सजवलेल्या बैलगाडीतून गावात आणण्यात आले. यामुळे आलेले अभिनेते व प्रमुख पाहुणे या अस्सल गावठी सत्काराने भारावून गेले होते.यानंतर कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आलेहोते. व्यासपीठावर मान्यवरांचेआगमन झाल्यानंतर त्यांच्याहस्ते सरस्वती च्या प्रतिमेचेपूजन करण्यात आले. यावेळीमुलींची पंचायत राज समितीव ग्राम पंचायत च्या वतीने सर्वमान्यवरांचे पुष्पहार, सरस्वतीमातेची प्रतिमा व येरगी इतिहासाचा वारसा दर्शवणारा कॉफी टेबल बुक देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संतोष पाटील यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. यामध्ये आज पर्यंत गावातील विविध अंगाने झालेल्या विकासाची माहिती दिली. यानंतर बालिका पंचायत राज चे सरपंच अंजली वाघमारे यांनी गावात बालिका पंचायत राज समितीच्या वतीने घेतलेल्या विविध ऐतिहासिक निर्णयांची व त्यांच्या अंमलबजावणीची माहिती देऊन बालिका पंचायत राज च्या कार्यपद्धतीची ओळख करून दिली. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांनी येरगीच्या कार्याचीसविस्तर माहिती दिली.यानंतर अभिनेता संदीप पाठक व रसिका वेंगुर्लेकर यांनी बालिका पंचायत राज व ग्राम पंचायत यांच्या मार्फत आई वडिलांचे पालन पोषण न करणाऱ्यांच्या विरुद्ध, हंडा बंदी, कन्या भरून हत्या, जन्म लेल्या मुलीचे संतोष पाटील यांच्याकडून मोफत काढण्यात येत असलेले सुकन्या योजना खाते आणि इतर उपक्रमांची प्रशंसा केली. तसेच अगदी म हाराष्ट्राच्या टोकावर व तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असलेल्या येरगी गावात बालिका पंचायत राज चे अतुलनीय कार्य चालते तसेच दर रविवारी सुरू असलेले स्वच्छता अभियान याची प्रशंसा करत येरगी गावात येण्याचे भाग्य आम्हाला लाभले अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वाटप अभिनेत्यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये महिलाना पैठणीच्या साड्यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेश तोटावाड यांनी केले.

येरगी येथे सिने कलाकारांची भेट...

पवित्र रमजान महिण्यातील अलीशा नाज हिचा पहिला रोजा संपन्न.* { अनिल चव्हाण / मानवत. }——————————मानवत शहरातील बांगड प्लॉट गालीब नगर परिसरातील रहिवासी मोहम्मद मुजाहेद यांची मुलगी, अल्हाज मूफ्ती मोहम्मद इसाक साहाब कास्मी यांची नात *अलीशा नाज* वय ७ वर्ष हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरित्या दि. १५ मार्च रविवार रोजी पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. तब्बल १३ तास अन्न व पाणी न घेता तिने श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण घालून दिले. इतक्या लहान वयात पहिलाच रोजा पूर्ण केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोजा पूर्ण केल्या नंतर कुटुंबीयांनी तिचे कौतूक करून अभिनंदन केले. प्रोत्साहन दिले नातेवाई यांनीही *अलीशा नाज* हिचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्या साठी शुभेच्छा दिल्या.अलीशा नाज हिच्या पहिल्या रोजामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या या कृतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे. लहान वयात धार्मिक कर्तव्याची जाणीव ठेवून हे दाखवलेला संयम इतर मुलींसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. रमजान महिन्यात रोजा ठेवण्यामागील उद्देश केवळ उपवास नसून आत्मसंयम, दानधर्म आणि प्रार्थना यांद्वारे आध्यात्मिक उन्नती साधणे हा आहे.अलीशा नाज ने पूर्ण केलेला हा पहिला रोजा तिच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला आहे. मुस्लिम समाजाचा दि.१९ फेब्रुवारीपासून पवित्र रमजान महिना सुरू झाला असून या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा (उपवास) ठेवून अल्लाहची उपासना करतात.आत्मशुद्धी, संयम आणि त्याग यांचा संदेश देणाऱ्या या पवित्र महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे.***

पवित्र रमजान महिण्यातील अलीशा नाज हिचा पहिला रोजा संपन्न.*���������������������������…

पातूरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या काळाबाजारावर प्रशासनाची कारवाई*; (पातूर (प्रतिनिधी): घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी तहसील प्रशासनाने पातूर शहरात व्यापक तपासणी मोहीम राबवली. ही कारवाई १३ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी अकोला यांच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला तसेच तहसीलदार पातूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.निरीक्षण अधिकारी शीतल मोरखडे तसेच कर्मचारी पराग खंडारे आणि अक्षय गोरे यांच्या पथकाने पातूर शहरातील विविध हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाश्ता केंद्रांवर छापेमारी केली. या दरम्यान एकूण १९ आस्थापनांची तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान योगेश्वर भोजनालय, सिदाजी महाराज टी सेंटर तसेच गावरान गुळाचा चहा या चार आस्थापनांमध्ये घरगुती वापराचे गॅस सिलेंडर व्यावसायिक कामासाठी अवैधरित्या वापरले जात असल्याचे आढळून आले.प्रशासनाने तत्काळ कारवाई करत या आस्थापनांमधील घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले असून पुढील आदेशापर्यंत ते मनात्मा इंडेन गॅस एजन्सी, पातूर यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहेत.घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर हा नियमांच्या विरोधात असल्याचे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले असून अशा प्रकारच्या प्रकरणांवर पुढेही कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगितले. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व भोजनालय चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पातूरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या काळाबाजारावर प्रशासनाची कारवाई*;�������������������…

*पाडळसे शिवपुराण कथा: आयोजक मस्त, प्रशासन सुस्त आणि जनता त्रस्त!****भव्य आयोजनाचा फोलपणा उघड; चोरीच्या घटना, पोलिसांची अरेरावी आणि मूलभूत सुविधांचा अभाव**** (पाडळसे (ता. यावल) | विशेष प्रतिनिधी**आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या 'श्री शिवमहापुराण' कथेच्या निमित्ताने पाडळसे-अकलूद शिवारात भक्तीचा पूर लोटला असला, तरी या सोहळ्याच्या नियोजनाचा मात्र पुरता बोजवारा उडाला आहे. एकीकडे **आयोजक** आपल्या प्रसिद्धीच्या झोतात 'मस्त' आहेत, तर दुसरीकडे वाढत्या चोऱ्या आणि गोंधळाकडे दुर्लक्ष करून **प्रशासन** 'सुस्त' बसले आहे. या साऱ्यात मात्र स्थानिक **जनता आणि भाविक** प्रचंड 'त्रस्त' झाले आहेत.### **आयोजक फक्त 'व्हीआयपी' सेवेत मग्न?**कथेच्या आयोजनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा केला जात असला, तरी सामान्य भाविकांच्या वाट्याला मात्र हालअपेष्टाच आल्या आहेत. * व्यासपीठावर येणाऱ्या 'व्हीआयपी' पाहुण्यांच्या सरबराईत आयोजक व्यस्त असून, सामान्य भाविकांना पिण्याचे पाणी आणि सावलीसाठी साधी सोयही मिळेनाशी झाली आहे. * प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बसण्यासाठी जागा नाही, मात्र आयोजकांच्या जवळच्या व्यक्तींसाठी खास सोफे लावले गेले आहेत.### **प्रशासनाची भूमिका फक्त नावापुरती?**लाखो लोकांची गर्दी होणार हे माहित असूनही प्रशासनाने खबरदारीचे उपाय का केले नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.* **चोऱ्यांचा सुळसुळाट:** कथास्थळी महिलांचे दागिने आणि मोबाईल लंपास होत असताना पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. * **दबंगगिरी:** पोलीस गुन्हेगारांना पकडण्याऐवजी स्थानिक ग्रामस्थांवर आणि पत्रकारांवर आपली 'खाकी' गाजवण्यात धन्यता मानत आहेत.### **जनतेचे हाल कुणी पाहायचे?*** **ट्रॅफिकचा विळखा:** रस्त्यांच्या नियोजनाअभावी तासनतास वाहतूक कोंडी होत असून, स्थानिकांना आपल्या शेतात जाणेही कठीण झाले आहे.* **प्रसादाच्या रांगेत गोंधळ:** महाप्रसादाच्या ठिकाणी धक्काबुक्की होत असून, वृद्ध आणि लहान मुलांचे हाल होत आहेत.> **निष्कर्ष:** धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अशा भव्य सोहळ्यात जर सामान्य माणसाचा छळ होत असेल, तर याला 'भक्ती' म्हणायचे की 'इव्हेंट'? आयोजकांनी आपली 'मस्ती' सोडून आणि प्रशासनाने आपली 'सुस्ती' झटकून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.---

पाडळसे शिवपुराण कथा: आयोजक मस्त, प्रशासन सुस्त आणि जनता त्रस्त!****भव्य आ…

अतिक्रमण हटविण्याच्या मागणीवर ठाम अन्यथा आमरण उपोषण- भाजपचे उपाध्यक्ष जिल्हा मकरंद पाटील; प्रशासनाच्या टाईमपास भूमीकेकडे लक्ष... (प्रा. डी. सी. पाटील, नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक)शहादा : शहरातील अतिक्रमणांच्या वाढत्या प्रश्नावरुन प्रशासनाविरोधात भाजपाने आक्रमक, आग्रही ठाम भूमिका घेतली आहे. येत्या 20 मार्चपर्यंत अतिक्रमणे हटवावीत अन्यथा, दि.21 मार्चपासून नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात येईल, असा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात प्रा.पाटील यांनी शहादा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील वाढत्या अतिक्रमणांबाबत प्रशासनाच्या वेळकाढू धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून चालढकल करण्यासह ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या अडचणी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. शहरातील तीन प्रमुख ठिकाणांवरील अतिक्रमणांचा विशेष उल्लेख केला आहे. त्यानुसार मेमन जीन कंपाऊंड परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांसह दोंडाईचा रस्त्यालगत केशरानंद मंगल कार्यालयाजवळील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून हा रस्ता तातडीने मोकळा करावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. याशिवाय शहराच्या मुख्य रस्त्यांवर लॉरीधारकांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शहरातील अतिक्रमणांमुळे सामान्य नागरिक, व्यापारी व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत प्रा. पाटील यांनी प्रशासनावर टीका केली. दि.20 मार्चपर्यंत कारवाई न झाल्यास 21 मार्चपासून नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. प्रस्तावित आंदोलनात प्रा. मकरंद पाटील यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान शहादा पालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी सांगितले की, भाजपाने दिलेल्या पत्रानुसार शहरात 23 मार्चनंतर अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त आवश्यक असल्याने पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, सणोत्सवांचा काळ असल्यान 23 मार्चनंतर पोलीस बंदोबस्त मिळणार असून याबाबतची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात आली असून त्यांनी तोपर्यंत उपोषण थांबवावे.

अतिक्रमण हटविण्याच्या मागणीवर ठाम अन्यथा आमरण उपोषण- भाजपचे उपाध्यक्ष जिल्हा मकरंद पाटील; प्रशासन…

गॅस तुटवड्यामुळे महिला पुन्हा वळले लाकूड फाट्याकडे. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी. देगलूर) देगलूर : सध्या देशात सुरू असलेल्या युद्धामुळे,ग्रामीण भागात सुद्धा या युद्धाचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे, त्यात प्रामुख्याने गॅस तुटवड्याची परिणाम आता ग्रामीण भागात दिसू लागले,आहेत एकेकाळी सर्व महिला लाकूड व चुलीवर ती स्वयंपाक करत असे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा सन्मान करून, प्रधानमंत्री उज्वला योजना या अंतर्गत ग्रामीण भागातील, खेडोपाडी प्रत्येक घरोघरी गॅस देण्यात आले. याचा फायदा भारतातील प्रत्येक महिलांनी घेतलेला, असून आनंदाने गॅस वरती स्वयंपाक करून आपले रोजचे जीवन व कामे चालू होते, पण जगातील युद्ध पातळी अमेरिका, इराण, इस्त्रालयांमध्ये, युद्ध सुरू होऊन त्याचे परिणाम जगभर उमटायला लागले आहेत,यातच महिला भगिनींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचे तुठवडा निर्माण होऊन, ग्रामीण भागातील माय माऊली, व महिला भगिनी लाकडाकडे वळल्याचे दिसून येत आहे गॅस तुटवडा सुरळीत, होईपर्यंत चुलीवरती स्वयंपाक करण्याची ही वेळ आली असून,ग्रामीण भागात मात्र महिलांनी लाकूड फाट्याची व्यवस्था करण्याचे कामी हाती घेतल्याचे चित्र दिसून येत आहे,जून ते सोनं असं म्हण आहे या म्हणी प्रमाणे ग्रामीण भागातील महिलांनी चुलीचे इंधन जमा करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत,आहे देगलूर तालुक्यातील व्यवसायिक गॅस पुरवठा बंद झालेला असून, घरगुती गॅस साठा थोडासा शिल्लक असून अधिकृत ग्राहकाच्या मोबाईलला, ओटीपी आल्याच्या नंतरच त्यांना घरगुती गॅस देण्यात येत असल्याचे गॅस एजन्सी यांच्याकडून काळविण्यात आले आहे.

गॅस तुटवड्यामुळे महिला पुन्हा वळले लाकूड फाट्याकडे.

Load More
That is All