Read more

View all

वाचनालयातील विद्यार्थ्यांनी केली, नैसर्गिक होळी साजरी. (मारोती एडकेवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड) : बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी, येथे डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे वाचनालयातील, विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रित्या रंग बनवून होळी साजरी करण्यात आली. हिप्परगा थडी, हे गाव बिलोली तालुक्यातील माळ्याच्या कडेला बसलेली वस्ती असून, उत्तरेस माळ व दक्षिणेस मनमाड नदी व मध्यभागी हिप्परगा थडी गाव आहे, या ठिकाणी माळावरती उगवलेले,निसर्गाने पळसाच्या पानाचे फुलं, या फुलाचा रंग बनवून, विद्यार्थ्यांनी त्या रंगाची होळी साजरी करून, केमिकलने बनवलेल्या रंगाची होळी साजरी न करता नैसर्गिकरीत्या रंगाची होळी साजरी करावी असे आपणाला दिलेल्या, पळसाच्या पानाच्या फुलाची रंग बनवून होळी साजरी करण्याचा समाजापुढे, एक आदर्श विचार ठेवण्यात आले. होळीनिमित्त एकमेकांवरती रंग टाकून प्रेम भाव सादर करण्यात आला, यावेळी उपस्थित वाचनालयाचे अध्यक्ष मारोती एडकेवार, व ग्रंथपाल राजू अंजनीकर व मातंग समाजाचे युवा तरुण कार्यकर्ते, व वाचनालयातील विद्यार्थी उपस्थित होते होळी सन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले.

वाचनालयातील विद्यार्थ्यांनी केली, नैसर्गिक होळी साजरी.�������������������������������������������…

अकोल्यात बौद्ध मंगल परिणय समितीची प्रभावी बैठक संपन्न.शिस्त, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचे ठराव एकमताने मंजूर.. (अकोला, प्रतिनिधी) दि. १ मार्च २०२६ :धम्म, शिस्त आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संगम अनुभवायला मिळाला तो लेबर कॉलनी, कृषीनगर येथील सम्राट अशोक अभ्यासिका केंद्रात. बुद्ध विहार समन्वय महासंघ अकोला यांच्या वतीने जिल्ह्यातील लग्न लावणारे बुद्धाचार्य, श्रामनेर, उपासक-उपासिका यांची ‘बौद्ध मंगल परिणय समिती’ बैठक अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.समाजसेवक तथा बुद्ध विहार समिती लेबर कॉलनी कृषीनगर अकोला चे अध्यक्ष देवरावजी अहिर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विचारमंथनासोबतच ठोस सामाजिक निर्णय घेण्यात आले.धम्ममार्गाची दिशा देणारे मार्गदर्शन बैठकीचे प्रमुख वक्ते आणि महासंघाचे अध्यक्ष धम्मबोधी डोंगरे सर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून बौद्ध विवाह पद्धतीतील शुद्धता, समयपालन आणि सामाजिक शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. विवाह हा केवळ दोन जीवांचा मिलाफ नसून तो समाजातील नैतिक मूल्यांचा उत्सव आहे, असे सांगत त्यांनी सर्व बुद्धाचार्यांना संघटित व जबाबदार भूमिका घेण्याचे आवाहन केले.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मुकुंद रावजी तायडे, पोलीस अधिकारी बाबुराव वानखडे, भारतीय बौद्ध महासभा अकोला चे संस्कार विभाग उपाध्यक्ष भाऊसाहेब थोरात, माजी शहराध्यक्ष गोरखनाथजी वानखडे, माजी महासचिव संतोषभाऊ रायबोले, तसेच बाळापूर तालुका अध्यक्ष राहुलभाऊ इंगळे यांची उपस्थिती कार्यक्रमास अधिक बळ देणारी ठरली. जिल्हाभरातील उपासक-उपासिकांची उत्स्फूर्त उपस्थिती कुटासा, कपिलेश्वर, पैलपाडा, खडका, दाबकी, कानशिवणी, शिवणी, मोठी उमरी, न्यू भीमनगर आदी गावांमधून आलेले ज्येष्ठ कवी, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, महिला संघाच्या प्रतिनिधींसह तब्बल २०० ते २५० उपासक-उपासिका या बैठकीस उपस्थित होते.कार्यक्रमात अनेक मान्यवरांना बुद्ध विहार समिती लेबर कॉलनी कृषीनगरचे अध्यक्ष देवरावजी अहिर यांच्या हस्ते संयोजक म्हणून ओळखपत्र प्रदान करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या कार्याची पावतीच मानली गेली.सामाजिक भान जपणारे ठराव एकमताने मंजूरबैठकीत वाचून दाखविण्यात आलेले आणि सर्वानुमते मंजूर झालेले ठराव समाजातील अनुशासन आणि नैतिकतेचा ध्वज उंचावणारे ठरले वेळेवर न लागणारे विवाह बुद्धाचार्य, श्रामनेर, उपासक-उपासिका यांनी लावू नयेत.नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी विलंब झाल्यास समंजस निर्णय घ्यावा.सर्व विवाह भारतीय बौद्ध महासभा यांनी ठरवून दिलेल्या पद्धतीने व पांढऱ्या वस्त्रांमध्येच संपन्न करावेत.गावातील किंवा बौद्ध वस्तीत अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.दारू पिऊन कोणालाही विहारात प्रवेश देऊ नये.सर्व निर्णय कायदेशीर आणि शांततेच्या मार्गानेच राबवावेत, संयोजकांकडून शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.या ठरावांमुळे बौद्ध विवाह पद्धतीला शिस्त, सात्विकता आणि सामाजिक सजगतेची नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.संघटनबांधणीसाठी परिश्रमकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी प्रेमसागर शेंडे, संदीपभाऊ इंगळे, प्रमोदभाऊ वानखडे, साहेबरावजी मोरडे, नाना किरतकार, मोतीरामजी गायकवाड, रविभाऊ जंजाळ, दिवाकर सदाशिव यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतरावजी अवचार यांनी केले, तर सूत्रसंचालन मा. पोलीस उपनिरीक्षक मनोहर वानखडे यांनी प्रभावी शैलीत पार पाडले. आभार प्रदर्शन साहेबरावजी मोरडे सर यांनी व्यक्त केले. सरनथ्य घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.धम्मसंस्कारांचा दीप प्रज्वलित ही बैठक केवळ औपचारिक नव्हती; ती होती धम्मसंस्कारांची पुनःप्रतीज्ञा.समाजातील विवाहसंस्थेला शिस्त, सात्विकता आणि कायदेशीरतेची चौकट देत बौद्ध समाजाने स्वतःच्या संघटनशक्तीचे दर्शन घडविले.अकोल्याच्या भूमीतून निघालेला हा धम्मसंस्काराचा संदेश जिल्हाभर पसरून समाजजीवन अधिक सुसंस्कृत व सजग करण्याची दिशा देईल, यात शंका नाही. अशी माहिती समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.प्रकाशनार्थ......माननीय, संपादक /पत्रकार अकोला.

अकोल्यात बौद्ध मंगल परिणय समितीची प्रभावी बैठक संपन्न.शिस्त, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचे ठराव …

माहिती अधिकार कार्यकर्त्याला जीव ठार मारण्याची धमकी. यावल प्रतिनिधी आरिफ खान. यावल शहरातील बाबूजी पुरा भागातील रहिवासी व माहिती अधिकार कार्यकर्ता हनिफखान हमीद खान उर्फ लाला व ४८. यांना एका अज्ञात व्यक्तीने दिनांक २६. फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास विरावली रोळावर धमकी दिली आहे की तू नेहमी यावल नगरपालिकेत व डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व नगरसेवक बाबत अर्ज फाटे करत राहतो याच्यापुढे जर तू आमच्या विरोधात अर्ज दिला तर आम्ही तुला व तुझ्या परिवाराला जीवे ठार मारेल अशी धमकी मिळाल्यानंतर हनीफ खान यांनी यावल पोलिसात धाव घेतली आणि अज्ञात व्यक्तीविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल केला पुढील तपास यावल पोलीस करीत आहे

माहिती अधिकार कार्यकर्त्याला जीव ठार मारण्याची धमकी.���������������������������������������������…

*पोलीस अधीक्षक कार्यालय*,*सोलापूर ग्रामीण**सायबर पोलिस ठाणे सोलापूर ग्रामीणची उल्लेखनीय कामगिरी!** गहाळ झालेल्या तब्बल ५३ मोबाईलचा शोध तांत्रिक विश्लेषणाद्वारे घेण्यात आला..**पो.उपनि* *अमितकुमार करपे यांच्या नेतृत्वाखालील सी.ई.आय.आर. पोर्टल टीमने विशेष मोहिम राबवून विविध कंपन्यांचे सुमारे ₹ ७,९५,०००/- किमतीचे मोबाईल हँडसेट हस्तगत करून संबंधित धारकांना परत केले*.*मा.पोलीस अधीक्षक**श्री.अतुल कुलकर्णी**यांच्या हस्ते मोबाईल परत करण्यात आले*. *हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले*.*सायबर गुन्ह्यांविरुद्ध सतर्कता आणि तांत्रिक कौशल्याचा उत्तम नमुना!* ***

पोलीस अधीक्षक कार्यालय*,*सोलापूर ग्रामीण**सायबर पोलिस ठाणे सोलापूर ग्रामीणची उल्लेखनीय कामगिरी!**…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या मार्फत वड्री आसरा बारी धरण येथे भोंगर्या बाजार पार पडला.. ( (यासीन तडवी पोलीस टाईम मीडीया विभागीय संपादक यावल ) आदिवासी समाजातील सरव लोक मिळुन भोंगऱ्य बाजार आनंद घेतला एकुन तिन वर्षे पूर्ण झाले उपस्थित मानवर राजु भाऊ सुर्यवंशी विष्णु पारधे लला पावर दुऊलसिग पावरा गुडु बारेला रमेश बारेला महाराज बारेला कांताबाई बारेला रेखा बारेला मंगलाबाई बारेला अजय भालेराव सरपंच सर्व आदिवासी समाजातील लोक भोंगऱ्या बाजार मिळुन शातेत पार पडला

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या मार्फत वड्री आसरा  बारी धरण येथे भोंगर्या बाजार पा…

सावखेडा येथे युवकांचा भीम आर्मीमध्ये प्रवेश सोहळा... {: यावल विभागीय संपादक यासीन तडवी -) रावेर तालुक्यातील सावखेडा येथे भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने भव्य प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. संस्थापक खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत असंख्य युवकांनी संघटनेत जाहीर प्रवेश केला.आक्रमक, कणखर आणि दमदार नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, रावेर तालुका प्रमुख राहुल निंभोरे तसेच फैजपूर शहराध्यक्ष मोसिम तडवी यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या हस्ते रईस तडवी, दस्तुर तडवी, आसिफ तडवी यांच्यासह अनेक युवकांचा प्रवेश करण्यात आला. कार्यक्रमात सामाजिक न्याय, समानता आणि संविधानिक मूल्ये यांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मोठ्या संख्येने युवकांनी संघटनेच्या विचारांशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी बोलताना गणेश सपकाळे म्हणाले की, “भीम आर्मी ही सामाजिक संघटना असून कोणत्याही प्रकारच्या अन्याय व अत्याचाराविरोधात ती नेहमीच सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असते. संपूर्ण जळगाव जिल्हा भीम आर्मीमय करण्याचा आमचा संकल्प असून प्रत्येक गावात संघटना मजबूत केली जाईल. युवकांच्या ताकदीवर सामाजिक परिवर्तन घडवून आणू.”प्रवेश सोहळ्याबाबत अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना जिल्हा प्रसिद्ध प्रमुख प्रबुद्ध खरे व राहुल जयकर यांनी दिली.

सावखेडा येथे युवकांचा भीम आर्मीमध्ये प्रवेश सोहळा...

**स्काऊट, गाईड् यांच्या ऊत्कृष्ट कार्याचे शिक्षणाधिकारी सौ. सविता बिरगे यांच्याकडून कौतूक* (*प्रतिनिधी } अनिल चव्हाण.**}———————————*44 स्काऊट गाईड जिल्हा मेळावा श्री गोकुळ नाथ मंदिर ताडकळस रोड,* *पिंगळी ता.जि.परभणी* *या ठिकाणी दिनांक 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न झाला**ह्या मेळाव्यामध्ये नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी मेळाव्यात झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धा तंबू उभारणी, मानवी मनोरे, संचलन, स्पर्धा, शेकोटी स्पर्धा यामध्ये सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले स्काऊट गाईड् च्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी सौ. सविता बिरगे मॅडम आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्र देऊन अभिनंदन करूण गूणगौरव करण्यात आले.तसेच यावेळी मा. शिक्षणाधिकारी सौ सविता बिरगे मॅडम यांनी गाईडच्या तंबूचे निरीक्षण करत असताना खूप खूप कौतुक स्काऊट, गाईडच्या याकार्याच्या यशा बद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजयजी लाड, उपमुख्याध्यापक श्री. विश्वनाथजी बुधवंत सर, श्री शिवराजजी नाईक, माणिकराव शिसोदे, अशोकजी बैस, बाळ नाईक, कैलासचंद्र सारडा तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. यावेळी स्काऊट गाईड विद्यार्थ्यांना स्काऊट मास्टर तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक श्री विश्वनाथ बुधवंत सर, (प्रशिक्षण आयुक्त स्काऊट गाईड जिल्हा परभणी) गाईड कॅप्टन सौ कुसुमताई कनकुटे,(प्रि.एल.टी)स्काऊट मास्टर श्री काचगुंडे सर, श्री ठमके सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळेची खिचडीवाल्या मावशी सौ. चंद्रकला बाई गिरी यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना भोजनाची खूप छान व्यवस्था केेली.***

स्काऊट, गाईड् यांच्या ऊत्कृष्ट कार्याचे शिक्षणाधि…

*शिक्षणाधिकारी, श्रीमती सविताताई बिरगे यांची राजर्षी शाहू महाविद्यालयास भेट** (मानवत ( अनिल चव्हाण )**{ मीडिया पोलिस टाईम. }*————————————मानवत येथील राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयास माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती सविताताई बिरगे यांनी भेट देऊन विद्यालयातील विविध उपक्रमाची केली पाहणी.सविस्तर वृत्त असे की,मानवत येथील राजर्षी शाहू महाविद्यालयास आज माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी राजर्षि शाहू कनिष्ठ महाविद्यालयास भेट देत शैक्षणिक कामकाजाचा आढावा जाणून घेतला यावेळी पाहणी दरम्यान महाविद्यालयातील शिस्तबद्ध कार्यपद्धती गुणवत्ता पूर्ण अध्यापन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या नीट आय. आय. टी. फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी मन मोकळे पणानी संवाद साधला व तसेच या उपक्रमाची विशेष दखल घेतली. याच दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष पवार यांनी यावेळी सविस्तर माहिती देतांनी सांगितले की गेल्या पाच वर्षा पासून आम्ही फाउंडेशनचे क्लासेस घेत आहोत या क्लासेसचा विद्यार्थी यावर्षी jee साठी पात्र झालेला आहे असे अशी माहीती यावेळी संतोष पवार यांनी दिली.यावेळी शिक्षणाधिकारी यांनी विद्यालयातील शिक्षकांशी संवाद साधत शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी सातत्य पूर्ण नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असून गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे असे यावेळी शिक्षकांशी हितगूज साधतांना मत व्यक्त केले. यावेळी मानवत गट साधन केंद्राचे समन्वयक जलसिंगे सर तसेच यावेळी कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांतलिंग काळे संचालक आत्मलिंग काजळे प्राचार्य संतोष पवार उपप्राचार्य शिवशक्ती काजळे प्रा अनुसयाताई काळे प्रा गोविंद रासवे प्रा काशिनाथ जाधव प्रा शिवराज गिराम प्रवीण पवार प्रा गोविंद पाटील प्रा अण्णासाहेब कांबळे दैवशालाताई शिरसागर श्रीमती सुनिताताई दमाने आदींची यावेळी उपस्थिती होती.***

शिक्षणाधिकारी, श्रीमती सविताताई बिरगे यांची राजर्षी शाहू महाविद्यालयास भेट**���������������������…

एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक? (जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे)दिनांक 28 फेब्रुवारी 2026 .यावल कडून बोरावल गावाकडे जाणाऱ्या एसटी बसने शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या ईको या वाहनाला जोरदार धडक दिल्याने आज सकाळी मोठा अपघात घडला.या अपघातात इको वाहन चालकासह सुमारे १० ते १२ लहान बालके तथा शालेय विद्यार्थी जखमी झाले तर २ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची चर्चा आहे.या अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांची सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध वाहतूक बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.एस.टी बसचे वाहक एस.एम.पाटील व चालक ए.ए.तडवी हे होते.घटनेनंतर परिसरात शैक्षणिक क्षेत्रात आणि संबंधित पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि सर्वांनी यावल ग्रामीण रुग्णालयात लहान लहान बालकांना पाहण्यासाठी गर्दी केलीसकाळी साडेसातच्या सुमारास एमएच ४० एन ९८४५ क्रमांकाची यावल-टाकरखेडा मार्गावरील एसटी बस भालशिव पिंप्री फाट्यावरून जात असताना, भालशिव पिंप्रीकडून यावलच्या एका खासगी शाळेकडे विद्यार्थी घेऊन जाणारी एमएच ३७ जी ६६८० क्रमांकाची ईकोकार समोर आली. यावेळी दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.धडक जोरदार लागल्याने ईको कारमधील चालक व विद्यार्थी जखमी झाले. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. बोरावल परिसरातील तसेच यावल शहरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.जखमी विद्यार्थ्यांवर यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रथमोपचार केले. तर गंभीर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.यात दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.अपघातातील विद्यार्थी वाहतूक करणारी ईको कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.अपघाताची माहिती मिळता बरोबर यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी यावल ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्यात भेट देऊन अपघाताची माहिती घेतली तसेचजखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीमुळे आणि त्यांच्या शैक्षणिक हक्क आणि सुरक्षतेबाबत समाजात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक?�������������…

Load More
That is All