देगलूरमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टा; कोट्यवधींची उलाढाल. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर). देगलूर: शहरात आयपीएल हंगाम सुरू होताच ऑनलाइन सट्टेबाजाराने भीषण रूप धारण केले असून, संपूर्ण शहरात जुगाराचे जाळे वेगाने पसरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गल्लीबोळापासून ते शाळा व महाविद्यालयांपर्यंत सट्ट्याची लागण पोहोचली असून, तरुणाई मोठ्या प्रमाणात या विळख्यात अडकत चालली आहे. मोबाईल अॅप्स, क्रोम व गुगलच्या माध्यमातून आयडी तयार करून सङ्गा खेळवला जात असून, यासाठी १० ते १५ हजार रुपयांची अमानत रकम घेऊन युजरनेम व पासवर्ड दिला जातो. त्यानंतर लाखो रुपयांचा सट्टा एका सामन्यावर लावला जात असून, दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. या सट्टा व्यवहारामुळे अनेक युवक कर्जबाजारी होत असून, नैराश्याच्या गर्तेत अडकत आहेत. कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या मोहापायी अनेकांनी आपले आयुष्यच उद्धस्त करून घेतले असून, देशपांडे गल्लीतील एका तरुणाने सट्ट्याच्या विळख्यात अडकून आत्महत्या केल्याची घटना अजूनही ताजी आहे.विशेष म्हणजे, शाळकरी मुलांमध्येही सट्टा खेळण्याची प्रवृत्ती वाढत असून, हा प्रकार आता फॅशन बनत चालल्याने पालक वर्गात प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, देगाव नाका परिसरातील तथाकथित टी कंपनी' हे या सट्टा रॅकेटचे मुख्य केंद्र बनल्याची चर्चा असून, एका स्वयंघोषित मास्टरमाईंडच्या इशाऱ्यावर संपूर्ण व्यवहार चालत असल्याची माहिती समोर येत आहे. सीमेलगतच्या तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांतून एजंट (फंटर) नेमून हे जाळे अधिक मजबूत करण्यात आले असल्याचेही बोलले जात आहे. या सट्ट्यात काही प्रभावशाली व्यक्ती व राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांचा सहभाग असल्याची कुजबुज नागरिकांमध्ये सुरू आहे.सर्वात गंभीर बाच म्हणजे या सर्व प्रकारांची माहिती पोलीस यंत्रणेला असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. ही निष्क्रियता की संगनमत? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात असून, या सट्टा रॅकेटमागील मास्टरमाईंडवर कठोर कारवाई करून त्याला तडीपार करावे तसेच संगनमत करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. डीआयजी शहाजी उमाप व एसपी अबिनाश कुमार यांनी या प्रकरणाची गांभीयनि दखल घेऊन तात्काळ छापेमारी करून ऑनलाइन व ऑफलाइन सट्टा पूर्णपणे बंद करावा, अशी एकमुखी मागणी पुढे येत आहे. आयपीएलच्या नावाखाली सुरू असलेले हे सद्वाराज आता केवळ बेकायदेशीर व्यवहार न राहता समाजासाठी धोक्याची घंटा ठरत असून, जर वेळेत कठोर पावले उचलली नाहीत तर आणखी किती युवक या विळख्यात सापडतील, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. देगलूरमध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टा; कोट्यवधींची उलाढाल.… byमीडीया पोलीस टाईम -April 06, 2026
गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे खानावळ चालक हैराण.काहींनी केली दरवाढ तर काही हॉटेल बंद करण्याच्या तयारीत. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर)देगलूर: आखाती देशात सुरू असलेल्या भीषण पुद्धाचा परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांच्या जननीषनावर होताना दिसून येत आहे. व्यावसायिक वापराचे सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल, द्वाषा, खानावळ, चालकासह चहा, नाश्ता, छोडी सेंटर चालवणारे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.देगलूर शहरातील चाड सेंटर, पाणीपुरी, वडापाव, दावेली, भेळ, रगडा, पापड, समोसा, इडली, डोसा, उत्तप्पा, वडा, आदी पदार्थ तयार करताना चाट सेंटर हैरान झाले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडर तुज्वडा निर्माण झाल्याने अनेक छोटे हॉटेल वाल्यांनी लाकडे आणि चूल मांडली आहे. तर दुसरीकडे इंडक्शन शेगडी विल परवडत नसल्याने किरकोळ व्यावसायिकाने फाही दिवसांसाठी चाट सेंटर, छोटे हॉटेल बंद करावा यासाठी तयारीत दिसून येत आहेत. जिल्हा शिक्षण मंडळाची परीक्षा सत्र येत्या काही दिवसांवर येऊन ठेपले असून सिलेंडर तुषडामुळे खानावळ चालक चिंतेत दिसून येत आहेत. त्याच सोषत निवासी हॉस्टेल, वस्तीगृह विद्यार्थ्यांसह पालकात ही चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही हॉटेल चालकांनी खाद्यपदार्थाचे दर वाढवले असून मुद्धाच्या परिणामाची झळ सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला घेट बसत असल्याने नागरिकात चिंता दिसून येत आहे. येत्या फाळात फाय होणार? या विचाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. फोषिडचे महासंकट नंतर फाहीसे विस्कळीत झालेले जनजीवन चार वर्षे पूर्वी पूर्वपदावर आले आहे. मोठ्या नैसर्गिक संकटाला तोंड दिल्यानंतर नागरिकांना आता आखातीयुद्धाच्या परिणामाची भीतीचे साषट दिसून येत आहे. इंधन दरवाढीसह गॅस सिलेंडर तुटवड्याच्या अफवेने नागरिक काही से बेचैन झाले आहेत. शहरात ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी फॉलेज आणि खासगी शिकवण्यासाठी निवासी आले आहेत. खासगीखानावळ मेसद्वारे त्यांची भोजनाची व्यवस्थेची सोय झाली आहे. सध्या स्थितीत चाट सेंटर, पिश्झा सेंटर, नाश सेंडर मोठ्या प्रमाणावर उघडली गेली आहेत. बदली होऊन आलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी हे शहरात मुजामी असल्याने त्यांच्या भोजनाची मिस्त हॉटेलवर अवलंबून आहे. ग्रामीण भागातून शासकीय फार्यालयात शासकीय कामकाना निमित्त शहरात ग्रामस्थांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर असते. त्यांची भूक शमविण्यासाठी हॉटेलचा मोठा आधार आहे तर पाहुणे नातलग यांचे आगमनानिमित्त काही इव्हेंट जात ला समारंभ, वाढदिवस, साक्षगंध सोहळ्यासाठी हॉटेलवर भोजनाची ऑर्डर केली जाते. बहुतांश नागरिकांना चार्टसह हटिलिंगची सवय झाली असल्याने सिलेंडर तुठवड्यामुळे जननीषनावर काहीशी परिणाम हळुवारपणे होताना दिसून येत आहे. इडली, डोसा, उत्तप्पा, खिचडी, भजे विक्रेते यांनी काहीसे दर वाढविण्याचे सुचवाच केले. चुलीवर ती लाकडे जमा करूनकाहीजणांनी व्यवसाय चालविण्याचा प्रयत्न सुरू केले. व्यावसायिक वापराचे सिलेंडर उपलब्ध होत नसल्याची तक्रार वाढली आहे घरगुती सिलेंडर पुर्किंगचा फालावधी वाढविला आहे.शहरात सिलेंडर पुरवठा बन्यापैकी होत आहे. नुकतेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व गॅस वितरकांना घरपोच गॅस सिलेंडर पोहोचण्याची व्यवस्था करण्याची सूचना देऊन सुद्धा गॅस एजन्सीवरच रांगेमध्ये तासनतास थांबून गॅस घ्याषी लागते. मात्र मागणी अधिक वाढल्याने गर्दी दिसून येत आहे. युद्धामुळे अनेक जणांनी लग़ समारंभ, साक्षगंध डोळे पुढे इकलण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेलिंग महाग होत असल्याने उन्हाळी सुट्टी निमित्त आयोजित धार्मिक पर्यटन स्थळांकडील सहलीचे चेत रद करण्याचा निर्णय अनेक कुटुंबीयांनी घेतला आहे. घरगुती सिलेंडर बुद्धि नंतर लगेच काही दिवसात सिरीयल भुसार वाटप करण्यात येत आहे. सिलेंडरचा पुरवठा व्यवस्थित होत आहे. आप्पा पर विश्वास ठेवू नका गॅस सिलेंडर तुटवड्याच्या खोट्या चर्चा यांषषाष्यात मागणीनुसार सिलेंडर पुरवठा करत आहोत. ग्राहकाने गर्दी करू नये व्यावसायिक वापराचे सिलेंडर पूर्वीप्रमाणे नेहमीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे वितरणास काही अडचणी येत आहेत. अशी माहिती इंडियन गॅस एजन्सी चे संचालक विशंभर विरादार यांनी दिली आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे खानावळ चालक हैराण.काहींनी केली दरवाढ तर काही हॉटेल बंद करण्याच्या तय… byमीडीया पोलीस टाईम -April 06, 2026
देगलूरमध्ये काँग्रेसचा भव्य बूथस्तरीय मेळावा; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, संघटन बळकटीचा निर्धार. खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला नवचैतन्य, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; संघटन बळकटीसाठी नवा निर्धार. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर) देगलूर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला बूथस्तरीय कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात पार पडला. शहरासह ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून काँग्रेस पक्षावरील आपली निष्ठा पुन्हा अधोरेखित केली. या मेळाव्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेस संघटनेला नवे बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे आदरणीय खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांची प्रभावी व प्रेरणादायी उपस्थिती होय. आपल्या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांना थेट संवाद साधत पक्षाच्या धोरणांची सविस्तर मांडणी केली. त्यांच्या अभ्यासू नेतृत्वशैली, स्पष्ट भूमिका आणि कार्यकर्त्यांशी असलेले आत्मीय नाते यामुळे संपूर्ण सभागृहात नवचैतन्य निर्माण झाले. त्यांच्या प्रत्येक शब्दातून कार्यकर्त्यांना दिशा, ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळाल्याचे दिसून आले. आजच्या राजकारणात प्रामाणिकपणा, तळागाळाशी नाळ आणि विकासाभिमुख दृष्टी असलेले नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.मेळाव्यात हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, रामदास पाटील सुमठाणकर, यशपाल भिंगे, पूजा गायकवाड, मोगलाजी अण्णा शीरसेटवर, शेख मीरा मोय्योदिन, अविनाश निलमवार, शत्रुघन वाघमारे, हाफिस मोहित, बिस्मिल्ला कुरेशी, जिया मेकानिक, नगरसेवक बालाजी रोयलावर यांच्यासह अनेकमान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष विष्णू पाटील यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना "येणारा काळ काँग्रेसचा आहे" असा ठाम विश्वास व्यक्त केला. विरोधकांकडून पैशाचे व सत्तेचे आमिष दाखवून कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते विचारांशी निष्ठावान राहून कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, "आज तुम्ही काँग्रेसचे खरे शिलेदार आहात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मावळ्यांप्रमाणे तुम्हीही पक्षासाठी निष्ठेने लढत आहात. तुमच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निश्चितच विजयाच्या दिशेने वाटचाल करेल."मेळाव्यात संघटन मजबुती, बूथ पातळीवरील अचूक नियोजन, मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याची रणनीती तसेच आगामी राजकीय घडामोडींवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावात आणि बूथ स्तरावर काँग्रेसची विचारधारा प्रभावीपणे पोहोचवण्याचा संकल्प केला.एकूणच, हा मेळावा काँग्रेस पक्षासाठी ऊर्जा देणारा आणि संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला. कार्यकर्त्यांचा उत्साह, एकजूट आणि नेतृत्वावरील विश्वास यामुळे आगामी काळात काँग्रेस पक्ष अधिक बळकट होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून आली. देगलूरमध्ये काँग्रेसचा भव्य बूथस्तरीय मेळावा; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त … byमीडीया पोलीस टाईम -April 05, 2026
येरगी येथे आरोग्य शिबिरात २९८ लोकांची मोफत तपासणी.२७ जणांची मोतीबिंदू साठी तर ११ जणांची हर्निया व अपेंडिक्स शस्त्रक्रियेसाठी निवड. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर )देगलूर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुक्यातील चालुक्यकालीन येरगी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण २९८ जणांची मोफत तपासणी करण्यात येऊन यामधून २७जणांची मोतीबिंदू साठी तर हर्निया व अपेंडिक्स साठी एकूण ११ जणांची निवड करण्यात आली आहे. सदरील शिबिराचे उदघाटन उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. संजय लाडके सर, यांच्या हस्ते सरस्वती मातेच पूजनाने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच संतोष पाटील येरगीकर, उदगीर येथील लायन्स नेत्र रुग्णालयचे डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. प्रतिक जाधव, डॉ. संजय इंगळे, आदी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर नेत्र विभाग, अन्य विभागांची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये नेत्र रोग तपासणी कक्ष, जनरल तपासणी कक्ष, बि.पी. शुगर तपासणी कक्ष, औषध वाटप कक्ष, बीपी तपासणी, सामान्य आरोग्य तपासणी, स्त्री रोग विभाग, नुसार रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी देण्यात आले.सदरील शिबिरात एकूण २९८ महिला व पुरुषांची तपासणी करण्यात आली. उदगीर येथील लायन्स नेत्र रुग्णलयाकडून नेत्र तपासणी करून त्यामधून एकूण २७ नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात येऊन उदगीर येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. तसेच यापैकी ११ जणांची हर्निया व अपेंडिक्स साठीच्या शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आले असून त्यांच्यावर देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.सदरील निशुल्क आरोग्य शिबीरात डॉ. शेख शाहनवाज, डॉ. फारूखी मॅडम, डॉ. किरण ठाकरे मॅडम, राजेश्वर मटंगे, विनायक पाटील, श्रीमती शेख शरीफा, आशाताई कालिंगवार व भुरळे, आदींनी नागरिकांची तपासणी करून नागरिकांना सेवा दिली. या प्रसंगी तंटामुक्त अध्यक्ष सायलु कांबळे, ग्रामपंचायत सदस्यविश्वनाथ बागेवार, अशोक बरसमवार, सुरेश सोमवार, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गजानन भोकसखेडे, माजी सरपंच चांदु कांबळे, दशरथ काबळे, अंगणवाडीचे हाणमाबाई बरसमवार, गंगामणी दारलावार, शितल मटपती, नागमणी बरसमवार, मजुळा सिलमकुटवार, बालिका पंचायत राज चे ग्रामपंचायत सदस्य महादेव कुंचगे, मोनिका माळगे, रुक्मिणी भुख्ळे, रितिका चिटकुलवार, शिबीर यशस्वी करण्यासाठी संतोष पाटील, इरवंत कालिंगवार, माधव ईज्जरवार, मल्लिकार्जुन मटपती, प्रभाकर वाघमारे, माधव बागेवार, सर्व ग्राम पंचायत सदस्य, बालिका पंचायत राज, आरोग्य कर्मचारी आणि गावकऱ्यांनी परिश्रम केले. प्रास्ताविक संतोष पाटील येरगीकर यांनी केल आभार बालिका पंचायत राजचे रुक्मिणी भुरळे, सूत्रसंचालन मोनिका माळगे यांनी केल. येरगी येथे आरोग्य शिबिरात २९८ लोकांची मोफत तपासणी.२७ जणांची मोतीबिंदू साठी तर ११ जणांची हर्निया व… byमीडीया पोलीस टाईम -April 05, 2026
धारदार तलवारीसह फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर )देगलूर : कुंडलवाडी शहरात दहशत पसरवण्याच्या किंवा एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या इराद्याने धारदार तलवार बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला कुंडलवाडी पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई दि. ४ एप्रिल रोजी दुपारी १.०० वाजताच्या सुमारास बसस्थानक परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात करण्यात आली. हर्ष उर्फ हर्षसिंग हाणमंत इंगळे (वय १९ वर्ष, रा. इंदिरा नगर, गल्ली क्र. १२, तरोडा बुद्रुक, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हर्ष हा कुंडलवाडीतील महालक्ष्मी मंदिर परिसरात संशयास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती कुंडलवाडी पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे शासनाने प्रतिबंधित केलेले ३१ इंच लांबी आणि २७ इंच मूठ असलेली एक धारदार तलवार मिळून आली. या कारवाईत पोलिसांनी ६,५००/- रुपये किमतीची तलवार आणि १०,०००/-रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ आणि २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुंडलवाडी पोलीस करीत आहेत. धारदार तलवारीसह फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.… byमीडीया पोलीस टाईम -April 05, 2026
हेट स्पीच प्रकरणात तणाव वाढला; संघटनांचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा! रावेर–फैजपूरमध्ये भडकावू भाषणावरून खळबळ; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. (मुख्य जळगाव जिल्हा प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील रावेर व फैजपूर येथे रामनवमी निमित्त झालेल्या कथित भडकावू भाषण प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. दोन समाजांमध्ये वैमनस्य निर्माण झाल्याचा आरोप करत नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनंतरही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. जळगाव जिल्हा एकता संघटन व कौमी एकता संघटनांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत पोलिसांना थेट इशारा दिला आहे.दि. २६ मार्च २०२६ रोजी रावेर येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात तसेच फैजपूरच्या खंडेराव वाडी येथे झालेल्या सभेत काही वक्त्यांनी केलेले भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले. या भाषणात समाजात द्वेष, भीती व तणाव निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 196, 299, 353 तसेच 152, 179, 270, 202, 352 आणि आयटी ॲक्ट 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. “तक्रारीची वाट न पाहता FIR करा” — कायद्याचा स्पष्ट आदेशसुप्रीम कोर्टाच्या In Re: Hate Speech (2023) प्रकरणानुसार, हेट स्पीच आढळल्यास पोलिसांनी कोणतीही तक्रार न येताही स्वतःहून (suo motu) FIR नोंदवणे बंधनकारक आहे. मात्र, या प्रकरणात ८ ते १० दिवस उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.“कायद्याचा अवमान सहन करणार नाही” — संघटनांचा इशाराया शिष्टमंडळाचे नेतृत्व फारुक शेख (जळगाव एकता संघटना) व कुर्बान शेख (कौमी एकता संघटना, फैजपूर) यांनी केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की,“जर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही, तर जिल्हाभरात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल. तसेच निष्क्रिय राहणाऱ्या पोलिसांविरुद्धही न्यायालय व उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल.”🕊️ सामाजिक सलोख्यासाठी कठोर संदेश — फारुक शेखएकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी सांगितले की,“कोणत्याही धर्म, समाज किंवा व्यक्तीविरुद्ध द्वेष पसरवणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रवृत्तीला थारा देणे म्हणजे समाजात आग लावण्यासारखे आहे. त्यामुळे कठोर कारवाई अत्यावश्यक आहे.” सकारात्मक पण ठाम भूमिका — कुर्बान शेखकौमी एकता संघटनेचे अध्यक्ष कुर्बान शेख यांनी प्रशासनाला आवाहन केले की,दोषींवर त्वरित FIR दाखल करून समाजात शांतता राखण्यासाठी कठोर पावले उचलावीत व कायद्याचा धाक निर्माण करावा.घोषणांमधून स्पष्ट संदेशशिष्टमंडळाच्या वतीने जोरदार घोषणा देण्यात आल्या :“जळगाव जिल्हा शांततेचा आहे — द्वेष पसरवणाऱ्यांना येथे स्थान नाही!”“कायदा सर्वांसाठी समान — हेट स्पीच करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे!” पोलिसांचे आश्वासनपोलीस उपविभागीय अधिकारी, फैजपूर विभाग अनिल बडगुजर यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की,दोन्ही पोलीस स्टेशन त्यांच्या अखत्यारीत असल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन व संपूर्ण पडताळणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.👥 शिष्टमंडळातील प्रमुख सदस्यया वेळी फारुक शेख, अनिस शहा, नजमोद्दीन शेख, ताहेर शेख, जकी पटेल, सईद शेख, अकील शेख, अमीन शेख (जळगाव), एडवोकेट अल्तमश कालू (रावेर) तसेच कुर्बान शेख, कलीम मेंबर, फारूक अब्दुल्ला, अमीन शेख, रियाज साबीर, जमालोद्दीन, शेख निसार, अख्तर पैलवान, सुलतान शेख, जाबीर शेख, रज्जाक शेख, इकबाल शेख, जफर अली, अजगर अली, वसीम शेख, गफार, काशीफ शेख, आसिफ, दानिश शेख, मोहसीन शेख (फैजपूर) आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.👉 या प्रकरणामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आता पोलिस प्रशासनाची पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेट स्पीच प्रकरणात तणाव वाढला; संघटनांचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा! … byमीडीया पोलीस टाईम -April 05, 2026
मा.जिला न्यायाधीश वर्षा बा. पारगांवकर के हस्ते अधीक्षक रविंद्र बाभुलकर का गौरवपूर्ण सत्कार.............................. , .मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक .................................हिंगणघाट - “बाभुलकर ने अपने संपूर्ण सेवाकाल में निष्ठा, ईमानदारी और कर्तव्यपरायणता का उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत किया है। न्यायालयीन प्रशासन को सुचारू रूप से चलाने में उनका महत्वपूर्ण योगदान रहा है। उनके शांत, संयमी और सहयोगी स्वभाव के कारण वे सभी के प्रिय बने रहे।”ऐसे उद्गार जिला न्यायाधीश-१ वर्षा बा. पारगांवकर ने व्यक्त किए। वे दीवानी न्यायालय वरिष्ठ स्तर के सेवानिवृत्त अधीक्षक रविंद्र बाभुलकर के सेवा निवृत्ति के निमित्त आयोजित कार्यक्रम में अध्यक्ष के रूप में बोल रही थीं।तसे ही उन्होंने आगे यह भी कहा कि, “ऐसे कर्तव्यनिष्ठ और अनुशासित अधिकारियों के कारण कोई भी संस्था समृद्ध होती है। वे संस्था की अमूल्य संपत्ति होते हैं।”स्थानीय वरिष्ठ स्तर के दीवानी न्यायालय में अधीक्षक पद पर कार्यरत रहे मा. श्री रविंद्र बाभुलकर का सेवामुक्ति का प्रसंग अत्यंत भावनात्मक एवं स्मरणीय वातावरण में मनाया गया।मा. श्री बाभुलकर की नियुक्ति दिनांक ०१/०९/१९९४ को कनिष्ठ लिपिक के रूप में हुई थी। लगभग ३२ वर्षों के दीर्घ सेवाकाल में उन्होंने वर्धा जिले के विभिन्न न्यायालयों में अत्यंत ईमानदारी, निष्ठा और कर्तव्यपरायणता से कार्य किया। उनकी अनुशासित कार्यप्रणाली तथा कार्य के प्रति अटूट प्रतिबद्धता के कारण उन्होंने न्यायमूर्ति, वकील वर्ग तथा पक्षकारों के मन में विशेष स्थान निर्मित किया है।इस निमित्त लीगल कल्चरल क्लब, हिंगणघाट शाखा की ओर से विदाई समारोह एवं सत्कार कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में मा. जिला न्यायाधीश-१ श्रीमती वर्षा बा. पारगांवकर के हस्ते श्री बाभुलकर को सम्मानपत्र, शाल एवं स्मृति चिन्ह प्रदान कर सम्मानित किया गया।इस अवसर पर मा. जिला न्यायाधीश-२ श्री धनराज वाय. काले, मा. दीवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री सैयद हसन, मा. दीवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्री गवई, अधिवक्ता संघ के सचिव एड. विजयेंद्र ढेकले, लीगल कल्चरल क्लब के शाखाध्यक्ष एड. इब्राहिम बख्श, सचिव एड. अस्मिता मुंगल खानेकर, एड. वर्षा नंदेश्वर, एड. गणवीर, एड. कुणाल दुर्गे, सहायक अधीक्षिका दुर्गे मैडम तथा न्यायालय के अधिकारी, कर्मचारी एवं अधिवक्ता बड़ी संख्या में उपस्थित थे।कार्यक्रम की प्रस्तावना एवं संचालन एड. इब्राहिम बख्श ने किया, जबकि आभार प्रदर्शन संदीप डोंगरे ने किया। कार्यक्रम के सफल आयोजन के लिए शिवानी पंडित ने विशेष परिश्रम किया।इस अवसर पर उपस्थित सभी मान्यवरों ने श्री बाभुलकर की सेवाभावी वृत्ति के प्रति कृतज्ञता व्यक्त करते हुए उनके आगामी जीवन के लिए उत्तम स्वास्थ्य, सुख एवं सफलता की शुभकामनाएं दीं। मा.जिला न्यायाधीश वर्षा बा. पारगांवकर के हस्ते अधीक्षक रविंद्र बाभुलकर का गौरवपूर्ण सत्कार.......… byमीडीया पोलीस टाईम -April 04, 2026
मा.जिला न्यायाधीश वर्षा बा. पारगांवकर के हस्ते अधीक्षक रविंद्र बाभुलकर का गौरवपूर्ण सत्कार.............................. , .मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक .................................हिंगणघाट - “बाभुलकर ने अपने संपूर्ण सेवाकाल में निष्ठा, ईमानदारी और कर्तव्यपरायणता का उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत किया है। न्यायालयीन प्रशासन को सुचारू रूप से चलाने में उनका महत्वपूर्ण योगदान रहा है। उनके शांत, संयमी और सहयोगी स्वभाव के कारण वे सभी के प्रिय बने रहे।”ऐसे उद्गार जिला न्यायाधीश-१ वर्षा बा. पारगांवकर ने व्यक्त किए। वे दीवानी न्यायालय वरिष्ठ स्तर के सेवानिवृत्त अधीक्षक रविंद्र बाभुलकर के सेवा निवृत्ति के निमित्त आयोजित कार्यक्रम में अध्यक्ष के रूप में बोल रही थीं।तसे ही उन्होंने आगे यह भी कहा कि, “ऐसे कर्तव्यनिष्ठ और अनुशासित अधिकारियों के कारण कोई भी संस्था समृद्ध होती है। वे संस्था की अमूल्य संपत्ति होते हैं।”स्थानीय वरिष्ठ स्तर के दीवानी न्यायालय में अधीक्षक पद पर कार्यरत रहे मा. श्री रविंद्र बाभुलकर का सेवामुक्ति का प्रसंग अत्यंत भावनात्मक एवं स्मरणीय वातावरण में मनाया गया।मा. श्री बाभुलकर की नियुक्ति दिनांक ०१/०९/१९९४ को कनिष्ठ लिपिक के रूप में हुई थी। लगभग ३२ वर्षों के दीर्घ सेवाकाल में उन्होंने वर्धा जिले के विभिन्न न्यायालयों में अत्यंत ईमानदारी, निष्ठा और कर्तव्यपरायणता से कार्य किया। उनकी अनुशासित कार्यप्रणाली तथा कार्य के प्रति अटूट प्रतिबद्धता के कारण उन्होंने न्यायमूर्ति, वकील वर्ग तथा पक्षकारों के मन में विशेष स्थान निर्मित किया है।इस निमित्त लीगल कल्चरल क्लब, हिंगणघाट शाखा की ओर से विदाई समारोह एवं सत्कार कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में मा. जिला न्यायाधीश-१ श्रीमती वर्षा बा. पारगांवकर के हस्ते श्री बाभुलकर को सम्मानपत्र, शाल एवं स्मृति चिन्ह प्रदान कर सम्मानित किया गया।इस अवसर पर मा. जिला न्यायाधीश-२ श्री धनराज वाय. काले, मा. दीवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री सैयद हसन, मा. दीवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्री गवई, अधिवक्ता संघ के सचिव एड. विजयेंद्र ढेकले, लीगल कल्चरल क्लब के शाखाध्यक्ष एड. इब्राहिम बख्श, सचिव एड. अस्मिता मुंगल खानेकर, एड. वर्षा नंदेश्वर, एड. गणवीर, एड. कुणाल दुर्गे, सहायक अधीक्षिका दुर्गे मैडम तथा न्यायालय के अधिकारी, कर्मचारी एवं अधिवक्ता बड़ी संख्या में उपस्थित थे।कार्यक्रम की प्रस्तावना एवं संचालन एड. इब्राहिम बख्श ने किया, जबकि आभार प्रदर्शन संदीप डोंगरे ने किया। कार्यक्रम के सफल आयोजन के लिए शिवानी पंडित ने विशेष परिश्रम किया।इस अवसर पर उपस्थित सभी मान्यवरों ने श्री बाभुलकर की सेवाभावी वृत्ति के प्रति कृतज्ञता व्यक्त करते हुए उनके आगामी जीवन के लिए उत्तम स्वास्थ्य, सुख एवं सफलता की शुभकामनाएं दीं। मा.जिला न्यायाधीश वर्षा बा. पारगांवकर के हस्ते अधीक्षक रविंद्र बाभुलकर का गौरवपूर्ण सत्कार.......… byमीडीया पोलीस टाईम -April 04, 2026
विकासाचा रथ अखंड धावत राहणार !**@) विकासपूरूष डाॅ. अकूंश लाड*. (मानवत / अनिल चव्हाण)———————————“विकासाची गती कायम ठेवत आश्वासन पूर्ण!”*उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते भगतसिंग नगरमध्ये मारुती मंदिर व भव्य उद्यानाचे भूमिपूजन करण्यात आले.शहराच्या सर्वांगीन विकासाला वेग देत दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवण्याची परंपरा कायम ठेवत उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १ मधील भगतसिंग नगर येथे हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर मारुती (हनुमान) मंदिर व भव्य उद्यानाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या दीर्घ काळच्या मागणीला अखेर मूर्त रूप मिळाले आहे.भगतसिंग नगरमधील मंदिर व उद्यान उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत डॉ. अंकुशराव लाड यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा प्रकल्प मार्गी लावला, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले.या कार्यक्रमाला प्रभागाचे नगरसेवक राजकुमार खरात व राजेश वासुंबे यांच्यासह संजयजी बांगड, दत्तप्रसादजी बांगड, ॲड. अनिरुद्ध पांडे, मोहनराव लाड, दत्तराव चौधरी, किशोर लाड, विनोद रहाटे, ॲड. गणेश मोरे, स्वप्नील शिंदे, गणेश वासुंबे, सत्यशिल धबडगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांच्या स्वप्नांना मिळाले प्रत्यक्ष रूपया ठिकाणी उभारण्यात येणारे मारुती मंदिर हे धार्मिक श्रद्धेचे केंद्र ठरणार असून, सोबतच विकसित होणारे भव्य उद्यान परिसरात हरित वातावरण निर्माण करून नागरिकांना विरंगुळ्याचे आधुनिक ठिकाण उपलब्ध करून देणार आहे. डॉ. अकूंशराव लाड यांच्या पुढाकारामुळे हा संपूर्ण परिसर विकासाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. पुढील विकासकामांची ठोस घोषणायावेळी नागरिकांशी संवाद साधताना डॉ. अंकुश लाड यांनी स्पष्ट केले की,भगतसिंग नगरला मुख्य रस्त्याशी जोडणारा डी.पी. प्लॅनमधील रस्ता लवकरच पूर्ण केला जाणार आहे. तसेच या भागातील दुसऱ्या ओपन स्पेसमध्ये बुद्ध विहार व आणखी एक उद्यान उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. “दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही”नागरिकांच्या सत्काराला उत्तर देताना डॉ. लाड म्हणाले,“शहराच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. निवडणुकीत दिलेली प्रत्येक आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. जनतेने दिलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणा आहे. काम करत आलोय, आणि पुढेही काम करत राहणार आहे.” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला राम कष्टे, सतीश मगर, नितीन मगर, नारायण गिरी, मुंजा कदम, मौली कदम, दत्ता बंडेवाड, भरत ढाले, प्रकाश ढाले, अशोक ढाले, असद खान, वाजेद शेख, समाधान साळवे, अमोल मगर, राजू चव्हाण, नितीन घनसावंत, प्रवीण मगर, विष्णू हरणे, नामदेव खताळे, गजानन बंडेवाड, रत्नदीप बोराडे, बाबासाहेब बोराडे, सुलतान भाई कुरेशी, श्रवण गायकवाड, सोनू अवचार आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, डॉ. अंकुश लाड यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग नगरमध्ये सुरू झालेला हा प्रकल्प केवळ एक विकासकाम नसून, नागरिकांच्या विश्वासाची पूर्तता आणि शहराच्या प्रगतीची नवी दिशा ठरत आहे.*** विकासाचा रथ अखंड धावत राहणार !**@) विकासपूरूष डाॅ. अकूंश लाड*.… byमीडीया पोलीस टाईम -April 04, 2026