• Home
  • About Us
  • Contact Us
MEDIA POLICE TIME

MEDIA POLICE TIME

THANKS
THANKS

आज तहसील कार्यालय रावेर व शिक्षण विभाग पंचायत समिती रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्य गृप ने वाघोड, मोरगाव, रावेर या बाजाराच्या गावांमध्ये जाऊन पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली

byमीडीया पोलीस टाईम -April 26, 2024
Load More
That is All

जाहिरात

MEDIA POLICE TIME

Follow Us

Popular Posts

आदिवासी विकास प्रकल्प यावल येथे आज पासुन *"बेमुदत अन्नत्याग उपोषण"* (यावल गायरान प्रतिनिधी तितऱ्या बारेला ) येथेसर्व आदिवासी समाज बांधवांना सुचविण्यात येत आहे की, शासन निर्णय दिनांक २८/०९/२००९ नुसार आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे ही योजना राबवली जाते, सदर योजनेचा हेतु हा आदिवासी विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकावा, त्याच्या शिक्षणाचा दर्जा वाढावा, ह्या हेतूने ही योजना राबली जाते परंतु; सद्य स्थितीत शासन *निर्णय ०४/०९/२०२५* नुसार नाशिक: पात्र अर्ज ४८६ लक्षांक ३८कळवण: पात्र अर्ज ११४९ लक्षांक ९०नंदुरबार: पात्र अर्ज ७५० लक्षांक ५६तळोदा: पात्र अर्ज १६२७ लक्षांक ११३धुळे: पात्र अर्ज ९४१ लक्षांक ६७यावल: पात्र अर्ज ३०३ लक्षांत १९राजूर: पात्र अर्ज १२० लक्षांक ०८वरील प्रमाणे *पात्र अर्जाची संख्या ५३७६ प्रवेशासाठी निश्चित केलेला लक्षांक फक्त ३९१* वरील परिस्थिती बघता ५३७६ पात्र विद्यार्थ्यांपैकी फक्त ३९१ विद्यार्थ्यांच्या लक्षांक आहे उर्वरित *४९८५ विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात आहे* , त्या अनुषंगाने यावल प्रकल्पाचे ३०३ पात्र अर्ज असलेल्या सर्व पालक मंडळींनी यावल प्रकल्पाला फक्त १९ चा लक्षांक आहे ते लक्षांक वाढवून मिळण्यासाठी महिनाभरापासून लढा देत आहे परंतु समाधानकारक निर्णय मिळाला नाही म्हणून, सर्व ३०३ पात्र अर्ज असलेले पालक मंडळी, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटना मिळून लढा उभा केला आहे, *लक्षांक वाढवून मिळावा व सर्व पात्र विद्यार्थ्यांना तत्काळ नामांकित इंग्रजी निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळावा ह्या प्रमुख मागण्या* घेऊन आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय, यावल येथे *०८/१२/२०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसणार आहे* तरी, सर्व समाज बांधव, सामाजिक संघटना यांनी लढा मध्ये सहभागी व्हावे, आजची पिढी शिकेल तेव्हाच उद्या आपला समाज टिकेल, बाबा साहेबांनी वंचित घटकांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पण केले आपल्याला स्वतंत्रपणे जगण्याच्या, शिक्षणाच्या अधिकार दिला, तो अधिकार सरकार कुठे तरी बळकावत आहे, मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कट ह्या शासन निर्णयात दिसत आहे, आपल्या हक्कासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी संपूर्ण समाजाने ह्या लढ्यात सामील व्हावे असे आवाहन. 🙏 *जोहार जिंदा बाद* *उलगुलान जारी हैं जारी रहेगा.

byमीडीया पोलीस टाईम -December 08, 2025

भद्रावती पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; 2 लाख 76 हजारांचा मुद्देमाल हस्तगत - दोन आरोपी जेरबंद... (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.9 :- पोलीस ठाणे भद्रावती येथे अप क्रमांक 545/25 कलम 303(2), 317(2), 3(5) भारतीय न्याय सहिता अंतर्गत दाखल गुन्ह्यातील चोरटे अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकले. दि. 25/09/25 रोजी फिर्यादी पंकज राजकुमार देवतळे (वय 29 वर्ष, रा. जेना, ता. भद्रावती) यांनी तक्रार दिली होती की, त्यांच्या ठिकाणाहून बैलबंडीचे चार लोखंडी सामान किंमत 16,000 रुपये तसेच दोन ट्रॅक्टरचे पाच हायड्रोलिक लोखंडी पट्टे किंमत 10,000 रुपये असा एकूण 26,000 रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या काळोखात लंपास केला.तोंडी फिर्यादीवरून भद्रावती पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान चोरीचा मुद्देमाल आणि चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण 2,76,000 रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. त्यामध्ये 1) बैलबंडीचे चार लोखंडी सामान -16,000 रुपयाचे, 2) ट्रॅक्टरचे पाच हायड्रोलिक पट्टे-10,000 रुपये , 3) गुन्ह्यात वापरलेली फोर्ड फिगो चारचाकी क्र.MH-34-AM-2618 2,50,000 रुपये ही चोरी आरोपी विनोद उर्फ बिल्लू देवगडे वय 58 वर्ष, रा. आंबेडकर वार्ड, भद्रावती, वैभव महादेव दगडी वय 29 वर्ष, रा. जेना, ह.मु. महाकाली मंदिर, भिवापूर वार्ड, चंद्रपूर यांनी केल्याचे निष्पन्न झाले असून दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक, मा. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री संतोष बाकल (उपविभागीय पोलिस अधिकारी, वरोरा) यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वाखाली भद्रावती पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.ही कारवाई पोलीस ठाणे भद्रावती व गुन्हे शाखेतील पो. उपनिरीक्षक गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, जगदीश झाडे, अनुप अस्तुंकर, विश्वनाथ चुधरी, गोपाल आतकुलवार, योगेश घाटोळे, रोहित चिडगिरे, खुशाल कावळे, संतोष राठोड यांच्या संयुक्त प्रयत्नांतून यशस्वी झाली.

December 09, 2025

नांदेड जिल्ह्यात बिबट्याची दहशत, नागरिक व शेतकऱ्यांना भीतीचे सावट. (मारोती एडकेवार जिल्हा/ प्रतिनिधी नांदेड )नांदेड : नांदेड जिल्ह्यात व बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये बिबट्याचे दहशत निर्माण झाली असून,नागरिकांत मात्र भीतीचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडिया वरती अनेक ठिकाणी बिबट्या, दिसण्याचे चित्र व कुष्णूर एमआयडीसी येथे एका शेतकरी व कामगारावरती हल्ला केलेल्या बिबट्याचे, चित्र ग्राफी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसला, रोज नवीन एका गावातील, शिवारामध्ये बिबट्या आढळून येत आहे त्यामुळे, बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागामधील शेतकऱ्याला व कामगारांना मात्र भीतीच्या सावटाखाली,शेतीची कामे कराव लागत आहे.या बिबट्याच्या संचारामुळे शेतीतले कामे सुद्धा शेतकऱ्यांना करता येत नसून रात्रीच्या,वेळी हरभरा या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी सुद्धा शेतात जाण्यासाठी भीती निर्माण होत असून, या बिबट्याच्या भीतीने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे संभ्रम निर्माण झाले आहे. यावरती आळा घालण्यासाठी वन विभाग मात्र कुठेही पुढे दिसत नसून, प्रशासन तरी याकडे लक्ष देऊन या बिबट्यांना आवर घालावं अशी विनंती नागरिकांमधून होत आहे,याकडे प्रशासनाने लक्ष देतील का असे प्रश्न,व बिबट्यांना आळा घालतील, का असे प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहेत, काही दिवसांपूर्वी देगलूर तालुक्यातील, लखा,वनाळी या गावी बिबट्या आढळला असे माहिती मिळाली, तर नंतर कुष्णूर एमआयडीसी मध्ये एका शेतकऱ्यावरती हल्ला केला व या दोन दिवसांमध्ये बिलोली तालुक्यातील पाचपिंपली,डोणगाव,बेळकोणी व बामणी,या शिवारात बिबट्या दिसल्याचे चित्र सोशल मीडियावरती फिरत असून,यामुळे शेतकरी मात्र भीतीच्या, सावटाखाली आपल्या शेतातील काम मागे पडत आहेत या कडे,वन विभागाने लवकरात लवकर लक्ष देणे गरजेचे असल्याचे, शेतकऱ्यांचं व नागरिकांची विनंती आहे.

December 05, 2025

पोलीस ठाणे वर्धा शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कामगीरी अवैध्यरित्या गांजा मालाची विक्री करीतांना एकास अटक.. दिनांक 04.12.2025 रोजी पोलीसांना मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून एन.डि.पी.स. कायदयातील तरतुदीनुसार छापा घातला असता आरोपी नाम े सुरज श्याम गौतम वय 35 वर्ष रा. शितला माता मंदीर जवळ, ईतवारा बाजार, वर्धा हा आपले राहते घरी अवैध्यरित्या गांजा अमली पदार्थ बाळगुन असतांना मिळून आल्यान े पालीसांनी त्यास अटक केली. दिनांक 04.12.2025 रोजी दुपारचे सुमारास वर्धा शहर पोलीस ठाण्याच े पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहीतीवरून त्यांनी मा. पोलीस निरीक्षक संतोष ताले यांनी दिलेल्या सुचनाप्रमाण े पंच, मापारी, फॉरेसिंक पथक व पोलीस स्टॉफसह शितला माता मंदीर जवळ, ईतवारा बाजार, वर्धा येथ े आरोपीच े राहते घरी तपासणी केली असता घरझडतीमध्य े 3 किलो 623 ग्रॅम निव्वळ गांजा अमली पदार्थ, एक छोटा इलेक्ट्रीक वजनकाटा, किरकोळ विक्रीकरीता गांजा अमली पदार्थ भरण्यासाठी वापरत असलेल्या छोटया प्लास्टीक पन्नी असा एकुण जु.कि. 73500 रु चा मुद्देमाल जप्त केला. हि कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, मा. अपर पोलीस अधिक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच े मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार गजेंद्र धर्म, शैलेश चाफलेकर, अभिजीत वाघमारे, विजय पंचटिके, महेद्र पाटील, रंजीत भुरसे, नितीन इटकरे, अश्पाक शेख, मिना माहींदे, अक्षया सावळकर, यांनी केली त्यामुळ े शहर परीसरात अवैध्य अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींवर प्रतीबंध करण्यास पोलीसांना यश मिळाले. गुन्हयात अटक केलेल्या आरोपीवर यापुर्वी सुद्धा वेगवेगळ्या कलमाअन्वये भरपुर गुन्हे नोंद असल्याबाबत माहीती मिळाली.

December 05, 2025

नाशिक ग्रामीण पोलीस दलात ४३ नवीन चारचाकी वाहने दाखल.. (मनमाड नाशिक विभागीय संपादक सतीश परदेशी) दिनांक ०५/१२/२०२५नाशिक ग्रामीण पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या एकूण ४३ चारचाकी वाहनांचा हस्तांतर सोहळा मा. जिल्हाधिकारी नाशिक श्री. आयुष प्रसाद, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दत्तात्रय कराळे, नाशिक परिक्षेत्र नाशिक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. बाळासाहेब पाटील यांचे उपस्थितीत आज रोजी पोलीस मुख्यालय आडगाव येथील परेड मैदानावर संपन्न झाला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. रविंद्र मगर, पोलीस निरीक्षक मोटर परिवहन विभाग श्री. अनिल घाडगे, पोलीस निरीक्षक वेल्फेअर श्री. राहुल मोरे, राखीव पोलीस निरीक्षक श्री. पंडित चव्हाण यांचेसह अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. सदर सोहळयाप्रसंगी प्रमुख अतिथींनी नवीन चारचाकी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.नाशिक ग्रामीण जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असुन जिल्हयास गुजरात राज्याची व इतर जिल्हयांची सीमा जोडलेली असल्याने तसेच मालेगाव हा संवेदनशील भाग असल्याने पोलीस यंत्रणेस सातत्याने कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त पार पाडावा लागतो. तसेच नाशिक जिल्हयात आगामी सिंहस्थ कुंभमेळयाकरीता देश-विदेशातुन फार मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच व्हीआयपी/व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहनताफ्यांकरीता वाहनांची अत्यंत आवश्यकता भासणार आहे.त्याचप्रमाणे जिल्हयात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, सप्तश्रृंगी गड, मांगीतुंगी व लगतचे शिर्डी यासारखे धार्मिकस्थळे असल्याने राज्यातुन व परराज्यातुन भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात तसेच जिल्हयातील कृषीउत्पन्न बाजार समित्या, पर्यटनस्थळे, विमानतळ या ठिकाणांवर सुरक्षा बंदोबस्त / व्हीआयपी भेटींच्यावेळी वाहनताफे पुरविणे आवश्यक असते.तसेच नाशिक ग्रामीण पोलीस घटकात एकूण ४० पोलीस स्टेशन, आठ उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कार्यालये, तर अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व मालेगाव विभाग अशी एकूण ५० कार्यालये व इतर शाखा कार्यरत आहेत. सुमारे साडेतीन हजार पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी कार्यरत असलेले जिल्हा ग्रामीण पोलीस दल सुमारे १५,००० चौरस किलोमीटर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्हा ग्रामीण पोलीसांकडे वाहनांची कमतरता भासत होती. उपलब्ध असलेली वाहने मोठया प्रमाणावर नादुरूस्त झाल्याने पोलीस ठाण्यांच्या एकंदर कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत होता.तसेच जिल्हयातील नागरीकांच्या तक्रारींची शीघ्रतेने दखल घेण्यासाठी डायल ११२ ही योजना कार्यन्वीत आहे. सदर योजनेअंतर्गत जिल्हयाच्या नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती अगदी कमी कालावधीत संबंधीत कॉल करणा-या व्यक्तीच्या अधिक जवळ असणा-या वाहनास पुरवली जाते. नागरीकांच्या तक्रारींची शिघ्रतेने दखल घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी ग्रामीण पोलीस दलास वाहनांची असणारी गरज आणखी वाढली होती.सदरची बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी वाहनांबाबतची मागणी मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांचे मार्फतीने जिल्हा नियोजन समितीकडे नोंदवली होती. ग्रामीण पोलीस दलास वाहनांची असलेली निकडीची गरज लक्षात घेवून शासनाने सदर कामास प्राधान्याने मंजुरी देत नाशिक ग्रामीण घटकास जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून एकलस्त्रोत पध्दतीने नाशिक ग्रामीण पोलीस दलास नवीन ४३ चारचाकी वाहने त्यात ३५ महिंद्रा बोलेरो न्युओ, ०५ महिंद्रा स्कॉर्पिओ-एन, ०२ इनोव्हा क्रिस्टा, ०१ एक्सयुव्ही ७०० अशी एकूण ४३ वाहने प्राप्त झाली आहे. तसेच नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलास मंजुर असलेल्या ८३ वाहनापैकी उर्वरीत ४० वाहने व आवश्यक वाहनांबाबत निधी मंजुर करून, तातडीने वाहने पुरविण्यात येतील असे यावेळी मा. जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच आगामी कालावधीत पोलीस दलास उपयुक्त साधनसामुग्रीसाठी तत्पर राहु असेही यावेळी सुचित करण्यात आले.सदर नवीन व सुसज्ज वाहनांच्या उपलब्धतेमुळे नाशिक ग्रामीण पोलीसांना जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न, रात्रगस्त, विविध प्रकारचे बंदोबस्त / व्हिआयपी दौरे, नाकाबंदी याबरोबरच डायल ११२ योजनेंतर्गत तक्रारदारांचे कॉल स्वीकारून त्यावर शिघ्रतेने कारवाई करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

December 05, 2025

सभापती म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील __ सभापती डॉ. संजय रोडगे... (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती पत्रकार परिषद बैठकीचे आयोजन; मार्केट कमिटी : शेतकऱ्यांच्या विकासाचा आखाडा, राजकारणाचा नाही”.-डॉ. संजय रोडगेसेलू : दि. 09 डिसेंबर रोजी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करतांना सभापती डॉ. संजय रोडगे यांनी सभापती म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.ही ठाम भूमिका स्पष्ट केली.पुढे ते बोलतांना म्हणाले की,कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या विकासाचा आखाडा व्हावा, राजकारणाचा नव्हे, या भूमिकेतून मी सभापती पदभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत पारदर्शकता, शिस्त आणि विकासाच्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. माझा स्पष्ट विश्वास आहे की, शेतकरी विकास हेच आमचे मुख्य ध्येय आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेले सर्व बदल त्यांनी वेळोवेळी कठोरपणे राबविण्याचे धाडस केले. कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तबद्धता निर्माण करण्यासाठी घेतलेले निर्णय खरोखर कौतुकास्पद आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मार्केट कमिटीतील काही कर्मचाऱ्यांची कामावरील अनास्था, शिस्ताअभावी निर्माण झालेली अव्यवस्था पाहता एक प्रशासकीय उच्च विभूषित सुशिक्षित सभापतीला न पटणारेच होते. म्हणून या सर्व बाबी वर लक्ष केंद्रित केले. आणि त्याची अंमलबजावणी करून सर्वांना एक धक्का दिला. जो काही कर्मचारी यांना पटला नाही. त्यांनी घेतलेले अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे कार्यालयामध्ये वेळेवरती हजर राहणे. आल्या बरोबर फिंगर टेक बायोमेट्रिक हजेरी करणे. युनिफॉर्म सक्तीने लागू केले. कंप्युटर प्राविण्य अनिवार्य केले. खोट्या प्रमाण पत्रांवर प्रमोशन घेतलेल्या प्रकरणांची चौकशी सुरू केली.रोज केलेल्या कामाचा अहवाल (Daily Report) कार्यालयास कळवणे आवश्यक केले आहे. रोजनिशी लिहिणे बंधनकारक केले. रजेचे नियम कठोरपणे लागू केले. रोजच्या हालचालीचे रजिस्टर सुरू केले. वसुली झालेली रक्कम बँकेत रोज जमा करण्याचे आदेश पारित केले.कोणत्याही कर्मचा ऱ्यांनी पैसे संचालकांकडे किंवा स्वतः जवळ न ठेवता बँकेत जमा करावे. या सर्व नियमांमुळे काही कर्मचारी विरोध करीत असले तरी 90% कर्मचारी पूर्ण सहमतीने शिस्त बद्ध पद्धतीने कामाला लागले आहेत. शिस्त लावणे हे मोठे आणि आव्हाना त्मक काम असले तरी ते दृढ निश्चयाने राबविण्याचे धाडस सभापती डॉ संजय रोडगे यांनी केले आहे.शेतकरी हितासाठी केलेली विकासकामे.शेतकऱ्यांना थेट फायदा होईल अशा अनेक उपक्रमांची अंमलबजावणी त्यांनी सभापती पदावर आल्या बरोबर करण्यात आली.त्यांनीमार्केट यार्डातील जागांची दुरुस्ती करून घेतली. त्याठिकाणी जनावरांचा बाजार सुरु केला. विरोध करणाऱ्यांनी त्या ठिकाणी कधीही भेट न देता केवळ बैठका घेऊन अडथळे निर्माण केल्याचे खंत व्यक्त केली.त्यांनी खरेदी व्यवस्थेत सुधारणा केली.त्यामध्ये CCI चे कापूस खरेदी केंद्र सुरू केले.कापूस खरेदी मर्यादा वाढविण्यासाठी शासनाशी सतत पाठपुरावा करत खरेदीची मर्यादा वाढवून घेतली.नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी चालू केले.मागील कार्यकाळात 4 वर्ष बंद असलेला काटा सुरू केला.शेतकऱ्यांच्या शेतमाला साठी मोंढ्यामध्ये बीट सुरू केले.शेतकरी विविध सुविधा उपलब्ध करून देत कमी दरात चाळणी यंत्र सुरू करून शेतकऱ्यांना थेट लाभमिळवून दिला.शेतीनिष्ठ पुरस्कारांचे वितरण केले. व्यापारी, हमाल, जिनिंग संचालक यांच्या बैठका घेऊन संवाद वाढवला.राजकारणाला बाजूला ठेवून फक्त शेतकरीहित लक्षात घेऊन काही कठोर आणि धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे काही विरोधक मंडळी तांत्रिक कारणांचा आधार घेऊन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत.शेतकऱ्याच्या जात -पात-पक्ष न पाहता सर्वांचा विकास करण्यासाठी गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक मदत करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली आहे.“कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या विकासाची जागा आहे. येथे राजकारणाला स्थान नाही. शिस्त, पारदर्शकता आणि शेतकरीहित या तीन आधारस्तंभावर आम्ही काम करत आहोत. कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही. मार्केट कमिटीचा प्रत्येक निर्णय शेतकऱ्याच्या भल्यासाठीच असेल.” अशी ठाम भूमिका स्पष्ट केली आहे.या पत्रकार परिषदेसाठी संचालक अँड. दत्तराव कदम,माऊली ताठे, अनिल पवार,शैलेश तोष्णीवाल, रामेश्वर राठी, केशव सोळंके आदी मान्यवर उपस्थित होते.

December 09, 2025

जांब येथील शेतकऱ्यांना पाणी फाउंडेशन तर्फे गट शेती प्रीमियर लीग २०२५ चा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. _______________________________________________संजय भरदुक प्रतिनिधी (मंगरुळपीर वाशिम ) _______________________________________________________दिंनाक -०६/१२/२०२५ शनिवार _____________________________मंगरूळपीर---तालुक्यातील शेलूबाजार जवळील नागी (ईचा) येथे ६ डिसेंबर शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक,सार्वजनिक सभागृह, येथे सन्मान सोहळा चे पाणी फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत श्री योगेश कुंभेजकर (जिल्हाधिकारी वाशिम), डॉ.अविनाश पौळ (मुख्य सल्लागार पाणी फाउंडेशन),आरिफ शहा (जिल्हा कृषी अधिकारी वाशिम),अनिसा महाबळे (आत्मा संचालक)), श्री सचिन कांबळे (तालुका कृषी अधिकारी मं.पीर), अश्विनी भोसले (तालुका कृषी अधिकारी कारंजा) यांच्या शुभहस्ते जांब येथील डॉ.पंजाबराव देशमुख शेतकरी गटाला व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी नैसर्गिक साधनसंपत्ती वापरून गटामार्फत सेंद्रिय शेती करतात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमामध्ये सहभागी अनेक शेतकरी गट व शेतकऱ्यांची उपस्थिती होती सर्व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी सहकारी, कृषी सहायक , पाणी फाउंडेशन टीम, आत्मा संचालक कॄषी विभाग यांचे मोलाचे मार्गदर्शन सहकार्य लाभले.तसेच गावातील शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले.

December 06, 2025

महसूल विभागातील मुकुंद आष्टीकर यांचा सेवा गौरव समारंभ संपन्न. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.सेलू ): सेलू तलाठी पदावरून सेवानिवृत्त झाल्यामुळे महसूल विभागाचे मूंकूद आष्टीकर यांच्या कार्याचा गौरव करत सर्व महसूल विभागाचे कर्मचारी यांच्या वतीने भव्यदिव्य असा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. पाथरी रोड वरती गूरुकपा हॉटेल येथे महसूल विभाग आणि तलाठी सघंटने कडून तलाठी पदावरून सेवा निवृती गौरव सभांरभ कार्यक्रमात निवडणूक अधिकारी उदयसिह भोसले, शैलेश लाहोटी, डॉ. शिवाजी मगर, प्रशांत थारकर,महसूल विभागात तलाठी सघटनेचे जिल्हाअध्यक्ष, सेलू तालूक्या तील शेतकरी, व्यापारी, शहरातील मित्र परीवार, सेलू महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थीती होती.कार्यक्रमा चे सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारीका हेगडे यांनी केले. यावेळी सत्कार मर्ती मुकंद आष्टीकर, सौ. आष्टीकर, शैलैश लाहोटी, डॉ. शिवाजी मगर, अशोक उपादय, प्रशांत थारकर,माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मिलिंद सावंत,प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, डॉ. ऋतुराज साडेगावकर,विजय मोरे,सारीका हेडगे, बोधले, माधव लोकूलवार, सूर्यवंशी, अशोक मंत्री, कृष्णा देशमूख आदी मित्र परिवार उपस्थित होते.

December 04, 2025

कोटेकलूर येथे अखंड शिवनाम सप्ताहाची, भव्य व भक्तिमय सुरुवात. (मारोती एडकेवार जिल्हा: प्रतिनिधी नांदेड) नांदेड :देगलूर तालुक्यातील मौजे कोटेकलूर येथे दरवर्षीप्रमाणे, यंदाही अत्यंत श्रद्धा व उत्साहाच्या वातावरणात अखंड शिवनाम सप्ताहाला सुरुवात झाली. ६ डिसेंबर २०२५ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित सप्ताहाच्या, उद्घाटनासाठी गावातील तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहाटे काकड आरती, अभिषेक, रुद्रास्तव पठण व हरिनामाच्या जयघोषात या सप्ताहाचे शुभारंभ झाले.उद्घाटन प्रसंगी गावातील मान्यवर, मंदिर समितीचे पदाधिकारी, महिला मंडळ, युवक मंडळ तसेच मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांनी भगवान शिवाच्या चरणी पूजा-अर्चना करून सप्ताहाचे महत्त्व सांगितले. भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.या सप्ताहात दररोज शिवमहिम्न स्तोत्र, रुद्रपाठ, हरिनाम संकीर्तन, शिवपुराण वाचन, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ तसेच विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः महिला मंडळाच्या संयुक्त विदर्भ गजरामुळे कार्यक्रमाला विशेष भक्तिमय रंग चढणार आहे.ग्रामस्थांनी हरिनाम सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी होऊन भक्तिरसाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी प्रसंगी केले.सप्ताहाच्या काळात कोटेकलूर गावात शांतता, ऐक्य, सामाजिक सलोखा व अध्यात्मिक उर्जा निर्माण झाली असून भाविकांसाठी प्रसाद, पाणी, व्यवस्थापन इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.गावातील नागरिकांनी या उत्सवासाठी विशेष तयारी करून मंदिर परिसर सजविला आहे. फुलांच्या तोरणांनी सजवलेला मार्ग, मंदिरे व परिसरातील आकर्षक प्रकाशयोजना यामुळे वातावरण अधिकच पवित्र व मंगलमय झाले आहे.सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी विशेष महाआरती, हरिनाम संकीर्तन, महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवकृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

December 09, 2025

खेडीभोकरी तापी पुलाचे काम प्रगतीपथावर मात्र नवीन पर्यायी मार्ग तात्काळ सुरू करण्याची जनतेची मागणी.. (चोपडा तालुका प्रतिनिधी (ज्ञानेश्वर बाविस्कर ) येथिलतालुक्यातील खेडीभोकरी तापी पुलाचे काम सध्या प्रगती पथावर आहे तरी सर्व सामान्य जनतेला येण्या जाण्या साठी त्रास होत आहे तरी प्रयाई मार्ग लवकरात लवकर तयार करणे.व सर्व सामान्य जनतेचे वाहनंधारकांचे प्रवाशांचे तापी नदीच्या पात्रात जिवाचे हाल होणार नाहीत ही काळजी प्रशासनाने लक्षात घ्यावी . अशी मागणी जनतेकडून होत आहे .

December 03, 2025

Main Tags

  • THANKS (1)
  • धन्यवाद (2)
  • धन्यवाद..... (1)

Labels

  • THANKS (1)
  • धन्यवाद (2)
  • धन्यवाद..... (1)
  • Home
MEDIA POLICE TIME

MEDIA CRIME TIME

MEDIA POLICE TIME NETWORK च्या Digital वेब पोर्टल चा शुभारंभ जळगाव जिल्हा, रावेर तालुका, ( महाराष्ट्र ) येथे करण्यात आला असुन.राज्यात आज अनेक संकेतस्थळाच्या माध्यमातून वृत्त देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रातील चालू घडामोडी , गुन्हे , तसेच सांस्कृतीक, शैक्षणिक घडामोडी, चालु घडामोडी, शेती विषयक आणि प्रशासकीय बातम्या या पोर्टल च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येणार आहे पोर्टलची एम.एस.एम.ई. अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे Ragistrestin No : UDYAM-MH-14-0033356
मुख्य संपादक तथा संचालक हमीद इस्माईल तडवी मोबा- +91 90963 03283 या न्यूज पोर्टलला ज्या बातम्या येतात त्या प्रतिनिधी मार्फत येत असल्यामुळे प्रकाशित झालेल्या बातमी शी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही
कोणतेही कायदेशीर न्याय क्षेत्र रावेर

Design by Theme Developer | Distributed by Blogger Templates
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • RTL Version