धामणगाव तालुक्यातील विरूळ रोघे गावात एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू, गावात शोकाकुळ . (मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती ) पोलीस विभाग, तहसीलदार व आरोग्य विभागाने घटनास्थळी भेट, आ प्रताप अडसड यांनी प्रशासनाला सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या,शव विच्छेदन तज्ज्ञ डॉ.आशिष सालणकर करत आहेत पोस्टमार्टम.चांदूर रेल्वे : पोलीस स्टेशन हद्दीतील विरूळ रोंघे गावात शुक्रवारी सकाळी 5 ते 6 वाजता च्या वेळी हृदयद्रावक घटना घडली, ज्यात एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुली कु चैताली राजेश साव वय 11 वर्षे, व कु नंदिनी प्रवीण साव वय 11 वर्ष या दोन चिमुकल्या मुलींचा दु:खद मृत्यू झाला, तर याच कुटुंबातील चि देवास राजेश साव,भक्ती प्रवीण साव यांच्यावर धामणगावच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साव कुटुंबातील दोन मुलांवर गुरुवारपासून धामणगाव येथील दवाखान्यात पोट दुखत असल्या कारणाने उपचार सुरू होते, त्यांना गुरुवारी दवाखान्यातून बरं वाटलं वाटत असल्यामुळे सुट्टी देण्यात आली,मात्र गुरुवारी रात्री अचानक या मुलांना पुन्हा पोट दुखीची त्रास सुरू झाल, व शुक्रवारी सकाळी ६.०० वाजता घरातील एका मुलीचा अचानक मृत्यू झाला, तर दुसऱ्या मुलीला दवाखान्यात घेऊन जात असताना तिचा ही मृत्यू झाला, तर या कुटुंबातील दोन्ही मुलांना धामणगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार करीता दाखल करण्यात आले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे, या घटनेची माहिती मिळताच चांदुर रेल्वेचे ठाणेदार अजय अहिरकर व पोलीस टीम ने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला, तसेच दोन्ही मुलींचे मृतदेह चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्या करिता आणण्यात आले, पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय अहिरकर यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत. बॉक्स मध्ये (घटनेची माहिती मिळताच प्रताप अडसड यांनी प्रशासनाला सूचना देऊन सखोल चौकशीचे आदेश दिले, यावेळी धामणगावचे तहसीलदार गोविंद वाकोडे, आरोग्य विभाग अंजनसिंगीचे डॉ. आनंद जैन यांनी घटनास्थळी भेट दिली, ) बॉक्स मध्ये (दोन्ही मुलींचे शवविच्छेदन तज्ज्ञ डॉ. आशिष सालणकर पोस्टमार्टम करत आहे बातमी लिहे पर्यंत पोस्टमार्टम की रिपोर्ट आली नाही,)
byMEDIA POLICE TIME
-
0