दुपारी दीड वाजेपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होण्याची शक्यता! (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी)लोकसभा निवडणूकीची मतमोजणी मंगळवारी होणार असून दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत निकालाचा कल समजु शकणार आहे मतमोजणीच्या एकुण २५ फेऱ्या होणार असून सर्व फेऱ्या पुर्ण होण्यास दुपारचे तीन वाजणार आहेत. मतमोजणीसाठी नियुक्त दोन्ही केंद्रिय निरीक्षक नंदुरबारत दाखल झाले आहे. मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.दरम्यान निवडणुकीच्या निकालाची प्रचंड उत्सुकता जिल्ह्यात लागून आहे अनेकांनी पैजा लावल्या आहेत नंदुरबार लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान झाले मतदान झाल्यानंतर २०१५ मतदान केंद्रातील मतदान यंत्रणा हे नंदुरबारातील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आले आहे. याठिणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे मतदारसंघात ७० टक्के मतदान झाले असून कोण बाजी मारतो याकडे लक्ष लागून आहे मंगळवारच्या मतमोजणी कडे सर्वाच्या नजरा लागल्या असून दुसरीकडे प्रशासनानेही आपली तयारी पूर्ण केली आहेत. मतमोजणी कर्मचारी सकाळी ६ वाजताच मतमोजणी केंद्रात दाखल होणार आहेत मतमोजणीसाठी एकुण ६०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय १४ टेबल असतील प्रत्येक टेबलावर एक सुपरवाझर, एक सहाय्यक, एक सुक्ष्म निरीक्षक आणि एक शिपाई यांचा समावेश आहे मीडिया व पत्रकार प्रतिनिधींना ठराविक वेळानुसार गटागटाने आत जाऊ दिले जाणार आहे.एकुण २५ फेऱ्यांना दुपारचे तीन ते साडेतीन वाजतील अधिकूत निकाल हा साधारण ४ वाजता जाहीर होण्याची शक्यता असुन प्रशासनाने तसे नियोजन करून ठेवले आहे. यंदाची निवडणूक ही चुरशीची झाल्याने एखाद्या वेळी शेवटच्या काही फेऱ्या देखील उत्सुकता ताणली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेरीनिहाय अधिकूत आकडेवारीवरच बरेच काही अवलंबून राहणार आहे गेल्या निवडणुकीत १२ व्या फेरी अखेर जवळपास स्पष्ट झालेला होता. यंदा तशी शक्यता कमीच आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0