यावल तालुक्यात वादळी वारा पावसामुळे शेती पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागामार्फत तात्काळ सुरू. यावल दि.७ (सुरेश पाटील) तालुक्यात काल मंगळवार दि.६ मे २०२५ रोजी संध्याकाळी अचानक झालेल्या वादळी,वारा पाऊसामुळे काही गावात शेतकरी बांधवांच्या केळी पिकांचे व काही नागरीकांच्या घरांचे मोठे नुकसान झाल्याने फैजपूर विभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी आज सकाळी तातडीने घटनास्थळी प्रत्यक्ष भेटी आपल्या महसूल यंत्रणेच्या माध्यमातून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू केली. दरम्यान काल दिनांक ६ मे रोजी यावल तालुक्यात विविध गावांमध्ये अचानक आलेल्या वादळी वारा आणी अवकाळी पाऊसामुळे केळी पिकांचे व काही ठीकाणी रहीवाशी घरांचे नुकसान झाले असुन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,फैजपुर विभागाचे प्रांतधिकारी बबनराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थित आज सकाळच्या सुमारास यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या पथकाने तालुक्यातील डांभुर्णी शेती शिवारात वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानिची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामाची प्रक्रिया सुरू केली सुरुवात केली. यावेळी डांभुर्णी गावाच्या लोकनियुक्त सरपंच कल्पनाबाई बावीस्कर,शेतकरी व ग्रामस्थ मोठया संख्येत उपस्थित होते, यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पिनाटे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना तात्काळ तुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या.या अवेळी आलेल्या वादळी वारा आणी पाऊसामुळे तालुक्यात ईतर ठीकाणी देखील मोठे नुकसान झाल्याचे वृत्त मिळाले असुन, त्यांचे ही पंचनामे व्हावे अशी अपेक्षा शेतकरी व नागरिकांनी ग्रामस्थांनी केली आहे .
byMEDIA POLICE TIME
-
0