**श्रीमती कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाले नाले सफाई मोहिम प्रगती पथावर*. (मानवत / प्रतिनिधी.)मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाले शहरातील अनेक प्रभागातील मानवत नगर परिषदेकडून नाले साफ सफाईचे कामे युद्ध पातळीवर असल्याची माहिती मुख्याधिकारी सौ. कोमल सावरे यांनी दिली असून श्रीमती कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळ्यापूर्वीची शहर स्वच्छ व नाले सफाईची कामे जोमात सूरू असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केल्या जात आहे.सविस्तर वृत्त असे की, येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होण्याची शक्यता लक्षात घेता मानवत नगर परिषदेकडून शहरातील नाले सफाईचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. या कामांचे मार्गदर्शन व नियोजन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत नियोजन बद्ध पद्धतीने सुरू आहे.मानवत शहरातील प्रमुख तसेच उपनगरी भागातील नाल्यांमध्ये वर्षभर साचलेला गाळ, प्लास्टिक कचरा, झाडांच्या फांद्या व इतर अडथळ्यांमुळे पाणी वाहतुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला पूरस्थिती उद्भवू शकते. ही परिस्थिती टाळण्यासाठी नगर परिषदेकडून नाले उपसण्याचे काम प्राधान्याने सुरू करण्यात आले आहे.मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यां सोबत नाले सफाई च्या कामाचा आढावा घेतला असून, वेळेवर व गुणवत्तेपूर्ण काम होण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी कामकाजात कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्टपणे संकेत दिले आहे. दररोजच्या कामाचा अहवाल घेतला जात असून, स्वच्छता निरीक्षक व अभियंत्यांची विशेष जवाबदारी निश्चित करण्यात आली आहे.शहरातील नाले सफाईसाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री तसेच वाहनांची पुरेशी उपलब्धता करून देण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी देखील स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन घरातील व परिसरातील कचरा नाल्यांमध्ये टाकू नये, असे आवाहन मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी नागरिकांना केले आहे.शहरातील काही ठिकाणी याआधी पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या तक्रारी होत्या, त्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करून काम सुरु आहे. येत्या आठवड्यात संपूर्ण शहरातील नाले सफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट नगर परिषदेनं निश्चित केल आहे. मानवत शहरातील काही भागात छोटे मोठे नाले व गल्लीतील नाल्यात गाळ तसेच काटेरी झाडे-झुडपे, प्लास्टिक, व इतर कचरा साचलेला असतो, परिणामी पावसाळ्यात शहरातील अनेक भागात पाणी जमा होते. हे पाणी जमा होवू नये साठी मानवत नगर पालिकेकडून मान्सून पूर्व कामांना सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी शहरातील विविध भागांमध्ये जेसीबी तसेच पोकलॅनच्या सहाय्याने शिवाजी नगर, जिजाऊ नगर, वालीबाचा मळा, बौद्ध नगर, देवी मंदिर व मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेले मोठे नाले तसेच शहरातील विविध भागातील मोठ्या नाल्यातील पूर्ण साफसफाई करण्यात आली. या साफसफाई मूळे पावसाळ्यात शहरातील नागरीकांना त्रास होणार नाही. याची दक्षता पालिकेकडून घेण्यात येत आहे.यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे यांच्या कडून शहरातील नागरिकांनी स्वच्छता राखावी तसेच आपल्या घरातील व परिसरातील तयार होणारा कचरा हा घंटागाडीत व्यवस्थित टाकावा असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच याविषयी अधिक माहिती देताना श्रीमती सावरे यांनी या उपक्रमामुळे येत्या पावसाळ्यात नागरिकांना पावसाच्या साचणाऱ्या पाण्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.तसेच शहरात स्वच्छता व आरोग्य अबाधित राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नगर परिषदेकडून या कामासाठी विशेष निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी नगरपरिषदेचे भगवानराव शिंदे कार्यालयीन अधीक्षक, सय्यद अन्वर नगर अभियंता, भागवत भोसले अभियंता, संतोष उन्हाळे, भारत पवार, रामराव चव्हाण कर निरीक्षक, मुंजाजी गवारे स्वच्छता निरीक्षक, पंकज पवार, वसीम शेख शहर समन्वयक, बळीभाऊ दहे, सुनील कीर्तने मुकादम, दीपक भदर्गे, राम दहे, आदींची उपस्थिती होती.***

श्रीमती कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाले नाले सफाई मोहिम प्रगती पथावर*.                                     
Previous Post Next Post