अनेक वर्षांपासून कुसुंबा गावात होत आहे पोलिस चौकीची मागणी. वरिष्ठ पोलिस अधीकारी यांनी लक्ष देण्याची गरज (जळगाव प्रतिनिधी )रावेर तालुक्यातील कुसुंबा बुद्रुक हे गाव सातपुडा पायथ्याशी वसलेले आदिवासी गाव म्हणून परिचित आहे हे गाव तसं चांगलं पण वेशीला टांगल असे म्हणायला काहीच हरकत नाही.कारण हे गाव शांततेत गुण्या गोविंदाने नांदत आहे मात्र काही संकुचित वृत्तीच्या लोकांमुळे कुसूंबा गावाचा नकाशा बिघडला आहे ह्या गावाचा नकाशा बिघडवण्या मागचं कारण म्हणजे दारुड्या बेवळ्यांचे प्रमाण वाढणे विचित्र प्रकार घडण्याची पहिली पायरी म्हणजे बेवळ्यांपासुन सुरू होते घटना कोणत्या व्यसनांपासून होतात दारूडे बेवळ्यांचा उगम कुठुन होतो याकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे तसेच रावेर पोलिसांनी दिवसाही एक दोन फेरी पेट्रोलिंग सुरू करावी कारण पोलिसांच्या नजरेस पण अशा घटना दिसायला हव्या अशी परिसरातील गावकरी शेतकरी महिलांची रास्त स्वरुपाची मागणी आहे कारण यामुळे संकुचित व्रुत्तीच्या लोकांवर पोलिसांचा वचक निर्माण होईल अशी चर्चा मात्र परिसरात जोर धरू लागली आहे आणि जनतेकडुन ऐकण्यास मिळत आहे याबाबत अधिक माहिती अशी की कुसूंबा गाव हे सातपुडा पायथ्याशी असल्याने ह्या जंगलमय परिसरात शेती शिवारात दररोज काही ना काही घटना घडतच असतात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीची घटना छोट्या छोट्याशा कारणांवरून त्यांचे रुपांतर हाणामारीत व्हायला वेळ लागत नाही दारूळे बेवळ्यांचा धुमाकूळ काही कारण नसतांना शिवीगाळ करणे अशा अनेक प्रकारच्या घटना कुसुंबा गावात नेहमी घडत असतात त्यामुळे ह्या गावाला पोलिस चौकीची अत्यंत गरज आहे ,जेणेकरुन कायदा व सुव्यवस्था चे योग्य प्रकारे पालन होईल आणि ह्या गावात जो पोलिसांबद्दलचा धाक संपला आहे तो पोलिसांचा धाक कायम राहील आणि गाव शांततेत नांदेल ह्या गावाला लागू असलेले रावेर तालुका पोलिस स्टेशन हे गावापासून ७ ते १० किमी अंतरावर आहे ह्या रावेर पोलिस स्टेशन ला संबंधित नागरिक पोहचतो तो पर्यंत ह्या घटनांचा पोलिस येईपर्यंत चेहरा मोहरा बदलून जातो अशा ह्या घटनांना लक्षात घेत गावकरी नागरिक महिलांनी गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस चौकीची मागणी केली आहे परंतु याकडे प़ोलिस चौकीच्या मागणीकडे पोलिस प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे? असा प्रश्न गाव परिसरातील जनतेला, महिलांना खुप सतावत आहे त्याचबरोबर कुसूंबा बु येथील शेती शिवारात आदिवासी संकुचीत व्रुत्तीचे लोक शेतात जाऊन दांगोडे घालत असतात दगडफेक करतात आणि कोणी शेतकरी गावकरी यांनी विचारपूस केली तर कोणालाही शिवीगाळ करतात असा चित्र विचित्र प्रकार करीत असतांत अशा ह्या संकुचित व्रुत्तीचे लोकांमुळे कुसूंबा गावाचा नकाशा बिघडला आहे कारण यांचे बघुन इतर शेतकरी देखील भांडणे करीत असल्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे अशा ह्या घटनांना जबाबदार कोण ?ह्या संकुचित व्रुत्तीच्या लोकांना लगाम लावणार कोण ?याकडे संपुर्ण गावातील जनतेचे लक्ष लागले आहे.मागील काळात ह्याच संकुचित व्रुत्तीच्या लोकांनी मध्यप्रदेशमधील चोरीच्या मोटारसायकली महाराष्ट्रात कमी किंमतीत विकल्या होत्या त्यांचा पर्दाफाश मध्यप्रदेश पोलिसांनी केला होता त्यावेळी संबंधित चोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली की नाही की मोकाट सोडले असे परिसरातील जनतेकडुन बोलले जात आहे.अशा अनेक घटना ह्या परिसरात घडतच असतात म्हणूनच या कुसूंबा गावाला पोलिस चौकी स्थापन करण्यात यावी तरी या संपूर्ण प्रकाराकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने या घटनांचा विचार करून तात्काळ कुसूंबा परिसरात पोलिस चौकी स्थापन करावी अशी रास्त स्वरुपाची मागणी परिसरातील जनतेने गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी,महिलांनी पोलिस प्रशासनाकडे रास्त स्वरुपाची मागणी केली आहे..
byMEDIA POLICE TIME
-
0