**तालूक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी !* *युवा तालूकाध्यक्ष @)> दत्तराव परांडे. (*मानवत // प्रतिनिधी.)———————————जिल्हासह मानवत तालूक्यातील शेतकरी अनेक समस्यामध्ये गूरफटला असून शासनाच्या वेळ काढू धोरणामूळे शेतकरी देशोधडीला लागला असून आत्महात्या करण्याची वेळ शासनाच्या वेळ काढू धोरणामूळे आली.त्यामूळे आपण राज्याच्या मंत्री तथा परभणी जिल्हाच्या *पालकमंत्री* असल्यामूळे आपण शेतकर्यांच्या रितसर मागण्या शासनदरबारी मांडून त्या सोडवाव्यात अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली. परभणी जिल्हातील पिक विमा धारक शेतकरी बांधवांचा रखडलेला 25%. अग्रीम तात्काळ अदा करावा. नोफेट अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्राची संख्या वाढवावी. वन्यजीव प्राण्यांचा होणारा उपद्रव्य टाळण्यालागी शेत कुंपन या घटकाला सामाविष्ट करावे. महा डिबीटी अंतर्गत शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान तात्काळ अदा करावे. नानाजी रेखामुख कृषी संजिवनी योजनेअंतर्गत पाईप लाईन व मोटार पंप या घटकाचा समावेश करावा. मिळणाऱ्या अवजार बँक या घटकाचे टारगेट वाढून द्यावे, नानाजी देशमुख कृषी मंजिवनी योजनेअंतर्गत पाईपलाईन व मोटार पंप या घटकांचा समविश करावा. जायकवाडी प्रकल्या अंतर्गत येणाऱ्या पूर्व कनाल लाईन शेवटच्या शेतापर्यंत दुरुस्तीकरण करण्यात यावे. वरिल सर्व सामान्य मागण्यांचा आपल्या स्तरावरून योग्य तो पाठपुरावा करावा. अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे युवा तालूका अध्यक्ष दत्तराव परांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष नामदेवराव काळे, आदी सह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.***
byMEDIA POLICE TIME
-
0