*वाहतूक पोलिसांनी विद्यार्थी यांना दिले वाहतूक नियम पाळण करण्याचे धडे 400 विद्यार्थी यांनी घेतली वाहतूक नियम पाळण्याची प्रतिज्ञा **
(हिंगणघाट वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा पत्रकार)
आपल्या वर्धा जिल्ह्यात रस्ते वाहतूक अपघात कमी व्हावेत प्रlणातीक अपघात कमी व्हावेत या करिता मा पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सर यांनी वाहतूक पोलीस यांना सर्व शाळा कॉलेज ट्युशन कोचिंग क्लास मधील विध्यार्थी यांना भेटी घेऊन वर्धा जिल्ह्यात अपघात कमी व्हावेत वाहतूक नियमाचे पालन करणेस जणजागृती करण्याच्या सूचना दिल्यात त्यावरून आज रोजी वाहतूक पोलिसांनी बापूरावं देशमुख कॉलेज सेवाग्राम येथील NCC केम्प च्या 400 विद्यार्थी यांना कॉलेज केम्प मध्ये जाऊन पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक फोजदार जावेद खान यांनी मार्गदर्शन केले
NCC चे विद्यार्थी यांनी देशासाठी राष्ट्रीय एकता, देश प्रेमकरिता प्राधान्य द्यावे शिस्त, अनुशासन मध्ये ट्रेनिंग करावे, परेड व व्यायाम करून शारीरिक क्षमता वाढवावे , NCC च्या ट्रेनिंग मुळे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यमद्ये निवड होणेस मदत होत असते, त्यासाठी आतापासुनच अभ्यासात कठोर परिश्रम घ्यावे व यश सम्पादन करावे आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढवावे. ज्यामध्ये विद्यार्थी यांनी वाहन चालवीण्याचा परवाना अगोदर RTO कडून प्राप्त करून घ्यावे, अतिवेगाने वाहन चालवू नयेत, हेल्मेट चा वापर करावे, अमली पदार्थ चे सेवन करून कधीही वाहन चालवू नयेत, वाहन चlलविताना मोबाईल चा वापर करू नये, रस्त्यावर अपघात झालेला असल्यास मदतीकरिता अंबुलेन्स करिता 108 वर कॉल करावे, पोलीस मदत करिता टोल फ्री न 112, महिला हेल्प लाईन न 1091.1098 वर कॉल करावे, मुलीच्या सुरक्षितते करिता असलेले कायदे कलम याबाबत , गुड टच, बेड टच, याबाबत. सायबर फ्रॉड ला अनोळखी फोन कॉल वर आपली बॅंकबाबत माहिती देऊ नयेत, अमली पदार्थ सेवण पासून दूर रहावे कोणत्याही वाईट गोष्टी दारू जुगार अमली पदार्थ विक्री बाबत पोलिसांना त्वरित माहिती द्यावे,
NCC विध्यार्थी यांना अपघातमुक्त जीवन जगणे, सर्वांना मदत करणे याबाबत प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रम समारोप करण्यात आला, NCC चे विद्यार्थी यांनी ही वाहतूक पोलिसांच्या भेटी व मार्गदर्शन बाबत त्यांना पुष्पगुछ व भेट स्वरूपात मोमेन्टटो देऊन आभार व्यक्त केलेत
पोलीस निरीक्षक
विलास पाटील
वाहतूक शाखा वर्धा

