बोदवड तालुक्यात दुष्काळ पडला उपाययोजना राबविण्याची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष आबा पाटील यांनी

बोदवड तालुक्यात दुष्काळ पडला उपाययोजना राबविण्याची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष आबा पाटील यांनी..

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि.७ 
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बोदवड तालुका अध्यक्ष आबा पाटील सह शेतकरी शेतमजूर, महा विकास आघाडी सह पक्षाने पदाधिकारी यांनी बोदवड तहसीलदार यांना निवेदन देऊन 
बोदवड तालुक्यात दुष्काळ पडल्याने तात्काळ उपाययोजना राबविण्याची मागणी केली.

दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की खरीप २०२६ चे सुरुवाती पासून पावसाचा लहरीपणा सुरू राहीला आज सप्टेंबर महीना उजाडला खरीपातील मका,कापूस, सोयाबीन,कडधान्य पिकांसह बागामात पिकाला फुलोरा अवस्थेत पावसाचा मोठा खंड पडला खरीप हंगाम पूर्णतः करपला,की येणार नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती प्रचलीत उपाययोजनेत शेतकऱ्यांना फायदा होणार नाही,त्यामुळे 
विषेश पॅकेज अथवा दुष्काळा पलीकडील उपाययोजना
राबवण्यात येवून हेक्टरी ५० हजार रु शेतकऱ्यांच्या खाती
सरसकट मदत तातडीने करा.
मागील खरीप हंगाम २०२५ मधील ढगफुटी अतिवृष्टीची
मदत अध्याप शेतकयांना मिळाली नाही पुढील दोन दिवसावर शेतकरी आणी बैलराजा" या "पोळा "सन
आला आहे मात्र शेतकरी संकटात असल्याने सर्व दूर
निराषा पसरली आहे.

मागण्या पुढील प्रमाणे
१) सरसकट विना अट ५० हजार रु मदत व कर्जमाफी सह ७/१२ कोरा करून मिळावा.
२) फळ बागायत पीक वाचवण्यासाठी तातडीने मलचींग पेपर सह अनुदान द्या.
३) १०० % अनुदानावर मागेल त्याला "शेततळे" उभारा.
4) नुकसान प्रसंगी खऱ्या अर्थाने मदत देणाऱ्या "१" रुपयात पीक विमा योजनेची तत्कालीन अटी शर्ती सह पुन्हा अंमलबजावणी करा. ३) "ई" पीक नोंदणी कारभारातील अनियमितता तातडीने सुधारणा करून शेतकऱ्यांना सुलभ होईल अशी यंत्रणा राबवा. ३) तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांचे तसेच दुष्काळी वर्षातील आरोग्य, अभियांत्रिकी,तंत्र तसेच उच्च शिक्षण संपूर्ण फी माफ करा.
४) दुष्काळात प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे या साठी प्रत्येक गावातायजल संधरण, शेत रस्ते च्या उपाय योजनेत प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे मंजूर करा.
५) यंदाचा सन २०२६ मधे खरीप व रब्बी हंगाम सुध्धा वायाजाणार 
असल्याने मदत उपाययोजना पूर्ण वेळ सुरू ठेवा.
६) गावातील नागरिकांना पुरेशा मुबलक पाणी पुरवठा व पशुधन पाणी,चारा पिकांची लागवड, उपलब्धता या संरक्षित व्यवस्थेबाबत नियोजन करा.
७) दुष्काळात शासकीय मानधन जसे की दिव्यांग,निराधार, वृधदापकाळ,लाडकी बहीण, PM किसान इत्यादी आर्थिक मदत लाभ सुरळीत, नियमित मिळतील याची उपाययोजना करा. ८) सर्व साधारण गरीब आणि आर्थिक उन्नत गटात मोडत नसलेल्या रेशनकार्ड लाभार्थ्यांना दिलेल्या चुकीच्या
ED नोटीस रद्द करून कार्ड सुरू ठेवा. ९) जिल्ह्यात पुन्हा पशुधनावर जीवघेण्या "लंपी" आजाराचा प्रादुर्भाव झाला असून तालुक्यात प्रतिबंधात्मक
उपाययोजना राबवा. १०) सद्य स्थितीत बिघडलेली तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व आवश्यक ती कठोर अंमलबजावणी करण्यात यावी बोदवड तहसीलदार यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष आबा पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य पती रामदास पाटील,रमेश बोरसे शेलवड,रवी वाघ नाडगाव,पिंटू पाटील मणुर,श्रीराम शेळके,दिलीप पोळ,अभिजित सिंह,वैभव सिंह, RPI चे संजय तायडे,निलेश शिंदे सुरवाडे,नंदू पाटील सरपंच करंजी, मनुर येथील वैभव पाटील, गजानन पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी शेतमजूर बांधव हजर होते.
Previous Post Next Post