रावेर श्री व्ही एस नाईक महाविद्यालयात अनुलोम संस्थेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी जयंती दरम्यान समरसता पंधरवडा निमित्त कार्यक्रम यशस्वी पार पडला. (जळगाव जिल्हा प्रतिनिधी हमीद तडवी ) रावेर शहरातील नाईक महाविद्यालयांमध्ये अनुलोम संस्थेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणींना उजाळा म्हणून पुण्यतिथी ते जयंती दि. 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत समरसता पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्राच्या वस्ती पाड्यांवर सुरू आहे कॉलेजेस मध्ये सुरू आहे याचाच एक भाग म्हणून आज महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला यात रा. स्व.संघाचे ता. का.श्री जितेंद्र गवळी सर प्रमुख वक्ते होते सरांच्या च्या बोलण्यात अण्णाभाऊंच्या एकंदरीत सर्व प्रवासाचे वर्णन उजाळा दिला गेला तसेच या ठिकाणी उपस्थित समोर बसल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना पण हा विषय पूर्णपणे समजून घ्यावा म्हणून विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल इंटरनेटवर सर्च करून पुढच्या आठ दिवसात एक निबंध लिहावा जेणेकरून अण्णाभाऊ साठे आपल्याला अधिक लक्षात राहतील असा एक सुंदर उपक्रम विद्यार्थ्यांना देण्यात आला. प्रा. सी पी. गाढे सर यांनी आपल्या मनोगतात अण्णाभाऊंच्या रशियाच्या प्रवासाचे व स्वयं लिखित कादंबऱ्यांचे असे अनेक उदाहरण दिले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षमा प्रा. डॉ.पी.व्ही.दलाल सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे भू. वि. प्र. प्रा.सी.पी. गाढे तसेच प्रा.डॉ.एस.बी.गव्हाड प्रा.एल.एम.वळवीप्रा.डॉ.एन.बी.जाधव प्रा.डॉ.एस.बी.राजकुंडल प्रा.मानकर मॅडम यांनी उपस्थिती दिली. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुलोम संस्थेचे भाग जनसेवक तुषार महाजन व खेमचंद्र धांडे यांनी केले.

Previous Post Next Post