भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पवित्र स्थळी वास्तव्य केले, ज्या स्थळांना आपल्या उपस्थितीने स्पर्श केला, ती ठिकाणं समाजासाठी सदैव प्रेरणास्थान ठरली आहेत. (मनमाड (प्रतिनिधी) दिनांक २३ ; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पवित्र स्थळी वास्तव्य केले, ज्या स्थळांना आपल्या उपस्थितीने स्पर्श केला, ती ठिकाणं समाजासाठी सदैव प्रेरणास्थान ठरली आहेत. अशाच ऐतिहासिक महत्व असलेल्या डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम, मनमाड या भूमीला "प्रेरणाभूमी" म्हणून घोषित करण्याच्या मागणीस राज्य शासन सकारात्मक आहे. या विषयासंदर्भात माजी नगराध्यक्ष रवींद्र घोडेस्वार, माजी नगरसेवक संतोष आहिरे, समाजसेवक विलास कटारे, संजय निकम, दीपक साळवे, सुनील साळवे यांच्या शिष्टमंडळाने राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला.मनमाड येथील डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम भूमीस "प्रेरणाभूमी" म्हणून घोषित करणे, या स्थळाला राष्ट्रीय स्मारक म्हणून दर्जा देणे, येथे आंतरराष्ट्रीय ज्ञान संकुल उभारणे, १७ नोव्हेंबर या दिवशी "प्रेरणादिन" म्हणून राजकीय मान्यता देणे याबाबत सकारात्मक प्रतिसाद देताना अण्णा बनसोडे यांनी, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी मनमाड येथे प्रत्यक्ष येऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले. या दौऱ्यात संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी, प्रेरणाभूमी विकास कृती समितीचे सदस्य, तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करून पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे, १७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी "प्रेरणादिन" म्हणून साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने हा दौरा नियोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मनमाडमध्ये काही आठवड्यांपूर्वी या मागणीसाठी प्रेरणाभूमी विकास कृती समितीच्या वतीने विविध समाजघटक व संघटनांच्या सहभागाने एक भव्य आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन लाभले. याच आंदोलनाची दखल शासनदरबारी घेण्यात येत असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.या बैठकीनंतर शिष्टमंडळातील सदस्यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, "डॉ. आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेली ही भूमी लवकरच प्रेरणाभूमी म्हणून घोषित होईल, असा विश्वास असून, या निर्णयामुळे मनमाड शहराच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळेल."फोटोमुंबई – शिष्टमंडळाकडून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना निवेदन देताना.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पवित्र स्थळी वास्तव्य केले, ज्या स्थळांना आपल्या उपस्थितीने स्पर्श केला, ती ठिकाणं समाजासाठी सदैव प्रेरणास्थान ठरली आहेत.                                                                           
Previous Post Next Post