बंजारा जनजागृती मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा मा डॉ श्री ज्ञानेश्वर राठोड जळगाव जिल्हा अध्यक्ष यांचे समाज बांधवाना आव्हान बंजारा समाजासह वंचित उपेक्षित शेतकरी ऊसतोड कामगार बांधवांची फाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थशेत्र पोहरागड येथे दिनांक 25 मार्च बुधवार रोजी बंजारा ब्रिगेडच्या वतीने अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याचे आयोजन सर्व संत महंताच्या व बंजारा समाजातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेले आहे.या मेळाव्याला समाज बांधवानी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान बंजारा ब्रिगेडचे जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ श्री ज्ञानेश्वर राठोड यांनी केले आहे. अखिल भारतीय बंजारा मेळाव्याला आमदार धर्मगुरु बाबुशिंगजी महाराज, धर्मगुरू महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज आदिसह भारतभरातून येणाऱ्या प्रमुख बंजारा नेत्यांची उपस्थितीथी राहणार आहे. या मेळाव्याला बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड मार्गदर्शन करणार असून मागील अनेक वर्षांपासून देशपातळीवर आरक्षण, शिक्षण, यासह अन्य सामाजिक प्रश्नांवर लक्ष वेधणार आहे. बंजारा भटक्या विमुक्त समाजातील समाज बांधवानी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान.. बंजारा ब्रिगेडचे जळगांव जिल्हा अध्यक्ष डॉ श्री ज्ञानेश्वर राठोड यांनी केले आहे.

बंजारा जनजागृती मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा मा डॉ श्री ज्ञानेश्वर राठोड जळगाव जिल्हा अध्यक्ष यांचे समाज बांधवाना आव्हान 
Previous Post Next Post