रावेर शहरातील नॅशनल हायवेला जोडलेल्या आंबेडकर चौकात एकही पोलीस नसल्याने वाहतुकीचा खोळंबा.मोठमोठ्या वाहनांच्या वर्दळीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता.रावेर पोलिसांचे दुर्लक्ष.. जिल्हा वरीष्ठ अधिकार्यांनी जातीने लक्ष देण्याची गरज.

जळगाव जिल्हा मुख्य प्रतिनिधी (रशीद तडवी ) जिल्ह्यातील रावेर शहरातील आंबेडकर चौकात अनेक दिवसांपासून वाहतुकीचा खोळंबा होत आहे.या आंबेडकर चौकात एकही वाहतुक पोलीस नसल्याने दिवसेंदिवस वाहतुकीचे तीन तेरा नऊ अठरा वाजले आहेत. याकडे मात्र रावेर पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचा रावेर तालुक्यातील जनतेसह महिलांचा आरोप आहे. याबाबत अधिक माहिती अशी की रावेर शहरात असलेला आंबेडकर चौक हा नॅशनल हायवे ला जोडला असल्याने ह्या चोकात नेहमी वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यातच या चौकात वाहतुकीचा सिग्नल. नसल्याने जास्तच वाहनधारक व पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तरी जिल्हा वरिष्ठ पोलीस अधीक्षक साहेब यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन तालुक्यातील जनतेचे व वाहन धारकांचे होणारे हाल थांबवावे. आणि तात्काळ योग्य निर्णय घेऊन, रावेर येथे आंबेडकर चौकात वाहतुकीचा सिग्नल बसवावा. अशी रास्त स्वरूपाची मागणी तालुक्यातील जनतेसह महिलांनी, पोलीस प्रशासनाकडे  मागणी केली आहे. 
Previous Post Next Post