रावेर तालुक्यात अवैध धंद्यांचा महापुर.. रावेर पोलीस निरीक्षक, बीट हवलदार, पोलीस पाटील आणि ठाणे अंमलदार यांच्या आशिर्वादाने..दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त..महाशय पोलीस महासंचालक साहेब. यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज... जळगाव जिल्ह्यासह रावेर तालुक्यातील कुसूंबा परिसरात अनेक वर्षांपासून खुलेआमपणे अवैध धंदे जोमात, आणि रावेर पोलीस प्रशासन कोमात.ठाणे अंमलदार बीट हवलदार, पोलीस पाटील,ठाणे अंमलदार पोलीस निरीक्षक सुस्त, आणि जनता मात्र त्रस्त. दारू सट्टा जुगार सारख्या नशीली पदार्थाच्या सेवनाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त.रावेर पोलीस प्रशासन चे जाणिव पूर्वक दुर्लक्ष.वरिष्ठ अधिकार्यांनी जातीने लक्ष देण्याची गरज..
byMEDIA POLICE TIME-
0
जळगाव जिल्हा प्रतिनिधी (दिपक बोकडे) रावेर तालुक्यातील कुसूंबा परिसरासह जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षांपासून अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. हा सगळा प्रकार गावच्या पोलीस पाटील बिट हवालदार यांना माहित असल्यावरही. बीट हवलदार. पोलीस निरीक्षक यांच्या आशिर्वादाने अवैध धंदे जोमात सुरू आहेत. यामध्ये अवैध धंद्यांवाल्यांकडुन पोलीस प्रशासन ला चिरीमिरी मिळत असल्याचा आरोप परिसरातील जनतेसह महिलांनी केला आहे.शेजारील गावामधे दारु पुर्णपणे बंद आहे आणि मग ॣकुसूंबा परिसरातच अवैध धंदे का सुरू? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे..हे कुसूंबा परिसरातील अवैध धंदे बंद झाले नाही. तर आम्ही परिसरातील जनता. नागरिक व तालुक्यातील, जिल्ह्यातील महिलां व नागरिक मिळुन लोकशाही मार्गाने आंदोलन करु. असा इशाराही परिसरातील जनतेकडून. महिलांकडून रावेर पोलीस प्रशासन ला देण्यात येईल. असेही परिसरातील जनतेकडून बोलले जात आहे.तसेच परिसरात सुरू असलेली गावठी दारू..सटृटा .जुगार असे अनेक अवैध धंदे कुठपर्यंत सुरू राहणार ?हे गावातील पोलीस पाटील. बीट हवलदार यांना पुर्णपणे माहित असल्यावरही डोळे लावून दुधावरची मलाई खात असल् सर्वसामान्य नागरिकांचे संसार अनेकांचे संसार जाणून बुजून उद्ध्वस्त करण्याचे काम मात्र प्रगती पथावर दिसत आहे.. कुठे पर्यंत चालणार हा प्रकार असाही प्रश्न महिला व परिसरातील जनतेकडून उपस्थित झाला आहे. तरी संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करून गावठी दारू अड्डे.सट्टा जुगार सारखे नशीली पदार्थांच्या व्यसनी गेलेल्यांना. संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे. आणि कुसूंबा परिसरातील अवैध धंदे कायम स्वरुपी बंद करावे.अशी रास्त स्वरुपाची मागणी जळगाव जिल्ह्यासह तालुक्यातील जनतेसह महिलांनी जिल्हा पोलीस प्रशासन कडे केली आहे.. .. पाहूया या बातमी मुळे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का.? याकडे मात्र जळगाव जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून आहे...