Tags:
धन्यवाद.....
गाव तस चांगल,पण वेशीला टांगल. यासाठी कुसूंबा खुर्द येथे पाल फाट्यावर तात्काळ पोलीस चौकीची स्थापना करावी.. महिलांसह गावकऱ्यांची जिल्हा पोलीस प्रशासना कडे रास्त स्वरुपाची मागणी.. जिल्हा प्रतिनिधी (रशीद तडवी) रावेर तालुक्यातील कुसूंबा खुर्द व कुसूंबा बुद्रुक ही दोन गावे सातपुडा पायथ्याशी वसलेले असून ह्या गावातील नागरिक मात्र मोठ्या आनंदाने व गुण्यागोविंदाने नांदत असुन आपला संसार गाडा चालवत आहे .आणि आपले आनंदाचे जीवन जगत आहेत..परंतु ह्या गुण्यागोविंदा च्या गावात काही असेही संकुचित व्रूत्तीचे लोक आहेत. की जे गावात गावठी दारू,पिऊन दांगोडे,किंवा गावामध्ये चित्रविचित्र प्रकार करतांना नजरेस पडत आहे. अशाच काही भामटय़ांमुळे कुसूंबा गावाचा नकाशाच बिघडला आहे.. हा कुसूंबा गावाचा नकाशा बिघाडाण्यामागे. गावचे पोलीस पाटील. गावचे काही पंचायतचे सदस्य. आणि रावेर पोलीस प्रशासन चे संबंधित ठाणे अंमलदार व बीट हवलदार यांच्या मिलीभगतमुळे गावात छोट्या छोट्याशा कारणावरून शिवीगाळ.भांडणतंटे करुन त्यांचे रुपांतर हाणामारीत व्हायला वेळ लागत नाही. आणि आधिच हे गाव दंगलग्रस्त गाव आहे.आणि हे सगळं प्रकरण घडल्यावर बिट हवलदार. ठाणे अंमलदार. पोलीस पाटील, काही पंचायत सदस्य यांची खूप मोठी बोर पकते.आणि ह्या बोर ची सगळे बोरे हे नाव बडे और दर्शन खोटे. अशा व्रूत्तीचे सर्व मिळुन सगळी बोरं चावुन चुवुन खाऊन जातात. आणि बोरवर शिल्लक राहतात फक्त बोरची काटे .त्यामधे काट्याची काट्यांमधे सर्वसामान्य नागरिक.महिला.आणि शेतकरीही ह्या काट्यांमधे अडकली जातात. अर्थात..भाड मे जाए जनता और अपना काम बनता..अशी परीस्थिती झाली आहे या लुबाडणार्या कर्मचारी आणि पदाधिकारींची .अशा संकुचित व्रूत्तीचे अधिकारी कर्मचारी.पदाथिकारी.आपल्या पदाचा दुरुपयोग करुन गावात भांडणे लावणे.पोलीस स्टेशन मध्ये बोलावून खोटे गुन्हे दाखल करणे. पैशाची मागणी करणे.आणि सर्व सामान्यांना विनाकारण त्रास देणे.ही परिस्थिती सद्ध्या रावेर पोलीस स्टेशन ची झाली आहे.तरी संबधीत वरिष्ठ अधिकारी यांनी ताबडतोब या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशांना जिल्हा वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ त्यांना निलंबित करावे.आणि त्यांचेवर दंडात्मक कठोर कारवाई करावी.त्त्याचबरोबर त्या काट्यांमधे अडकली जातारे गोरगरीब नागरिक. महिला. सुशिक्षित नागरिक ह्या अशा लोकांना ती बोरची काटे चोटली जातात.आणि विनाकारण त्या नागरिकांना रावेर पोलीस स्टेशन ला बोलावून त्यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करण्यात येतात. आणि नंतर दलालांच्या मदतीने हिस्से वाटीवाटी होती. नाहीतर मग हवेली पे आ जाना. असा हा प्रकार होतो असा हा प्रकार कुठपर्यंत चालणार हो साहेब? असा सवाल दोन्ही गावच्या नागरिकांनी व महिलांनी उपस्थित केला आहे. तरी या संपुर्ण प्रकाराची संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी कसुन चौकशी करून अन्याय करणारे जे कोणी ही असतील त्यांचेवर दंडात्मक कारवाई करावी. अशी रास्त स्वरुपाची मागणी कुसूंबा गावाला परिसरातील जनतेकडून. महिलांकडून जिल्हा पोलीस प्रशासन कडे करण्यात आली आहे..
byMEDIA POLICE TIME
-
0