कवी कालिदासाचे लेखन हे संस्कृत साहित्याला देणगी -प्रा. मोहन पाटील. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. )एक दिवस एक पुस्तक उपक्रमक्रांतर्ग कार्यक्रम.सेलू : दि. 23 अलौकिक प्रतिभेचे धनी कवी कालिदास यांचे लेखन हे संस्कृत साहित्याला देणगी आहे. कवी कालिदासा च्या रचना या प्रत्यक्ष वाचून अनुभवायला हव्यात असे प्रतिपादन नूतन महाविद्यालया तील संस्कृत विषयाचे प्रा. मोहन पाटील यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ‘एक दिवस एक पुस्तक’ या उपक्रमाच्या विसाव्या भागात ते कवी कालिदास यांच्या ‘मेघदूत’ या पुस्तकावर सोमवार (दि. 22) रोजी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. महेंद्र शिंदे हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून नूतन कन्या प्रशालेतील संस्कृतचे सहशिक्षक डॉ. यशवंत कुलकर्णी यांची उपस्थि ती होती. पुढे बोलताना प्रा. मोहन पाटील म्हणाले की, कवी कालिदासाचे मेघदूत हे पतीपत्नीच्या हळुवार प्रेमाची आणि विरहाची कथा आहे. ही कथा काळजाचा ठाव घेते. ‘मेघदूत’ वाचनाने नवतारूण्य प्राप्त होते. प्रमुख वक्ते डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले की, ‘कवी कालिदासांचे ‘मेघदूत’ हे लिहिण्या च्या संस्कृतीचा वारसा सांगणारे महाकाव्य असून ते चिरतरुण आहे. यात तत्कालीन सामाजिक परिस्थिती, स्त्री वेदना, मनाची घुसमट, कुचंबना, तारूण्य, प्रेम, जीवनशैली वाचायला मिळते. डॉ. महेंद्र शिंदे यांनी समयोचीत अध्यक्षिय समारोप केला.कार्यक्रमात पवन फरकांडे यांचा वरिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरां च्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुरेश हिवाळे यांनी केले. सुत्रसंचलन प्रणिता सोलापुरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. के.डी. वाघमारे यांनी केले. कार्यक्रमास स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालया चे अध्यक्ष महेश खारकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर मुळावेकर, डॉ. शरद ठाकर, शशिकांत देशपांडे, भालचंद्र गांजापुरकर, विनायक धामणगाव कर,प्रा.आर.एम.खाडप,प्रा. हेमचंद्र हडसनकर, रश्मी बाहेती, सुलभा बागले, ज्योती कुलकर्णी,प्रा. सुभाष बिराजदार, डॉ. जयश्री सोन्नेकर यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post