अक्कलकुवा -अक्राणी अपक्ष उमेदवार डॉ हिना गावित यांच्या सूर. (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी) खासदाकिच्यां दहा वर्षात जास्तीत जास्त विकासकामे करुन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला. येत्या कालावधीत दुर्गम भागातील विकासाचा अनुशेष भरून काढणार असुन आमचूर, महू उत्पादकांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अक्कलकुवा- अक्राणी मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार डॉ हिना गावित यांनी केले. मतदारांची यांच्याची संवाद साधताना अक्कलकुवा- अक्राणी तालुक्यातील विविध गाव पाड्यांमधील मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत. काल दुर्गम भागात काढण्यात आलेल्या मतदार संवाद यात्रेदरम्यान डॉ हिना गावित म्हणाल्या की, अक्कलकुवा - अक्राणी मध्ये गेल्या अनेक वर्षांत येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत मात्र, येत्या कालावधीत या भागांतून होणारे स्थालांतर रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आमचूर,भगर, उत्पादकांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. स्थानिक पातळीवरील बाजारपेठ उपलब्ध झाली तर आदिवासी बांधवांना स्थलांतर करावे लागणार नाही, असा विश्वास डॉ. हिना गावितांनी व्यक्त केला त्या पुढे म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षांच्या खासदारकीची काळात आरोग्य केंद्र आणि वीज, पाणी संदर्भात योजना केल्या. नेटवर्कची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला.या भागाची भौगोलिक परिस्थिती विकासात आव्हानात्मक असली तरी अशक्य काहीही नसुन आपण पाच वर्षांत परीसराचा कायापालट करणारच, असा ध्यास घेतल्याचे हिना गावित म्हणाल्या.

अक्कलकुवा -अक्राणी अपक्ष उमेदवार डॉ हिना गावित यांच्या सूर.                                                                        
Previous Post Next Post