कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या चहाचा कागदी कपावर बंदी घालण्यात यावे या संदर्भात मा तहसिलदार अक्राणी यांना निवेदन. (उदेसिंग पराडके ग्रामीण प्रतिनिधी अक्राणी) अक्राणी प्रतिनिधी: चहाचा कागदी कप बनवितांना त्यामध्ये बिपीए नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लास्टिकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत असल्यामुळे चहाचा कागदी कपावर बंदी घालणे आवश्यक आहे असे एक निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी उपस्थित माहिती अधिकार प्रचार संघटक उदेसिंग पराडके, अविनाश पाडवी प्रचार संघटक अक्राणी, महेंद्र पाडवी प्रचार संघटक अक्राणी.
byMEDIA POLICE TIME
-
0