कोंढावळ येथील सरपंचाने जातीच्या दाखल्यावर आडनाव बदलले ; सरपंच पद रद्द करुन फैजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी.जिल्हाधिकारी यांचें तहसीलदारांना चौकशीचे आदेश. (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी)ग्रामपंचायत कोंढावळ येथील सरपंच गोपाल भगवान भील यांचे सरपंच पद रद्द करुन जातीचा दाखला रद्द करा व त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करा, अशा मागणीचा तक्रार अर्ज कोंढावळ येथील रहिवासी शेनू रामा भील यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे दि.५ फेब्रुवारी २०२५ रोजी केला होता.त्या तक्रार अर्जाची दखल घेत जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी तहसीलदार शहादा यांना दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजच्या आदेशान्वये प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे खोट्या जात प्रमाणपत्र धारकांना मोठा धक्का बसला आहे तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की ग्रामपंचायत निवडणूक २०२२ मध्ये गोपाल भगवान भील यांनी सरपंच पदाकरीता नामनिर्देशन फार्म मध्ये आपल्या नावासमोर कोळी आडनाव न लावता भील आडनाव बदल करून शासनाची फसवणूक करीत लोकनियुक्त सरपंच गोपाल भगवान कोळी हे आदिवासी समाजाचे नसून कोळी समाजांचे आहेत. मुळ कोळी समाजांचे आहेत व आईचे नाव कानूबाई भगवान कोळी ह्या भील भील समाजाच्या आहेत त्यामुळे मुलांची जात ही वडिलांकडून निश्चित केले जाते. आईकडून नाही.तरी गोपाल भगवान कोळी हे कोळी समाजांचे असुनही त्यांनी आदिवासींच्या सवलती व योजनांचा लाभ घेण्यासाठी खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करुन अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घेऊन हल्ली सरपंच पद उपभोगत आहेत. ग्रामपंचायत कोंढावळ सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या मतदार यादीत सरपंच गोपाल भगवान भील यांच्या आई, वडील,आजोबा, काका,काकी यांच्या नावासमोर त्यांची जात व आडनाव कोळी नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जात कोळी असताना गोपाल भगवान भील यांनी कशाच्या आधारे आडनावात बदल करून भील आडनाव लावले आहे? जिल्हा परिषद शाळा कोंढावळ येथील शाळेच्या दाखल्यावर सुध्दा आडनाव बदलले आहे यांची सखोल चौकशी करण्यात यावी खोट्या जातीच्या दाखल्यांच्या आधारे व वडिलांचे आडनाव कोळी असताना भील आडनाव बदल करून शासनाची दिशाभूल करुन फसवणूक केली आहे. म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांचा खोटा जातीचा दाखला रद्द करण्यात यावा व सरपंच पद तात्काळ रद्द करुन कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार शेनू रामा भील यांनी केली आहे. चौकशी अहवालावरून नंदुरबार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी मित्ताली सेठी ह्या ग्रामपंचायत कोंढावळचे सरपंच गोपाल भगवान कोळी याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0