*_मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक भावभावनाचे संवर्धन करणे काळाची गरज__*प्रा. डॉ. एस बी गव्हाड* श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज व विज्ञान महाविद्यालय रावेर यांच्या मानसशास्त्र विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयात विद्यार्थ्यांची मानसिक आरोग्य व संवर्धन या वरती कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अनिल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ. विजय पाटील तसेच डॉ. दिपाली लोहार व्याख्याते म्हणून लाभले सूत्रसंचालन प्रा. जी. आर. ढेंबरे यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा डॉ. एस बी गव्हाड यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये वाढत्या जागतिकीकरण, खाजगीकरण तसेच वाढणारी प्रचंड लोकसंख्या यातून निर्माण होणारी स्पर्धा व बेरोजगारी तसेच आरोग्याच्या समस्यांना व्यक्तीं सामोरे जात असताना आधुनिक युगात सजग राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा मोबाईल या माध्यमांमुळे ई-मेलच्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेक असे शासकीय प्रशासकीय कामकाज शासकीय कर्मचाऱ्यांना एकाच वेळी करावे लागतात हे करत असताना कामाला गती नक्की येते पण प्रत्येक व्यक्ती हा कामामुळे व्यस्त झाला आहे जगभरातली माहिती आपल्याला एका क्षणात मिळत असते पण हे माध्यम दुधारी शस्त्र आहे त्याचा वापर सकारात्मक व आपल्या ज्ञानात भर असावी याकरिता न होता आजचे तरुण-तरुणी विद्यार्थी यांना मोबाईलचे आज व्यसन लागले आहे , वेळेचे नियोजन तसेच योग्य व्यवस्थापन शक्य न झाल्यामुळे आशा कामाचे मनावरील वाढणारे दडपण व ताण तणाव तसेच भविष्यातील चिंता यातून येणारे मानसिक नैराश्य व या नैराश्याला बळी पडलेल्या अनेक अशा व्यक्ती आपल्याला दिसून येतात विद्यार्थ्यांनी येणाऱ्या दैनंदिन जीवनातील तान तणावाचा सामना करण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक भावना अनुभवांनी युक्त असावा, छोट्या छोट्या कामांमध्ये आनंद शोधणे, मैत्री संबंध जपणे तसेच जीवन अर्थपूर्ण कसे होईल याकरिता सकारात्मक विचार करणे तसेच सात ते आठ तास झोप घेणे व ध्यानधारणा योगा व्यायाम अशा अनेक गोष्टींमधून व्यक्ती स्वतःचे मानसिक आरोग्य संवर्धन व स्वतःचे जीवन समृद्ध करू शकतो असे मत डॉ एस बी गव्हाड यांनी मार्गदर्शन केले तसेच दुसरे प्रमुख व्याख्याते डॉ विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक व्यक्तीचा विशिष्ट घटना प्रसंगाकडे बघण्याचा विशिष्ट दृष्टिकोन असतो म्हणूनच व्यक्तीचा घटनेच्या संदर्भात वैयक्तिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो आनंद आणि समाधान हे ध्येय व्यक्तीच्या बाबतीत किती महत्त्वाचे आहे यावर आनंदाची परिभाषा ठरते संपत्ती, व्यक्तीचा आनंद आहे गोष्टी मिळविण्यातील अग्रक्रम जीवनातील गुणवत्ता यावर आनंद वृत्ती ही अवलंबून असते असे मत विजय पाटील यांनी मानसशास्त्र दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व नकारात्मक आणि सकारात्मक कार्यप्रणाली आनंद आनंदी वृत्तीच्या बाबतीत महत्त्वाची असते म्हणून आनंदाचे मोजमाप करताना मानसिक समाधान खूप महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी आपल्या व्याख्यानात मांडले या कार्यशाळेसाठी आभार प्रा. एस बी धनले यांनी केले तसेच या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एच डी धापसे IQAC डॉ बी जी मुख्यादल समन्वयक प्रा. डॉ नीता जाधव प्रा. एस बी धनले प्रा. जी आर ढेंबरे प्रा. डॉ. एस बी गव्हाड तसेच शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली

*_मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक भावभावनाचे संवर्धन करणे काळाची गरज__*प्रा. डॉ. एस बी गव्हाड*    
Previous Post Next Post