यावल तालुक्यात जून महिन्यात तीन महिन्याचे धान्य वितरण नियमित,प्रमाणानुसार होणार का..? (यावल दि.१ ( सुरेश पाटील ) पावसाळा सुरू होत असल्याने पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य वेळेवर,प्रमाणात मिळावे तसेच दुकानदारांना योग्य प्रकारे अन्नधान्य पुरवठा व्हावा म्हणून जून,जुलै, ऑगस्ट २०२५ या ३ महिन्याचे धान्य पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या शिधापत्रिकेवर जून महिन्यातच देण्याचे आदेश राज्य सरकारचे आहेत आणि दुकानदारांनी धान्याची उचल ३१ मे पर्यंत करावी असे आदेश पुरवठा विभागाला देण्यात आले असले तरी आतापर्यंत यावल तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांनी किती प्रमाणात धान्याची उचल केली आणि आणि शिधापत्रिकाधारकांना प्रमाणानुसार,स्वस्त धान्य दुकानातून किती प्रमाणात किंवा कोणत्या वेळेत आणि कोणत्या दिवशी रीतसर कॅश मेमो देऊन दिले जाणार..? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.दुकानदारांनी राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेत ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल दि.३१ मे पर्यंत करून ३० जून पर्यंत त्याचे वाटप पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार जून चे नियंत्रण उचल तालुक्यातील धान्य दुकानदारांनी पूर्ण केले आहे किंवा नाही तसेच ऑगस्ट नियतन उचल सुरू करावी अशा सूचना सुद्धा पुरवठा विभागाला राज्य शासनाने दिल्या आहेत.शासनाच्या आदेशानुसार सूचनेनुसार जिल्ह्यात केशरी तसेच अंत्योदय अन्य योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला गहू तांदूळ इत्यादी रेशन मालाचा पुरवठा होतो परंतु शासन निर्देशानुसार ठरलेल्या प्रमाणानुसार दुकानदारांना धान्य पुरवठा होतो का..? आणि दुकानदार सुद्धा पात्र शिधापत्रिका धारकांना शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणाानुसारच धान्य वितरित करतात का.? धान्य वितरित करताना कॅश मेमी वर शिधापत्रिका धारकाची स्वाक्षरी घेतली जाते का.? स्वस्त धान्य दुकानाची नेमकी वेळ आणि दिवस कोणते याबाबतचा फलक दर्शनी भागावर दुकानदारांनी ग्राहकांच्या माहितीसाठी लावलेले आहेत का.? पुरवठा विभागाकडून तपासणी केली जाते ती तपासणी फक्त कागदपत्रे आहे की प्रत्यक्षात आहे याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत असून तीन महिन्याचा धान्यसाठा दुकानदाराकडे होणार असल्याने धान्याचा साठा स्टॉक रजिस्टरला, सेल रजिस्टरला, प्रत्यक्ष आहे किंवा नाही याची खात्री पुरवठा विभागामार्फत प्रत्यक्ष करून खात्री करण्यात येते का.? काही दुकानदारांकडे तीन महिन्याचा धान्य साठा मिळणार असल्याने काही शिधापत्रिका धारक आणि दुकानदार संगमने मिळालेल्या धान्याची परस्पर विल्हेवाट लावणार का.? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने यावल पुरवठा विभागाने लक्ष केंद्रित करून प्रत्यक्ष काही दुकानांमध्ये जाऊन स्टॉक रजिस्टर व प्रत्यक्ष मालाची खात्री करावी असे तालुक्यात बोलले जात आहे. पुरवठा विभागामार्फत जळगाव जिल्ह्यात हजारो टन तांदूळ गहू पुरवठा होत असताना संबंधित ठेकेदारांकडून वाहनातून योग्य त्या प्रमाणात गोदामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष धान्य पुरवठा होतो किंवा नाही.? गोदामात होणारा धान्य पुरवठा कमी प्रमाणात होतो का.? आणि होत असल्यास स्वस्त धान्य दुकानदारांना दरमहा किती प्रमाणात धान्य कमी मिळते..? स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांना ठरलेले कमिशन वेळेवर देण्यात येत आहे किंवा नाही याकडे सुद्धा पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची यावल तालुक्यात चर्चा आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0