Read more

View all

* *निधनाची वार्ता कळताच आमदार राजेश विटेकर ढसढसा रडले*. (मानवत / प्रतिनिधी.)——————————मानवत तालूक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील ताडबोरगाव सर्कल मधील खरबा येथे प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी गेलेले पाथरी मतदार संघाचे आमदार राजेश विटेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची वार्ता कळताच प्रचार अर्थावर थांबवून मानवतच्या दिशेने जात असतानाच गाडीत बसून आपल्या भावना आवरणे त्यांना शक्य झाले नाही. दादांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, राजकीय मार्गदर्शन आणि वैयक्तिक ऋणानुबंध आठवताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. चालत्या गाडीतच त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.मानवत येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांच्या निवासस्थानी पोहोचल्या नंतर जिल्हा व मानवत तालुक्यातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अजित दादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना आमदार राजेश विटेकर पुन्हा भावुक झाले. बंधू श्रीकांत विटेकर यांच्या गळ्याला पकडून आपल्या अश्रूंना वाट करून देत होते. त्यांच्या तोंडून शब्द निघत नव्हते, मात्र डोळ्यांतून वाहणारे अश्रू त्यांच्या दुःखाची तीव्रता व्यक्त करत होते. अजित दादा पवार यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, राजकीय मार्गदर्शन आणि वैयक्तिक ऋणानुबंध यामुळे हा धक्का अधिक तीव्र असल्याची भावना यावेळी व्यक्त होत होती..

निधनाची वार्ता कळताच आमदार राजेश विटेकर ढसढसा रडले*.���������������������������������������������…

*महाराष्ट्र ब्रेकिंग....*धक्कादायक.. विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारसह 6 जणांचा मृत्यू.. (बारामती (प्रतिनिधी) आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. ताज्या अपडेटनुसार, या विमान अपघातापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दादांन घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे. बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचं दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे पवार कुटुंबियांवार शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्र ब्रेकिंग....*धक्कादायक.. विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारसह  6 जणांचा मृत्यू..���…

वंचित बहुजन आघाडी चे नेते अश्विन तावाडे यांनी केली मुख्यमंत्र्या कडे महाजन वर कारवाई ची मागणी... नाशिक येथील 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव आपल्या भाषणात कुठे न घेता ज्या संविधान मुळे भारत प्रजासत्ताक झाले त्या महामानवाचे नाव न घेऊन केले अपमान अशी प्रतिक्रिया दिलीहिंगणघाट | दि. 27/01/2026नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून, संविधान, संविधाननिर्माते व संपूर्ण बहुजन समाजाचा थेट अपमान आहे.या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा हिंगणघाट विधानसभा उमेदवार अश्विन तावाडे यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) हिंगणघाट यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्यावर SC/ST Atrocities Act अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची, तसेच या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही. दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन संविधानाचा सन्मान राखण्याची ठाम मागणी केली आहे..! वर्धा जिल्हा शहर प्रतिनिधी फैमोद्दीन शेख

वंचित बहुजन आघाडी चे नेते अश्विन तावाडे यांनी केली मुख्यमंत्र्या कडे महाजन वर कारवाई ची मागणी... नाशिक येथील 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव आपल्या भाषणात कुठे न घेता ज्या संविधान मुळे भारत प्रजासत्ताक झाले त्या महामानवाचे नाव न घेऊन केले अपमान अशी प्रतिक्रिया दिलीहिंगणघाट | दि. 27/01/2026नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून, संविधान, संविधाननिर्माते व संपूर्ण बहुजन समाजाचा थेट अपमान आहे.या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा हिंगणघाट विधानसभा उमेदवार अश्विन तावाडे यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) हिंगणघाट यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्यावर SC/ST Atrocities Act अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची, तसेच या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही. दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन संविधानाचा सन्मान राखण्याची ठाम मागणी केली आहे..! वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख

वंचित बहुजन आघाडी चे नेते अश्विन तावाडे यांनी केली मुख्यमंत्र्या कडे महाजन वर कारवाई ची मागणी...�…

**ध्वजारोहना नंतर नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणात सामुदायिक कवायतीचा भव्य कार्यक्रम संपन्न*. (मानवत / प्रतिनिधी).*****—————प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी येथील नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणावर देशभक्तीपर वातावरणात सामुदायिक संगीतमय कवायतीचा भव्य कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात शहरातील सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालय, शकुंतलाबाई कांचनराव कत्रूवार विद्यालय, के. के. एम. महाविद्यालय, इकरा उर्दू शाळा तसेच इतर सर्व शाळांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या संगीमत कवायती मध्ये सहभाग नोंदवला. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी एकत्र येत विविध प्रकारच्या शिस्तबद्ध कवायती नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणावर सादर करण्यात आल्या. देशभक्ती गीतांच्या तालावर सादर करण्यात आलेल्या कवायतींमुळे संपूर्ण विद्यालय परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.यावेळी कार्यक्रमास मानवत तहसिलचे तहसीलदार मा. पांडुरंग माचेवाड, मानवत पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी मा. मंगेशजी नरवडे साहेब, मानवत नगर पालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमलताई सावरे मॅडम, मानवतचे प्रथम नागरिक मा. डाॅ.अंकुशरावजी लाड, संस्थेच्या अल्काताई सोळंके, सोरेकर, मुख्याध्यापक संजयजी लाड, उपमुख्याध्यापक विश्वनाथ बुधवंत, माणिकराव सिसोदे, प्राध्यापक बाळासाहेब नाईक , राजन सूर्यवंशी, सदाशिव होगे, अशोक काळे,प्रा. शिवाजीराव रणवीर, यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच शहरातील सहभागी झालेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या कवायती घेण्यात आल्या. यासोबतच कॉपीमुक्त परीक्षा अभियान व मतदार जनजागृती याबाबत शपथ देण्यात आली. यावेळी माननीय तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी स्वतः पुढाकार घेत विद्यार्थ्यांना शपथ दिली.यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संजय लाड, उपमुख्याध्यापक विश्वनाथ बुधवंत सर, अशोक बैस सर, बाभळे सर, सदाशिवराव होगे पाटील, अशोक काळे सर, माणिक सिसोदिया सर, ज्ञानेश्वर कैसाईतकर सर, शिवाजी रणवीर सर, शेषराव ढगे सर, गणेश सिरसकर सर, सुनील लाड सर, राज सूर्यवंशी सर, बाळासाहेब नाईक सर, सौ. कुसुम कनकुटे, सौ. अनिता पतंगे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.***

ध्वजारोहना नंतर नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणात सामुदायिक कवायतीचा भ…

देऊळगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा (अकोला जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनी आज 26 जानेवारी 2026 रोजी स्वतंत्र भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतात आनंदाने साजरा. करण्यात आला त्यानिमित्ताने. पुंडलिक महाराज विद्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री पुंडलिक महाराज विद्यालय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रल्हाद रावजी बोचरे साहेब होते तसेच ज्येष्ठ समाजसेवक श्री पांडुरंग जी गोळे यांच्या हस्ते विद्यालयातील ध्वजारोहण संपन्न झाले याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले तसेच याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पोलीस टाईम मीडियाचे अकोला जिल्हा प्रतिनिधी संतोष भाऊ उपर्वट यांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच बक्षीस वितरण सुद्धा.संतोष उपर्वट यांच्या हस्ते करण्यात आले क्रीडा स्पर्धे अंतर्गत प्रमाणपत्राचे वितरण देऊळगाव मधील मान्यवरांच्या हस्ते सुद्धा.करण्यात आले 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी रोजी शाळा महाविद्यालय तंबाखूमुक्त गाव.परिसर असा संकल्प करण्यात आला. त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहेसंपूर्ण कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे शिक्षक श्री सांगळे सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरणसे सरांनी केले संपूर्ण कार्यक्रम मुख्याध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तसेच देऊळगाव मधील प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक मान्यवर मंडळी.मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते आणि शालेय पोषण आहार मदतनीस सुद्धा या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होत्या अशा रीतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला

देऊळगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

*शासनाची दिशा अनं शेतकर्‍यांची व्यथा**@)> मधूकर आवचार.**———————————. (*मानवत / प्रतिनिधी.)———————शेतकरी सुखी होऊ द्यायचा नाही, अशीच धोरणे गेली ७५ वर्षे सर्वच राज्यकर्त्यानी राबविलीसत्तेवर कोणताही पक्ष असला तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णायक तोडगा निघत नाही. 'शेतीच्या मूळ प्रश्नाला हात न घालता शेतकऱ्यांना नेहमी याचक किंवा भिकाऱ्याच्याच भूमिकेत ठेवायचं' आणि 'शहरी ग्राहकांना शेतमाल स्वस्तात मिळावा याकरिता कधी आयात तर कधी निर्यातीवर बंधन घालून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवायची' या दोन चौकटीतच सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळते. सरकारचा दृष्टिकोन पूर्णपणे शहरी ग्राहककेंद्री असतो. सत्तेच्या गादीवर येणाऱ्यांची नावं, आडनावं आणि चेहरे तेवढे बदलले जातात. शेतकऱ्यांनी शेतीसोडुन जाऊ नये म्हणुन शेतीनिगडीत विविध योजनेचे फायदे सांगितले जाते योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव मात्र वेगळेच असतात.अधिकाऱ्यांच्या टेबल ची किमत ठरलेली असते. सर्वच शेती शोषणाच्या मागे हातपाय धुवून लागले आहे. शासन,प्रशान,शेतकऱ्यांना लुटुनच हि व्यवस्था चालते.एका दाण्यातून शंभर दाणे तयार होण्याचा चमत्कार शेतीतच होतो.ज्या दिवशी हे लक्षात आलं, त्या दिवसापासूनच शेतीमध्ये तयार झालेली ही बचत लुटून न्यायला सुरवात झाली. आजपर्यंतच्या इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये होणारा गुणाकार लुटण्याची आहे.शरद जोशींनी शेतकऱ्यांना शेती एक व्यवसाय आहे आणि तिला व्यावसायिक तत्त्वांवर चालवावे लागते हे शिकवले, तसेच शेतीत होणारे नुकसान आणि सरकारी धोरणांमुळे मिळणारे नकारात्मक सबसिडी यांसारख्या गोष्टींचे अर्थशास्त्र सोप्या भाषेत समजावून सांगितले, आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित रास्त भावासाठी लढा दिला. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना एक नवीन आर्थिक दिशा दिली आणि त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढायला शिकवले.शेतकऱ्यांना एकत्र करून शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी गळफास ठरणारे, परिशिष्ट नऊमधील कायदे रद्द करण्यासाठी भारतीय राज्यघटना दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी केली होतीया परिशिष्ट नऊमध्ये सुमारे अडीचशे कायदे हे थेट शेती क्षेत्राशी संबंधित आहेत. आणि हेच शेतकऱ्यांना गळफास ठरणारे कायदे म्हणून मारक ठरले आहेत.शेतकऱ्यांचे शोषण पिढ्यान्नापिढ्या चालूच जुन्या काळात, त्यामागे जनतेचे अज्ञान तसेच निरक्षर होते. आज शेतकऱ्यांची पोर सुशिक्षित झाला आहे. मात्र, तो राजकीय पक्षांच्या, जाती-धर्माच्या चक्रव्यूहात अडकला आहे.आपल्याकडे परिस्थिती झाकुन ठेऊन समाजात मोठेपणा दाखवण्याची याची पद्धत आहे, राहायला निट घर नाही, आंगावर घालायला निट कपडे नाहीत खायला सकष आहार नाही, शेती पिकली तरी बँकेचे व खाजगी सावकाराचे कर्ज फीटत नाही. जेव्हा पिकल तेव्हा लुटल म्हणुन आमच्या बाप दाज्याचे कर्ज नाही फिटले! 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल पण स्वातंत्र्य आपल्या पर्यंत पहोचल नाही, आर्थिक परिखिती दुर्बल झामुळे मुलांना चांगालया शाळेत घालता येत नाही. न परवडनारी शेती आपल्या लेकरांच्या नशिबी येऊ नये म्हणुन शिक्षण शिकविणे काळाची गरज आहे. कष्टाची शेती नफ्याची होईल अशी अशा उरली नसल्याने शेतीकडे पाहायचा दृष्टिकोन बदलत चालला आहे त्यामुळे लग्नास अलेल्या शेतकरी मुलांची लग्न होत नाही.सध्या शेती कठीण व्यवसाय होत आहे. अस्मानीसोबत सुल्तानीही कोसळत असते,पावसाने उघाड दिल्ली किंवा झोडपले नाही तर शेतात पेरणी केल्यावर रानडुकरांचा हैदोस सुरू होतो. पेरणीच्या दिवशी रात्री शेतात रखवालीला शेतकरी गेला नाही तर त्याला दुबार पेरणी करावीच लागते, पीक थोडेफार 'जमिनीच्यावर निघाले की रोही आणि हरिणाचे आक्रमण सुरू होते. शेतकरी जर शेतात हजर नसला तर पूर्ण पीक हाती येतच नाही. शेतकऱ्याला २४ तास शेतावर लक्ष ठेवावे लागते. उन, वारा, पाऊस, गारपीट, थंडी याची तमा बाळगता येतच नाही. त्यातूनही पीक जगले वाचले की अनेक प्रकारच्या रोग, किडीचा प्रादुर्भाव हमखास पाठ शिवतो. तिथूनही पिक सहीसलामत सुटले तर शेतमजुरांची वाढलेली मजुरी 'आमदनी अठन्नी, खर्चा रुपया' या म्हणीची आठवण करुन देते. थोडक्यात शेतकऱ्याच्या कष्टाला अंत हा नाहीच. शेतीमाल बाजारात येतो त्या मागचे अपार कष्ट कुमाला दिसत नाही.शेती धंदा नफ्याचा उरला नाही, हे या प्रश्नाचं मूळ आहे. शेती मुळात निसर्गाच्या लहरीवर अवलंबून. निसर्गावर आपले काही नियंत्रण असू शकत नाही. परंतु अतिपाऊस, दुष्काळ यामुळे नुकसान झालं तर ते भरून निघण्यासाठी विम्याचं भक्कम संरक्षण असलं पाहिजे. प्रत्यक्षात सध्या मिळणारा पिकविमा अतिशय तुटपुंजा आहे. दुसरा मुद्दा आहे पायाभूत सुविधांचा. पाणी, वीज, रस्ते, वाहतूक, माल साठवणुकीच्या सुविधा, प्रक्रिया, आदी पायाभुत सुविधांची आपल्याकडे बोंब आहे. निसर्गाने साथ दिली आणि चांगलं उत्पादन आलं की सरकार हस्तक्षेप करून शेतमालाचे भाव पाडते.घाम गाळण्यासोबत आटवलेले रक्त कुणाला दिसत नाही. कष्ट करूण निसर्गाच्या लहेरी पणामुळे पिकत नाही.आणि एखाद्या वर्षी पिकलं तर विकत नाही.विकलं तर पदरात काहीच पडत नाही.त्यामुळं शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणाचा शिक्का त्याला कुठल्याही वर्षी पुसता येत नाही. बरेचजण तो कपाळाला लावूनच आत्महत्येसारखा पर्याय स्विकारतात. या आत्महत्यांनी त्याच्या पुरता प्रश्न सुटतो पण मागे रहाणाऱ्या कुटुंबासाठी अनेक प्रश्न निर्माण करणारा ठरतो. सरकारच्या शेतीमालविषयी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्याला कधीही त्याच्या पिकाला उत्पादन खर्चाचा मोबदला आजपर्यंत मिळाला नाहीआरक्षणाचा मुद्दा घ्या. आता कोणताही राजकीय पक्ष, इच्छा असो अगर नसो, आरक्षणाच्या तत्त्वाला विरोध करू शकत नाही. हा मुद्दा आता राजकीय अजेंड्यावर स्थापित झाला आहे. समाजानेही तो स्वीकारला आहे. आता उलट आम्हीच जास्त मागास आहोत, म्हणून आरक्षण मागण्याची स्पर्धा सुरू आहे. अर्थात आरक्षणाचं सामाजिक न्यायाचं तत्त्व आता हद्दपार झालं आहे. गरीबी निर्मूलनाचा कार्यक्रम म्हणून ते सादर केलं जात आहे. हे योग्य नव्हे, तो मोठा विपर्यासच आहे. पण आपला मुद्दा राजकीय अजेंड्याचा आहे. आरक्षणाप्रमाणेच शेतीचे प्रश्न राजकीय अजेंड्यावर आले तरच धोरण बदलू शकते. त्यासाठी शेतीच्या प्रश्नावरच राजकारण व्हायला हवे.मधुकर आवचार जिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना परभणी ८८३०६७९१९५***

शासनाची दिशा अनं शेतकर्‍यांची व्यथा**@)> मधूकर आवचार.**———————————.���������������������������…

रावेर तालुक्यात अवकाळी गारपीटसह चक्रीवादळाचा हाहाकार, घराची पत्रे उडाल्याने अनेक जण जखमी.. तालुक्यात शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान.. ( यावल तालुका विभागीय उपसंपादक फिरोज तडवी ) जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात निमड्या व गारखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात वादळ व गारपीट झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घराचे पत्रे उडाल्याने अनेक जण जखमी झाले आहेततर वन धन केंद्राचे गोडावून चे छप्पर उडाल्याने पाचलाखापेक्षा जास्त माल असलेला डिंक पूर्ण गारांमधे भिजल्याने खराब झाला आहेगावात एक महिला डिलेव्हरी साठी तिला कळा येत असूनगावात रस्ते बंद असल्याने नागरिक हैराण आहेत. अनेक जखमीना उपचाराची गरज आहे शासनाने अधिकाऱ्यांनी तात्काळ ह्या परिसरात जाऊन दखल घ्यावी. आणि योग्य त्या सोयी सुविधा पुरवाव्या अशी मागणी परिसरातील शेतकरी मजुर महिला जनतेची शासनाकडे मागणी आहे

रावेर तालुक्यात अवकाळी गारपीटसह चक्रीवादळाचा हाहाकार घराची पत्रे उडाल्याने अनेक जण जखमी.. तालुक्य…

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय वर्धा तर्फे प्रीतम गायकी यांचा 'राह वीर' सन्मानपत्राने गौरव*. वर्धा, दिनांक २६ जानेवारी २०२६:भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, रस्ते अपघातातील जखमींचे प्राण वाचवण्यासाठी सदैव तत्पर राहणारे श्री. प्रीतम रामप्रकाश गायकी यांचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (RTO), वर्धा यांच्या वतीने मानाचे 'राह वीर' सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.रस्त्यावरील सुरक्षा आणि अपघातग्रस्तांना मिळणारी तातडीची मदत (Golden Hour Response) या विषयात प्रीतम गायकी यांनी बजावलेली भूमिका अत्यंत मोलाची आहे. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता जखमींना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे आणि माणुसकी जिवंत ठेवणे, या त्यांच्या कार्याची दखल आरटीओ कार्यालयाने घेतली आहे. प्रीतम गायकी हे केवळ अपघातग्रस्त मदतनीस नसून, ते एक निष्णात सर्पमित्र आणि रुग्णसेवक म्हणूनही जिल्ह्यात परिचित आहेत.प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रीतम गायकी यांना हेल्मेट, आकर्षक भेटवस्तू आणि 'राह वीर' सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. रस्ते सुरक्षेचा संदेश देण्यासाठी हेल्मेट देऊन करण्यात आलेला हा सत्कार त्यांच्या धाडसी वृत्तीला आणि सामाजिक बांधिलकीला दिलेली मोठी सलामी मानली जात आहे.सत्काराला उत्तर देताना प्रीतम गायकी म्हणाले की, "उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने माझ्या कार्याची दखल घेऊन मला सन्मानित केले, याबद्दल मी आभारी आहे. प्रत्येकाने दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा, जेणेकरून अपघात झाल्यास प्राण वाचू शकतील. हा सन्मान मला भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देईल."

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय वर्धा तर्फे प्रीतम गायकी यांचा 'राह वीर' सन्मानपत्रान…

Load More
That is All