Read more

View all

निवडणूक अधिकारी, कर्मचारी याचे पहिले प्रशिक्षण संपन्न*निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वबाबी समजून घ्याव्यात.*@)> निवडणूक निर्णय अधिकारी }श्रीमती अरूणा संगेवार.*. (मानवत / प्रतिनिधी.)———————जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने आज दिनांक 24.01.2026 रोजी सकाळी 10 वाजता सामाजिक सभागृह आठवडी बाजार मानवत येथे एकूण 557 मतदान अधिकारी कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांच्या उपस्थितीत पार पडले मतदान अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रिये बाबत सखोल मागदर्शन मा.तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड यांनी केले असून प्रशिक्षणास नायब तहसीलदार संजय खिल्लारे, नायब तहसीलदार स्वप्ना अंभूरे, संतोष वायकोस निवडणूक ऑपरेटर राहुल खाडे व तहसील कार्यालयाचे तसेच तालुक्यातील सर्व कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.*{{ गैर हजर कर्मचारी }}**557 पैकी 52 निवडणूक कर्मचारी गैरहजर**—{{ चौकट टाकणे}} ——————————**01 ) PRO 133 पैकी 13 गैरहजर}**02 ) PO 1- 140 पैकी 12 गैरहजर }**03 ) PO -2,- 117 पैकी 13 गैरहजर-**03) PO-3-167 पैकी 14- गैरहजर निवडणूक कर्मचारी राहिले आहे.*जे मतदान अधिकारी कर्मचारी अनुपस्थित होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येतील असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. *----------*

निवडणूक अधिकारी, कर्मचारी याचे पहिले प्रशिक्षण संपन्न*निवडणूक अधिकारी व क…

*मानवत तालुक्यातील 19 विद्यार्थ्यांचे टंग टाय शस्त्रक्रिया यशस्वी संपन्न.*. (मानवत / प्रतिनिधी.) ‌———————————————— {{ पिएमश्री जि प मानवत शाळेचे माणिक घाटुल यांच्यातर्फे मुलांना आईस्क्रीम व पालकांना अल्पऊपहाराचे वाटप. }}दर वर्षाप्रमाणे या ही वर्षी देखील समावेशित शिक्षण विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणारे जिभेचे शस्त्रक्रिया (टंग टाय) ग्रामीण रुग्णालय मानवत येथे यशस्वीरित्या पार पडली. मानवत तालुक्यातील एकूण 30 विद्यार्थ्यापैकी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 19 विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आले. सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाले असून मुलांना चार तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवून औषध गोळ्यां देऊन मुलांना घरी पाठविण्यात आले. या कामी तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ तेजस तांबोळी व डॉ शेख आशिक हुसेन यांनी शस्त्रक्रिया पार पाडले. या शिबीरासाठी विद्यार्थी उपस्थित ठेवण्यासाठी समावेशित शिक्षण अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षक *ज्ञानेश्वर जलशिंगे,* दत्ता शहाणे, संतोष पांचाळ व मल्लिकार्जुन देवरे यांनी उत्कृष्ट नियोजन करून सर्व मुलांना शस्त्रक्रियेसाठी पालकांना समुपदेशन करून मुलांना उपस्थित ठेवले या वेळी शस्त्रक्रियेसाठी शाळा स्तरावर होणारे आरोग्य तपासणी दरम्यान आढळणारे वाचादोष विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ग्रामीण बाल स्वास्थ्य अभियान अंतर्गत कार्यरत *NRHM* डॉक्टरांच्या टीमने मुलांची तपासणी करून त्यांना ग्रामीण रुग्णालय मानवत येथे रेफर करण्यात येतात. शस्त्रक्रिया शिबिरा दरम्यान संपूर्ण ग्रामीण रुग्णालय मानवाच्या टीमसह NRHM, RBSK, समावेशित शिक्षण विभाग पूर्ण वेळ कार्यरत होते.शस्त्रक्रिया शिबिरासाठी मानवत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मंगेशजी नरवाडे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नीलू पवार, केंद्रप्रमुख ओम मुळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे आरोग्याची विचारपूस केली. तर या बरोबर केंद्रप्रमुख प्रकाशजी मोहकरे, उमाकांतजी हाडोळे, विनोदजी गायकवाड, साधन व्यक्ती राजकुमारजी गाडे, आत्मारामजी पाटील, दिगंबरजी गिरी, प्रतोदजी बोरीकर, सीमाताई सिसोदे, गजाननजी वांबुरकर यांनी परिश्रम घेऊन सर्व शालेय विद्यार्थ्यांना या वेळी शुभेच्छा दिले.संपूर्ण शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी पार पडल्यानंतर पी.एम.सी. शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ यांच्या तर्फे सर्व पालकांना अल्पउपहार व मुलांना आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले. सोबतच सीमाताई सिसोदे व सपनाताई राऊत यांच्यातर्फे मुलांना बिस्किट खाऊचे वाटप करण्यात आले. असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी मल्लिकार्जुन देवरे यांनी बोलतांना दिली.**

मानवत तालुक्यातील 19 विद्यार्थ्यांचे टंग टाय शस्त्रक्रिया यशस्वी संपन्न.*.�����������…

नारणाला उत्सव म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ -आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर**झरी बाजार-येथे आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर यांची सभा संपन्न* (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)सातपुडा पायथ्याशी वसलेल्या गावात हिंसक वन्य प्राण्यामुळे दहशत पसरलेली आहे. गावागावात हिंसक प्राणी वाघ,बिबट,अस्वल शिरकाव करीत आहेत. ग्रामीण नागरिकांवर हमले करत आहेत. शेतात जाण्याकरिता शेतकरी, शेतमजूर घाबरत आहेत.पिकाला पाणी देण्याकरिता एक मजूर जात असताना त्याला संरक्षण करिता चार माणसे लागत आहेत.याकडे दुर्लक्ष करून वण्याविभाग आणि प्रशासन नरनाळा महोत्सव या भागात उत्सव साजरा करीत आहे.हे चिंतेची बाब आहे. खरं तर त्यांनी आधी मानव प्रजाती व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता उपाययोजना करायला हव्या होत्या परंतु मागील एक महिन्यापासून *मानव प्रजाती वाचवा* आंदोलन सुरू असून प्रशासन पूर्ण दुर्लक्ष करून उत्सव साजरा करते हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखे आहे.दरवर्षी महाराष्ट्रात10हजार कोटी ते40हजार कोटी या वन्यप्राण्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.ही संपत्ती राष्ट्रीय संपत्ती असून राष्ट्रीय संपत्ती चे नुकसान होत आहे.या कडे प्रशासन गंभीरतेने बघत नसल्याने ग्रामीण, आदिवासी,शेतकरी वर्गाची चेष्टा करून उत्सव साजरा करण्यात धन्यता मानत आहे. वन्यजीव संरक्षण कायदा अस्तित्वात येऊन 47 वर्ष झाली.या वर्षात प्राण्यांची वाढ झपाट्याने झाली. यांचा प्रजनन चा दर लक्षात घेतला गेला नाही. त्यामुळे हिंसक प्राणी नागरी वस्तीत येऊन शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी गोठ्यातून पळवून नेत आहेत.येणाऱ्या पिढी वर वन्य प्राणी एक संकट आहे.यावर तातडीने उपाययोजना प्रशासनाने कराव्यात कारण वन्यप्राणी हे वण्याविभागाची जबाबदारी आहे. त्यांनी आपली जबाबदारी करावें पार पाडावी. या पासून पर्यटनाला संधी उपलब्ध होते. यातून प्रशासन कडे पैसे गोळा होतात. जंगल सफरीत एका गाडीकडून 3800 रुपये घेण्यात येतात.शेकडो गाड्या रोज शहानुर येथे जंगल सफरीला जात असतात.आपण पैसे मिळवावे व त्रास आम्हाला द्यावा की बाब न्यायला धरून नाही. पर्यटन वाढलं पाहिजे यात दुमत नाही पण त्याचा स्थानिकांना फायदा मिळायला हवा होता पण तसं न घडता उलट वन्यप्राण्यामुळे नुकसान,दहशत,हमले हे शिकारी प्रवृत्तीचे प्राणी करीत आहेत. या मुळे ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त झालेला आहे.येणाऱ्या 30 जानेवारी पर्यंत वण्याविभाग व प्रशासन यांनी आमच्या आंदोलनाची गंभीर दखल न घेतल्यास 30 जानेवारी ला आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा सर्व ग्रामिंणी एकमताने ठराव सभेत पास केला.जास्तीत जास्त संख्येने सहपरिवार या आंदोलनात लोकांनी शामिल होण्याचे आवाहन आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर यांनी सभेत केले.अफजल भास्कर,मोहन खिरोडकार, दिनेश गिर्हे,रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व बहुसंख्य शेतकरी,शेतमजूर, ग्रामस्थ उपस्थित होते.*एकीकडे ग्रामीण शेतकरी व शेतमजूर याच्यावर हिंसक प्रवृत्तीचे प्राणी हमला करीत आहेत.वन्यप्राणी देशाची 10 हजार ते 40 हजार संपत्ती नष्ट करीत आहेत.तरीही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.यांना मानव प्रजाती व देशाच्या संपत्ती ची काजळी नसल्याने डॉलर ची किंमत वाढून रुपयात घसरण आलेली आहे. शेतकरी व ग्रामिनांवर हमले होत असतांना,वण्याविभाग व प्रशासन या भागात उत्सव साजरा करीत आहे. हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे.म्हणून आम्ही येणाऱ्या 30जानेवारी ला मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन करणार आहोत.-आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर*

नारणाला उत्सव म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ -आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर**झरी बाजार-ये…

येळवण गावाला पंचायत समिती अकोला विस्तार अधिकारी यांची भेट)=. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अमल बजावणी साठी अकोला पंचायत समिती यांच्या वतीने ग्राम भेट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या विशेष कार्यक्रमा अंतर्गत परिसरातील गावा मध्ये जाऊन ग्रामपंचायतिला भेट देऊन ग्रामपंचायत स्तरावर सुरु असलेल्या विकास कामाची प्रत्येक्ष पाहणी करून शासकीय योजनाची माहिती नागरिकां पर्यंत पोहचून शैक्षणिक सुविधा स्वच्छता व जल संधारण व ग्राम वशियांशी मनं मोकळा सव्वाद व समस्या जाणून घेण्याचे कार्य पंचायत समिती चे विस्तार अधिकारी साहेब उल्हास मोकळकर हॆ या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत ग्राम वास्यांना भेट देत आहेत व त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत त्याच्या सोबत लाभार्थी येळवण येथील यांच्या सोबत सव्वाद करतांना दिसत आहेत येळवण चे सचिव गणेश सिरसाट, सरपंच काजल मडावी, संतोष चतरकर, अतुल दांदळे, डॉ. सुजाता भीमकर, डॉ. विद्या भुसारी, जयंत मालोकार, प्रवीण देशमुख, आकाश खडसे, बबिता भातकुले यांची उपस्थिती होती...

येळवण गावाला पंचायत समिती अकोला विस्तार अधिकारी यांची भेट)=.�������������������������…

जळगाव जिल्ह्यात अपंगत्व प्रमाणपत्रांची तपासणी केल्यानंतर 8 कर्मचारी निलंबित. जळगाव जिल्ह्यात अपंगत्व प्रमाणपत्रांची तपासणी केल्यानंतर8 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदCEO मिनल करनवाल यांनी सांगितले की, दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशानुसार दोन महिन्यांची मोहीम राबवून 600 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी काहींकडे वैध प्रमाणपत्र नव्हते किंवा निकष पूर्ण होत नव्हते.संबंधित कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे..

जळगाव जिल्ह्यात अपंगत्व प्रमाणपत्रांची तपासणी केल्यानंतर 8 कर्मचारी निलंबित.���������������������…

*श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवती शहराध्यक्ष संजना राजपूत यांचे तर्फे हळदी कुंकू चे जळगाव मधील गणपती नगर पिंप्राळा येथे आयोजन* आज दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीराष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्याजळगाव शहर युवती शहर अध्यक्ष संजना राजपूत यांच्या पिंप्राळा येथील गणपती नगरात हळदी कुंकू चें आयोजन करण्यात आले होते प्रसंगी या कार्यक्रमाला महिला जिल्हा अध्यक्षा सौं सारिका ताई राजपूत व जिल्हा सचिव मीनाताई राजपूत यांची उपस्थिती लाभली या वेळी सारिकाताई यांनी आपल्या भाषणातून महिला संघटन वर भर देताना सांगितले कि महिला संघटन काळाची गरज आहे आपल्या राजपूत समाजातील महिला बाहेर जो पर्यंत येणार नाही तो पर्यंत आपल्याला शासन दरबारीं न्याय मिळणार नाही तसेच खूप काळाची गरज आहे आपण संघटित होऊन कार्य करणे, समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख दुःखात मिळून मिसळून वेळोवेळी कशी मदत करता येईल या विषयावर भर दिला प्रसंगी कार्यक्रमाला उपस्तिती मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्तिती लाभली रत्नमाला पाटील, उज्वला पाटील,सुमित्राबाई पाटील,सुरेखा पाटील, प्रतिभा बाई पाटील, दीपाली पाटील, वैशाली पाटील, कलाबाई पाटील,मायाबाई पाटील, शीतल पाटील,सोनाली पाटील, संगीता पाटील, माधुरी पाटील, धनश्री पाटील, विद्या पाटील, रेखा पाटील, कविता पाटील, प्रतिभा पाटील,शितल पाटील,मालती पाटील, ममता पाटील, मीना पाटील संजना पाटील आदी महिला भगिनीं उपस्तित होत्या

* श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवती शहराध्यक्ष संजना राजपूत यांचे तर्फे हळदी …

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, शंकर महाजन यांचा नागरी सत्कार. (मारोती एडकेवार जिल्हा /प्रतिनिधी नांदेड) नांदेड :बिलोली शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी बिलोली येथील शासकीय विश्रामगृहात, उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या कार्यक्रमात शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे, मार्केट कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपीपळीकर, कमलाकर जमदडे, त्र्यंबक पाटील सावळीकर, विजय होपळे, विठ्ठल चंदनकर, धम्मानंद गावंडे, नगरसेवक संदीप कटारे, शंकर हांडे, रंजीत मंगरुळे, लखन हांडे, उपसभापती शंकर मामा यंकम, प्रकाश पाटील बडूरकर आदी मान्यवरांच्या वतीने मा. शंकर महाजन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना मा. शंकर महाजन यांनी पक्षाने सोपविलेल्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त करत, बहुजन समाजाच्या न्यायहक्कासाठी, संविधानाच्या मूल्यांसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी मा. शंकर महाजन यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करत, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.सदर सत्कार समारंभ मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत शांततापूर्ण व उत्साही वातावरणात संपन्न झाला.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, शंकर महाजन यांचा नागरी सत्कार.���������������������������������…

पीएमश्री. लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन- प्रतिभा व जल्लोषाचा संगम*. हिंगणघाट नगरपरिषद हिंगणघाट द्वारे संचालित पीएमश्री. लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. या सोहळ्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव आणि संपूर्ण शाळा परिसरात उत्साह, आनंद, आणि ऊर्जेचे वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलनाने नगराध्यक्षा डॉ. नयना तुळसकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सभापती पल्लवी बाराहाते, नगरसेविका दुर्गा चौधरी, प्रशासन अधिकारी प्रवीण काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैशाली चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पारंपारिक सांघिक लोकनृत्य, एकल नृत्य, एकांकिका, नाट्यछटा आदी सादर केल्या. यावेळी नगराध्यक्षा नयना तुळसकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करुन भविष्यासाठी प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा यासारख्या कृती विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात असे यावेळी बोलताना त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक गिरीधर कोठेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे बहारदार संचालन शेषराव म्हैस्के यांनी केले. शाळेच्या वतीने सर्व पाहुण्यांचे आभार कविता चव्हाण यांनी मानले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य वैशाली भडे, संजय पुनवटकर, प्रियंका गावंडे, ज्ञानेश्वर राऊत,माधवी वैरागडे, मंगेश कटारे, नम्रता मानकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक चंद्रशेखर कोठेकर, मिना आडकीने, सरिता केशवरे यांनी विशेष परिश्रम घेतले.मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

पीएमश्री. लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन- प्रतिभा व जल्लोषाचा संगम*.������������������…

बडूर येथील मातंग समाजाचा बिलोली, तहसील कार्यालयावर आमरण उपोषण. (मारोती एडकेवार जिल्हा/ प्रतिनिधी नांदेड )नांदेड: बिलोली तालुक्यातील बडूर गावात क्रांतीसुर्य साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्यासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याच्या विरोधात,बडूर येथील मातंग समाजाचा तिर्व संताप व्यक्त होत आहे,केवळबाई गंगाराम दावलेकर या महिलेने सदर अतिक्रमण केलेला आहे, असे मातंग समाजाकडून आरोप होतं आहे सदर महिलेला अनेक वेळा अतिक्रमण काढून घ्यावे अशी विनंती केली असता,समाज बांधवांना घाण शब्द भाषा वापरत, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र राबवली आहे, व गावातील काही जातीयवादी उच्चवर्णी लोक या महिलेला साथ देण्याचे कार्य सुरू करत असल्याची,माहिती उपोषणकर्ते यांनी दिलेली आहे डॉ. आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे, नियोजित जागा काबीज करून स्वतः त्या ठिकाणी, घर बांधण्याचे बांधकाम सुरुवात केली आहे यामुळे, गावातील वातावरण अधिक तणावपूर्ण आहे सदर महिलेची वर्तणूक आणि आक्रमक भूमिका पाहता अतिक्रमणाच्या,विरोधात असलेल्या गावातील बहुसंख्य मातंग समाज पुरुष व महिलांनी एकत्र येत, आंदोलनाचा निर्णय घेतला अखेर 22 जानेवारी रोजी मा.जिल्हाधिकारी नांदेड, मा उपाधिकारी साहेब,अधिकारी बिलोली तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी,तसेच पोलीस निरीक्षक बिलोली, यांना निवेदन देत संबधीत महिलेवर तात्काळ करावी,यासाठी तहसील बिलोली कार्यावर आमरण उपोषण करण्यात येत आहे,उपोषण कर्ते, पिराजी लालबा दावलेकर, राम जळबा भंडारे, गंगाराम माणिक दावलेकर, चंदु गोविंद सोमवारे, मारोती गोविंदराव जाधव, मागण्या, डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जागेवरती केलेली अतिक्रमण हटवण्यात यावे, अनाधिकृत जागेवरील विनापरवाना करीत असलेले बांधकाम थांबविणे, अवैधरीत्या चोरून मुरूम आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावा, सदर महिला गावाचे शांतता व एक्यता धोक्यात असल्या प्रकरणी तात्काळ प्रतिबंधक करावा, स्वतः 420 असून या विरोधात लढणाऱ्या पुरुषावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी धमकी देत असल्याने तिच्यावर तात्काळ कारवाई करावी, या प्रकरणात सदर महिलेवर तात्काळ कारवाई करून मातंग समाजाला न्याय मिळवून द्यावा याबाबतीत प्रशासनाने, गांभीर्यपूर्वक दखल घेऊन त्या महिलेवर ती कारवाई करावी,अन्यथा मातंग समाज पूर्ण महाराष्ट्र मध्ये रस्तावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे मातंग समाजामधून त्रिव व संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बडूर येथील मातंग समाजाचा बिलोली, तहसील कार्यालयावर आमरण उपोषण.�����������������������������������…

Load More
That is All