Read more

View all

हिदायत पटेल यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध... अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी अकोट तालुक्यातील मोहाळा या त्यांच्या गावी राजकीय वैमनस्यातून झालेला हल्ला अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे.त्यांच्या पोटावर आणि मानेवर चाकूने वार करण्यात आले.हे केवळ एका व्यक्तीवर झालेले हल्ला नाही, तर लोकशाही, विचारस्वातंत्र्य आणि राजकीय संस्कृतीवरचा हल्ला आहे.अशा भ्याड हल्ल्याचा मी जाहीर शब्दांत तीव्र निषेध करतो.दोषींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी,पीडित नेत्याला योग्य वैद्यकीय उपचार आणि संरक्षण मिळावे,आणि राजकारणातील वाढती हिंसा थांबवावी, हीच ठाम मागणी आहे.लोकशाहीत मतभेद असू शकतात, पण हिंसेला कोणतीही जागा नाही.⸻

हिदायत पटेल यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध...������������������������������������…

*नाॅट रिचेबल, ग्राम सेवकांच्या मनमानीला गोगलगाकर कंटाळले , तात्काळ बदली करण्याची गोगलगावकरांची मागणी. (मानवत / प्रतिनिधी.)————————मानवत तालूक्यातील मौजे गोगलगाव येथील ग्राम पंचायतीचा कारभार पाहणारे ग्राम विकास अधिकारी यांच्या मनमानी कारभार व नाॅट रिचेबल या कारभारामूळे गोगलगावकर त्रस्त झाले असून दिनांक ०७ जानेवारी रोजी मानवत पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी यांच्या कडे एका निवेदनाद्बारे नेहमीच नाॅट रिचेबल राहणार्‍या ग्राम विकास अधिकारी यांची तात्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आल्याने ग्राम विकास अधिकारी यांच्या कारभाराच्या चर्चेला उधान आले आहे.सविस्तर वृत्त असे की, मानवत तालूक्यातील मौजे गोगलगांव येथील ग्राम पंचायत कार्यालयाचे ग्राम विकास अधिकारी यांच्या नाॅट रिचेबल कारभारामूळे त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी नागरीकांनी मानवत पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय, मानवत यांच्याकडे एका निवेदना द्बारे केली. मानवततालूक्यातील मौजे गोगलगाव, आंबेगाव (दिगर)चे कामचूकार व भ्रष्ट्र कारभारात माहिर असलेले ग्राम विकास अधिकारी *शिवकुमार भारतराव कानडे* यांच्या मनमानी व नाॅट रिचेबल कारभाराची सखोल चौकशी करून त्यांची बदली करण्या बाबत निवेदनाद्बारे मागणी केली. तालूक्यातील मौजे गोगलगाव /आंबेगाव (दिगर) ग्राम पंचायतीचे चे ग्राम विकास अधिकारी यांची बदली करण्यात यावी अशी मागणी केल्याने चर्चेला उधान आले. गोगलगाव/आंबेगाव (दिगर) ग्रामसेवक यांना गोगलगाव/आंबेगाव (दिगर) येथे पाच वर्षे पूर्ण झाले आहेत ते सामान्य जनतेसह कोणाचे पण काही ऐकत नाहीत ते स्वतःची मनमानी कारभार करत आहेत, कोणाचा ही फोन उचलत नाहीत, गावाला येत नाहीत, कोणालाही कसलीच किंवा कोणतीही माहीती देत नाहीत, भ्रष्टकामे करण्यात ते नेहमी अग्रेसर आहेत.मानवत पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी यांनी नागरिकांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन बदली करावी अशी मागणी गोगलगाव ग्रामस्थांनी केली आहे.यावेळी दिलेल्या निवेदनावरज्ञानेश्वर केशवराव मगर, रामेश्वर तूकाराम गूरव, संदिप शंकर साखरे, मिलिंद धोंडीराम गोंन्टे राहणार गोगलगाव यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.**

नाॅट रिचेबल, ग्राम सेवकांच्या मनमानीला गोगलगाकर कंटाळले , तात्काळ बदली करण्याची गोगलग…

*अकोला जिल्ह्यातील अकोट तहसीलमध्ये अकोला येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर ६ जानेवारी २०२६ रोजी हल्ला करण्यात आला.*. ‌‌. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)हा हल्ला त्यांच्या मूळ गावी मोहाळा (अकोट तहसील) येथे झाला. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.हल्ल्यामध्ये हिदायत पटेल गंभीर जखमी झाले होते. सुरुवातीला त्यांना अकोट येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना चांगल्या उपचारांसाठी अकोला येथे रेफर केले. प्राथमिक अहवालानुसार, मोहाळा गावात सुरू असलेल्या राजकीय संघर्षामुळे मतीन पटेल गटाने हा हल्ला केल्याचे मानले जात आहे.स्थानिक पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.हिदायत पटेल हे अकोला जिल्ह्यातील एक प्रमुख नेते आहेत आणि त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती.

अकोला जिल्ह्यातील अकोट तहसीलमध्ये अकोला येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रे…

आदिवासी सांकृतिक एकता महासंमेलानात आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे बी.आर.तडवी... (मुख्य संपादक हमीद तडवी)आदिवासी सांकृतिक एकता महासंमेलन या ऐतिहासिक आदिवासी सांकृतिक एकता महासंमेलानात राजस्थान, गोवा, गुजरात, दादरा-नगरहवेली, अशा पर राज्य व इतर देशांतून आदिवासी बांधव या संमेलनात दरवर्षी प्रमाणे येत असतात. तसेच महाराष्ट्रातून मोठ्या संख्खेने आदिवासी शेतकरी, हात मजूर, विद्यार्थी, तरुण युवक, कर्मचारी-अधिकारी आणि सर्व आदिवासी सामाजिक संघटना व सर्व आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावेआज आपण पाहत आहोत सर्वात जास्त अन्माय हा विकासाच्या नावावर आदिवासी समाजाच्या जल, जंगल, जमीनी पासून बेदखल करण्यात येत आहे. मः हणून हा ३३ वा आदिवासी सांकृतिक एकता महासंमेलानात सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन दि. १३, १४,व १५ जानेवारी २०२६ रोजी चैनपुरा तहसील नेपानगर जि. बुरहानपुर येथे हजोरोच्या संख्खेत यावल रावेर तालुक्यातून सहभागी व्हावे असे आव्हान बी.आर. तडवी रावेर, आदिवासी. सयाबाई ला. तडवी बहुउद्देशीय संस्था संस्थापक डोंगर कठोरा ता. यावल, आदिवासी एकता परिषद जिल्हा सचिव यांनी केले आहे.

आदिवासी सांकृतिक एकता महासंमेलानात आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे बी.आर.तडवी...�����������������…

*मोठ्या आवाजाचे अवैध बनावट सायलेंसर वर्धा वाहतूक पोलिसांनी नाश केलेत **. आज दि. 08/01/26 रोजी रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने मा पोलीस अधिक्षक श्री सौरभ अग्रवाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस वर्धा यांनी मोटार वाहन कायदा कलम 190(2)194फक्त, 198 अन्वये जे सायलेंसर बनावट आहे मोठ्या आवाजचे आहेत जे अनाधकृतपणे बसविन्यात आलेले होते ज्यांचा आवाज 80 डेसिबल पेक्षा जास्त होते ज्यांच्या मोठा आवाजने इतर चालक व नागरिकांना त्रास होत होता ते 150 सायलेंसर हे वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायदा अंतर्गत जप्त केलेले होते ते सायलेंसर आज मा कोर्टाचे आदेशानवये पंचासमक्ष रोलर खाली दाब देवून नाश केलेत, सदर कार्यवाही वाहतूक शाखा वर्धा चे पोलीस निरीक्षक विलास पाटील पो उप नि अमोल लगड, ASI मंगेश येळणे, संजय भांडेकर, रियाज खान, दिलीप आंबटकर, प्रशांत करंजेकर. पो. हवा, आशिष देशमुख, किशोर पाटील मुकेश राऊत, प्रदीप कोहळे यांनी आज रोजी 12/00 वा बजाज चौकात ही कार्यवाही केली.सर्व वाहन चालक यांना आवाहांन आहे कि बिना परवाना सायंलेन्सर बदल करू नये. मोठ्या आवाजचे सायलेंसर वापरू नये, फटाके फोडू नये अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी विलास पाटील पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा.

मोठ्या आवाजाचे अवैध बनावट सायलेंसर  वर्धा वाहतूक पोलिसांनी नाश केलेत **.�������������������������…

बनावट दारू, सुगंधीत तंबाखु व गुटखा ची र्निमीती करून त्याची अवैध विक्री करणारा सराईत गुन्हेगार अनिकेत कांबळे यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही."* माननीय श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांनी शासनाने प्रतीबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु,गुटखा व दारू ची अवैध विक्री करणा-या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अवैध व्यवसाय करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 07 जानेवारी 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथक पोलीस स्टेशन समुद्रपुर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून सराईत गुन्हेगार नामे अनिकेत उर्फ प्रकाश कांबळे रा. उबदा, तह. समुद्रपुर याचेवर रेड केला असता, त्याचे घरी त्याचेकडे काम करणारा आरोपी भुवेश उर्फ ताडा उर्फ योगेश मनोहर जिल्हारे, रा. वार्ड क्र 01 उबदा हा हजर मिळुन आला असुन, आरोपी अनिकेत कांबळे व त्याचे घरासमोर असलेल्या आरोपी राहुल डोफे याचे घराची कायदेशीरित्या झडती घेतली असता, झडती दरम्यान देशी-विदेशी दारूने भरलेल्या सिलबंद शिशा, बनावटी विदेशी दारू रॉयल स्टॅग कंपनीचे स्टिकर, रासायनिक द्रव,सुंगधीत तंबाखु व गुटखा,खाली शिशांचे झाकण व सिलींग अॅन्ड पॅकिजींग इलेक्ट्रिक मशीन व इतर साहित्य मिळुन आल्याने, नमुद आरोपी हे संगणमताने मानवी जिवीतास धोका निर्माण होणाऱ्या व शासनाने प्रतीबंधीत केलेल्या सुंगधीत तंबाखु व गुटखा तसेच दारूची बनावटी पद्धतीने निर्मिती करून त्याची अवैध विक्री करीत असल्याचे व त्याची निर्मिती करण्याकरीता उपयोगी येणारे साहित्याचा वापर करीत असल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीचे ताब्यातुन 13 खरर्ड्याचे खोक्यात देशी दारूच्या 1,300 सिलबंद शिशा, एका चुंगडीमध्ये विदेशी दारूच्या 65 सिलबंद शिशा, विमल, व्हि.1, होला कंपनीचा सुगंधीत तंबाखु व पान मसाल्याचे पॉकिटे, रासायनिक द्राव्य व बनावटीकरीता उपयोगी येणाऱ्या मशिनासह जु.कि. 4,53,109 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, तिन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. समुद्रपुर येथे अन्न सुरक्षा मानके कायदा, दारूबंदी व भारतीय न्याय संहिता चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी श्री मानवतकर, पो.उपनि. बालाजी लालपालवाले, राहुल इटेकर, पो.अं अरविंद येनुरकर, चंद्रकांत बुरंगे, रोशन निंबोळकर, भुषण निघोट, रवि पुरोहित, अमोल नगराळे, अखिल इंगळे,अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली

बनावट दारू, सुगंधीत तंबाखु व गुटखा ची र्निमीती करून त्याची अवैध विक्री करणारा सराईत गुन्हेगार अनि…

*मातोश्री आशाताई कुणावर महिला महाविद्यालयामध्ये शालेय विद्यार्थ्यांची विज्ञान प्रयोगशाळांना भेट* विज्ञान म्हटलं की विविध विषयाचे कुतूहल आणि उत्सुकता होय. विज्ञानातील नवनवीन शोधांमुळे आज मानवाचे जीवन सुकर झालेले आहे. शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानातील नवनवीन गोष्टींची माहिती व्हावी तसेच त्यांच्यामध्ये विविध विषयाबाबत जिज्ञासा उत्पन्न व्हावी या अनुषंगाने मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालय, हिंगणघाट येथे विज्ञान विभागामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रयोग शाळा निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता विद्या विकास हायस्कूल, हिंगणघाट येथील वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा निरीक्षणासाठी आमंत्रित करण्यात आलेले होते. प्रयोगशाळा निरीक्षण करत असताना वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, गणितशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांच्या प्रयोगशाळेमध्ये विविध वस्तूंचे, उपकरणांचे तसेच विषयामधील बारकावे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक चार्ट्स तसेच प्रतिकृतींच्या सहाय्याने समजून घेतले. सदर कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर तसेच विद्या विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री नितेश रोडे यांच्या परवानगी ने तसेच विज्ञान विभाग प्रमुख प्रा. शितल धार्मिक या सर्वांच्या देखरेखी खाली करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी वनस्पतीशास्त्र विभागातून प्रा. दर्शना रेंढे, प्रा. मानसी चौधरी, प्रा. श्रेया गायकवाड प्राणीशास्त्र विभागातून प्रा. शितल धार्मिक व प्रा. तेजस्विता सहस्त्रबुद्धे, रसायनशास्त्र विभागातून प्रा.अंबिका ठवरी व प्रा. दिपाली दुधे, भौतिकशास्त्र विभागातून प्रा. कीर्ती बावणे, प्रा. समीक्षा पवार व प्रा. रोहिणी बोरकर आणि गणित शास्त्र विभागातून प्रा. किरण कष्टी व प्रा.मयुरी धोंडे या सर्वांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

मातोश्री आशाताई कुणावर महिला महाविद्यालयामध्ये शालेय विद्यार्थ्यांची विज्…

*खादमीन-ए-उम्मत संस्थेच्या वतीने 'आफताब-ए-सहाफत' विभागीय पुरस्कारासाठी ॲड.इकबाल रसूलसाब शेख यांची निवड.*. (लातूर (म. मुस्लिम कबीर):साहित्यिक, स्तंभलेखक, कवी, पत्रकार तसेच विधिज्ञ ॲड.इकबाल रसूलसाब शेख यांना नांदेड येथील खादमीन-ए-उम्मत या स्वयंसेवी संघटनेतर्फे जाहीर करण्यात आलेला 'आफताब-ए-सहाफत' (पत्रकारितेचा सूर्य) विभागीय पत्रकारिता पुरस्कार येत्या १८ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे एका विशेष समारंभात प्रदान केला जाणार आहे.ॲड.इकबाल रसूलसाब शेख यांच्या कविता व लेखनाचे मराठी व हिंदी वृत्तपत्रांतून नियमित प्रकाशन होत असते.ते सा.लातूर रिपोर्टरचे कार्यकारी संपादक व स्तंभलेखक असून ‘प्रश्नचिन्ह’ व ‘आँखों देखा हाल’ या नावाने प्रसिद्ध होणारे त्यांचे स्तंभलेख वाचकप्रिय ठरले आहेत. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ ते मराठी व हिंदी पत्रकारितेत सक्रिय असून, सध्या ते विविध वर्तमानपत्रांमध्ये लेखन करीत आहेत.पत्रकारितेसोबतच ते सामाजिक कार्यातही अग्रेसर असून, गेल्या २५ वर्षांपासून ‘खिदमत-ए-खल्क’ व ‘सोशल वेल्फेअर सोसायटी’ च्या माध्यमातून सामाजिक कार्यात सतत कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान असून, ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल व राहत अकॅडमीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य ते करीत आहेत.अनेक क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत खादमीन-ए-उम्मत संस्थेने त्यांची या विभागीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. 'आफताब-ए-सहाफत' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतून ॲड.इकबाल रसूलसाब शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.दरम्यान,खादमीन-ए-उम्मत संस्थेचे अध्यक्ष आबेद खान हमीद खान यांच्या वतीने पुरस्कार निवडीचे पत्र अलहाज सलीम अलंद सर व अलहाज सय्यद म.सलीमोद्दीन करीमोद्दीन सर यांच्या हस्ते प्रदान करून ॲड.इकबाल रसूलसाब शेख यांना शुभेच्छा देण्यात आल्या.हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ॲड इक्बाल शेख यांचे सर्व स्तरातून शुभेच्छा व अभिनंदन करण्यात येत आहे.

खादमीन-ए-उम्मत संस्थेच्या वतीने 'आफताब-ए-सहाफत' विभागीय पुरस्कारासाठी ॲड.इकबा…

निधन वार्ता..*आपल्याला कळविण्यात अत्यंत दुःख होते आहे की*'ग. भा.'.अन्नपूर्णा बाजीराव पाटील* *वय 94* यांचे अल्पशाह आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज पुनखेडा येथून संध्याकाळी ठीक 5.00 वाजेला राहत्या घर पुनखेडा येथून निघेल .त्या *देवघरातील सदस्य वसंत बाजीराव पाटील* यांच्या आई , व *संजय प्रल्हाद पाटील* व *सुनील प्रल्हाद पाटील* यांच्या काकू होत्या .शोकाकूल .*समस्त पाटील ( गणेश ) परिवार पुनखेडा...**भावपूर्ण श्रद्धांजली..*

निधन वार्ता..*आपल्याला कळविण्यात अत्यंत दुःख होते आहे की*'ग. भा.'.अन्नपूर्णा बाजीराव पाटी…

Load More
That is All