Read more

View all

पोलीस स्टेशन रामनगर येथे दिनांक १३/१/२६ रोजी तकारकर्ता किशोर पांढुरगउरकुडे रा. तडस लेआउट ग्रामपंचाय जवळपिषरी मेधे वर्धा यांचा मालकीचा ट्रक क.एण्मएच-३२ एजे ६३६६ हा १० चाकीचाकी वाहन कि. ४९,००,०००/- रू हे कोणतीहीअज्ञातांचे चोरून नेल्याची तकार दिल्यावरून पो.स्टे.ला अप.क. ४४/२६ कलम ३०३(२)विएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करून तात्काळ तपासात घेवुन तपास सुरू केला.सदरहु गुन्हयांचे तपासात यातील फिर्यादीचा नेलेला १० याकी ट्रक हा कोणीअज्ञांताने चोरून नेला असल्याने कोणताही संशयती पुरावे उसे/निशानी नसतांना आम्हीआमचे अधिनस्त पो.स्टे.ला असलेले पोलीस पथक व आरोपी शोध पथकांना पाचारण करूनलागलीच त्या दिवशीच मिळालेल्या माहीतीच्या मार्गाने रवाना केले सतत ९ दिवस आरोपीशोध पथकांनी कसोशीने प्रयत्न करीत व जिवपाड अथक प्रयत्न करीत माहीती तंत्रज्ञांनाचाउपयोग करीत व गुप्तमाहीतीघोर व्यक्तीना कार्यान्वीत करून माहीती घेवुन चोरी गेलेला टक चामाग घेतला तसेच राज्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्स्थान या मार्गातील एकुण ३०टोल नाके व वेगवेगळया ठिकाणचे ३०० वर सिसिटीव्ही फुटेज चेक करून बारकाईनेअवलोकन करीत तसेच वेळोवेळी पथकांनी पोलीसानी ट्रक चालक, किल्नर, याचे रूपातवेशांतर करून वर नमुद या राज्यात शोध अंती सदरहु ट्रक हा मध्यप्रदेश राज्यातील अतिदृग्रमभाग अलीयापुर जिल्हा, पो.स्टे. भाबरा (त. आझाद चंद्रशेखर नगर) ग्राम बोरकरा येथेतपासादरम्यान मिळुन आला, पोलीसाचा मागावा मिळताच सदर गुन्हयांत अज्ञात आरोपी ट्रकसोडुन पळुन गेले व सदरहू ट्रकची मुळ स्थिती अज्ञात आरोपीतानी बदविल्याने ते माहीती घेतव बारकाईने तपासणी करीत या गुन्हयांतील टूक निष्पन करून, गुन्हा उघडकीस आणलेलाआहेसदरह गुन्हयांतील ट्रक चोरीबाबत कोणताही सुगावा नसतांना, अधिनस्तपथकातील सपोनि/अंबादास टोपले, पोउपनि अलीम शेख, ग्रे.पो.उपिन/दिनेश कांबळे,पोशि/गजानन मस्के, पोशि/प्रशाद शिंदे, पोशि/विशाल देवकाते, पथकातील पोहवा/योगेशचन्ने, पोशि/राहुल भोयर, पोशि/रूपेश उगेमुगे, पोशि/सचीन पवार, तसेच पथकांतीलपोहवा/अवि बन्सोड, पोशि/मुकेश वांदीले, पोशि/विक्की अनेराव, पोशि/मनोज भोमले वस्थानीक गुन्हे शाखेतील सपोनि/आशिषसिंग ठाकुर, पोहवा/नरेन्द्र पाराशर, पोहवा/संजयराठोड, दिपक साठे, मिथुन जिजकार व यातील तात्रीकरित्या माहीती देणारे सायबर सेलचेअमलदार पोशि/गोविदराव मुहें, अक्षय राउत यांनी महत्वाची भुमीका राबवित सदरचा गुन्हाउघडकीस आणलेला आहे.सदरहु गुन्हयांचा तपास हा मा. पेलीस अधिक्षक श्री. सौरभ अग्रवाल, सा., माअपर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.प्रमोद मकेश्वर सा. व स्थनीक गुन्हे शाखेचे पोनि/विनोद चौधरी पो.स्टे. रामनगर ठाणेदार श्री.अजय भुसारी वर्धा यांचे मार्गदर्शनात तपास करून गुन्हयांतील चोरी गेलेल्या ट्रकाचा शोधघेवुन हस्तगत करण्यांत आला आहे. सदर गुन्हयांतील पुढील तपास हा पोउपनि / दिनेश कांबळेव सहकारी ह करीत आहे.

मारहाण, धमक्या, हल्ले… पण अटक नाही : जळगावात कायद्याची थट्टा**अल्पसंख्यांक असुरक्षित, आरोपी सुरक्षित : जळगावची भयावह स्थिती* (*महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक शेख शरीफ* ) जळगाव जिल्ह्यात केवळ चार दिवसांत अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांवर घडलेल्या तीन गंभीर, हिंसक व कायद्याला आव्हान देणाऱ्या घटनांमध्ये पोलीस यंत्रणेची पूर्ण निष्क्रियता उघड झाली आहे. अन्याय झालेल्यांना न्याय देण्याऐवजी आरोपींना अप्रत्यक्ष संरक्षण दिले जात असून त्यामुळे अल्पसंख्यांक समाजात तीव्र असंतोष व संतापाची भावना निर्माण झाली आहे.*घटना क्रमांक १ – जामनेर (१७ जानेवारी):*मॉब लिंचिंग प्रकरणातील मूळ फिर्यादी रहीम खान सुलेमान खान यांचे वडील यांना डिफॉल्ट बेलवर सुटलेल्या आरोपींनी रस्त्यात अडवून “आमच्या जामिनाला विरोध करू नकोस, नाहीतर तुझाही तुझ्या मुलासारखा अंत करू” अशी जिवे मारण्याची धमकी दिली.या गंभीर धमकीप्रकरणी जामनेर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवून एकाही आरोपीस अटक केलेली नाही. हे कायद्याची थट्टा नाही तर काय?*घटना क्रमांक २ – निंभोरा (१८ जानेवारी):*फैजपूर येथील साबीर शेख व त्याचा अल्पवयीन पुतण्या यांना “गोमांस असल्याच्या संशयावरून” काही समाजकंटकांनी अमानुषपणे मारहाण केली. एवढ्यावर न थांबता या हिंसाचाराचे व्हिडिओ शूट करून पसरवले, समाजात दहशत निर्माण केली.धक्कादायक बाब म्हणजे मारहाण झालेल्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला, तर प्रत्यक्ष हल्लेखोरांवर २१ जानेवारीपर्यंत एकही गुन्हा नोंदवलेला नाही. ही कारवाई नसून अन्यायाला कायदेशीर कवच देण्याचा प्रकार आहे.*घटना क्रमांक ३ – रावेर (२० जानेवारी):*कोतवालवाडा परिसरातील मशिदीचे धर्मगुरू अक्रम खान अजगर खान यांच्यावर रात्री साडेदहा वाजता दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला.अशा गंभीर हल्ल्यातही रावेर पोलीस स्टेशन मध्ये केवळ भारतीय न्याय संहिता कलम 115(2) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करून आरोपी मोकाट फिरत आहेत.या तिन्ही घटनांबाबत जळगाव जिल्हा एकता संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक, जळगाव यांना स्वतंत्र व संयुक्त स्वरूपात निवेदने देण्यात आलेली आहेत.तरीही अद्याप ठोस कारवाई, अटक, गुन्हे वाढवणे किंवा पीडितांना संरक्षण दिलेले नाही.*एकता संघटनेतर्फे इशारा*जर आठ दिवसांच्या आत संबंधित सर्व प्रकरणांमध्येआरोपींवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करून अटक,पीडितांना संरक्षण,व पोलीस कारवाईतील दिरंगाईची चौकशीझाली नाही, तर जळगाव जिल्ह्यात तीव्र, लोकशाही मार्गाने परंतु आक्रमक स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनावर राहील. अल्पसंख्यांक समाज शांत आहे, कमकुवत नाही.न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही. असे वक्तव्य एकता संघटनेचे फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, नदीम मलिक व मजहर पठाण यांनी एका पत्रका द्वारे केला आहे*शिष्टमंडळात यांचा होता समावेश*फारुक शेख, नदीम मलिक, हाफिज रहीम पटेल, मतीन पटेल, जकी पटेल, सलीम इनामदार, एडवोकेट अल्ताफ मिर्झा, अनवर सिकलगर , मजहर पठाण, एडवोकेट आवेश शेख, युसुफ पठाण, मुजाहिद खान, आरिफ देशमुख, मुस्तकीम शेख, सय्यद फराद, अख्तर शेख, वसीम शेख, रज्जाक पटेल, अरमान पटेल , वसीम मुलतानी आदींचा समावेश होता.

मारहाण, धमक्या, हल्ले… पण अटक नाही : जळगावात कायद्याची थट्टा**अल्पसंख्यांक असुरक्षित, आरोपी सुरक्…

*के. के.एम. महाविद्यालया मध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यी अमोल साळवे यांचा गूण गौरव*. (मानवत / अनिल चव्हाण.*)————————*मानवत येथील के. के. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.अमोल साळवे यांची रेल्वे स्टेशन मास्तर पदी नियुक्ती झाल्याबद्दल मानवत येथील के. के.एम. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.पंडित मोरे, डॉ.प्रदीप गिरासे, स्वामी विवेकानंद सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री. अनंत गोलाईत ( गहिलोत ) के.के. महाविद्यालयाचे कार्यालयीन प्रमुख श्री. गणेशजी उबाळे, प्रा अनिलजी सोळंके, प्रा बालासाहेब भिसे पाटील, तसेच विद्यालयातील प्राध्यापक वर्ग व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. अमोल साळवे यांनी के. के.एम. महाविद्यालया मध्ये शिक्षण घेत असताना *१शिस्त, परिश्रम आणि चिकाटीच्या* जोरावर आपली शैक्षणिक वाटचाल यशस्वी केली. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पुन्हा एकदा प्रचिती आली असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.यावेळी सत्काराला उत्तर देताना *अमोल साळवे* यांनी महाविद्यालयाने दिलेले मार्गदर्शन, शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान आणि संस्थेचे संस्कार यामुळेच मी आज हे यश मिळाविले असल्याचे सांगून सर्व उपस्थित आदरनिय गूरूजन वर्गासह सर्वांचे आभार व्यक्त करूण शतक्षा ॠणी असल्याचे भाव व्यक्त केले.***

के. के.एम. महाविद्यालया मध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यी अमोल साळवे यांचा गूण …

*ए बी फॉर्म* चुकीचा निघाल्याने (जोडला )वंचितच्या उमेदवाराला पक्षापासून वंचित राहणाची पाळी*. (मानवत / प्रतिनिधी.*)————————————*. मानवत* तालुक्यातील ताडबोरगाव गटात वंचित बहुजन आघाडी कडून अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराने पक्षाचा *ए.बी. फॉर्म* तपासणीत चुकीचा निघाल्याने यूवा उमेदवाराला आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याची पाळी आली आहे. उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत करणार असल्याची चर्चा सुरु आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी साठी उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मानवत तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार, सहाय्यक निवडणूक अधिकारी पांडुरंग माचेवाड यांच्या उपस्थितीत पार पडली. छाननी दरम्यान ताडबोरगाव गटातून विनोद मकासरे यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र उमेदवाराने पक्षाचा *ए.बी. फॉर्म* ताडबोरगाव *गटा* ऐवजी ताडबोरगाव *गणाचा* जोडला यामुळे विनोद मकासारे हे पक्षाचे अधिकृत उमेदवार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र उमेदवारी अर्ज विहित नमुन्यात भरण्यात आल्याने अर्ज वैध ठरवण्यात आला असल्याने *विनोद मकासरे* यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यां मध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. असे असले तरी *विनोद मकासरे* यांना पक्षाकडून पुरस्कृत केले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान तालुक्यातील उर्वरित तीन गटात वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार रिंगणात असणार आहेत.***

ए बी फॉर्म* चुकीचा निघाल्याने (जोडला )वंचितच्या उमेदवाराला पक्षापासून वंचित राहणाची पाळी*.�������…

कुसुमाग्रज प्रतिष्ठान याठिकाणी कविराज राधेशाम अशोक कंडारे यांना काव्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा या मंचाच्या नाशिक शाखेच्या वतीने आज झालेल्या संमेलनाचे आयोजन कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात करण्यात आले आहे. या समरसता संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द कीर्तनकार आणि कवी ह. भ. प. श्री. शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ कवयित्री सौ. हेमलता गिते यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाची संयोजन समिती व संयोजक श्री. शिवराज पाटील हे आहेत.विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा यांच्या कडुन हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 51 कवींची निवड करण्यात आली असुन त्यांना गौरवपदक, महावस्त्र, श्रीफळ व मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.कवी-लेखकांचा खुला परिसंवाद आयोजित करण्यात आला असून परिसंवादाचा विषय "मराठी साहित्याने मला काय दिले?" असा आहे. या संमेलनाच्या समारोप सत्रात "कविमनाची आरोळी .... विश्वात्मक चारोळी" अशी उत्स्फुर्त चारोळी सादरीकरण स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.काव्यरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वडती गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावातील नागरिक, पुज्य साने गुरुजी माध्य.विद्यालय वडती येथील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी, व मित्र परिवार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कार्यवाही नाकेबंदी करून देशी दारूने भरलेल्या 150 पेट्या व चार चाकी वाहनासह 22,10,000/-रु चा मुद्देमाल जप्त केल्याबाबत* .................................. दिनांक 21/01/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक वर्धा तर्फे अवैद्य धंदयावर कारवाई संबंधाने पो. स्टे. सावंगी (मेघे) परीसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहिती वरून आरोपी नामे राहुल प्रकाश पवार हे त्याचे ताब्यातील बुलेरो पिकप मालवाहू क्रमांक MH 52 0026 चारचाकी वाहनाने देशी दारूचा माल तुळजापूर हायवे नि वर्धा कडे घेऊन येत आहे. अश्या माहिती वरून पंछी धाब्या जवळ नाकेबंदी करून त्यांचेवर प्रो रेड केला असता आरोपी व आरोपीच्या वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता वाहनांमध्ये 150 खरड्याच्या खोक्यात देशी दारूने भरलेल्या राकेट संत्रा कंपनीचे प्लास्टिक शिशी मध्ये 90 एम एल चे 15,000 शिश्या तसेच नगदी पैसे व मोबाईल सह असा एकुण जु. कि. 22,10,000/-चा मुद्देमाल माल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त केला. आरोपीयास दारू माल कुठून आणला याबाबत विचारणा केली असता भूषण पाटील रा. मुकटी जि. धुळे (पसार) याने दारू माल दिल्याचे सांगितले वरून सदर दोन्ही आरोपीविरुध्द पो. स्टे. सावंगी मेघे येथे गुन्हा नोंद केला. पुढील तपास करीत आहे*सदरची कार्यवाही* मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि प्रकाश लसूण्ते पोलीस अंमलदार शेखर डोंगरे विकास मुंडे, सुगम चौधरी, शुभम राऊत,राहुल लुटे यांनी केली आहे.मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

चोपडा जळगाव जाण्यासाठी शॉट कट सुखकर आसा रस्ता म्हणजे गोरगावले खु गोरगावले बु खेडी भोकरी जळगाव तालुक्यातील भोकर हा मार्ग आहेयाच मार्गावर गोरगावले खू ते खेडी भोकरी या गावांना जोडणारा गुड नदी चा जुना पूल हा उंचीने कमी होती हे लक्षात घेऊन माननीय माजी आमदार लताताई सोनवणे व * आमदार प्रॉ . चंद्रकांत सोनवणे* यांच्या विशेष प्रयत्नातून अंदाजित रक्कम सुमारे *५ कोटी रुपये* अधिक उंचीचा पूल मंजूर करून प्रवास अधिक सुखकर करून दिल्यामुळे पंचक्रोशीतील लोकांनी आभार व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त करत आहेत तरी आज ह्या कामातला भेट देण्यासाठी चोपड्याचे शिवसैनिक नंदू भाऊ गवळी गोरगावल्याचे उपसरपंच नरेंद्र बाविस्कर व माजी सरपंच अरुण भाऊ कोळी जितू कोळी विठ्ठल कोळी लहान गोरगावल्याचे गजू पाटील शिवसैनिक तसेच खेडीभोकरीचे मंगल पाटील नारायण पाटील आदी उपस्थित होते तरी हा पूल लवकरात लवकर तयार करून देऊ असेही सांगण्यात आले .

जहाजपुर कोटडी विधानसभा क्षेत्र के लिए गर्व का क्षण है पूरे प्रदेश से हजारों कार्यकर्ता पदभार ग्रहण में रहे शामिल विधायक गोपीचंद जी मीणा अनुसूचित जनजाति प्रदेश अध्यक्ष ने सभी कार्यकर्ताओं का जताया आभार और आने वाले समय में संगठन को मजबूत करने की बात कही कार्यक्रम में पंडेर क्षेत्र से कार्यकर्ताओं में सुरेश जी माली विक्की सोनी, देशराज भाट, गोपाल रेगर, गणपत रेगर, सोहनलाल रेगर, निर्मल हरिजन, कालू भाट, राजेश जी जैन, ओमप्रकाश भाट, रामपाल जी कटारिया, लक्ष्मण जी माली, गोपाल जी रेगर, देवराज जी भट्ट ठेकेदार, आदि कार्यकर्ताओं ने जयपुर भाजपा कार्यालय में पहुंच कर विधायक गोपीचंद जी मीणा का माला और गुलदस्ता और साफा बंधवाकर स्वागत किया विधायक जी ने सभी कार्यकर्ताओं का आभार जताया जहाजपुर भीलवाड़ा से खास रिपोर्ट गणपत लाल

*"अकोल्यात महिलांचे राज्य! इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी राखीव महापौरपद"* ‌. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान) अकोल्यासह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी महापौरपदाचे आरक्षण नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या सोडतीत निश्चित करण्यात आले.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत (१६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झालेले निकाल), अकोल्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.भाजप: ३८ जागा (सर्वात मोठा पक्ष, परंतु बहुमतासाठी ४१ च्या जादुई संख्येपेक्षा ३ जागा कमी).काँग्रेस: ​​२१ जागा.इतर: शिवसेना यूबीटी (६), वंचित बहुजन आघाडी (५), राष्ट्रवादी-सपा (३), एआयएमआयएम (३).ओबीसी महिला आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर, भाजप आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) या दोन्ही पक्षांनी या प्रवर्गातील महिला उमेदवारांचा शोध आणि युतींबद्दल चर्चा तीव्र केली आहे.आता अकोल्याची पुढची "प्रथम नागरिक" (महापौर) ही ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेली महिला असेल.

अकोल्यात महिलांचे राज्य! इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी राखीव महापौरपद"*               ‌

Load More
That is All