भोकरी येथील गोरगरीब गरजु कुटुंबाचे अतिक्रमित घरे नावावर करा, संविधान आर्मी चे जिल्हाअध्यक्ष अशोक अटकळे यांनी ग्रामपंचायतीना दिले निवेदन, रावेर प्रतिनिधी तालुव्यातील भोकरी येथील गोरगरीब गरजु कुटुंबाचे जे अतिक्रमित घरे गट क्र १५ मध्ये आहे अशी घरे लवकरच लवकर नावा वर करणयाची मागणी चे निवेदन आज दि २९ रोजी ग्रामपंचायतीला देणयात आले आहे,निवेदनावर म्हटले आहे की भोकरी येथील गट क्र १५ च्या हाद्धीतील २०११/पुर्वी चे अतिक्रमित कुटुंबाचे घरे भोकरी ग्रामपंचायतला नमूना ८ ला लावणे साठी वारंवार मागणी केली असता अघाप या वर काहीच तोडगा निघालेला नाही, तसेच २३/८/२०२४ रोजी अतिक्रमित नागरिकानी ग्रामपंचायतीला नावावर करणयासाठी अर्ज दिला असताना आजपावेतो सदरील जागा किंवा घरे नावावर झालेली नाही,गावातील अनुसुची जाती जमाती ,व शाहा समाज राहात असुन यांना घरा ची अत्यंत गरज आहे,तरी ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन सदरील जागेचा ठहराव मासीक सभा व ग्रामसभेत पारीत करुन मंजुर करावा व लवकरच लवकर ही अतिक्रमित घरे नावावर करा अशी मागणी चे निवेदन ग्रामसेवक,तिडके साहेब, यांना देणयात आले आहे या प्रसंगी संविधान आर्मी चे तालुका अक्ष्यक्ष तथा रावेर लोकसभा जिल्हाक्षयक्ष मा अशोक भाऊ अटकळे , यांच्यासह आमीन तडवी,असलम वस्ताद,सलीम तडवी,शरीफ तडवी,किशोर चौधरी धनराज लाहासे,मिलिंद लाहासे,आदि जण मोठया संख्याने उपस्थित होते भोकरी येथील गोरगरीब गरजु कुटुंबाचे अतिक्रमित घरे नावावर करा, संविधान आर्मी चे जिल्हाअध्यक्ष अशोक … byMEDIA POLICE TIME -May 03, 2025
आधार व्हेरिफिकेशन व हयातीच्या दाखल्याची सुविधा गाव पातळीवर उपलब्ध करून देण्याबाबत आमदार अमोल जावळे यांच्याकडून प्रशासनाला सूचना (प्रतिनिधी | यावल I रावेर) रावेर - यावल तालुक्यातील नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ सुरळीत मिळावा, यासाठी आधार व्हेरिफिकेशन आणि हयातीचे दाखले (Life Certificate) या आवश्यक कागदपत्रांच्या सुविधेसाठी गाव पातळीवरच सेवा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना आमदार मा. अमोलभाऊ जावळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.सध्या या दोन्ही सेवा मुख्यत्वे तहसील कार्यालयात उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना वारंवार तेथे जावे लागते. यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात. विशेषतः वृद्ध, अपंग आणि अशक्त नागरिकांना यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.या पार्श्वभूमीवर आमदार जावळे यांनी रावेर तहसील कार्यालयात व्हिडिओ कॉलद्वारे विविध लाभार्थ्यांशी संवाद साधला असता, त्यांच्या तक्रारी ऐकून त्यांनी तात्काळ प्रशासनाकडे या सुविधा गावपातळीवर – जसे की ग्रामपंचायत कार्यालय, CSC केंद्रे किंवा मोबाईल कॅम्पद्वारे – सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, या उपक्रमाची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून अधिकाधिक नागरिक या सेवांचा लाभ घेऊ शकतील, अशीही सूचना त्यांनी दिली आहे.या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आधार व्हेरिफिकेशन व हयातीच्या दाखल्याची सुविधा गाव पातळीवर उपलब्ध करून देण्याबाबत आमदार अमोल जावळ… byMEDIA POLICE TIME -May 02, 2025
*चुंचाळे तालुका यावल येथे मुबारक तडवींचे दारू विक्री विरोधात आमरण उपोषण*. (चोपडा प्रतिनिधी मनसुर तडवी.) यावल तालुक्यातील आंदोलन आणि उपोषणाने नवाजलेली चुंचाळे ग्रामपंचायत येथे आमरण उपोषणाची सुरुवात १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित साधून गावात दारूबंदी झालीच पाहिजे तसेच ठराव मंजूर करून सहा महिने झाले तरी ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी आज पर्यंत कोणतीच कार्यवाही केली नाही यात माझी फसवणूक केली आहे संबंधितावर देखील कार्यवाही व्हावी म्हणून मुबारक तडवी यांचे आमरण उपोषणाला सुरुवात होत आहे सविस्तर वृत्त असे की चुंचाळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी दिनांक ८/१०/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मासिक सभेमध्ये ठाराव क्रमांक आठ मे गावात दारूबंदी ठराव एक मताने मंजूर करण्यासंदर्भात मुबारक नबाब तडवी यांच्या ५/९/२०२४ रोजी गावात दारूबंदी करण्या संदर्भात अर्ज सचिव यांनी वाचून दाखविले त्यावेळी उपस्थित सदस्य सरपंच उपसरपंच यांनी विचार व नियम करून गावात दारूबंदी करण्यात यावी असे सभेत सर्वांनी एक मताने ठरविले होते सदर ठराव पुढील कार्यवाहीसाठी दारूबंदी विभाग जळगाव यांना पाठविण्यात यावा असा ठराव करण्यात आलेला होता. व आहे आज रोजी सहा महिने होऊन देखील कोणतीच कारवाई करण्यात आली नसून दारू मोठ्या प्रमाणात गावात विक्री केली जात आहे दारू विक्री करणारे म्हणतात आम्ही पोलिसांना हप्ते देतो म्हणून दारू विक्री आमची चालूच राहील कितीही ग्रामसभाचे ठराव केले तरी आमचे काहीच होणार नाही अशा प्रकारचे भाष्य करत असतात याबाबतचे निवेदन मुबारक तडवी यांनी दिनांक २/४/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक यावल पोलीस स्टेशन यांना दिले होते मात्र आज पर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही म्हणून १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून त्यांनी ग्रामपंचायत चुंचाळे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या व दारू विक्री करणाऱ्या च्या विरोधात बंड पुकारले आहे अशी माहिती मुबारक तडवी यांनी दिली आहे चुंचाळे तालुका यावल येथे मुबारक तडवींचे दारू विक्री विरोधात आमरण उपोषण*.�������������������������… byMEDIA POLICE TIME -May 01, 2025
जलगांव जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत कर्मचारी नी राज्यस्तरीय संपात सहभागी व्हावे आव्हान जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप पंडित. ग्राम पंचायत कर्मचारी कामगार सेना ५८२५ राज्य अध्यक्ष विलास जी कुमरवार यांचे १ व २ मे रोजी संपूर्ण राज्यातील ६० हजार ग्राम पंचायत कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी होणार या आव्हानास जलगांव जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत कर्मचारी सहभागी होऊन दोन दिवसीय संप यशस्वी करावा असे जलगांव जिला कामगार सेना ५८२५जिला अध्यक्ष विजय जी रल सचिव राहुल जी महाले संघटक कृष्णा जी महाजन उपाध्यक्ष सुनिल जी पाटिलमहिला उपाध्यक्ष कविता जाधव जिला कार्यकारणी ने जिल्ह्यातील सर्व कर्मचारिना आव्हान केलेला आहेसदर निवेदन सादर १-) जिला अधिकारी जलगांव २) मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद जलगांव ३) पोलीस अधिक्षक जलगांवप्रमुख मागण्या - १) चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून समाविष्ट करुन १००℅ वेतन शासनाने अदा करावे२) आकृती बंधातवाढ करावी३) ६१ कलम रद्द करावी४) यावलकर समिति च्या शिफारिश दुरूस्त करुन लागू करावे५) सुधारित किमान वेतन लागू करावे६) उत्पन्नाची अट रद्द करावी२७ हजार ग्राम पंचायत गावगाडा ठप्प होणार जलगांव जिला कार्याध्यक्ष दिलीप पंडित जलगांव जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत कर्मचारी नी राज्यस्तरीय संपात सहभाग… byMEDIA POLICE TIME -April 30, 2025
खतगावात बाळुमामाची पालखी मोठ्या ढोलतासात साजरी. (आनंद कुरुडवाडे प्रतिनिधी रामतीर्थ सर्कल )खतगाव दि. 30एप्रिलबिलोली तालुक्यातील ग्राम खतगांव नगरीत श्री. संत सद्गुरू बाळू मामांची पालखी व 25.04.2025मेंढरांचा तळ मुक्कामी आला आहे. शुक्रवार रोजी सायंकाळी खतगांव नगरीत येऊन सह दिवस उलटले आहेत.खतगांव परिसरातील भाविक भक्तांची दर्शनास दररोज गर्दी होताना दिसून येत आहे. येथील सद्गुरू बाळूमामांची ही १२ व्या क्रमांकाची पालखी आहे. महाराष्ट्रात बाळूमामांच्या मेंढरांचे तब्बल १९ तळ ग्रामीण भागात विराजमान आहेत. सकाळ, संध्याकाळ आरती, महाप्रसाद अन्नदान व बाळूमामांनी आयुष्यात व्यतीत केलेल्या चमत्कारिक बाबींचे रसाळ विवेचनही ऐकायला मिळत आहे. तळा गळातिल अनेक सेवेकरी भक्तांचाही उत्तुंग मनोभावे सहभाग होत आहेत.या सदरील बग्गीचे कारभारी यशवंत भाऊ सुरनर बनवसकर हे आहेत. सोमवार दि.२८ एप्रिल रोजी सायंकाळपासून ते मंगळवार दि.२९ रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत बाळूमामांचा भार उतरवणे (अर्थात लक्ष्मीरूपी मेंढ्यांच्या लोकरीचे जावळ काञण) कार्यक्रम संपन्न झाले दररोज सकाळ संध्याकाळ महा प्रसादचा ककर्यक्रम व फुरणफोळी भंडारे झाले खतगाव व खतगाव नगरी जेष्ट श्री बाळासाहेब पाटील खतगावकर व खतगाव आणि परीसरातिल भाविक भंक्तांची खुप मोठी गर्दी होती् पालकी मोठ्या उस्तवात साजरी झाली खतगावात बाळुमामाची पालखी मोठ्या ढोलतासात साजरी.��������������������������������������������������… byMEDIA POLICE TIME -April 30, 2025
खवणे पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू : सेलू तालुक्यातील खवणे पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती अतिशय उत्सवात साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात परभणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मिलिंद सावंत, अशोक अंभोरे,ॲड विष्णू ढोले,सरपंच श्री व्यंकटबापू चव्हाण, उप सरपंच सुभाष चव्हाण, सिद्धांत भाग्यवंत, वचिष्ट (पिंटू) चव्हाण, मुंजाभाऊ चव्हाण, सोमेश्वर तात्या चव्हाण, राहुल जाधव, अर्जुन बाविसे,जयंती उत्सव समिती अध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे,उपाध्यक्ष सिद्धांत कदम यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते.या प्रसंगी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकावर अतिशय प्रेम होते त्याच अनुषंगाने श्री नाथराव चव्हाण यांनी स्वखर्चाने 100 विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली. खवणे पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.�������������������������������… byMEDIA POLICE TIME -April 30, 2025
पाडळसे गावात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. पाडळसे ता. यावल सुरेश खैरनार) – पाडळसे गावातील गट क्रमांक 1234 व गट क्रमांक 843 या शिवारात मंगळवार, दि. 29 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळच्या सुमारास बिबट्या दिसल्याची माहिती ग्रामस्थ लीलाधर रवींद्र चौधरी यांनी दिली.ही घटना घडताच ग्रामपंचायत सदस्या सौ. पुनमताई पाटील यांनी तातडीने वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक (आर.ओ.) अतुल तायडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अतुल तायडे व रवींद्र तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. पाहणीदरम्यान बिबट्याचे स्पष्ट पायाचे ठसे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेता वन विभागाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध व शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. वन विभागाकडून लवकरच पथकाच्या माध्यमातून पुढील तपासणी व उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती अधिकारी वर्गाने दिली आहे.दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. रात्रीच्या वेळी गरज नसताना घराबाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पाडळसे गावात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा.���������������������������… byMEDIA POLICE TIME -April 30, 2025
अशोक दिगांबर जाधव यांना राष्ट्रीय रत्न पुरस्कार 2025 चे सन्मानित करण्यात आले,,,, (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.27:- चंद्रपूर ः- दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींना कलाजीवन बहुउद्देशीय संस्था ढगा अमरावती संस्थेकडून पुरस्कार दिले जातात या वर्षी संस्थेकडून संपूर्ण देशातुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रीय रत्न पुरस्कार 2025देण्यात येणार आहे त्यासाठी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते डॉ युवराज ठाकरे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले या पुरस्कार साठी आदिवासी व ग्रामीण नक्षलक्षेत्रातील मानिकगढ पाहाडावरील पिटीगुडा नं1 ता जिवती जिल्हा चंद्रपूर येथील या बंजारा गावातील अशोक दिगांबर जाधव राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स यांना राष्ट्रीय रत्न पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आले आहे अशोक जाधव सर यांना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विभागीय स्तरावर, जिल्हा, तालुका, गावं पातळीवर आता पर्यंत 216पुरस्कार मिळाले आहेत महाराष्ट्र शासन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहु फुले आंबेडकर पुरस्कार प्राप्त साईबाबा बहुउद्देशीय संस्था पिटीगुडा नं1 ता जिवती जि चंद्रपूर व्दारा संचालीत श्री दिगांबर नाईक निवासी पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया येथील संस्थेच्या वतीने सन 2012-2013 पासून अल्पसंख्याक समाजातील निवासी पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया या जिल्ह्यात राबविण्यात आले आहे आत्ता सुद्धा सुरू आहे वाचनालय,ग्रंथालय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ही पण योजना राबविण्यात येत आहे त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्स वतीने अल्पसंख्याक निवासी पोलिस भरती पुर्व संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक, संघटना कडून तथा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटना कडून हार्दिक अभिनंदन शुभेच्छा दिल्या जात आहेत,पुणे येथे आयोजित कार्यक्रम करण्यांत येणार आहे कार्याक्रमाचे उद्धाटन मा ,श्री सुनील जी गायकवाड साहेब माजी लोकसभा खासदार लातूर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा,श्री मेघराज जी राजेभोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, प्रमुख अतिथी - मयुरी प्रमोदराव नव्हते मराठी अभिनेत्री, कार्यक्रमाचे स्वागतध्यक्ष -डाॅ संजय कुलकर्णी ,सुपेकर डॉ अल्का नाईक कार्याध्यक्ष, प्रमुख अतिथी मा श्री मंगेश प्रभुलकर ठाणे जनादेश न्युज चॅनल,मा श्री रमेश बोरकुटे सी ओ चंद्रपूर,ऑन्ड रमेश खेमु राठोड वकील,मा श्री शेख आमजत महाराष्ट्र इंडस्ट्रीज अमरावती,कार्यक्रमाचे संयोजक डॉ युवराज ठाकरे अध्यक्ष कलाजिन बहुउद्देशीय संस्था ढगा ता ,वरुड जिल्हा अमरावती ऊपस्थित होते. अशोक दिगांबर जाधव यांना राष्ट्रीय रत्न पुरस्कार 2025 चे सन्मानित करण्यात … byMEDIA POLICE TIME -April 27, 2025
आडगाव येथील वाघ्याबर्डी सिंचन प्रकल्पाची केली अधिकाऱ्यांनी पाहणी ( अनेक गावासह शेतकऱ्यांना फायदा (कासोदा एरंडोल तालुका प्रतिनिधी केदारनाथ सोमाणी ) येथुन जवळचं असलेल्या आडगाव ता.एरंडोल येथील वाघ्याबर्डी सिंचन प्रकल्पकांची पाहणी उपविभागिय जलसंधारण अधिकारी मूर्णशा वैलचावला , जिल्हा जलसंधारण अधिकारी बाळकृष्ण ढंगारे , जलसंधारण अधिकारी नितीन राठोड , विशाल शिंदे यांनी भर उन्हात जाऊन प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली . या प्रकल्पासंदर्भात आडगाव येथील कृती समितीने तालुक्याचे माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांच्याशी भेट घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला होता . वरिष्ठाचे आदेश प्राप्त झाल्याने जलसंधारण अधिकारी यांनी ताबडतोब जाऊन वाध्याबर्डी जलसिंचन प्रकल्पाची पाहणी केली . या सिंचन प्रकल्पाचा आडगाव , कासोदा , उमरे , मालखेडा सह बऱ्याच गावांचा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमधे आनंदाचे वातावरण दिसून आले . हा प्रकल्प अनेक वर्षापासून विचाराधीन आहे .परंतू अमलबजावणी होत नाही . गिरणा सिंचन प्रकल्प असला तरी बऱ्याच शेतकरी वर्गाला फायदा होत नाही म्हणून वाघ्याबर्डी सिंचन प्रकल्प होणे गरजेचे आहे . कासोदा आडगाव परिसराला पिण्याच्या पाण्याची समस्या खूप मोठया प्रमाणावर आहे म्हणून या प्रकल्पाचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे . मुख्यमंत्री महोदय यावर सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा आहे . सिंचनाची पाहणी करतेवेळी शिष्टमंडळातील सरपंच सुनिल पवार , ग्रां प सदस्य प्रल्हाद पाटील , प्रविण पाटील , मार्केट कमेटी संचालक सुदाम पाटील ग्रा प सदस्य रविंद्र पवार , रावसाहेब पाटील . जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील , मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर उपस्थित होते . अधिकारी वर्गाने सकारात्मक भूमिका घेऊन शासनाकडे अहवाल लवकर पाठविला जाईल असे मत व्यक्त केले . शेवटी आभार प्रल्हाद पाटील यांनी मानले . आडगाव येथील वाघ्याबर्डी सिंचन प्रकल्पाची केली अधिकाऱ्यांनी पाहणी ( अनेक गावासह शेतकऱ्यांना … byMEDIA POLICE TIME -April 27, 2025