Read more

View all

शालेय विद्यार्थ्यांसोबत पत्रकार मारोती एडकेवार यांचे वाढदिवस साजरा. (आनंद कुरुडवाड ेप्रतिनिधी/नांदेड ज़िल्हा ग्रामीण ) मीडीया पोलीस टाईम नांदेड जिल्हा प्रतिनिधी पत्रकार मारोती जकोजी एडकेवार, यांचे वाढदिवस हिप्परगा थडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थी यांना, पेन व खाऊ देऊन विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आले. मारोती एडकेवार, यांचं सामाजिक कार्यात मोठे योगदान असून, सत्यशोधक सामाजिक क्षेत्रात त्यांनी, सत्यशोधक पद्धतीने विवाह लावणे, व बहुजन समाजाचे आवाज म्हणून, वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात, वंचित बहुजन आघाडी मध्ये तालुका सदस्य सक्रिय सदस्य म्हणून आवाज उठवतात. पत्रकार म्हणून, त्यांना सामान्य जनतेचे आवाज म्हणून सगरोळी सर्कल मध्ये ओळखल्या जाते. अत्यंत गरीब परिस्थिती मधले सामाजिक कार्यकर्ते असून, फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने सर्वसामान्य माणसांमध्ये भेदभाव न करता समानतेने वागावे व बहुजनवादी विचार महामानवाचे विचार समाजामध्ये रुजवण्याचे कार्य करतात,उपजीविकेसाठी त्यांनी स्वतः त्यांनी छोटसं व्यवसाय करतात, फालव्या वेळेमध्ये समाजाचे कार्य करतात. अशा कार्यकर्त्यांना ग्रामीण भागामध्ये मोठे स्थान असून, पत्रकार मारोती एडकेवार यांनी त्यांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त, सगरोळी सर्कल मधील प्रत्येक शाळेला दरवर्षी, विद्यार्थ्यांना वही व पेन वाटपाचा कार्यक्रम करतात,त्यांचं हे आदर्श प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांनी घ्यावे, आपल्या वाढदिवसानिमित्त आनंद दुसऱ्यांना सोबत घेऊन करणे याच्यापेक्षा, आनंद दुसरं काय असू शकते. माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर आई-वडिलांनी तर जन्म दिलाच पण,या जगात माणूस म्हणून जगण्यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज,महात्मा बसेश्वर महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे,या सर्व महामानवांच्या कार्यांनी जगात जगण्याचे स्थान निर्माण झालं, व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाने आम्हाला, संघर्ष करण्याची ऊर्जा निर्माण होते.मी समाजातील दिन दलित, व गोरगरीब, विधवा, अपंग, लोकांचं सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी, मला ऊर्जा मिळते. त्यामुळे आज शेवटच्या क्षणापर्यंत मी समाजाच्या कार्यास वाहून घेईन, आज माझा वाढदिवस साजरा करण्याची संधी सुधा, माझे दैवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर,यांच्यामुळे मिळाले. म्हणून मी माझं जीवन आंबेडकर चळवळीला अर्पण करतो,आणि माझं प्रत्येक सुख आणि दुःख सर्वसामान्य लोकांपर्यंत व लोकांसोबत वाटतो असे,आमच्या आनंद कुरुडवाडे पत्रकार यांच्याशी मारोती एडकेवार यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांसोबत पत्रकार मारोती एडकेवार यांचे वाढदिवस साजरा.������������������…

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेची यावल तालुका कार्यकारणी जाहीर !महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या यावल तालुका सरचिटणीस पदी प्रा उमाकांत पाटील यांची निवड .. (यावल : (१७ ऑगस्ट २०२५) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुबंई संघटनेचे राज्यप्रदेशाध्यक्ष गोविंदा वाकडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, यांच्या मान्यतेने उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी यांच्या आदेशानुसार यावल तालुका अध्यक्ष विशाल दांडगे यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन यांची निवड केली त्यातयावल तालुका सल्लागार संजय सराफ, यावल तालुका उपाध्यक्ष पदी गोकुळ कोळी, तालुका कार्याध्यक्ष पदी सुरेश खैरनार, यावल तालुका सरचिटणीस प्रा. उमाकांत रुपचंद पाटील, यावल तालुका प्रसिद्धी प्रमुख किरण पाटील, यावल तालुका संघटक ज्ञानेश्वर तायडे, फैजपूर शहराध्यक्ष मलक शाकिर मलक मुसा ,यावल  शहराध्यक्ष मलक शाबीर, यांची निवड करून त्यांना यावल तालुका अध्यक्ष विशाल दांडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.   या सर्व नवनिर्वाचित पत्रकार पदाधिकारी चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेची यावल तालुका कार्यकारणी जाहीर !महाराष्ट्र राज्य पत्रक…

हाती आलेला मूंग सततच्या पावसाने गेल्याने शेतकरी हवालदिल. (मानवत / प्रतिनिधी.)मानवत तालूक्या सह मानवत शिवारात सतत पडस असलेल्या पावसामूळे हाती आलेले मुंगाचे पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला त्यामूळे शासनाने तात्काळ पंचेनामे करू अस्माणी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना तातडीची मदत जाहिर करावी अशी मागणी करणी सेनेचे राम पंडीतराव दहे पाटील यांनी केली आहे.सविस्तर वृत्त असे की लहरी हवामानामूळे तालूक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे तालूक्यातील शेतकर्‍यांचा हाती आलेला मुंग गेल्यामूळे शेतकरी हवालदील झाला असून जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामी करून अर्थीक मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. तर करणी सेनेचे तालूकाध्यक्ष राम दहे पाटील यांनी तात्काळ पंचेनामे करून अर्थीक मदतीची केली आहे..

हाती आलेला मूंग सततच्या पावसाने गेल्याने शेतकरी हवालदिल.�����������������…

.मानवत शहरातून *पाच जण उमऱ्यासाठी मक्का–मदीना* रवाना. (मानवत / प्रतिनिधी) मानवत शहरातील गालिब नगर परिसरातील पाच जण उमरा करण्यासाठी *मक्का–मदीना* (सौदी अरेबिया) येथे रवाना झाले. मानवत रोड येथून रेल्वेने मुंबईकडे प्रस्थान करून तेथून पुढे विमानाद्वारे पवित्र यात्रेचा पुढील टप्पा पार पडणार आहे.रवाना झालेल्यांमध्ये मोहम्मद फारुख अब्दुल रहिम बागवान, त्यांची आई व पत्नी यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत शेख अजिम बेलदार व त्यांची आई ही उमऱ्यासाठी निघाले आहेत. कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारांनी स्टेशनवर उपस्थित राहून शुभेच्छा देत सुरक्षित प्रवास व सफल उमऱ्यासाठी दुवा केली.उमरा ही पवित्र उपासना वर्षभरात कधी ही करता येते. यात्रेत उमरकर्ते हरम शरीफमध्ये प्रवेश करून तवाफ, सई यांसह धार्मिक अर्हता पार पाडतात. शहरातून निघालेल्या मंडळींनी प्रवासादरम्यान नियमांचे पालन करून शांततेत व श्रद्धेने उपासना पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचे कुटुंबीयांनी सांगितलेस्थानिक नागरिक व समाजस्वीयांनी या प्रसंगी आनंद व्यक्त करत, “मानवत शहराच्या वतीने आपण सर्वांच्या भलाई, सलामती आणि देश–दुनियेच्या अमन शांतीसाठी दुआ करा,” अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.मुंबईतून आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मंडळी सौदी अरेबियाकडे प्रयाण करतील. यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार उमरा पूर्तता करून ते लवकरच सुरक्षित परतणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.***

मानवत शहरातून *पाच जण उमऱ्यासाठी मक्का–मदीना* रवाना.���������������������…

मा. जळगाव नगरी आमदार श्री. सुरेश दामू भोळे ( राजु मामा) यांनी नगरविकास विभाग मूलभूत सोयीसुविधाचा विकास योजनेतर्गत शंभूराजे हिल्स पॉईंट साई विहार हायमास लॅम्प बसविण्यात आले. यात सामाजिक कार्यकर्ते गौरव सपकाळे, आणि भुषण भालेराव हे उपस्थित होते

मा. जळगाव नगरी आमदार श्री. सुरेश दामू भोळे ( राजु मामा) यांनी नगरविकास वि…

लातूर जिल्हा निर्मितीचा वर्धापन दिन, त्यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व जनतेला मनपूर्वक शुभेच्छा!१६ ऑगस्ट १९८२ रोजी लातूर जिल्हा जिल्ह्याची अधिकृतरित्या निर्मिती झाली. तेव्हापासून आजपर्यंत या जिल्ह्याने विकासाची मोठी झेप घेतली आहे, या जिल्ह्याला आजवर लाभलेले नेतृत्व आणि येथील जनतेचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे शिक्षण, कृषी, सहकार, उद्योग, क्रीडा आणि सामाजिक सलोखा यासह अशा अनेक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात अनुकरणीय ठरावा असा #लातूर_पॅटर्न तयार झाला आहे.भविष्यातही लातूर जिल्ह्याच्या प्रगतीचा वेग असाच वाढत राहील यादृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील आणि सक्रिय राहण्याचा आज संकल्प करूयात. जिल्ह्यातील जनतेला पुनश्च एकदा शुभेच्छा!#लातूर #लातूरजिल्हा #वर्धापनदिन #लातूरपॅटर्न #Latur #LaturDistrict#AmitDeshmukh4LaturCity#IndianNationalCongress#INCMaharashtra

लातूर जिल्हा निर्मितीचा वर्धापन दिन, त्यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व जनतेला  मनपूर्वक…

सिल्लोड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा जालना लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर कल्याण काळे साहेब जिल्हा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ भैय्या त्यांच्या सूचनेनुसार अल्पसंख्या क काँग्रेसचे आढाव बैठक पार पाडली उपस्थित होतेअध्यक्ष भास्कर घायवंट यांनी केले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अनिस पटेल होते यावेळी अल्पविसंख्या क तालुका काँग्रेस कमिटीची व शहर अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते

सिल्लोड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा जालना लोकप्रिय ख…

एसटी वाहक नागनाथ पेटेकर यांनी केले महिला प्रवाशांचे 22 हजार परत त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक (आंनद करूडवाडेनांदेड़ ग्रामीण प्रतिनिधि बिलोली ) तालुक्यातील खतगाव येथिल नागनाथ राजाराम पेटेकर, आजकालच्या काळामध्ये इमानदारी जणू हरवली असे वाटत असताना..माणूस माणसापासून दुरावलंत चाललेलाअसताना..एकमेकावरचा विश्वास उडत चालेला असताना...थोड्याशा मोहापाई एवढेच काय काही रुपयासाठी स्वतःच्या रक्ताच्या नात्यांतला जीवही घेण्यास मागेपुढे न पाहणारा माणूस.. अशा मानसिकता गढूळ झालेल्या समाजामध्ये पैशाच्या पुढे रक्ताची नाती ही विसरलेल्या या समाजामध्ये इमानदारी अजूनही जिवंत आहे याचा प्रत्यय नुकताच आला.देगलूर एस.टी डेपोचे प्रामाणिक वाहक,खतगाव येथील रहिवासी नागनाथ राजाराम पेटेकर यांनी नेहमीप्रमाणे देगलूर धर्माबाद एसटीने कार्य बजावत असताना त्यांच्या शेजारी वझरगा ता. देगलूर येथील महिला प्रवासी सौ.सविता ज्ञानेश्वर कोकणे -(सुर्यवंशी) यांनीही प्रवास करत होत्या पण वजरगा आल्यानंतरत्या उत्तरत असताना त्यांची 22 हजारांची पर्स तेथेच विसरून ते खाली उतरल्या. पुढे गेल्यानंतर हे एसटी वाहक नागनाथ पेटेकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ती बॅग तसेच ठेवून बस आगारा प्रमुखाकडे जमा केली आणि त्यांचा संपर्क साधून, त्यांना एसटी डेपो मध्ये बोलावून घेण्यात आले.त्यांना एवढी मोठी रक्कम सर्वात समक्ष सुपूर्द केली.त्यावेळी त्या महिला प्रवासांच्या चेहऱ्यावरला आनंद पाहण्यासारखा होता.एक एक पैसा जमा करून संसारासाठी उभा केलेले हे आर्थिक भांडवल क्षणात त्यांच्या समोरून गेले असे वाटत असतानाच नागनाथ पेटेकर यांनी दाखवलेली माणुसकी आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.आजच्या काळामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे असेच म्हणावे लागेल.त्यांचा तो आदर्श त्यांची ती सामाजिक कार्याविषयी जाण तळमळ आणि मनामध्ये कोणत्याही पैशाचा लोभ न आणता प्रामाणिकपणाचे हे कार्य त्यांनी स्वकृतीतून करून दाखवले. आणि समाजापुढे एक आदर्श उभा केला.त्यांच्या या प्रामाणिक कार्याबद्दल भारताच्या 79 स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट या दिवशी त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी आगार व्यवस्थापक संजय जी अकुलवार साहेब,ट्राफिक इन्स्पेक्टर,सोनकांबळे साहेब, ए.टी.आय चोपडे साहेब व इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान करण्यात आला.नागनाथ पेटेकर यांनी आतापर्यंत एसटी वाहकाचे उत्तम प्रकारे काम केले आहे.ते राजाराम पेटेकर यांचे चिरंजीव साहित्यिक,चित्रकार बालाजी पेटेकर व रांगोळीकार शिवाजी पेटेकर यांचे छोटे बंधू होत. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे...

एसटी वाहक नागनाथ पेटेकर यांनी केले महिला प्रवाशांचे 22 हजार परत त्यांच्या प्रामाणिकपण…

पावसाने कहर धरला अतिवृष्टीची पाहणी केली आमदार अंतापुरकर यानी अधिकाऱ्यांसह ... (आंनद करूडवाडे नांदेड़ ग्रामीण प्रतिनिधि बिलोली ) तालुक्यातील खतगाव व परिसरातिल गळेगाव , आदमपुर, केसराळी, रामपूरथडी ,येथे नदीकाठच्या पूरपरीस्थिती शेताची पाहणी .दि,16/08/2025 आ. जितेश अंतापूरकर यांनीपावसाने मुसळधार हजेरी लावलेली असतानाही, आपल्या मतदारसंघातील देगलुर बिलोली जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आ. जितेश अंतापूरकर हे थेट गावोगाव जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. नुसता संवाद नाही, तर तिथल्या समस्यांना जागेवरच तोडगा देण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे.शेतकरी असो की सामान्य नागरिक, त्यांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच तत्पर असतात.यासाठी त्यांनी पोलिस प्रशासन, महसूल विभाग, महावितरण, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, ,यांसारख्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेत थेट प्रश्नावर प्रशासनास धारेवर धरले, समस्यांना त्वरित निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश ही दिले ठिकानी गेले असता खतगाव चे बाळासाहेब पाटील खतगावकर ,गोविंद पाटील,अमृत पाटील संतोष पाटील, सरपंच प्रतिनिधि मलेश पेटेकर, मारोती राहीरे , कार्यकर्ते व बरेच शेतकरी उपस्थित होते केवळ राजकारणाची गोष्ट नाही, हीआहे खऱ्या लोकप्रतिनिधीच्या कार्यशैलीची!आज मतदारसंघातील नागरीक मजो पावसातसुद्धा आमच्या सोबत उभा राहतो!"आ. जितेश अंतापूरकर यांचे झंझावाती दौरा आणि कार्यशैली पाहता मतदारसंघात विकासाची नवी पहाट उगम पावतेय..

पावसाने कहर धरला अतिवृष्टीची पाहणी केली आमदार अंतापुरकर यानी अधिकाऱ्यांसह ...��������������������…

Load More
That is All