Read more

View all

अवैध रेती वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर जप्त. ( महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.29 चिमूर तालुक्यांमध्ये गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत नियमित तपासणी करुन कोणत्याही नदीपात्रातून किंवा नाल्यातुन रात्री रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुक रोखण्याकरीता फिरते पथक स्थापण करण्यात आले आहे.त्या अन्वये दिनांक २५/१२/२०२५ रोजी पहाटे ३.१५ वाजताचे सुमारास चिमूर नेरी रोडवर श्रीधर राजमाने तहसिलदार चिमूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील उमरे,केतन घरकेले,शुभम बदकी निरज चिंतावार,ग्राम महसूल अधिकारी यांच्या पथकाने विना नंबर निळ्या कलर चे मुंडा व लाल कलरची ट्रॉली असलेले दोन ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करीत असल्यामुळे सदर ट्रॅक्टर वर जप्तीची कार्यवाही करण्यात आलेली आहे.जप्त केलेले ट्रॅक्टर हे गौतम पाटील रा.चिमूर व मनोज नागापूरे रा.चिमूर यांचे असून सदर जप्त केलेले दोन्ही ट्रॅक्टरवर दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करण्यात येत आहे.

अवैध रेती वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर जप्त.

वर्धा पुलिस दलातील देवेंद्र उड़ान याना तीन तीन सुवर्ण पदक पटकीविले गिरड, पुलिस स्टेशन चे हेंड कांस्टेबल देवेंद्र उड़ान ची वाशिम जिलायेथेझालेल्या तारीख 26 28 दिसंबर ला 46व्य राज्य स्तरीय मास्टर चैंपियनशिप 2025 इस पर्दे तिल 100 मीटर 200,दौड़ तसेच 400 मीटर इसपरदेतिल स्वर्ण पदक पकाउन वर्धा पुलिस दलाचे वर्धा पुलिस मास्टर एसोसिएशन चेनाव लौकिक केले सदर इस पर्दे तिल चंद्रपुर यवतमाल वर्धा अकोला मुंबई या इस परदेतिल600/ से 700/ से खेराळु उपस्थित होते ववेग वेगेड वयो घटातील वर्धा जिलातिल देवेंद्र उड़ा यानी चार पदक पटकी विले या अगुधर देवेंद्र उड़ान यानी रशियन पदक,मिळविले आहे वर्धा जिला तिल टॉप चा खिलाड़ी मनुन वळखला जातो गिरड पुलिस स्टेशन ला नंबर वन खिलाड़ी मनुन,वळख आहे🌹🌹🌹🙏

छत्रपती क्रीडा मंडळातर्फे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचा सन्मानमैदानातून नेतृत्वापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास… (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.29:- शहराच्या क्रीडा क्षेत्रातून नेतृत्वापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करत नगर परिषद निवडणुकीत विजय मिळवून निवडून आलेले भद्रावती नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचा छत्रपती क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मानप्रसंग सन्मानपूर्वक पार पडत शहरातील क्रीडा संस्कृतीला नवे बळ देणारा ठरला. या विशेष प्रसंगी छत्रपती क्रीडा मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांना राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवरायांच्या प्रतीकाने गौरविण्यात आले. हे प्रतीक केवळ सत्कारापुरते मर्यादित नसून शिस्त, संयम आणि नेतृत्व या मूल्यांचे प्रतीक असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शिवरायांच्या आदर्शांप्रमाणे भद्रावतीतील खेळाडू घडावेत आणि शहराला सक्षम नेतृत्व लाभावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. हा सन्मान भद्रावती शहरातील खेळाडूंना योग्य दिशा, सुविधा आणि सातत्यपूर्ण पाठबळ मिळावे, या भूमिकेतून करण्यात आला. शहरातील अनेक तरुण खेळाडू जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करत असून, त्यांना योग्य व्यासपीठ व संधी मिळणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. खेळाडू घडवणे म्हणजे केवळ मैदानावर विजय मिळवणे नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शिस्त, संयम आणि नेतृत्वगुण रुजवणे होय, अशी महत्त्वपूर्ण भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. हे विचार छत्रपती क्रीडा मंडळाच्या ध्येयाशी सुसंगत असून, मंडळ शहरातील क्रीडा विकासासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे नमूद करण्यात आले. या सन्मानप्रसंगी मंडळाचे मुख्य संयोजक शंकर बोरघरे, ज्येष्ठ खेळाडू व संघटक सागर मोरे, राष्ट्रीय खेळाडू धीरज पाशी, राष्ट्रीय खेळाडू सागर अंबाघरे तसेच मंडळातील सर्व सदस्य व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सन्मानप्रसंग अधिक अर्थपूर्ण ठरला. यावेळी नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करत, भद्रावतीतील खेळाडूंना सक्षम व्यासपीठ, मूलभूत सुविधा आणि आवश्यक प्रोत्साहन देण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सकारात्मक सहकार्य राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले की, छत्रपती क्रीडा मंडळाचा हा उपक्रम शहरातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट करणारा ठरेल.

छत्रपती क्रीडा मंडळातर्फे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचा सन्मानमैदानातून नेतृत्वापर्यंतचा प्रेरणादा…

मानवत येथील तक्रार शिबीराकडे अधिकार्‍याची दांडी.*. ( मानवत / प्रतिनिधी.)मानवत तालूक्यातील शेतकरी यांच्यासाठी सौर पंप विषय तक्रारी निवारणाचे शिबिर मानवत येथील विज वितरण कंपनीच्या वतीने आयोजीत केले होते. पण या शिबीराकडे अधिकार्‍यांनी दांडी लगावल्याने संतप्त शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने DY सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाले पाथरी येथे घेण्यात आले. या वेळी संतप्त शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले व आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.सविस्तर वृत्त असे की, सौरऊर्जा पंपासाठी दिनांक 29 डिसेंबर रोजी मानवत उपविभाग येथे तक्रार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पण सदर मेळावा करिता सौर पंप एजन्सी सहभागी राहणारा असल्यामुळे या शिबीराकडे अधिकारी यांनी दांडी मारल्यामूळे, D.Y सोनवणे यांनी पाथरी येथील शिबीरात आपापल्या तक्रारी माडाव्यात असे कळविल्याने तालूक्यातील शेतकरी पवन चव्हाण,संकेत चव्हाण, किशन देशमाने, कृष्णा चव्हाण, नितीन कदम, गयाबाई आकात ह्या संतप्त झाला. तर यावेळी सूरवातीला काही शेतकऱ्यांचे तक्रारी उदाहरणार्थ पंप कार्यान्वित नाही, दुरुस्ती साठी तक्रारी असून अटेंड केली नाही.वादळामुळे पंपाचे नुकसान झाले परंतु बसविले नाही इत्यादि प्रकारच्या तक्रारी बाबत तक्रारी अवगत केल्या.मानवत येथे कृषि पंपासाठी शेतकरी तक्रास मेळावा -दिनांक 29 डिसेंबर 2025 वेळ सकाळी ११.०० वाजता महावितरण उपविभागीय कार्यालय मानवत येथे आयोजीत करण्यात आला होता. पण तालूक्यातील सौरऊर्जा कृषि पंप धारक शेतकरी यांच्या तक्रारी घेण्यासाठी एक ही अधिकारी आला नाही. त्यामुळे तालूक्यातील शेतकरी संतप्त झाला होता.विज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता मानवत उप विभागात शेतकरी जमू लागला त्यामुळे मात्र अधिकारी यांनी पाठ फिरवली त्यामुळे शेतकरी संतप्त झाला.**

मानवत येथील तक्रार शिबीराकडे अधिकार्‍याची दांडी.*…

आज यावल येथे पार पडलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ.छाया अतुल पाटील यांच्या पदग्रहण कार्यक्रमास उपस्थित राहून नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.लोकशाहीवर विश्वास ठेवत परिवर्तनाचा कौल देणाऱ्या यावलच्या जागृत, कर्तव्यदक्ष जनतेचे मनापासून आभार. आपल्या अपेक्षांना न्याय देणारे कार्य घडो, हीच सदिच्छा.या वेळी शिवसेना उपनेते संजय सावंत, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, माजी आमदार रमेश चौधरी, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, धरणगाव माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी व समस्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

जिओ मोबाईल कंपनी मस्त वापरकर्ते ग्राहक झाले त्रस्त संडे ला रेंज पुर्णपणे गायब.5G टॉवर ची नागरिकाकडून होत आहे मागणी.. (गिरड जिल्हा प्रतिनिधी)गिरड गावाची लोकसंख्या जवळपास १६ हजाराच्या घरात असुन एकूण अंदाजे घराची संख्या २५०० च्या जवळ आहेत तर प्रत्येक घरी किमान दोन तरी मोबाईल वापरकर्ते आहेत व एका मोबाईल चा खर्च महिन्याला किमान ३०० रुपये म्हणजे एका घरी ६०० रुपये महिन्याचा खर्च याचा अंदाज ताळेबंद काढल्यास मोबाईल सिम कंपनीला महिन्याला ३,०००,००० लाख रुपयाचा निधी जमा होतो.गिरड गाव हे पर्यटन असल्यामुळे येथे दर रविवारला हजारो लोकं इथे पर्यटनासाठी येत असतात त्यामुळे सिम चे युजर्स वाढत असल्याने रेंज पुर्ण पणे जाम होत असुन मोबाईल काम करणे बंद होते त्यामुळे साधा कॉल सुद्धा लागत नाही यामुळे आपत्कालीन परीस्तीती निर्माण झाल्यास संपर्क करणे अवघड होत आहे.गेल्या अनेक वर्षापासून गिरड व परिसरात सर्वच मोबाईल कंपन्यांचे टॉवर उभारले गेले. मात्र गावात टावर असतानाही नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईल धारक ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नेटवर्क मिळविण्यासाठी स्लॅपचा,झाडाचा किंवा एखाद्या उंच जागेचा आधार घ्यावा लागतो. तरीही नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांना पैसे देऊनही मनस्ताप सहन करावा लागत असल्याने मोबाईल सिम कंपनी मस्त वापरकर्ते त्रस्त म्हणण्याची वेळ आली आहे. परिसरात गेल्या अनेक वर्षापासून शासनाचे बीएसएनएल सह जिओ व वोडा-आयडिया,इर्टेल चे खासगी मोबाईल कंपन्यांचे भले मोठे व उंच टावर उभे केले गेले. मात्र कंपन्यांच्या थातूरमातूर व दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामीण भागात उभारलेल्या टावरला नेटवर्क मिळत नसल्याने अनेक ग्राहक नेटवर्क मिळवण्यासाठी आपला मोबाईल नंबर पोर्ट करीत आहेत. परंतु ज्या मोबाईल कंपनीकडे नंबर पोर्ट केला त्या मोबाईल कंपनीचे सुद्धा नेटवर्क मिळत नसल्याने अनेक नागरिक बऱ्याच वेळा उंच झाडावर चढून नेटवर्क मिळवण्यासाठी जीवघेणा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामतः शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यासह व्यापारी कर्मचारी व सर्व सामान्य मोबाईल ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. संबंधित मोबाईल कंपन्यांची मोबाईल नेटवर्क मधील तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील मोबाईल ग्राहक करत आहे. शासकीय निमशासकीय कार्यालयामधील कर्मचारी महा-ई-सेवा केंद्र तसेच ऑनलाईन काम करणारे सर्व केंद्र चालक त्रस्त झाले आहेत. मोबाईल कंपन्यांचे अजिबातही नेटवर्क मिळत नसल्याने बाहेर गावावरून आलेल्या अनेक ग्राहकांना महा-ई-सेवा केंद्रामधून आल्या पावली काम न करता परत जावे लागते ही समस्या गेल्या अनेक वर्षापासून दररोजची व नेहमीचीच असल्याने ग्राहकासह केंद्र चालक सुद्धा त्रस्त झाले आहेत. अचानकच टॉवरला काही ना काही बिघाड येत असल्याने परिसरातील ग्राहक फारच कंटाळले आहे. सर्वच मोबाईल ग्राहक मोबाईल वरून आपली स्वतःची कामे सहज व सुलभ व्हावी म्हणून तात्काळ मोबाईल कंपनीचे महागडे रिचार्ज मारतात. मात्र रिचार्ज मारूनही बरेच वेळा फोन लागत नाही किंवा इतर ऑनलाईन कामे होत नसल्यामुळे सेवेत सुधारणा करून ग्राहकांना दर्जेदार सेवा द्यावी, अशी मागणी मोबाईल धारक करीत आहे.

जिओ मोबाईल कंपनी मस्त वापरकर्ते ग्राहक झाले त्रस्त संडे ला रेंज पुर्णपणे गायब.5G टॉवर ची नागरिकाक…

भारत सरकारने सन २००५ मध्ये नरेगा कायदा सुरु केलेला होता त्यानुसार देशातील ग्रामीण भागातील मजुरांना कामांनुसार वेतन दिले जात होते, नरेगा कायद्यात बदल करून डिसेंबर २०२५ मध्ये केंद्र सरकारने नविन व्ही. बी जी. राम, जी. अधिनियमानुसार देशात योजनेचे नाव बदल केलेले आहे आणि कामांच्या कार्यपद्धतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसुन येत आहे, त्यानुसार योजनेची राज्यात पारदर्शकपणे अमंलबजावणी व्हावी यासाठी परसाडे बु ग्रामपंचायत कार्यालय येथे 29/ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विकसित( यासीन तडवी यावल तालुका विभागीय संपादक पोलीस टाईम मीडीया यावल) परसाडे बु येथे नरेगा ऐवजी व्ही. बी-जी. राम जी जनजागृतीबाबत विशेष ग्रामसभा परसाडे बुभारत - रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) अर्थात व्ही, बी- जी राम जी अधिनियम अंतर्गत जनजागृती करणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्या पत्रानुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते, त्यानुसार विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी परसाडे बु येथील सरपंच मिना राजु तडवी हे होते, या विशेष ग्रामसभेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील पात्र अनुसुचित जाती, जमाती, दुर्बल भागातील कुटुंब आणि दारिद्रये रेषेखालील कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा आणि त्यांच्या उत्पन्नात वाढहोऊन विकास व्हावा, यासाठी केंद्र सरकार मार्फत महत्वपूर्ण कायद्या आहे. यानुसार ग्रा. रो. सहाय्यक अलाउद्दीन शिकंदर तडवी यांनी नविन कायद्याची बदलत्या स्वरुपात अमंलबजावणी विषयी थोडक्यात जॉबकार्ड धारक मजुरांशी चर्चा करून मार्गदर्शन केले. या विशेष ग्रामसभेला ग्रामसेवक दिलीप तडवी ग्रामपंचायत सरपंच,मिना राजु तडवी उपसरपंच सुलेमान कान्हा तडवी व सर्व ग्रा. पं. सदस्य, मुन्ना बाई तडवी शकीला तडवी योगिता सावळे बाबासाहेब भालेराव रोशन तडवी रोजगार सेवक अलाउद्दीन तडवी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामरोजगार सहाय्यक, शिपाई, दिपक पाटील समाधान भालेराव संगणक चालक आणि गावातील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

भारत सरकारने सन २००५ मध्ये नरेगा कायदा सुरु केलेला होता त्यानुसार देशातील ग्रामीण भागातील मजुरांन…

मालेगाव मध्ये वंचित बहुजन आघाडी व मालेगाव सेक्युलर फ्रंटची एकत्रित करण्याची घोषणा मालेगाव आतला वंचित बहुजन आघाडी निर्णयक... (नांदगाव नाशिक जिल्हा विभागीय प्रतिनिधी)आगामी मालेगाव महानगरपालिका निवडणूक 2020 च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी व मालेगाव सेकंड यांची संयुक्त पत्रकार परिषद दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी शनिवारी आयोजित करण्यात आली. पत्रकार परिषदेत मालेगाव सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून लढवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. मालेगाव सेकुलर फ्रंट मध्ये वंचित बहुजन आघाडी, इस्लाम पक्ष आणि समाजवादी पार्टी यांचा सहभाग असून आगामी महापालिका निवडणूक ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढवणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या आघाडीच्या माध्यमातून मालेगाव शहराच्या विकासासाठी सामाजिक, न्याय, धर्मनिरपेक्षता आणि सर्व समावेशक राजकारणाचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या संयुक्त पत्रकार परिषदेस मालेगाव सेक्युलर फ्रंट व सहभागी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये माजी आमदार व इस्लाम पक्षाचे प्रमुख शेख रशीद, समाजवादी पार्टीचे प्रमुख व माजी नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी डॉक्टर अखलाख, वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दीपक पवार, महासचिव संजय जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत युतीची भूमिका भाजप - आरएसएस च्या धार्मिक ध्रुगीकरणाला विरोध, रणनीती तसेच मालेगाव शहराच्या प्रश्नावर संयुक्त भूमिका मांडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या युतीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीला आगामी निवडणुकीत बारा ते पंधरा जागा जाहीर करण्यात आल्या असून काही जागांवर अजून चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात मालेगाव शहरांमध्ये या मालेगाव सेक्युलर फ्रंटची मोठी ताकद निर्माण झाली आहे. या युतीच्या घोषणेमुळे मालेगाव शहराच्या राजकारणात मोठी उलाढाल पाहायला मिळाली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल (नाशिक)

मालेगाव मध्ये वंचित बहुजन आघाडी व मालेगाव सेक्युलर फ्रंटची एकत्रित करण्या…

*नेताजी सुभाष विद्यालयात *N.M.M.S.* परिक्षा संपन्न. (मानवत / प्रतिनिधी.—————————मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यासाठीची आज दिनांक 28 डिसेंबर रोजी. *NMMS* ची परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडली.सविस्तर वृत्त असू की, आज येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या , नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीतील शालेय विद्यार्थ्यासांठी शिष्यवृत्ती परिक्षा *एन. एम.एम. एस. परिक्षा* घेण्यात आली असून परीक्षेसाठी शहरी व ग्रामीण भागातून नेताजी सुभाष विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एकूण 397 विद्यार्थी नोंदणीकृत होते.पैकी 386 विद्यार्थी यांनी परीक्षा दिली. शहरातच परीक्षा केंद्र असल्या मुळे पालकांनी समाधान व्यक्त केले. परीक्षेचे काम केंद्रप्रमुख म्हणून श्री संजयजी लाड यांनी यावेळी काम पाहिले होते. तर उपकेंद्र संचालक म्हणून श्री. गणेशजी सिरसकर तसेच गटसाधन केंद्रातील मा. राजकूमारजी गाढे सर, लिपिक म्हणून विद्यालयातील श्री. दत्तरावजी आधाटे यांनी काम पाहिले. यावेळी परीक्षा सुरळीत पणे पार पाडण्यासाठी विद्यालयातील श्री सदाशिवराव होगे सर,कैलासचंद्र सारडा सर, माणिकराव सिसोदे सर, बाळासाहेब नाईक सर, धनंजय गरुड सर, राजन सूर्यवंशी सर यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच पर्यवेक्षण कामी परीक्षणाच्या कामी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी काम पाहिले. तर यावेळीशासकीय नियमाचे काटेकोर पणे पालन करून परीक्षा पार पडली.***

* नेताजी सुभाष विद्यालयात *N.M.M.S.* परिक्षा संपन्न.���������������������������������…

Load More
That is All