Read more

View all

📰 *घर घर संविधान — लोकशाहीचा प्राणवायू**भगवान चौधरी | माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते*. *२६ नोव्हेंबर हा भारताच्या लोकशाही प्रवासातील एक ऐतिहासिक दिवस.**याच दिवशी, १९४९ साली भारताने आपले संविधान स्वीकृत करून लोकशाहीचा पाया दृढ केला. आणि २६ जानेवारी १९५० रोजी त्या संविधानाची अंमलबजावणी करून देशाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहींच्या यादीत आपले नाव अमर केले*.*भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर ग्रंथ नाही, तर ते आपल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाचे मार्गदर्शन करणारे जिवंत दस्तऐवज आहे. या संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचे ध्येय ठरवले गेले. नागरिकांना विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य तसेच दर्जा व संधींची समानता देण्याची हमी यात दिली आहे.**आज, "घर घर संविधान" या उपक्रमाद्वारे संविधानातील आदर्श व मूल्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. संविधान निर्मात्यांनी घालून दिलेल्या तत्त्वांचे पालन करूनच देशाची एकता, अखंडता आणि बंधुता टिकून राहील, हे अधोरेखित करणे ही काळाची गरज आहे.**संविधान दिवस म्हणजे केवळ स्मरणाचा क्षण नाही, तर कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. नागरिक म्हणून आपल्यावर असलेली जबाबदारी, अधिकारांसह कर्तव्यांचे पालन, आणि लोकशाही मूल्यांची जपणूक — हाच खरा संविधानाचा सन्मान होय.**यंदा भारतीय संविधानाला ७६ वर्षे पूर्ण होत असताना,**आपण सर्वांनी "घर घर संविधान" ही संकल्पना आचरणात* *आणण्याचा निश्चय करावा,**हीच भारतीय लोकशाहीला खरी मानवंदना ठरेल.*📖

📰 *घर घर संविधान — लोकशाहीचा प्राणवायू**भगवान चौधरी | माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते*.������…

चारंगबाबा दूध संकलन केंद्र गुंजाळवाडी(बेल्हे) मार्फत लाभांश व दीपावली भेटवस्तू वाटप.. प्रतिनिधी - सुदर्शन मंडलेबेल्हे दि. २४ - चारंग बाबा दूध संकलन केंद्र गुंजाळवाडी मार्फत संस्थेचे संस्थापक लहूशेठ गुंजाळ व समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके सर यांच्या हस्ते गवळी बांधवांना लाभांश व दीपावली भेटवस्तू वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेत सन २०२४-२५ या कालावधीमध्ये सर्वात जास्त दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक यांचाही सत्कार करण्यात आला.सुभाष शिवाजी बोरचटे यांनी या आर्थिक वर्षात ४४,४०४ लिटर, बाळू एकनाथ गुंजाळ यांनी ३२,७४९, निखिल तानाजी बांगर यांनी ३२,६४२, मनोज गणपत बोरचटे यांनी २४,०२२,विशाल विलास बोरचटे यांनी २०,०८९ लिटर इतका दूध पुरवठा एका आर्थिक वर्षात केला आहे.सर्व दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक व गवळी यांना दीपावलीनिमित्त मिठाई,साड्यांचे वाटप करून सर्व दूध उत्पादकांची दिवाळी गोड केली.यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके सर यांनी सर्व गवळ्यांना जास्तीत जास्त दूध पुरवठा करावा.शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते.उच्च व चांगल्या दर्जेचे दूध संस्थेमध्ये येत असल्यामुळे दुधाचा प्रतिलिटर भाव हा इतर संस्थेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर दिला जातो.जनावरांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे,त्यांचे लसीकरण वेळोवेळी करून घ्यावे याबद्दलची माहिती देण्यात आली.या कार्यक्रमानिमित्त सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके,संस्थेचे संस्थापक लहूशेठ गुंजाळ,वरिष्ठ दूध संकलन अधिकारी प्रवीण औटी,उद्योजक सुरेश शेठ गुंजाळ,साईकृपा पतसंस्थेचे संचालक दत्तूशेठ गुंजाळ,मा.तंटामुक्ती अध्यक्ष रामदास शेठ गुंजाळ,राजुरी येथील गणेश दूध संस्थेचे संचालक निलेश हाडवळे, पत्रकार राजेश कणसे, शामराव गुंजाळ, केरभाऊ गुंजाळ,सामाजिक कार्यकर्ते भाऊशेठ बोरचटे आदी मान्यवर उपस्थित होते.

चारंगबाबा दूध संकलन केंद्र गुंजाळवाडी(बेल्हे) मार्फत लाभांश व दीपावली भेटवस्तू वाटप..������������…

पत्रकार संदीप शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव* (जुन्नर तालुका प्रतिनिधी संदीप शितोळे बेल्हे )- जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील पत्रकार संदीप शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य पत्रकार बंधू आणि जय मल्हार क्रांती संघटनेचे विविध गावातील कार्यकर्ते यांनी त्यांना फोन करून व वैयक्तिक भेटून शुभेच्छा दिल्या. त्यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातुन अनेक शुभेच्छा प्राप्त झाल्या. त्यात चक्रेश्वर वार्ता चे संपादक लहू लांडे,महाराष्ट्र न्यूज लाईव्ह २४चे संपादक मनोहर गोरगल्ले, मीडिया पोलीस टाइम चे मुख्य संपादक हमीद तडवी (जळगाव ), सह्याद्री वाहिनी, आयबीएन लोकमत चे पत्रकार रायचंद शिंदे, शिवनेरी एक्सप्रेस चे संपादक व पुण्यनगरी आणि प्रभात पत्रकार रामदास सांगळे, एबी न्यूज चे सुरेश आण्णा भुजबळ, समर्थ भारत बेल्हा प्रतिनिधी सुधाकर सैद, शरद झावरे, गणेश जागदाळे, गणेश चोरे, अर्जुन शिंदे, सकाळ पत्रकार राजु कणसे, गोपीनाथ शिंदे, हिंदवी न्यूज चे सहदेव पाडेकर, अजित पानसरे, सुदर्शन मंडले, राहुल कडलक, फय्याज इनामदार, विठ्ठल शितोळे, सतिष शिंदे आदी पत्रकार मित्र आणि समाज बांधवानी शुभेच्छा दिल्या.

पत्रकार संदीप शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव*����������������������…

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची रेती माफिया विरुद्ध केलेली कारवाई* दि 24-10-2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे , पोलीस हवालदार चेतन पिसे , पोलीस हवालदार राहुल साठे, पोलीस हवालदार उमेश लडके, पोलीस हवालदार सतीश घवघवे पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की आरोपी क्रं 1 प्रवीण प्रोफेश्वर मरापे,रा. मौजा पिंपळगाव, ता. हिंगणघाट हा ट्रॅक्टर मालक योगेश देवराव सातपुते रा. पिंपळगाव रोड ,संत तुकडोजी वॉर्ड , ता. हिंगणघाट याचे सांगणे वरून त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक MH 32 P 545 लाल रंगाच्या सरपंच महिंद्रा कंपनी चा ट्रॅक्टर मध्ये लाडकी नदीच्या पात्राचे रेती घाटातून काळी रेती चोरून मौजा बुरकोणी कडे वाहतूक करीत आहे. अश्या मुखबीरचे खबरे वरुन पंच व पो.स्टॉप चे मदतीने यातील नमुद आरोपी च्या ताब्यातील ट्रॅक्टर यास थांबवून चेक केले असता 1 ब्रास काडी रेती (गौण खनिज) बिना रॉयल्टी वाहतूक करताना रंगेहाथ मिळून आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून ट्रॅक्टर, ट्रॉली व 1 ब्रास काळी रेती (गौन खनिज ) असा जु कि 8,08,000/- रु चा माल मिळून आल्याने , पो स्टे. हिंगणघाट येथे परत येवुन आरोपीतान विरूध्द गुन्हा नोंद केला ...... सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन सा. मा.अपर पोलीस अधिक्षक श्री सदाशिव वाघमारे सा.मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट श्री. सुशीलकुमार नायक सा. यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सा हिंगणघाट यांचे कार्यालयातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस हवालदार चेतन पिसे, पोलीस हवालदार उमेश लडके, पोलीस हवालदार राहुल साठे, पोलीस हवालदार सतीश घवघवे , पोलीस नाईक रवींद्र घाटुर्ले यांनी केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची रेती माफिया विरुद्ध केलेली कारवाई*���������������…

**खासदार अमर भाऊ काळे यांना पत्रकार बंधूंच्या दिवाळी शुभेच्छा*. *आर्वी, २४ ऑक्टोबर २०२५: दिवाळीच्या निमित्ताने पत्रकार विपुल पाटील, सुमंत पाटील, अब्दुल कदीर आणि अमोल येसाणकर यांनी खासदार अमर भाऊ काळे यांना भेट देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या."दिवाळीचा आनंद आणि समृद्धी सर्वांना लाभो," असे पत्रकारांनी सांगितले. खासदार काळे म्हणाले, "तुमच्या शुभेच्छांनी मी आनंदित झालो. पत्रकारितेचे योगदान अमूल्य आहे

* खासदार अमर भाऊ काळे यांना पत्रकार बंधूंच्या दिवाळी शुभेच्छा*.����������������������������������…

**मानवत तालूक्यातील हटकरवाडी ते रामपूरी रस्त्याची वाट लागली.**. { मानवत / अनिल चव्हाण }*पाथरी विधान सभा मतदार संघातील मानवत तालूक्यातील ग्रामीण भागातील रस्ते हे जिल्हा परिषदेच्या सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अख्तारीत येत असून पाथरी विधान सभा मतदार संघातील मानवत तालूक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासा पासून कोसो दूर राहिले असल्यामूळे ग्रामिण रस्ते विकास कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्तव्यदक्ष अभियंता यांचे दूर्लक्ष होत असल्या मूळे ग्रामीण भागातील रस्ते अखेरची घटका मोजत आहे. तर रस्त्या वरून वाहन धारकांना वाहने चालवितांना तारेवरची कसरत करण्याची पाळी आली आहे.*जि.प. व पं.स* निवडणूक लागण्या पूर्वीच रस्त्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी संतप्त ग्रामीण भागातील नागरिकातून होत आहे.रस्त्याचा प्रश्न न सूटल्यास याचा परिणाम जि.प. व पं.स. निवडणूकीच्या माध्यमातून व्यक्त केला जाईल अशी चर्चा नागरिकातून ऐकावयास मिळत आहे.*

मानवत तालूक्यातील हटकरवाडी ते रामपूरी रस्त्याची वाट लागली.**.…

**प्रभाग क्रमांक ३ चे युवा नेतृत्व पाडूरंग जाधव विकास कामावर निवडणूक लढविणार*. (मानवत / प्रतिनिधी.अनिल चव्हाण) ———————_मानवत शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा सामाजीक कार्यकर्ते पाडूरंग शिवाजीराव जाधव यांनी खंडोबा मित्र मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षा पासून या भागात विविध सामाजीक, शैक्षणिक, रक्तदान शिबीरे , महिला सक्षमीकरण , सामाजीक सलोखा हिंदू मुस्लिम एकता असे विविध उपक्रम प्रभागात व शहरात राबवून युवका मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.यंदा दिवाळीच्या धामधूमी नंतर निवडणूकीचे बिगूल वाजले असून त्यामुळे मानवत नगर परिषदेच्या प्रभागामध्ये दिवाळी नंतर रणनिती ठरणार आहे. त्यामुळे प्रभाग क्रमाक ३ मध्ये यूवा नेतृत्व पांडूरंग जाधव हे खंडोबा मित्र मंडळ यांच्या माध्यमातून विकासाच्या मूद्यावर निवडणूक लढविणार असून शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये यूवकांचा पाठिंबा मिळत आहे.*

प्रभाग क्रमांक ३ चे युवा नेतृत्व पाडूरंग जाधव विकास कामावर निवडणूक लढविणार*.���������������������…

हिंगणघाट पोलीस गुन्हे प्रकटीकरणाची कारवाई . पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, निखील पाटील रा. बुरकोणी हा निळा-काळया रंगाचे स्प्लेन्डर प्लस मोटार सायकलने दारूचा माल घेवून नागरी वरून लाडकी मार्गे बुरकोणी कडे वाहतुक करीत येत आहे, अशी खात्रीषीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा. अनिल राऊत पोलीस निरीक्षक सा. यांना देवून त्याचे आदेशाने लाडकी बसस्टाँप येथे पोस्टाँप सह रवाना होवून तेथे नाकाबंदी केली असता काही वेळाने प्राप्त खबरेप्रमाने निळया-काळया रंगाचे स्प्लेन्डर प्लस गाडी येतांना दिसल्याने सदर वाहनाला पंचासमक्ष थांबवुन व थांबिवण्याचा उददेष सांगुन नांव गाव पत्ता विचारला असता, त्याने त्याचे नाव निखील संजय पाटील वय 30 वर्ष रा. बुरकोणी ता. हिंगणघाट जि. वर्धा असे सांगितले त्याचे वाहनांची पाहणी केली असता सदर वाहनाचे टंकीवर असलेल्या एका चुंगडीमध्ये राँकेट कंपनीच्या 90 मिलीच्या देशी दारूच्या सिलबंद 300 शिश्या प्रती शिशी 120 रू प्रमाने 36,000 रू जूने वापरते हिरो कंपनीचे निळया-काळया रंगाचे स्प्लेन्डर प्लस गाडी क्र. एमएच 32 एएफ 2387 किं. 60,000 रू रू असा जू.किं. 96,000 रू चा माल विनापास परवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला. ही संपूर्ण कारवाई मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक सा. व मा. अनिल राऊत पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि पद्ममाकर मुंडे सा. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.

हिंगणघाट पोलीस गुन्हे प्रकटीकरणाची कारवाई

शेतकरी बापाचं अस्तित्व टिकवण्यासाठी,शेतकरी पुत्रांनो एक व्हा...समाजिक कार्यकर्ते आशिष जाचक, (वर्धा जिल्हा प्रतिनिधी(अब्दुल कदीर) वर्धा जिल्हा,तथा विदर्भातील सर्व शेतकरी,शेतमजूर,शेतकरी पुत्रांना. समाजिक कार्यकर्ते आशिष जाचक, समाजातील प्रत्येक घाटकाच्या न्याय हक्कासाठी,खम्बिर पणे उभे राहणारे,समश्या जिथे तिथे निवारण .,हेच आमचे ध्येय हेच आमचे धोरण म्हणारे ,वर्धा जिल्ह्यातील कुरझडी जामठा येथील रहिवाशी आशिष जाचक यांनी हे आव्हाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या एक वर्षा पासून हा लढा चालू आहे. आजही ह्या लढ्याला पूर्ण यश मिळाले नाही. ह्या विधमान महायुती भाजप सरकारने इलेक्शन मध्ये शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण पोकळ ठरली,शेतकरी,शेतमजूर,युवां वर्ग,लाडक्या बहिणीचे २१ शे रु देऊ सर्व जनतेला आशा दाखून,आश्वासने देऊन .गोरगरीब जनतेचे मत गुंडाळून सत्ता स्थापन करून आता ,बेधुंद सत्तेचा आनंद घेत आहे. शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा,कोरा,कोरा, अजूनही सातबारा कोरा झाला नाही.यांना ओला दुष्काळ अजूनही दिसला नाही.शेतकऱ्याच्या फाशीचा दोर यांना कळला नाही. तूट पुंजी जाहीर केलेली नुकसान भरपाई दिवाळी अगोदर देऊ कागदोपत्रीच आहे. शेतकऱ्याची दिवाळी गोड करणार सरकार शेतकऱ्याची दिवाळी काळी करून मोकळ झाल.महाराष्ट्राचे मुख्मंत्री साहेब स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका साठी साखर घेऊन फिरत आहे.आणी इकडे रोज शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकरी बापाचं अस्तित्व टिकवण्यासाठी भरपूर आंदोलने झाली ,मोर्चे उपोषणे झाली ,लाखो शेतकऱ्यांचे कर्ज माफीचे अर्ज भरून झाले.आता मात्र लढाई अंतिम टप्यात. आपल्या शेतकऱ्याची लढाई लढणार महाराष्ट्रात आता एकच नेतृत्व ते म्हणजे बच्चू भाऊ कडू शेतकरी मित्रानो,शेतकरी पुत्रानो आता आपल्या साठी लढाई लढणाऱ्या माणसाला ,मावळ्याला आपण साथ देण्याची गरज आहे. ते लढाई त्यांची नसून आपल्या हक्कासाठी लढत आहे. तेव्हा पक्ष्याचे झेंडे बाजूला ठेवा आणी आपल्या शेतकरी बापाच्या अस्तित्वासाठी लढाईत सहभागी व्हा आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय आणी मार्ग नाही.ह्या बेधुंद सरकारचं नाक दाबल्या शिवाय तोंड खुलणार नाही. बाळ रडल्या शिवाय माय दुध पाजत नाही याची जाणीव असू द्या येणाऱ्या २८आक्टोम्बर ला शेतकरी नेते ,बच्चू भाऊ कडू यांच्या बुट्टीबोरी ,नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनात लाखोच्या संखेने सामील व्हा.आमच ठरलं आहे.आपणही या .उठ शेतकरी पुत्रा जागा हो !बापाच्या लढाईचा धागा हो! असे सर्व विदर्भातील ,शेतकरी,शेतमजूर,युवां वर्गास समाजिक कार्यकर्ते आशिष जाचक यांनी आव्हान ,विनंती केली .

शेतकरी बापाचं अस्तित्व टिकवण्यासाठी,शेतकरी पुत्रांनो एक व्हा...समाजिक कार्यकर्ते आशिष जाचक,������…

Load More
That is All