Read more

View all

देवलगाव व ताडबोरगांव येथील आठ किलो मीटर खडीकरण रस्त्याचा मा. संतोष भैय्या आंबेगावकर यांच्याहस्ते शुभारंभ. (*मानवत / प्रतिनिधी.)—————————मानवत तालूक्यातीलमौजे देवलगाव येथे परभणी लोक सभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार संजयजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिव सेनेचे यूवानेते संतोष भैय्या आंबेगावकर व सरपंच केशवराव अवचार यांच्या अथक प्रयत्नाने देवलगाव व ताडबोरगाव येथील पांदण रस्त्याचे उद्घाटन मानवत तालूका शिवसेना तालुकाप्रमुख माणिकराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले. शेतरस्त्या अभावी गावातील व शिवारातील शेतकऱ्यांना नेहमीच येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या शिवारातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकवलेला माल बाजार पेठेमध्ये नेण्यासाठी शेतकऱ्यांना शेत रस्त्याची खूप आवश्यकता होती. यावेळी शेतकरी संघटनेचे मधुकराव अवचार, उत्तमराव अवचार, परमेश्वरराव अवचार, नारायणराव अवचार, श्याम आवचार, पांडुरंगराव अवचार, अशोकराव अवचार चेरमन, अशोक अवचार, उद्धव अवचार, परमेश्वर अवचार, उद्धवराव अवचार चेरमन आल्हादास भाई, बबरभाई, नारायण अवचार आदीसह शेतकरी व गावकरी यांची या वेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती...

देवलगाव व ताडबोरगांव येथील आठ किलो मीटर खडीकरण रस्त्याचा मा. संतोष भैय्या आंबेगावकर यांच्याहस्ते …

३१ डिसेंबर (थर्टी फर्स्ट) व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध मद्यनिर्मितीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्री. देशमुख यांनी दि. १३.१२.२०२५ रोजी नागपूर येथे झालेल्या आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार सह आयुक्त (अंमलबजावणी) अमरावती विभाग श्री. प्रसाद सुर्वे यांच्या आदेशान्वये व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अकोला श्रीमती सीमा झावों यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग, अकोला यांनी जिल्ह्यातील बनावट देशी दारू निर्मितीचा मोठा कारखाना उध्वस्त करत ऐतिहासिक कारवाई केली आहे.दि. २१.१२.२०२५ रोजी प्राप्त गोपनीय माहितीनुसार मोळे-विचखेड ता. पातूर जि. अकोला येथील शेतशिवारातील एका अस्थायी शेडमध्ये सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत ‘रॉकेट देशी दारू – संत्रा’ या ब्रँडच्या ९० मिली क्षमतेच्या ३५० खोक्यांमधील सुमारे ३५,००० प्लास्टिकच्या सिलबंद बाटल्या, तसेच मद्यार्क तयार करण्यासाठी वापरले जाणारे २०० लिटर क्षमतेचे ३५ प्लास्टिक ड्रम, एक मोटारसायकल व ट्रॅक्टरसह एक ढोली असा एकूण रु. २०,३२,११०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी जवान श्री. सुभाष गावंडे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास निरीक्षक श्री. महेंद्र सोनार (अकोला) हे करीत आहेत.त्याचप्रमाणे कारवाईदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजे विचखेड, ता. पातूर येथील किसान पोल्ट्री फार्म येथील कुलूपबंद खोलीवर दारूबंदी कायद्यान्वये छापा टाकण्यात आला. या ठिकाणी अवैध विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेल्या ‘रॉकेट देशी दारू – संत्रा’ या ब्रँडच्या ९० मिली क्षमतेच्या ३०० खोक्यांमधील सुमारे ३०,००० प्लास्टिकच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची किंमत रु. १२,०१,५००/- इतकी आहे. या गुन्ह्यात जवान श्री. आकाश बरडे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री. भरतकुमार धुरट, भरारी पथक, अकोला हे करीत आहेत.दोन्ही कारवाईत मिळून एकूण ६५० बॉक्स बनावट देशी दारू व रु. ३२,३४,४९०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईची चाहूल लागताच घटनास्थळी उपस्थित असलेले संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम १५ (१)(ई), ८१, ८३ व १०८ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच घटनास्थळाच्या जागेच्या मालकीबाबत माहिती मिळविण्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांना व जप्त वाहनांच्या मालकीसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.या यशस्वी कारवाईत निरीक्षक श्री. प्रमोद कांबळे, भरारी पथक अकोला तसेच जवान सर्वश्री विशाल बांवलकर, सुभाष गावंडे, योगेश सरप, रमाकांत मुंडे, आकाश बरडे, जयंत शेगोकार, वाहनचालक नरेश कास्देकर, प्रविण गजभार, राजेश खिराडे तसेच महिला जवान श्रीमती गीता भास्कर व वैष्णवी मोहन यांनी सहभाग घेतला.दरम्यान, अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतूक यासंदर्भात नागरिकांनी कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००-२१३-१९९९, व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६३८८८१ वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)

शिवसेना (उबाठा ) पक्षाचे चोपडा शहराध्यक्ष महेंद्र भोई यांचा राजीनामाडिसेंबर २९, २०२५ शिवसेना (उबाठा ) पक्षाचे चोपडा शहराध्यक्ष महेंद्र भोई यांचा राजीनामा. (चोपडा दि.२९(प्रतिनिधी) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चोपडा शहर प्रमुख महेंद्र मोहन भोई यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख उपनेते तथा नंदुरबार संपर्क प्रमुख श्री. गुलाबराव वाघ यांच्याकडे नुकताच दिला असून पक्षाशी मी प्रामाणिक असल्यावर देखील पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे दूर्लक्ष करतात त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.राजीनाम्यात स्पष्ट केले आहे की,मी पक्षाचा मागील १५-२० वर्षापासुन सक्रीय कार्यकर्ता व सदस्य आहे. मी चोपडा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नगरसेवक पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेले होते त्यावेळी मला कोणत्याही प्रकारचे सहकार्य पक्षामार्फत अथवा पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून मिळाले नाही, त्यामुळे मी पराभूत झालो आहे असा घणाघात करून त्यामुळे मी माझ्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तरी माझा राजीनामा वरिष्ठांनी स्विकारावा असे त्यांनी म्हटले आ

शिवसेना (उबाठा ) पक्षाचे चोपडा शहराध्यक्ष महेंद्र भोई यांचा राजीनामाडिसेंबर २९, २०२५ शिवसेना (उबा…

*'अकोट पुलिस ने अवैध रूप से नायलॉन चाइनीज मांजा बेचने के आरोप में आरोपी को गिरफ्तार किया. '*(अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)अकोला:28/12/2025 को, अकोट फाइल पुलिस स्टेशन को गोपनीय सूचना मिली कि अकोला क्षेत्र के शंकर नगर निवासी अभय देवानंद भोसले, सरकार द्वारा प्रतिबंधित नायलॉन चाइनीज मांजा की अवैध बिक्री कर रहा है। विश्वसनीय सूचना मिलने पर पी.एन. श्री. रहीम शेख, सपोनी जनार्दन खंडेराव, पोस्ट ऑफिस हवा/1500 प्रशांत इंगले, पोस्ट ऑफिस हवा/2114 हर्षल श्रीवास और पोस्ट ऑफिस का/2155 इमरान शाह के मार्गदर्शन में शंकर नगर, अकोट फाइल अकोला में छापेमारी की गई। आरोपी अभय देवानंद भोसले, उम्र 19 वर्ष, निवासी शंकर नगर, अकोट फाइल अकोला, को नागरिकों और जानवरों को गंभीर चोट पहुंचाने और गैर इरादतन हत्या करने के इरादे से अपने वित्तीय लाभ के लिए प्रतिबंधित नायलॉन रस्सी अवैध रूप से ले जाते हुए पाया गया। उसके पास से मोनो काइट फाइटर लेबल वाली काली प्लास्टिक की बंडल/रील सहित कुल 33 टुकड़े बरामद हुए, जिनकी कीमत 2000 रुपये थी। प्रत्येक पर 1200 रुपये का जुर्माना लगाया गया है। कुल 39,600 रुपये मूल्य का सामान जब्त किया गया है और भारतीय दंड संहिता की धारा 110, 223 के साथ-साथ पर्यावरण संरक्षण अधिनियम की धारा 4, 5 और 15 के तहत एफआईआर संख्या 616/25 के अंतर्गत मामला दर्ज कर कार्रवाई की जा चुकी है। इस अपराध की जांच पुलिस उपायुक्त शेख अख्तर कर रहे हैं।अकोट फाइल क्षेत्र में प्रतिबंधित चीनी मांझे का इस्तेमाल पतंग उड़ाने के लिए अवैध रूप से किया जा रहा है, जिसके कारण सड़क पर दोपहिया वाहनों से यात्रा कर रहे कई नागरिकों को जानलेवा चोटें आई हैं। सरकार द्वारा प्रतिबंधित नायलॉन मांझे के दुष्प्रभावों के बारे में सोशल मीडिया, विभिन्न सेवा संगठनों, पुलिस प्रशासन और अन्य मीडिया के माध्यम से जागरूकता फैलाई जा रही है, लेकिन आज अकोट फाइल क्षेत्र के पुलिस स्टेशन क्षेत्र और जिले में हुई घटनाओं में मोटरसाइकिल सवारों, पैदल यात्रियों और जानवरों को गंभीर चोटें आई हैं, जिनमें से कुछ की मौत हो गई है।माननीय के मार्गदर्शन में उक्त कार्यवाही की गई। पुलिस अधीक्षक/श्री अर्चित चाण्डक साहब, मा. अतिरिक्त पुलिस अधीक्षक/बडेली रेड्डी साहब, मा. उपविभागीय पुलिस अधिकारी/सुदर्शन पाटिल साहब, पीओ/शेख रहीम, सपोनी जनार्दन खंडेराव, पीओ अप नि अख्तर शेख, पीओ हवा/1500 प्रशांत इंगले, पीओ हवा/2114 हर्षल श्रीवास, पीओके/2155 इमरान शाह, पीओके/2152 अमीर, पीओके/1835 लीलाधर खंडारे।

' अकोट पुलिस ने अवैध रूप से नायलॉन चाइनीज मांजा बेचने के आरोप में आरोपी को गिरफ्तार किया.����������������…

अवैध रेती वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर जप्त. ( महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.29 चिमूर तालुक्यांमध्ये गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत नियमित तपासणी करुन कोणत्याही नदीपात्रातून किंवा नाल्यातुन रात्री रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुक रोखण्याकरीता फिरते पथक स्थापण करण्यात आले आहे.त्या अन्वये दिनांक २५/१२/२०२५ रोजी पहाटे ३.१५ वाजताचे सुमारास चिमूर नेरी रोडवर श्रीधर राजमाने तहसिलदार चिमूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील उमरे,केतन घरकेले,शुभम बदकी निरज चिंतावार,ग्राम महसूल अधिकारी यांच्या पथकाने विना नंबर निळ्या कलर चे मुंडा व लाल कलरची ट्रॉली असलेले दोन ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करीत असल्यामुळे सदर ट्रॅक्टर वर जप्तीची कार्यवाही करण्यात आलेली आहे.जप्त केलेले ट्रॅक्टर हे गौतम पाटील रा.चिमूर व मनोज नागापूरे रा.चिमूर यांचे असून सदर जप्त केलेले दोन्ही ट्रॅक्टरवर दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करण्यात येत आहे.

अवैध रेती वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर जप्त.

छत्रपती क्रीडा मंडळातर्फे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचा सन्मानमैदानातून नेतृत्वापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास… (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.29:- शहराच्या क्रीडा क्षेत्रातून नेतृत्वापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करत नगर परिषद निवडणुकीत विजय मिळवून निवडून आलेले भद्रावती नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचा छत्रपती क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मानप्रसंग सन्मानपूर्वक पार पडत शहरातील क्रीडा संस्कृतीला नवे बळ देणारा ठरला. या विशेष प्रसंगी छत्रपती क्रीडा मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांना राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवरायांच्या प्रतीकाने गौरविण्यात आले. हे प्रतीक केवळ सत्कारापुरते मर्यादित नसून शिस्त, संयम आणि नेतृत्व या मूल्यांचे प्रतीक असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शिवरायांच्या आदर्शांप्रमाणे भद्रावतीतील खेळाडू घडावेत आणि शहराला सक्षम नेतृत्व लाभावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. हा सन्मान भद्रावती शहरातील खेळाडूंना योग्य दिशा, सुविधा आणि सातत्यपूर्ण पाठबळ मिळावे, या भूमिकेतून करण्यात आला. शहरातील अनेक तरुण खेळाडू जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करत असून, त्यांना योग्य व्यासपीठ व संधी मिळणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. खेळाडू घडवणे म्हणजे केवळ मैदानावर विजय मिळवणे नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शिस्त, संयम आणि नेतृत्वगुण रुजवणे होय, अशी महत्त्वपूर्ण भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. हे विचार छत्रपती क्रीडा मंडळाच्या ध्येयाशी सुसंगत असून, मंडळ शहरातील क्रीडा विकासासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे नमूद करण्यात आले. या सन्मानप्रसंगी मंडळाचे मुख्य संयोजक शंकर बोरघरे, ज्येष्ठ खेळाडू व संघटक सागर मोरे, राष्ट्रीय खेळाडू धीरज पाशी, राष्ट्रीय खेळाडू सागर अंबाघरे तसेच मंडळातील सर्व सदस्य व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सन्मानप्रसंग अधिक अर्थपूर्ण ठरला. यावेळी नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करत, भद्रावतीतील खेळाडूंना सक्षम व्यासपीठ, मूलभूत सुविधा आणि आवश्यक प्रोत्साहन देण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सकारात्मक सहकार्य राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले की, छत्रपती क्रीडा मंडळाचा हा उपक्रम शहरातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट करणारा ठरेल.

छत्रपती क्रीडा मंडळातर्फे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचा सन्मानमैदानातून नेतृत्वापर्यंतचा प्रेरणादा…

मानवत येथील तक्रार शिबीराकडे अधिकार्‍याची दांडी.*. ( मानवत / प्रतिनिधी.)मानवत तालूक्यातील शेतकरी यांच्यासाठी सौर पंप विषय तक्रारी निवारणाचे शिबिर मानवत येथील विज वितरण कंपनीच्या वतीने आयोजीत केले होते. पण या शिबीराकडे अधिकार्‍यांनी दांडी लगावल्याने संतप्त शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने DY सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाले पाथरी येथे घेण्यात आले. या वेळी संतप्त शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले व आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.सविस्तर वृत्त असे की, सौरऊर्जा पंपासाठी दिनांक 29 डिसेंबर रोजी मानवत उपविभाग येथे तक्रार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पण सदर मेळावा करिता सौर पंप एजन्सी सहभागी राहणारा असल्यामुळे या शिबीराकडे अधिकारी यांनी दांडी मारल्यामूळे, D.Y सोनवणे यांनी पाथरी येथील शिबीरात आपापल्या तक्रारी माडाव्यात असे कळविल्याने तालूक्यातील शेतकरी पवन चव्हाण,संकेत चव्हाण, किशन देशमाने, कृष्णा चव्हाण, नितीन कदम, गयाबाई आकात ह्या संतप्त झाला. तर यावेळी सूरवातीला काही शेतकऱ्यांचे तक्रारी उदाहरणार्थ पंप कार्यान्वित नाही, दुरुस्ती साठी तक्रारी असून अटेंड केली नाही.वादळामुळे पंपाचे नुकसान झाले परंतु बसविले नाही इत्यादि प्रकारच्या तक्रारी बाबत तक्रारी अवगत केल्या.मानवत येथे कृषि पंपासाठी शेतकरी तक्रास मेळावा -दिनांक 29 डिसेंबर 2025 वेळ सकाळी ११.०० वाजता महावितरण उपविभागीय कार्यालय मानवत येथे आयोजीत करण्यात आला होता. पण तालूक्यातील सौरऊर्जा कृषि पंप धारक शेतकरी यांच्या तक्रारी घेण्यासाठी एक ही अधिकारी आला नाही. त्यामुळे तालूक्यातील शेतकरी संतप्त झाला होता.विज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता मानवत उप विभागात शेतकरी जमू लागला त्यामुळे मात्र अधिकारी यांनी पाठ फिरवली त्यामुळे शेतकरी संतप्त झाला.**

मानवत येथील तक्रार शिबीराकडे अधिकार्‍याची दांडी.*…

आज यावल येथे पार पडलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ.छाया अतुल पाटील यांच्या पदग्रहण कार्यक्रमास उपस्थित राहून नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.लोकशाहीवर विश्वास ठेवत परिवर्तनाचा कौल देणाऱ्या यावलच्या जागृत, कर्तव्यदक्ष जनतेचे मनापासून आभार. आपल्या अपेक्षांना न्याय देणारे कार्य घडो, हीच सदिच्छा.या वेळी शिवसेना उपनेते संजय सावंत, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, माजी आमदार रमेश चौधरी, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, धरणगाव माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी व समस्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

जिओ मोबाईल कंपनी मस्त वापरकर्ते ग्राहक झाले त्रस्त संडे ला रेंज पुर्णपणे गायब.5G टॉवर ची नागरिकाकडून होत आहे मागणी.. (गिरड जिल्हा प्रतिनिधी)गिरड गावाची लोकसंख्या जवळपास १६ हजाराच्या घरात असुन एकूण अंदाजे घराची संख्या २५०० च्या जवळ आहेत तर प्रत्येक घरी किमान दोन तरी मोबाईल वापरकर्ते आहेत व एका मोबाईल चा खर्च महिन्याला किमान ३०० रुपये म्हणजे एका घरी ६०० रुपये महिन्याचा खर्च याचा अंदाज ताळेबंद काढल्यास मोबाईल सिम कंपनीला महिन्याला ३,०००,००० लाख रुपयाचा निधी जमा होतो.गिरड गाव हे पर्यटन असल्यामुळे येथे दर रविवारला हजारो लोकं इथे पर्यटनासाठी येत असतात त्यामुळे सिम चे युजर्स वाढत असल्याने रेंज पुर्ण पणे जाम होत असुन मोबाईल काम करणे बंद होते त्यामुळे साधा कॉल सुद्धा लागत नाही यामुळे आपत्कालीन परीस्तीती निर्माण झाल्यास संपर्क करणे अवघड होत आहे.गेल्या अनेक वर्षापासून गिरड व परिसरात सर्वच मोबाईल कंपन्यांचे टॉवर उभारले गेले. मात्र गावात टावर असतानाही नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईल धारक ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नेटवर्क मिळविण्यासाठी स्लॅपचा,झाडाचा किंवा एखाद्या उंच जागेचा आधार घ्यावा लागतो. तरीही नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांना पैसे देऊनही मनस्ताप सहन करावा लागत असल्याने मोबाईल सिम कंपनी मस्त वापरकर्ते त्रस्त म्हणण्याची वेळ आली आहे. परिसरात गेल्या अनेक वर्षापासून शासनाचे बीएसएनएल सह जिओ व वोडा-आयडिया,इर्टेल चे खासगी मोबाईल कंपन्यांचे भले मोठे व उंच टावर उभे केले गेले. मात्र कंपन्यांच्या थातूरमातूर व दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामीण भागात उभारलेल्या टावरला नेटवर्क मिळत नसल्याने अनेक ग्राहक नेटवर्क मिळवण्यासाठी आपला मोबाईल नंबर पोर्ट करीत आहेत. परंतु ज्या मोबाईल कंपनीकडे नंबर पोर्ट केला त्या मोबाईल कंपनीचे सुद्धा नेटवर्क मिळत नसल्याने अनेक नागरिक बऱ्याच वेळा उंच झाडावर चढून नेटवर्क मिळवण्यासाठी जीवघेणा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामतः शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यासह व्यापारी कर्मचारी व सर्व सामान्य मोबाईल ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. संबंधित मोबाईल कंपन्यांची मोबाईल नेटवर्क मधील तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील मोबाईल ग्राहक करत आहे. शासकीय निमशासकीय कार्यालयामधील कर्मचारी महा-ई-सेवा केंद्र तसेच ऑनलाईन काम करणारे सर्व केंद्र चालक त्रस्त झाले आहेत. मोबाईल कंपन्यांचे अजिबातही नेटवर्क मिळत नसल्याने बाहेर गावावरून आलेल्या अनेक ग्राहकांना महा-ई-सेवा केंद्रामधून आल्या पावली काम न करता परत जावे लागते ही समस्या गेल्या अनेक वर्षापासून दररोजची व नेहमीचीच असल्याने ग्राहकासह केंद्र चालक सुद्धा त्रस्त झाले आहेत. अचानकच टॉवरला काही ना काही बिघाड येत असल्याने परिसरातील ग्राहक फारच कंटाळले आहे. सर्वच मोबाईल ग्राहक मोबाईल वरून आपली स्वतःची कामे सहज व सुलभ व्हावी म्हणून तात्काळ मोबाईल कंपनीचे महागडे रिचार्ज मारतात. मात्र रिचार्ज मारूनही बरेच वेळा फोन लागत नाही किंवा इतर ऑनलाईन कामे होत नसल्यामुळे सेवेत सुधारणा करून ग्राहकांना दर्जेदार सेवा द्यावी, अशी मागणी मोबाईल धारक करीत आहे.

जिओ मोबाईल कंपनी मस्त वापरकर्ते ग्राहक झाले त्रस्त संडे ला रेंज पुर्णपणे गायब.5G टॉवर ची नागरिकाक…

Load More
That is All