Read more

View all

नेरी कडून जळगाव कडे जाणाऱ्या मोटरसायकलचा अपघात, (जामनेर/ प्रतिनिधी )नेरी कडून जळगाव कडे जाणाऱ्या एम एच 19 बी एफ 79 90 नंबरच्या मोटरसायकलचा चिंचोली जवळच्या पुलावरून खाली कोसळून अपघात झाला, त्या पुलाची खोली वीस फूट असेल व खाली कोसळली त्या जागी दगडे होती, व मोटर सायकल डबल सीट असल्याकारणाने फुल वेगामध्ये गाडी पुलावरून वीस फूट खोल नाल्यामध्ये कोसळली ,या मोटरसायकल वरती एक पुरुष व महिला असल्याचे स्थानिक नागरिकांनी माहिती दिली, ज्यावेळेस घटना स्थळाचे दृश्य बघितले तर तेथील दृश्य भयानक होते, मोटर सायकल वीस फूट खोल नाल्यात पडलेली गाडीचे हेड लाईट फुटलेले शोकप बेंड झालेले कपड्यांच्या पिशव्या फाटून कपडे व साड्या ,रक्ताने भरलेला लेडीज रुमाल ,व गाडीच्या बाजूला पसरलेले रक्त, हे दृश्य बघून सर्व येणाऱ्या जाणाऱ्यांचे हृदय पिढवून टाकणार हे दृश्य होतं, सर्व लोक कुतूहलाने एकमेकांना विचारणा करीत होते की हे गाडीवरील स्त्री पुरुष वाचले असतील का, काही लोक म्हणत होते की गाडी चालक दारू तर पिलेला नसेल, स्पॉट अपघात होण्यासारखा नाही ,तरी गाडी पुलाच्या खाली कशी पडली कारण काहीही असो मात्र अपघात ग्रस्त व्यक्ती जिवंत असावेत असे सर्वांना वाटत होते, घटनास्थळ व गाडीच्या आजूबाजूला पडलेला वस्तू बघता असे वाटत होते की ,अपघात ग्रस्त व्यक्ती गरीब घरचा असेल, असे घटनास्थळावरून वाटत होते, अपघाताचे कारण काहीही असो, मात्र गरिबीची परिस्थिती आणि दवाखान्याचा खर्च व दवाखान्याचा खर्चही करून आलेले अपंगत्व त्यातच घरातील एकमेव कमावणारे व्यक्ती, अपघाताने सर्वसाधारण माणसाच्या पूर्ण कुटुंब उध्वस्त होतो ,ते लहान मुले ,म्हातारे आई-वडील, आणि गरिबीची परिस्थिती या अपघातामुळे अपघात झालेल्या व्यक्तीचा पूर्ण संसार उध्वस्त होतो, त्यामुळे सर्व वाहन चालकांनी व्यवस्थित वाहन चालवायला हवे, कारण आपल्या एका चुकीमुळे समोरच्या वाहन चालकाचा मृत्यू होऊ शकतो, किंवा त्याला कायमचे अपंगत्व येऊ शकते, त्यामुळे सर्व वाहनधारकाने जबाबदारीने वाहन चालवावीत जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्या व्यक्ती वरती दुःख येऊ नये पत्रकार अंबादास संतोष जाधव mo 97670 22719

नेरी  कडून जळगाव कडे जाणाऱ्या मोटरसायकलचा अपघात,�������������������������…

नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्या दिवसीच पंचसूत्री योजना सुरू करणार---- शंकर बोल्लमवाड पत्रकार परिषदेत दिली सविस्तर माहिती. (धर्माबाद(वार्ताहर ) नगरपालिका २०२५ च्या निवडणुकीचा निकाल दिनांक २१ डिसेंबर २०२५रोजी लागला. या निवडणुकीत नवीन स्थापन झालेल्या मराठवाडा जनहित पार्टीने नगराध्यक्ष व १५ नगरसेवक यांना प्रचंड मताने निवडूण आल्यानंतर मजपा पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शंकर बोल्लमवाड यांनी दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्याच्या आधीच नगर विकासासाठी हाती घेतलेल्या योजनेची माहिती दिली आहे. या परिषदेत मजप पार्टीचे मार्गदर्शक मोईजोद्दिनसेठ बिडीवाले करखेलीकर, व सचिव ताहेर पठाण यांची उपस्थिती होती.मजप पार्टीचे संस्थापक महेश उर्फ शंकर बोल्लमवाड यांनी पत्नी संगीता बोल्लमवाड यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देऊन सर्व अधिक५७१६ आणि विजय करून नऊ पैकी सात नगराध्यक्ष पदाचे महिला उमेदवारांची डिपॉझिट जप्त करून विजय झाले आहेत.२२ नगरसेवकापैकी स्वतः सह १५ नगरसेवक प्रचंड मतांनी विजयी करून बहुमत सिद्ध केले आहे.हा धर्माबाद च्या इतिहासातील ऐतिहासिक विजय समजला जातो. धर्माबाद नगरपालिकेवर पहिलाच मजपाचा झेंडा नवीन पार्टीने रोवला आहे.नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणे आधीच दि.३० डिसेंबर २०२५ रोजी येथील गोदावरी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद बोलावून नगरपालिकेचा विकास कसा करणार? यासाठी दिलखुलास माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेस पक्षाचे मार्गदर्शक मोईजोद्दीन सेठ बिडीवाले करखेरीकर उपस्थित होते.मजप पार्टीचे संस्थापक अध्यक्ष महेश उर्फ शंकर बोल्लमवाड यांनी विजयानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराचे शब्द सुमनाने स्वागत व अभिनंदन केले आहे तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पुढील प्रमाणे पत्रकार परिषदेत त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.मराठवाडा जनहित पार्टी ही भाजप ची बी टीम नसून हा स्वतंत्र पक्ष आहे. धर्माबाद शहराचा विकास हा आमचा एकच ध्यास एवढ्यासाठीच पक्षाची स्थापना केलेली आहे. माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी आमच्या पक्षाला सहयोगी पक्ष म्हटलेले आहे पण भाजपची बी टीम नाही पहिले स्पष्ट केले आहे.नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलेल्या दिवशीच आम्ही पंचसूत्री योजना सुरू करणार असे यांनी जाहीर केले आहे.नगर उपाध्यक्ष पद हे मजप पार्टीचाच राहील. एक स्वीकृत सदस्य मजपाचा व एक भाजपाचा स्वीकृत सदस्य राहील.मजप नी दिलेला नगर विकासाचा जाहीरनामा तंतोतंत अमलात आणणार असून त्यात तडजोड होणार नाही तसेच धर्माबाद करांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे अभिवचन दिले आहे.कुणावरही टीकास्त्र न करता विकास कामाचे नियोजन करून राहिलेल्या समस्या पूर्ण करणार , सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.नवीन योजनेपैकी ,टोल फ्री नंबर दिला जाईल, एक खिडकी योजना सुरू केली जाईल, इनामी व अवकाफ, वन विभागाच्या जागेवर बांधलेल्या घरांना सेवाशुल्क पावती देणार, बेरोजगारासाठी एमआयडीसी या योजनेचा पाठपुरावा करणार, आठवडी बाजाराचा प्रश्न सोडवणार, रस्ते, नाली बांधकाम करून शहर स्वच्छता अभियान योजना जोमाने राबविणार, वीज पुरवठा नियमित करण्यासाठी योजना राबविणार, आवश्यक असलेल्या नगरात बालवाडी सुरू करणार, शासनाने दिलेल्या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार. गुंठेवारी पद्धतीचा नियमाने प्रकरण सोडविणार. आमचा पक्ष नवीन असून काही उनिवा वाटल्यास मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा केली आहे. . बैठकीनंतर सुरुची जेवणाची व्यवस्था केली होती.पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक व आभार पार्टीचे सचिव ताहेर पठाण यांनी केले आहे. पत्रकारांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.धर्माबाद च्या इतिहासात कोणत्याही नगराध्यक्षांनी पत्रकार परिषद बोलावलेली नव्हती. निवडणुकीपूर्वी तसेच निवडणुकीनंतर पदभार स्वीकारणे आधी अशा दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती देणारे पक्षाचे अध्यक्ष महेश उर्फ शंकर बोल्लमवाड हे एकमेव ठरले आहेत.

नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्या दिवसीच पंचसूत्री योजना सुरू करणार----  शंकर बोल्लम…

*दुःखद निधन* *श्री.नथ्थू इमाम पिंजारी यांची पत्नी व श्री.भटू नथ्थू पिंजारी रा.अनवर्दे खुर्दे ता.चोपडा जि.जळगांव यांच्या मातोश्री कै.सौ.बैतुलबाई नथ्थू पिंजारी यांचे दि.०१/०१/२०२६ गुरुवार रोजी संध्याकाळी ५.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेलं आहे तरी त्यांची अंतयात्रा आज दि.०२/०१/२०२६ शुक्रवार रोजी सकाळी १०.०० वाजता त्यांच्या अनवर्दे खुर्दे येथील राहत्या घरापासून निघणार आहे.* *शोकाकुल* *१) श्री.नथ्थू इमाम पिंजारी* *२) श्री.भटू नथ्थू पिंजारी* *समस्त पिंजारी परिवार* *अनवर्दे खुर्दे ता.चोपडा जि.जळगांव*

दुःखद निधन*  *श्री.नथ्थू इमाम पिंजारी यांची पत्नी व श्री.भटू नथ्थू पिंजारी रा.अनवर्दे खुर्दे ता.च…

गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी योग शिबिर. ‌. (पारोळा विभागीय संपादक सागर थोरात)कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत योगशास्त्र विभागाच्या प्रथमवर्ष ,द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमांतर्गत , विद्यार्थ्यांमार्फत गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल मध्ये किशोरवयीन मुलां मुलींसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उद्घाटन नुकतेच गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक सुनील ठाकरे , स्कूल च्या उप प्राचार्या श्रीमती ज्योती वडगावकर सह, शिक्षक वृंदांच्या हस्ते करण्यात आले. गुलाबी थंडीच्या दिवसात, सकाळी सकाळीच योग शिबिर असल्याने, किशोरवयीन मुला-मुलीं योग शिबिराचा आनंद घेत असून योगशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनी सौ. देवयानी महाजन, व वैष्णवी पाटील त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.. सदर योग शिबिर एक महिना चालणार असून, योग शिबिरासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे इंजिनीयर प्रा.राजेश पाटील सर, प्रा.लीना चौधरी मॅडम, प्रा. गीतांजली भंगाळे मॅडम, प्रा. लिंता चौधरी मॅडम यांचे मार्गदर्शन व ग्रामीण उन्नती मंडळ संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सचिन भाऊ विसपुते , श्रीमती अंजुषा चव्हाण यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.

गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी योग शिब…

🌹नव वर्ष 2026 हार्दिक हार्दिक शुभकामनाएं🌹नया साल 2026 नई उम्मीदे लेकर आया है नई दुआ है नए इरादे और ईश्वर की नई रहमतों के साथ बीता हुआ हर लम्हा हमें सबक देकर गया और रहने वाला हर दिन हमें बेहतर इंसान बनने का अवसर दे दुआ है कि यह वर्ष आपके जीवन में सुकून सेहत इज्जत कामयाबी और रब की खास मेहरबानियां लेकर आए कभी जो रुकावटें थी वह रास्ता बन जाए और जो ख्वाब अधूरे थे वह हकीकत हकीकत में ढल जाए याद रखिए हम योजनाएं बनाते हैं लेकिन जिंदगी उसी राह पर चलती है जो तकदीर खुदा ने हमारे लिए लिखी होती है नए साल की शुरुआत शुक्र और सब्र और भरोसे के साथ करें आप सबको आपके परिवार को नववर्ष 2026 खूब-खूब शुभकामनाएं🌹🌹🙏 वर्धा जिला रायगढ़ स्वाभिमान पत्रकार अब्दुल कदिर

*॥शोकसंदेश ॥* * चोपडा - तातुभ्यातिल गणपुर येथिल अल्काबाई गोरख पाटील यांचे आज दि.1 जानेवारी. 2026 रोजी दुपारी 3:30 मिनटांनी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा उद्या दि. 2 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरी गणपूर येथे आहे.. *आपले शोकाकुल* *संतोष नीळकंठ पाटील**गोरख नीळकंठ पाटील**( सेवा निवृत्त कृषी विस्तार अधिकारी पं स चोपडा)**नरेंद्र गोरख पाटील (ग्रामसेवक पं स चोपडा)**महेंद्र गोरख पाटील**गोपाल संतोष पाटील**विकास संतोष पाटील**समस्त शिरसाठ परिवार गणपूर*

दि1जानेवारी.जिल्हा परिषद उच्च प्राथमिककेंद्र शाळा धोंडगाव पंचायत समिती समुद्रपूर जिल्हा वर्धा येथे समीर भाऊ कुणावर हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे मतदार क्षेत्राचे लोकप्रिय आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना पुस्तक वही पेन व खाऊ वाटप शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना भगत सहाय्यक शिक्षिका ठाकरे मॅडम दुर्गे मॅडम महाबुदे सर सामाजिक कार्यकर्ते दिलीप कोल्हे कवडूजी थोटे दादाजी भोसकर बाळाजी उमाटे बंडू उमाटे गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्व पालक वर्ग शिक्षक वर्ग उपस्थित होते ..मीडीया पोलीस टाईम यश राऊत समुद्रपूर

**संस्कृति, धर्म आणि गोमाता ही भारताची ओळख**@)> जगद् गूरू स्वामी रामदयालजी महाराज.*. (मानवत / प्रतिनिधी.)चांगले चारित्र्य, संस्कृती, धर्म, आणि गोमाता, ही आपल्या भारताची ओळख आहे. जगद्गुरु स्वामी राम दयालजी महाराज यांनी आपल्या अमृत तूल्यवाणी व्यक्त केले.चांगले चरित्र संस्कृती धर्म आणि गोमाता आपल्या भारत देशाची ओळख असून ती गौरवनीय आहे. असे विचार आंतरराष्ट्रीय रामस्नेही संप्रदाय शहापुरा धाम जिल्हा भीलवाडा राजस्थानचे चौदावे पीठाधीश्वर जगद्गुरु 1008 स्वामी राम दयालजी महाराज यांनी येथील पावरलूम शेजारच्या पटांगणामध्ये भव्य गोशाळेचे भूमिपूजन तसेच सौ.स्व. प्रमिलाबाई श्रीकिसन सारडा गौशाळा प्रवेशद्वाराचे पूजन प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सांगितले. यावेळी पाथरी विधानसभा मतदार संघाचे आ. राजेश भैय्या विटेकर, मानवत नगर पालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक डॉ. अंकुशरावजी लाड, मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज भैय्या आंबेगावकर, हे उपस्थित होते. यावेळी आचार्य श्री रामदयालजी महाराज यांच्या हस्ते सौ.स्व. प्रमिलाबाई श्रीकिसन सारडा प्रवेशद्वाराचे उद्घाटन स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गोशाळेचे भूमिपूजन आचार्य श्री रामदयालजी महाराज. आमदार राजेश भैय्या विटेकर. डॉ.अंकुशरावजी लाड व सभापती पंकज भैय्या आंबेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. आचार्य श्रीरामदयालजी महाराज यांच्या हस्ते आ. राजेश विटेकर यांना चांदीची गायची प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. राणीताई लाड व नवनिर्वाचित डॉ. अंकुशरावजी लाड यांनाही चांदीची गायची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सभापती पंकज आंबेगावकर यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला. या शुभ प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना आचार्य जगद्गुरु स्वामी श्रीरामदयालजी महाराज यांनी पुढे सांगितले. आपल्या भारतीय संस्कृतीचे नवे वर्ष हे चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा आहे. या देशातील प्रत्येक संत हे संस्कृतीचे पुजारी आहेत. मानवत नगरीच्या भूमीने सनातन धर्माची मशाल सतत तेवत ठेवली आहे. येथील रामस्नही संप्रदायाच्या रामबाडा मध्ये दररोज रामनाम जप आणि संप्रदायाचे जन्मदाता आचार्य श्री रामचरणजी महाराज यांनी स्वतः लिहिलेली वाणी ग्रंथाचे पठण आणि भजन कीर्तन संपन्न होतात. यामुळे मानवत नगरीचे संबंध आंतरराष्ट्रीय संप्रदायाची जुळले आहे. गोशाळेचे प्रवेशद्वार हे शक्तिपीठ, संस्कारमय पीठ, असुन यामध्ये एक प्रकारची ऊर्जा आहे. येथील श्री किसनजी सारडा परिवारांनी आस्था व प्रेम आणि गोसेवा मध्ये सदा पुढाकार घेऊन त्यांची सेवा अविरत करत आहे. यासाठी संत महात्मे सद्गुरूची कृपा व आपल्या आई-वडिलांचे अर्शिवाद असणे आवश्यक आहे. माझे धर्मगुरू संत श्री भगत रामजी महाराज यांची कृपा आशीर्वाद सारडा कुटुंबावर अविरत आहे. गुलाबाच्या फुलाला आपली प्रशंक्षा स्तुती करणे, आकांशा साठी मोहताज नाही. गुलाबाचे फुल गुलाबाच राहणार. परमात्मा विना गुलाब नाही. कठीण प्रयत्न कष्ट केल्याशिवाय लक्ष्मीची प्राप्ती होत नाही. लक्ष्मी आपल्याला चार प्रकारातून प्राप्त होते आई, बहीण, पत्नी, आणि मुलगी. आई रुपी लक्ष्मीने घरात अन्नदान, गोसेवा धार्मिक कार्य घडतात, या पैशातून गोशाळेचे कार्य पण यशस्वीपणे चालते. पत्नी रुपी लक्ष्मीने शक्तीहीन, क्लेशदायक. दुसऱ्याने केलेल्या कार्याचे श्रेय स्वतः घेणे. गोशाळातून मिळणारे दूध हे अमृतमही आहे. लाभदायक आहे. मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला आपल्या देशातील भ्रष्टाचार कधी मिटणार. त्यावर मी त्याला उत्तर दिले ज्या दिवशी आपल्या पोटाची भूक भागणार त्या दिवशी देशातील भ्रष्टाचार नष्ट होणार. आपला भारत देश त्याच दिवशी भ्रष्टाचार मुक्त होणार. गोर गरिबांना अन्नपुरवठा करून त्यांची भूक भागवणारे व शाकाहारी असणारे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होय. नरेंद्र मोदी यांनी पूर्ण भारताचे नाव गौरवपूर्ण जगाच्या पाठीवर कोरलेले आहे. सध्या विश्वाचा गुरु हा भारत देश आहे. आपल्या पवित्र भूमीवर शत्रूची वाईट नजर पडू नये म्हणून नरेंद्र मोदी हे सदैव दक्ष आहेत. ते एक कठोर तपस्वी आणि गोसेवक आहे. तपस्या शिवाय देश पुढे जात नाही. यांच्यावर आई-वडिलांचे आशीर्वाद गोसेवा सेवेचे आशीर्वाद आहेत त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही. आम्ही संत जन कुणाचेही गुलाम नाहीत. संविधान मोठे की वेद मोठे. कायदा बदलणे हे सोपे आहे. आज संविधानाच्या नावावर बोट उचलून आपले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी संविधानाला अपवित्र करत आहे. यांच्यासाठी संविधान काय आहे यांचे त्यांना महत्त्व नाही. आपला भारत देश हा गोसेवा प्रधान देश आहे. जगातील रशिया, अमेरिका, चीन, यांना संस्कृतीचे महत्त्व नाही. परंतु आपल्या भारताला गोसेवेची संस्कृती आहे. आपली हिंदू धर्माची संस्कृती हे सर्वश्रेष्ठ आहे. आपला भारत देश हा विश्वाचा गुरु असून वेदांचा देश आहे. आपल्या भारताची ओळख म्हणजे चांगले पवित्र चारित्र्य, धर्म,संस्कृती, आणि गोसेवा. ही आपल्या भारताची ओळख असून ती गौरवनीय आहे. गोदानाचे संकल्प धारण करा. आपल्या लग्नाचे वाढदिवस साजरे करताना गोशाळा मध्ये जाऊन लग्नाचा वाढदिवस साजरा करा. यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होणार नाही. आपल्या मुलांचे नामकरण व वाढदिवस हे गौशाळामध्ये जाऊन साजरे करा. गायीच्या मूल्या इतकी मूल्य कुठलेही नाही. माझ्या देशाची गौरव ही गोमाता आहे. ती पशु नसून गो राष्ट्रमाता आहे. गौशाळा मध्ये अमृत मिळते. गाईचे दूध हे अमृता समान आहे. गाईचे दूध पिणारा हा कधीही राष्ट्रद्रोही,समाजद्रोही, व मातपिता द्रोही असू शकत नाही. गोमातेच्या स्तनात दूध नसून हे अमृत आहे. संत सद्गुरु हे नेहमी जीवनाचे कल्याण करणारे असून ते निस्वार्थपणे समाजाची सेवा करतात. यांच्या आशीर्वाद व कृपेने आपले जीवनाचे कल्याण होत नाही. संत महात्मे नेहमी देशाच्या रक्षणासाठी व धर्माच्या रक्षणासाठी सदैव हे पुढाकार घेतात. असे विचार आंतरराष्ट्रीय रामस्नेही संप्रदायाचे 14 वे विटाधीश्वर जगतगुरु स्वामी 1008 श्री रामदयालजी महाराज यांनी येथील नवीन गोशाळेचे भूमिपूजन व सौ.स्व. प्रमिलाबाई श्रीकिसन सारडा गौशाळेचे प्रवेशद्वाराचे पुजनाच्या आयोजन प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.***

संस्कृति, धर्म आणि गोमाता ही भारताची ओळख**@)> जगद् गूरू स्वामी रामदयालजी महाराज.*.������������…

बिनविरोध निवड जळगाव महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 18 चे शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार युवा नेतेडॉ. गौरव दादा चंद्रकांत सोनवणे. (चोपडा जळगाव विभागीय संपादक संजीव शिरसाठ ) बिनविरोध निवड जळगाव महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 18 चे शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार युवा नेतेडॉ. गौरव दादा चंद्रकांत सोनवणे. यांची ऐतिहासिक बिनविरोध निवड त्यांना आजोबा कै .दादासाहेब बळीराम सोनवणे ' चोपडा विधानासभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार चंद्रकांत सोनवणे (वडिल ) च चोपडा चे लोकप्रीय माजी आमदार मा. सौ . लताताई सोनवणे (आई ) यांचा वारसा व गोरगरिबांची सेवा त्यांना आज कामात आली . जनसेवेच व्रत घेतलेले असल्याने बिनविरोध निवड झाली आहे . त्याबद्दल शिवसेनेचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते व गोरगरिब रुग्ण व जनता मनस्वी अभिनंदन! व आनंद व्यक्त करित आहे .

बिनविरोध निवड जळगाव महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 18 चे शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार   युवा …

Load More
That is All