*निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अकोल्यात मोठा धक्का!**गस्त घालताना खदान पोलिसांना ५० लाख रुपयांची रोकड जप्त*. २०२६ च्या अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा आणि दक्षता असताना खदान पोलिसांसाठी हे एक मोठे यश मानले जात आहे. मोपेड चालवणाऱ्या तरुणाचे नाव यश आनंद लालवाणी (२७) असे आहे. पोलिसांनी ५० लाख रुपयांची रोकड, एक वाहन आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत, एकूण ५० लाख ८० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे खदान पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान ही कामगिरी झाली. निवडणुकीच्या अगदी आधी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त करण्यात आल्यामुळे, पोलिस आणि निवडणूक विभागाला संशय आहे की त्याचा वापर निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठी केला जात होता. पोलिसांनी नियमांनुसार जप्त केलेले पैसे जप्त केले आहेत आणि आता पैशाचा खरा स्रोत आणि त्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी सखोल चौकशी करत आहेत. अकोल्यातील निवडणुकीदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. *अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान* निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अकोल्यात मोठा धक्का!**गस्त घालताना खदान पोलिसांना ५० लाख र… byमीडीया पोलीस टाईम -January 14, 2026
ब्रेकिंग न्यूज ...यावल तालुक्यातील न्हावी शिवारात एका इसमाची विहीरीत आत्महत्या ... पुढील तपास सुरू .. ब्रेकिंग न्यूज ...यावल तालुक्यातील न्हावी शिवारात एका इसमाची विहीरीत आत्महत्या ...… byमीडीया पोलीस टाईम -January 14, 2026
निंभोरा ठाण्याचे स. पो. नि. मीरा देशमुख ॲक्शन मोडवर,,, अवैध धंद्या वाल्यांचे धाबे दणाणले, आरोपीतांचे कोंबिंग ऑपरेशन, (विशेष जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद कोळी) दि. 13/01/2026 रोजी भल्यापहाटेच निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील निंभोरा-विवरा, तांदलवाडी, खिर्डी, ऐनपूर, निंबोल व आंदलवाडी दसनूर या बीट मधील असणारे पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील सवयीचे गुन्हेगार,हिस्ट्रीशीटर,दोन पेक्षा अधिक दाखल गुन्हे असणारे, अवैध गौण खनिज वाहतूक करणारे, अवैध दारू वाहतूक व विक्री करणारे , शरीराविरुद्धचे व मालाविरुद्धचे गुन्ह्यातील आरोपीतांना समक्ष पोलीस ठाण्यात हजर करण्यात येऊन निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील शेतातील शेती उपयोगी वस्तू तोलकाट्यावरील इलेक्ट्रॉनिक वस्तू, शेत पिकाचे नुकसान तसेच केबल चोरी याअनुषंगाने होणाऱ्या गुन्ह्यांबाबत आरोपीतांना विचारपूस करून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा या उद्देशाने सुमारे 35 ते 40 आरोपींची झाडाझडती घेवून तंबी देण्यात आली. सदर कोंबिग ऑपरेशनची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक, डॉ. महेश्वर रेड्डी यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक, अशोक नखाते व फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी, अनिल बडगुजर यांचे मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, मीरा देशमुख सोबत पो.स्टेचे पोलीस अधिकारी व अंमलदार स्टाफ आदींनी प्रभावीपणे कोंबिंग ऑपरेशन राबविले. सदरची कार्यवाही ही हद्दीतील गुन्हेगारीला प्रतिबंध बसावा म्हणून निंभोरा पोलीसांकडून राबविण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशनमुळे आरोपींचे व अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले. शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल स. पो. नि. मीरा देशमुख,,, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर त्याचबरोबर अवैध धंदे करणाऱ्यांवर व शेतकऱ्यांचे शेती उपयोगी साहित्य व शेतमालाचे नुकसान करणारे व्यक्तींची हयगय केली जाणार नाही असा कडक इशारा निंभोरा पोलीस ठाण्याचे महिला पोलीस अधिकारी स. पो. नि.मीरा देशमुख यांनी दिला आहे. निंभोरा ठाण्याचे स. पो. नि. मीरा देशमुख ॲक्शन मोडवर,,, अवैध धंद्या वाल्यांचे धाबे दणाणले, आरोपी… byमीडीया पोलीस टाईम -January 14, 2026
विद्यार्थी गूणवत्ता व मूल्यवर्धन उपक्रमाची नरवाडे यांनी केली पाहणी. (मानवत / अनिल चव्हाण.) —————————येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयास आज दिनांक १४ जानेवारी रोजी मा.प्रविणजी नरवाडे यांनी नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयास भेट.देऊन विविध उपक्रमाची पाहणी केली.सविस्तर वृत्त असे की,मानवत येथील नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयासआज दिनांक 14 जानेवारी रोजी शांतिलाल मुथा फाऊंडेशन मा. श्री. प्रवीणजी नरवाडे, मानवत तालुका समन्वयक, (शांतीलाल मुथा फाउंडेशन) यांनी आज नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालय मानवत येथे भेट देऊन पाहणी केली.यावेळी मा.श्री. प्रवीणजी नरवाडे यांनी प्रथमत मूल्यवर्धन कार्यक्रम व त्यांची शालेय स्तरावर होत असलेली अंमलबजावणी संदर्भात आढावा घेऊन माहिती घेतली.याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कृती गीताच्या माध्यमातून मूल्यवर्धन उपक्रमांची माहिती दिली. विद्यालयातील इयत्ता चौथीच्या वर्गात मा. श्री. श्रीहरी कच्छवे सरांनी विभाग 2 : स्व जाणीव अंतर्गत "भावना " हा उपक्रम घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांना कवितेच्या माध्यमातून भावना कशा जागृत होतात हे उदाहरणं द्वारे सांगितले व कवितेत भावनांचे वर्णन करण्यास सांगितले. घरातील व्यक्तीं एकापेक्षा जास्त कोणत्या भावना अनुभवत असतात, ही घरी करावयाची कृती विद्यार्थ्यांना दिली. हे पाहून नरवाडे सरांनी कौतुक केले.वर्गात शांतता संकेत, वर्गचर्चा, प्रभावी वर्ग व्यवस्थापन यांचा वापर व वर्ग नियम दर्शनी भागात पाहून प्रोत्साहन दिले. एकंदरीत नेताजी सुभाष प्रा.शाळा मानवत येथील विद्यार्थी गुणवत्ता व मूल्यवर्धन उपक्रम याबाबत श्री प्रवीण नरवाडे सरांनी समाधान व्यक्त केले.*** विद्यार्थी गूणवत्ता व मूल्यवर्धन उपक्रमाची नरवाडे यांनी केली पाहणी.… byमीडीया पोलीस टाईम -January 14, 2026
कार्यकारी अभियंता, सार्वजनीक बांधकाम उपविभाग सेलू यांच्या कृपाअर्शिवादाने बोगस कामाचा सपाटा*. (मानवत / प्रतिनिधी.)आंबेगाव दिगर गावापासून ते आंबेगाव पाटी पर्यंत चालू असलेलले रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असत्यामुळे त्याची उच्चस्तरीय समितीच्या वतीने चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली.सविस्तर वृत्त असे की,आंबेगाव दिगर ते आंबेगांव पाटी पर्यंत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येत असलेल्या रस्ता हा अतिश बोगस तयार होत असल्याने या बोगस रस्त्याची उच्चस्तरिय समितीच्या माध्यमातून चौकशी करून दोषीवर दंडात्म कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्या संबंधीचे एक निवेदन सहया करणारे अर्जदार मौजे आंबेगाव दिगर येथील रहिवाशी असून गावापासून ते आंबेगाव पाटी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरणाचे व मजबुती करणाचे काम चालू आहे. परंतू सदरील सर्व काम हे इस्टीगेंट प्रमाणे न करता अत्यंत थातुर, मातुर पध्दतीने केल्या जात आहे. तसेच रस्त्यामध्ये असलेले पुल देखील केल्या जात नाहीत. पुल करीत नसत्यामुळे पावसाळ्यात रस्त्याचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच डांबरीकरणाचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. संबंधीत गुत्तेदारास चांगल्या प्रकारे काम करणे बाबत व पुर्वीप्रमाणे असलेत्या ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्या बाबत विनंती केली परंतू ते आमचे काही एक ऐकण्याच्या तयरीत नाहीत.राज्य शासनाच्या लाखो रूपयांच्या निधीचा खर्च होत असतांना देखील रस्त्याचे काम हे चांगल्या दर्जाचे व इस्टीमेंट प्रमाणे केल्या जात नाहीत. त्यामुळे आपण सदर रस्त्याची प्रत्यक्ष उच्चस्तरिय समितीच्या वतीने जाय मोक्यावर जावून स्थळ पाहणी करून होत असलेले बोगस व नियमबाह्य काम थांबवून चौकशी करावी व दर्जेदार काम करण्या बाबत व पुलांचे काम करण्या बाबत आदेशीत करावे व काम पुर्ण होईपर्यंत बिले ताढण्यात येवू नयेत अशी मागणी निवेदनात केली आहे. नसता आम्हा गावकऱ्यांना अंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल कृपया याची नोंद घ्यावी असा ईशारा निवेदनाद्बारे . अमोल विठ्ठलराव साखरे, मुरली मधुकर साखरे, गोविंद रामकिशन साखरे आंबेगाव दिगर येथील नागरिकांनी प्रशासनाला दिला. कार्यकारी अभियंता, सार्वजनीक बांधकाम उपविभाग सेलू… byमीडीया पोलीस टाईम -January 14, 2026
अखिल भारतीय मराठा महासंघ वर्धा.यांनी केला राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा.. .वर्धा जिल्हा प्रतिनिधीअब्दुल कदिर दि. १२ जानेवारी २०२६ रोजी माँ साहेब जिजाऊ स्मारक दादाजी धुनिवाले चौक येथे करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणी ते सत्यात उतरवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या एक महान माता होत्या .जिजाऊंनी बालपणापासूनच शिवरायांवर उत्तम संस्कार केले.रामायण,महाभारतातील शौर्य कथा सांगून त्यांनी शिवरायांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्ध आणी स्वराज्याची प्रेरणा निर्माण केली.त्या शिवरायांच्या केवळ माताच नव्हे तर त्यांच्या गुरु आणी मार्गदर्शकहि होत्या ,एवढंच नाहीतर त्यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याचे तोरण बांधून स्वराज्य निर्माण करावे या साठी प्रेरित केले.आणी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली म्हणूनच त्यांना स्वराज्य जणनी, राष्ट्रमाता,राजमाता,माँ साहेब ,आऊसाहेब,अश्या विविध नावाने सभोधले जाते. ज्यांनी शिवबा घडविला,ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले.आणी ते प्रत्यक्ष्यात उतरविले अश्या ह्या मातेस कोटी,कोटी,नमन करून मानाचा मुजरा करून श्रधेचि श्रद्धांजलि, आदराची आदरांजली,अर्पित करून विनम्र अभिवादन करण्यात आले. ह्या जन्मोत्सव सोहळा प्रसंगी प्रामुख्याने वर्धाचे लोकप्रिय नगराध्यक्ष सन्मानीय श्री सुधीर भाऊ पांगुळ असून यांच्या हसते ह्या पावन सोहळ्याचे द्विप प्रज्वलन करून प्रतिमेला मालयार्पण करून पूजा करण्यात आली.तर मान्यवराणी आपले मत प्रकट करून माँ साहेबांच्या अथांग कार्यावर प्रकास टाकण्याचे काम केले.व उपस्थित मान्यवराणी नगराध्यक्षय सुधीर भाऊ यांचे पुष्प गुच्य देऊन सन्मान व सत्कार करुन उपस्थित मंडळीने अभिनंदन केले. ह्या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठा महासंघ महिला अध्यक्षा शैलेजा साळुंखे ,शहर अध्यक्षा भरतीताई चांदूरकर, शहर उपाध्यक्ष भाग्यश्री निघडे,तर कार्यक्रमाचे मुख्य प्रेरक प्रणिता ताई माउसकर,निताताई भांडवलकर,कीर्ति सोलंकी, जया जाधव,देवयानी वानोडे,समृद्धी आदमणे,सुनीता ताई डुकरे,अर्चना देवडे,संजीवनी काणसकर,सोबतच वर्धाच्या विविध समाजिक संघटना,समाजिक कार्यकर्ते व बहू संखेने मान्यवर उपस्थित असून जिजाऊ वेशभूष्या परिधान करून आलेल्या जिजाऊचे आनंद व आदरपूर्वक सर्वत्र कवतुक झाले आणी कार्यक्रमाची सांगता झाली.... अखिल भारतीय मराठा महासंघ वर्धा.यांनी केला राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा..… byमीडीया पोलीस टाईम -January 14, 2026
भीम आर्मी की समीक्षा बैठक संपन्न, पंचायती चुनाव की तैयारियां .. कोटड़ी/मांडलगढ़। भीम आर्मी की समीक्षा बैठक संपन्न हुई, जिसमें संगठन की मजबूती, सामाजिक जागरूकता और आगामी चुनावों की रणनीति पर विस्तार से चर्चा की गई। बैठक को संबोधित करते हुए प्रदेश महासचिव सुरेश मेघवंशी ने कहा कि भीम आर्मी भाईचारा बनाओ यात्रा के माध्यम से समाज के हर वर्ग को जोड़ने का काम किया जाएगा। उन्होंने कार्यकर्ताओं से आह्वान किया कि आने वाले चुनावों में कमर कसकर मैदान में उतरना होगा और बाहुबल व पैसे के दम पर राजनीति करने वालों के सामने मजबूत फील्ड तैयार करनी पड़ेगी।मेघवंशी ने कहा कि बहुजन महापुरुषों के आंदोलनों और उनकी विचारधाराओं को घर-घर तक पहुंचाना भीम आर्मी की प्राथमिकता है।इस अवसर पर जिला अध्यक्ष पंकज डीडवानिया ने कहा कि वोट की ताकत सबसे बड़ी ताकत है, जो बाबा साहब डॉ. भीमराव अंबेडकर ने बहुजन समाज को दी है। अब समय आ गया है कि इस ताकत का सही और जागरूक उपयोग किया जाए। ASP नेता विधायक प्रत्याशी भेरूलाल रेगर ने कहा कि अब बहुजन समाज पर अत्याचार भीम आर्मी नहीं सहेन नहीं करेगी हम सबने मिलकर भाई चंद्रशेखर आजाद के हाथों को मजबूत करना होगा उसका तन मन धन से समर्थन करना होगा आने वाले पंचायती चुनाव में दूसरी पार्टी से डटकर मुकाबला करना होगा जीत हासिल करनी होगी अपने आदमियों को कुर्सी पर बिठाना होगा आजाद समाज पार्टी जिंदाबादजिला उपाध्यक्ष दुर्गा लाल बैरवा ने कहा कि भीम आर्मी हमेशा शोषित, पीड़ित और अत्याचार के खिलाफ खड़ी रही है और आगे भी अन्याय के विरुद्ध संघर्ष जारी रहेगा।बैठक में कार्यकर्ताओं ने संगठन को गांव-गांव तक मजबूत करने, युवाओं को जोड़ने और सामाजिक न्याय के लिए एकजुट होकर काम करने का संकल्प लिया। भीम आर्मी जिला उपाध्यक्ष मंजू रेगर उपाध्यक्ष मनोहर बेरवा पूर्व भीम आर्मी उपाध्यक्ष मुकेश बारेठ भीम आर्मी तहसील अध्यक्ष रामलाल मेघवंशी ASP विधानसभा क्षेत्र अध्यक्ष ओमप्रकाश रेगर ASP पूर्व जिला सचिव सीताराम रेगर ASP महिला तहसील अध्यक्ष लक्ष्मी मीणा नगर अध्यक्ष आशा देवी तहसील उपाध्यक्ष कांता देवी उपाध्यक्ष शीला देवी सीमा देवी मनभर देवी शिमला देवी कोई ग्रामीण मौजूद रहे भीम आर्मी की समीक्षा बैठक संपन्न, पंचायती चुनाव की तैयारियां ..… byमीडीया पोलीस टाईम -January 14, 2026
स्वतःच्या उमेदवारीवर निष्ठेचा 'अंकुश' ठेवला, म्हणूनच आज नियतीने यशाचा गुलाल अंकुशभाऊंच्या कपाळी लावला!राजकारणाच्या या झगमगत्या जगात अनेक चेहरे येतात आणि जातात, पण काळजाच्या कोपऱ्यात कायमस्वरूपी जागा तोच बनवतो ज्याने सत्तेच्या उजेडापेक्षा संघर्षाचा काळोख जास्त सोसला असतो. हिंगणघाट नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी माझे बंधुतुल्य मित्र आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अंकुशभाऊ ठाकूर यांची झालेली नियुक्ती ही केवळ एका पदाची निवड नाही, तर ती एका सामान्य कार्यकर्त्याच्या असामान्य निष्ठेला नियतीने दिलेला राज्याभिषेक आहे.अंकुशभाऊंचा हा प्रवास आज जरी वैभवाचा वाटत असला, तरी त्याची मुळे एका अत्यंत कठीण आणि प्रतिकूल संघर्षात रुजलेली आहेत. आयुष्याची सुरुवात अतिशय साध्या आणि आव्हानात्मक परिस्थितीतून झाली. पदरी कोणतीही राजकीय वारसाहक्क नसलेली पार्श्वभूमी, ना पाठीशी मोठा आर्थिक आधार; होतं ते फक्त डोळ्यांत स्वतःला सिद्ध करण्याचं स्वप्न आणि काळजात पक्षाची अढळ निष्ठा! तो काळ आठवला की आजही अंगावर शहारे येतात, जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नाव घ्यायला किंवा पक्षाचे काम करायला लोक धजावत नसत. अशा विपरित परिस्थितीतही 'हिंदुत्वाचा' विचार छातीशी कवटाळून हा तरुण रात्रीच्या गडद अंधारात घराबाहेर पडायचा. हातात दोन-चार निष्ठावंत कार्यकर्त्यांना घेऊन, कुणाचीही भीती न बाळगता मध्यरात्रीच्या वेळी शहराच्या भिंतीवर पोस्टर चिकटवणारा आणि स्वतःच्या हाताने बॅनर लावणारा तो अंकुश ठाकूर आज अनेकांसाठी प्रेरणा बनला आहे. ज्या हातांनी मध्यरात्रीच्या बोचऱ्या थंडीत आणि विपरित स्थितीत पक्षाचे झेंडे लावले, त्याच हातांना आज नियतीने श्रमाची पावती म्हणून अधिकाराची लेखणी दिली आहे.अंकुशभाऊंनी केवळ राजकीय पातळीवरच लढा दिला नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी स्वतःच्या वाट्याला आलेल्या मर्यादांशी आणि परिस्थितीशी दोन हात केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत, घरच्या बेताच्या आर्थिक स्थितीवर आपल्या अफाट कष्टाच्या जोरावर मात केली. शून्यातून विश्व निर्माण करत आज त्यांनी जे स्वतःचे अढळ स्थान आणि भव्यदिव्य परिस्थिती निर्माण केली आहे, ती त्यांच्या जिद्दीची आणि प्रामाणिकपणाची सर्वात मोठी साक्ष आहे. त्यांनी दाखवून दिले की, कर्तृत्ववान माणसाला परिस्थिती कधीच रोखू शकत नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय उलथापालथ झाली आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. त्या काळात सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर आणि अन्यायावर आवाज उठवण्यासाठी अंकुशभाऊ हिंगणघाटच्या रस्त्यावर वाघासारखे उतरले. जनतेच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलनांचा धडाका लावून सरकारला वेठीस धरले. या संघर्षात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले, पोलिसांच्या लाठ्या-काठ्यांचा सामना करावा लागला, पण "पक्षासाठी आणि जनतेसाठी जेलमध्ये जायला लागलं तरी मागे हटणार नाही," ही त्यांची वृत्तीच त्यांच्यातील नेतृत्वाचा खरा कस लावणारी ठरली.अंकुशभाऊंची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांची 'माणसं जपण्याची' आणि 'माणसं घडवण्याची' वृत्ती. त्यांनी केवळ स्वतःचे पद पाहिले नाही, तर युवा मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उभी केली. त्यांनी ज्या ज्या युवकांवर जबाबदारी सोपवली, त्यातील कित्येक युवक आज शहरातून तालुका आणि जिल्हा पातळीवर पदाधिकारी म्हणून सन्मानाने कार्य करत आहेत. २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतः उमेदवारीसाठी पूर्णतः पात्र असताना आणि सर्वत्र बंडखोरीचे चित्र असतानाही, पक्षाने जेव्हा वेगळा आदेश दिला, तेव्हा अंकुशभाऊंनी आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला निष्ठेचा 'अंकुश' लावत तो आदेश शिरसावंद्य मानला. या युवकाने आपले मार्गदर्शक आमदार मा. श्री. समीरभाऊ कुणावार यांचा विजय हाच आपला श्वास मानला. स्वतःच्या उमेदवारीचा त्याग करून, दिवस-रात्र एक करत त्यांनी कार्यकर्त्यांची फौज मैदानात उतरवली आणि हिंगणघाट नगर परिषदेत भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.त्यांच्या याच अढळ निष्ठेची, आंदोलनातील धैर्याची आणि संघटन कौशल्याची दखल घेऊन आमदार समीरभाऊंनी वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांची 'स्वीकृत नगरसेवक' म्हणून निवड केली. हा सन्मान म्हणजे त्या मध्यरात्रीच्या जागरणाचा, अंगावर घेतलेल्या पोलीस केसेसचा, स्वतःच्या कर्तृत्वावर बदललेल्या परिस्थितीचा आणि आमदार महोदयांवरील अढळ विश्वासाचा झालेला सन्मान आहे.थोडक्यात सांगायचे तर, ज्याने स्वार्थाच्या लाटेवर नेहमीच 'निष्ठा' आणि 'त्यागाचा' अंकुश ठेवला, आज त्याच अंकुशभाऊंच्या कर्तृत्वाचा सुगंध संपूर्ण हिंगणघाट शहरात दरवळत आहे. अंकुशभाऊ, तुमच्या या संघर्षातून जन्मलेल्या लोकसेवेच्या यज्ञाला कोटी कोटी शुभेच्छा! तुमचा हा प्रवास येणाऱ्या पिढीतील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी "निष्ठा कशी असावी" याचा आदर्श वस्तुपाठ ठरेल. ___________________________________________ ★ राहुल कालिंदी रमेशराव दारुणकर ★ मुक्त पत्रकार :- राजकीय विश्लेषक प्रदेश अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता युवा परिवर्तन की आवाज संघटना महाराष्ट्र राज्य#AnkushThakur #Hinganghat #BJP #YuvaMorcha #SamirbhauKunawar #SuccessStory #Struggle #Loyalty #Nishtha #HinganghatPolitics #MaharashtraBJP #InspirationSamir Kunawar Nayana Umesh Tulaskar byमीडीया पोलीस टाईम -January 14, 2026
आज वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियान, बालवयीन असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (Childhood NCD Program) तसेच एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा (IPHL) यांच्या उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. पंकजजी भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.सिकलसेल ॲनेमिया हा आजार प्रामुख्याने आदिवासी व ग्रामीण भागात आढळून येतो. या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणारे विशेष अभियान अत्यंत उपयुक्त ठरणार असून यामधून नागरिकांमध्ये आजाराबाबत जनजागृती, नियमित तपासणी, योग्य उपचार व समुपदेशन सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होतील. सिकलसेल आजाराचे लवकर निदान झाल्यास रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल तसेच पुढील पिढीमध्ये या आजाराचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावेल.याच कार्यक्रमात बालवयीन असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमालाही प्रारंभ करण्यात आला. सध्याच्या जीवनशैलीतील बदलांमुळे लहान वयातच मधुमेह, रक्तदाब, स्थूलता, हृदयविकार यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. या कार्यक्रमांतर्गत मुलांची नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, शारीरिक व्यायाम, मानसिक आरोग्य आणि आरोग्यदायी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे बालकांचे आरोग्य बळकट होऊन भविष्यात उद्भवणाऱ्या गंभीर आजारांना प्रतिबंध करता येईल.या सोहळ्यात IPHL (Integrated Public Health Laboratory) या आधुनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या प्रयोगशाळेमुळे विविध आजारांचे जलद व अचूक निदान शक्य होणार असून जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेला नवे बळ मिळणार आहे. रक्त, पाणी, अन्न तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांच्या तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना वेळेत आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळू शकणार आहे.या कार्यक्रमास देवळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. राजेशजी बकाने, मा ना श्री.समीर कुन्नावार हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे,मा. श्रीमती वान्मथी सी. (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, वर्धा, मा. श्री. पराग सोमण (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा, मा ना श्री.सौरभ कुमार अग्रवाल आईपीएस वर्धा जिला पोलिस अधीक्षक ,डॉ. शशिकांत शंभरकर उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, डॉ. सुमंत वाघ जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा, डॉ. स्वप्नील बेले जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक byमीडीया पोलीस टाईम -January 14, 2026