Read more

View all

यावल येथे शिवसेना शिंदे गटाच्या पद अधिकारी व कार्यकर्त्यांनी यावल नगरपालिकेला यावल येथील शुक्रवारी भरणारा आठवडे बाजारात महिला व पुरुषासाठी स्वतंत्र शौचालय बांधण्याची केली मागणी. ( यावल प्रतिनिधी )निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना आठवडे बाजारामध्ये सुसज्ज व्यवस्था मिळत नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांसाठी व इतर नागरिकांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा देखील उपलब्ध नाही. त्यामुळे व्यापार्‍यांना व ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.आठवडे बाजारात भाजी पाला विकण्यासाठी बसण्यासाठी ओटे केलेले आहे परंतु ते तुटलेली असल्याने त्याचा वापर होत नाही त्यामुळे ते ओटे देखील बांधण्यात यावेतसेच यावल नगरपरिषद मधील सर्वसामान्य नागरिकांनी वारंवार अशा सुविधा पुरवण्याची मागणी केली असूनही अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. यामुळे आठवडे बाजारात व्यापाऱ्यांचे हाल होत असून ग्राहकांचीही गैरसोय होत आहे.शिवसेनेकडून मागणी करण्यात आली आहे की, आठवडे बाजारासाठी सुयोग्य जागी कायमस्वरूपी बाजारासाठी मार्केट उभारण्यात यावे, जेणेकरून भाजी विक्रेते व फळ विक्रेत्यांना सुसज्ज जागा मिळेल आणि त्यांना कोणत्याही गैरसोयींचा सामना करावा लागणार नाही. यामुळे शहरातील रहदारीचा प्रश्नही सुटेल व बाजार व्यवस्थितपणे पार पडेल.या निवेदनावर तातडीने कारवाई करून व्यापाऱ्यांना व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नितीन सोनार व शिवसेना शहर अध्यक्ष विवेक अडकमोल केली आहे.त्यावेळी निवेदन देत असताना शिवसेना तालुकाध्यक्ष राजूभाऊ काठोके युवा सेना तालुकाध्यक्ष अजय तायडे शिवसेना उपशहराध्यक्ष चेतन सपकाळे शिवसेना उपशहर अध्यक्ष राजू सपकाळे किशोर कपले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

यावल येथे शिवसेना शिंदे गटाच्या पद अधिकारी व कार्यकर्त्यांनी यावल नगरपालिकेला यावल येथील शुक्रवार…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचे यावल पदाधिकारी कामराज घारू यांचा प्रामाणिकपणा साडेनऊ हजार रुपये रोख व साडेतीन लाख रुपये चा धनादेश केला परत. ( यावल प्रतिनिधी )यावल येथे दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी आलेले केदारनाथ छगन धांडे राहणार सातोद तालुका यावल या युवकाजवळ असलेले साडेतीन लाखाचा धनादेश व साडेनऊ हजार रुपये रोख असलेली पिशवी हरवली व ती पिशवी सदरील यावल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कामराज घारू यांना सापडली त्यांनी धनादेश वरती असलेले नाव केदारनाथ छगन धांडे राहणार सातोद याचा स्वतः शोध घेऊन पोलीस स्टेशनमध्ये मुख्य पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे उप पोलीस निरीक्षक एमजे शेख संदीप सूर्यवंशी किशोर परदेशी अमित तडवी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील पिशवी केदारनाथ छगन धांडे ज्यांना प्रामाणिकपणे परत केली त्यामुळे यावर शहरात व तालुक्यात कामराज घारू यांचं कौतुक होत आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचे यावल पदाधिकारी कामराज घारू यांचा प्रामाणिकपणा साडेन…

*संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत मोहरद येथे प्रकल्प संचालक जल जीवन मिशन यांची भेट* प्रतिनिधी मन्सूर तडवी मोहरद तालुका चोपडा येथे दिनांक १६/६/२५ रोजी जल जीवन मिशन चे प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे यांनी भेट दिली गावातील समस्या तसेच मराठी मुलांची शाळा अंगणवाडी पाणीपुरवठा गावातील स्वच्छता शौचालय यांची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत चोपडा येथील डेपोटी इंजिनिअर सुनील मोरे साहेब जिल्हा परिषदेचे समाजशास्त्रज्ञ भीमराव सूरदास पंचायत समितीचे तालुका समन्वयक जितेंद्र महाजन सचिन पाटील प्रभारी विस्तार अधिकारी आरोग्य नितीन चौधरी विस्तार अधिकारी कृषी किरण पाटील आरोग्य विस्तार अधिकारी धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कवडी वाले लोकनियुक्त सरपंच अंजुम तडवी हाजी रमजान तडवी उपसरपंच हबीब तडवी ग्रा.स.हफशान तडवी. शकीला तडवी ग्रामसेवक राजेश सोनार अंगणवाडी सुपरवायझर शिरसाट मॅडम मुख्याध्यापक संगीता मॅडम सर्व स्टाफ अंगणवाडी कर्मचारी पत्रकार मन्सूर तडवी अय्युब तडवी शरीफ तडवी नूरखा तडवी फरीद तडवी (शालेय पो.अध्यक्ष) फरीद तडवी ऑपरेटर हसन तडवी इरफान तडवी शरीफ तडवी रोजगार सेवक मुस्तफा तडवी पाणीपुरवठा सर्व ग्रामस्थ उपस्थित होते

संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत मोहरद येथे प्रकल्प संचालक जल जीवन मिशन यांची भेट*

अनिष्ठ चालीरीतीला फाटा देत स्वतःच्या मुलाचा साखरपुड्यात विवाह .. ( फैजपूर प्रतिनिधी )माजी प्रभारी नगराध्यक्ष कलिमखान मन्यार च्या कुटुंबाने समाजासमोर ठेवला आदर्श फैजपूर--अनिष्ठ चालीरीती ला फाटा देऊन इस्लाम धर्मातील प्रेषित पैगंबर मोहंमद सल्लला वालैव सल्लम यांच्या शिकवणीला अनुसरून साध्या पध्दतीने आदर्श विवाह लावून देण्याचा एक प्रेरणादायी पायंडा म्हणून फैजपूर चे माजी प्रभारी नगराध्यक्ष कलिमखान मन्यारच्या कुटुंबाने स्वतःच्या मुलाचा साखरपुड्यात आदर्श विवाह पार पडल्याने मुस्लिम समाजात प्रेरणा देणारे ठरत आहे.शिवाय समाजासमोर आदर्श ठरत आहे. अनिष्ठ चालीरीतीनां फाटा देऊन कमी वेळेत व कमी खर्चात लग्न कार्य पार पाडावे व या माध्यमातून समाज परिवर्तन व समाज विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जवळपास सर्वच समाजांमध्ये सामूहिक विवाहांचे आयोजन केले जातात.सध्याच्या धकाधकीच्या व महागाईच्या काळात कमी वेळेत व कमी खर्चात लग्न कार्य पार पडणेही काळाची गरज आहे.म्हणून इस्लाम धर्मातील प्रेषित पैगंबर मोहंमद सल्ललावालैवसल्लम यांच्या शिकवणीला अनुसरून इस्लाम धर्मात निकाह सोपं आहे प्रेषित पैगंबर मोहंमद सं यांची सुन्नत आहे.आणि सर्वात कमी खर्चात होणारा निकाह(विवाह)सर्वोत्कृष्ट आहे.प्रेषित पैगंबर मोहंमद यांच्या साडेचौदाशे वर्षांपूर्वीच्या शिकवणीला अनुसरून आदर्श विवाह पार पाडण्याचा प्रेरणादायी कार्य फैजपूर माजी प्रभारी नगराध्यक्ष कलिमखान हैदर खान मन्यारच्या कुटुंबाने समाजासमोर ठेवला आदर्श रविवारी माजी प्रभारी नगराध्यक्ष कलिमखान मन्यार यांचे चिरंजीव दानिश खान यांचा निंभोरा ता.रावेर येथील शेख करीम मण्यार यांची नात व इस्माईल शेख मण्यार यांची कन्या रुकसार बी यांचा रविवारी साखरपुड्याचा कार्यक्रम होता.वर वधू पक्षांनी साखरपुड्यातच विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवल्याने एकत्रित विचारला मान्यता मिळाल्यावर चिरंजीव दानिश खान व कन्या रुकसार बी यांचा साखरपुड्यातच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला.पद प्रतिष्ठा मोठ्या जल्लोषात मुलाचे विवाह करण्याची क्षमता असतांना देखील समाजकारण व राकारण करतांना आपल्या कडून आदर्शवत पायंडा ठेवला जावा व समाजात प्रेरणादायी ठरले पाहिजे अशा दूरदृष्टीने कलिमखान मन्यार यांनी साखरपुड्यातच विवाह आटोपल्याने साध्या पध्दतीने पार पडलेल्या आदर्श विवाह चे सर्वत्र कौतूक होत आहे.शिवाय मुस्लिम समाजात प्रेरणा देणारे ठरत आहे.दरम्यान या आदर्श विवाह प्रसंगी माजी आमदार शिरिष चौधरी,युवा नेते धनंजय चौधरी,प्रल्हाद बोनडे,डिगंबर चौधरी,असगर सैय्यद,माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान,माजी नगरसेवक महेबूब पिंजारी,सावद्याचे माजी नगरसेवक फिरोज पठाण,राजीव बोरसे,फैजपूर चे काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज,सैय्यद कौसर अली, शेख इरफान शेख इकबाल,जलील शेख,शेख महेमुद शेख हसन (रावेर),शेख इरफान(चिनावल),सईदखान रशीदखान,शेख शाकिर,वाय डी पाटील,विवेक बोनडे,दिनेश पाटील व गावातील नागरिक मान्यवर यांनी वर वधू यांना शुभेच्छा दिल्या.उपस्थितांचे आभार हाजी शेख करीम मण्यार यांनी मानले.

अनिष्ठ चालीरीतीला फाटा देत स्वतःच्या मुलाचा साखरपुड्यात विवाह ..���������������������������������…

अनेक वर्षांपासून कुसुंबा गावात होत आहे पोलिस चौकीची मागणी. वरिष्ठ पोलिस अधीकारी यांनी लक्ष देण्याची गरज (जळगाव प्रतिनिधी )रावेर तालुक्यातील कुसुंबा बुद्रुक हे गाव सातपुडा पायथ्याशी वसलेले आदिवासी गाव म्हणून परिचित आहे हे गाव तसं चांगलं पण वेशीला टांगल असे म्हणायला काहीच हरकत नाही.कारण हे गाव शांततेत गुण्या गोविंदाने नांदत आहे मात्र काही संकुचित वृत्तीच्या लोकांमुळे कुसूंबा गावाचा नकाशा बिघडला आहे ह्या गावाचा नकाशा बिघडवण्या मागचं कारण म्हणजे दारुड्या बेवळ्यांचे प्रमाण वाढणे विचित्र प्रकार घडण्याची पहिली पायरी म्हणजे बेवळ्यांपासुन सुरू होते घटना कोणत्या व्यसनांपासून होतात दारूडे बेवळ्यांचा उगम कुठुन होतो याकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे तसेच रावेर पोलिसांनी दिवसाही एक दोन फेरी पेट्रोलिंग सुरू करावी कारण पोलिसांच्या नजरेस पण अशा घटना दिसायला हव्या अशी परिसरातील गावकरी शेतकरी महिलांची रास्त स्वरुपाची मागणी आहे कारण यामुळे संकुचित व्रुत्तीच्या लोकांवर पोलिसांचा वचक निर्माण होईल अशी चर्चा मात्र परिसरात जोर धरू लागली आहे आणि जनतेकडुन ऐकण्यास मिळत आहे याबाबत अधिक माहिती अशी की कुसूंबा गाव हे सातपुडा पायथ्याशी असल्याने ह्या जंगलमय परिसरात शेती शिवारात दररोज काही ना काही घटना घडतच असतात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीची घटना छोट्या छोट्याशा कारणांवरून त्यांचे रुपांतर हाणामारीत व्हायला वेळ लागत नाही दारूळे बेवळ्यांचा धुमाकूळ काही कारण नसतांना शिवीगाळ करणे अशा अनेक प्रकारच्या घटना कुसुंबा गावात नेहमी घडत असतात त्यामुळे ह्या गावाला पोलिस चौकीची अत्यंत गरज आहे ,जेणेकरुन कायदा व सुव्यवस्था चे योग्य प्रकारे पालन होईल आणि ह्या गावात जो पोलिसांबद्दलचा धाक संपला आहे तो पोलिसांचा धाक कायम राहील आणि गाव शांततेत नांदेल ह्या गावाला लागू असलेले रावेर तालुका पोलिस स्टेशन हे गावापासून ७ ते १० किमी अंतरावर आहे ह्या रावेर पोलिस स्टेशन ला संबंधित नागरिक पोहचतो तो पर्यंत ह्या घटनांचा पोलिस येईपर्यंत चेहरा मोहरा बदलून जातो अशा ह्या घटनांना लक्षात घेत गावकरी नागरिक महिलांनी गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस चौकीची मागणी केली आहे परंतु याकडे प़ोलिस चौकीच्या मागणीकडे पोलिस प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे? असा प्रश्न गाव परिसरातील जनतेला, महिलांना खुप सतावत आहे त्याचबरोबर कुसूंबा बु येथील शेती शिवारात आदिवासी संकुचीत व्रुत्तीचे लोक शेतात जाऊन दांगोडे घालत असतात दगडफेक करतात आणि कोणी शेतकरी गावकरी यांनी विचारपूस केली तर कोणालाही शिवीगाळ करतात असा चित्र विचित्र प्रकार करीत असतांत अशा ह्या संकुचित व्रुत्तीचे लोकांमुळे कुसूंबा गावाचा नकाशा बिघडला आहे कारण यांचे बघुन इतर शेतकरी देखील भांडणे करीत असल्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे अशा ह्या घटनांना जबाबदार कोण ?ह्या संकुचित व्रुत्तीच्या लोकांना लगाम लावणार कोण ?याकडे संपुर्ण गावातील जनतेचे लक्ष लागले आहे.मागील काळात ह्याच संकुचित व्रुत्तीच्या लोकांनी मध्यप्रदेशमधील चोरीच्या मोटारसायकली महाराष्ट्रात कमी किंमतीत विकल्या होत्या त्यांचा पर्दाफाश मध्यप्रदेश पोलिसांनी केला होता त्यावेळी संबंधित चोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली की नाही की मोकाट सोडले असे परिसरातील जनतेकडुन बोलले जात आहे.अशा अनेक घटना ह्या परिसरात घडतच असतात म्हणूनच या कुसूंबा गावाला पोलिस चौकी स्थापन करण्यात यावी तरी या संपूर्ण प्रकाराकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने या घटनांचा विचार करून तात्काळ कुसूंबा परिसरात पोलिस चौकी स्थापन करावी अशी रास्त स्वरुपाची मागणी परिसरातील जनतेने गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी,महिलांनी पोलिस प्रशासनाकडे रास्त स्वरुपाची मागणी केली आहे..

अनेक वर्षांपासून कुसुंबा गावात होत आहे पोलिस चौकीची मागणी. वरिष्ठ पोलिस अधीकारी यांनी लक्ष देण्या…

शिरपूर येथे अनाथ व मतिमंद मुलाच्या हस्ते केक कापून व उपजिल्हा रुग्णालयात खिचडी वाटप करून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा. (शिरपूर) - महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर व लायन्स क्लब शिरपूर, मनविसे तालुका व शहर च्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मराठी हृदय सम्राट सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्तने शिरपूर मनसे तर्फे अनाथ व मतिमंद मुलाचे बालगृह शिरपूर जि धुळे येथे अनाथ व मतिमंद मुलांना राजसाहेबांचे नावाचे केक कापून व बिस्किट व केक वाटप करुन व तसेच लायन्स क्लब शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात खिचडी वाटप करण्यात आले माननीय राज साहेब ठाकरे यांच्या ५७ वा वाढदिवसा निमित्ताने व विविध कार्यक्रम करण्यात आले यावेळी मनसे धुळे जि. अध्यक्ष राकेश चौधरी, मनविसे जिल्हाध्यक्ष सोनू राजपूत, जिल्हा सचिव चेतन राजपूत, उपाध्यक्ष राहुल शिराळे मनसे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे. मनसे शहर अध्यक्ष पंकज मराठे, मनसे वाहतुक जिल्हा संघटक छोटू राजपूत व नक्षत्र पाटील मनसे तालुका उपाध्यक्ष रमेश अहिरे, मनसे तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील, मनसे ग्रामपंचायत सदस्य विकी मोरे, शहर उपाध्यक्ष कैलाश बाबर, मनसे शहर सचिव मनोज चव्हाण, मनविसे शहर अध्यक्ष पराग दलाल, मनविसे तालुका संघटक विवेक पाटील, शहर संघटक हिमांशू राजपूत, तालुका सचिव प्रतीक राजपूत, विभाग अध्यक्ष ईश्वर मोरे, अरमान पिंजारी मयूर कोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

शिरपूर येथे अनाथ व मतिमंद मुलाच्या हस्ते केक कापून व उपजिल्हा रुग्णालयात खिचडी वाटप करून मनसे अध्…

*विजेच्या तारेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू*महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप. (सिल्लोड तालुका प्रतिनिधी)अजिंठा-बुलडाणा रोडवर एका दुर्दैवी घटनेत अक्षय शंकर धनवई (वय २५, रा. शिवना, ता. सिल्लोड) या युवकाचा विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी (महावितरण) बुलडाणा येथील कार्यकारी अभियंता, पाडळी उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता अरुण गुलाबराव खरात आणि विद्युत सहाय्यक उषा गावीत यांच्या निष्काळजीपणामुळे अक्षयचा मृत्यू झाल्याचा आरोप अक्षयचा मोठा भाऊ अभिषेक शंकर धनवई यांनी केला आहे.अभिषेक शंकर धनवई यांनी दिलेल्या लेखीफिर्यादीनुसार, दिनांक ६ जून २०२५ रोजी अक्षय हा बोलेरो पिकअप वाहनात फळरोपे घेऊन शिवना येथून जात होता. अजिंठा-बुलडाणा रोडवरील चौथ्या रोडवर, मुख्य रस्त्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर दोन विद्युत खांबांमधील तारेला मोठा झोल पडलेला होता. या दोन्ही खांबांमधील अंतर सुमारे ४०० फूट होते. या झोल पडलेल्या तारेचा वाहनाला स्पर्श झाल्याने वाहनात वीजप्रवाह उतरला आणि त्यात अक्षयला विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. अभिषेकने रंगनाथ रघुनाथ काळे आणि भारत गंगाधर सपकाळ यांच्यासोबत ८जून २०२५ रोजी घटनास्थळाला भेट दिली असता, दोन्ही पोलमधील अंतर ४०० फूट असल्याचे आणि पोलची उंची कमी असल्याचे निदर्शनास आले. तसेच, झोल पडलेली तार रस्त्यापासून अंदाजे १२ फूट उंचीवर होती आणि त्यातून विद्युत प्रवाह वाहत होता.फिर्यादीनुसार, वीज प्रवाह, जोडणी आणि त्यांचे मेंटेनन्स करण्याचे काम महावितरणच्या कार्यकारी अभियंता, बुलडाणा यांच्या अखत्यारीत येते. पाडळी उपकेंद्राअंतर्गत असलेल्या वीज प्रवाह, जोडणी आणि देखभाल दुरुस्तीचे काम कनिष्ठ अभियंता अरुण गुलाबराव खरात यांच्याअंतर्गत येते, तर विद्युत सहाय्यक उषा गावीत यांच्याकडेही याची जबाबदारी होती. अभिषेकने आरोप केला आहे की, घटनास्थळाजवळील तारेला झोल पडलेला असताना आणि त्यातून विद्युत प्रवाह वाहत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले नाही. त्यांच्या या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळेच अक्षयचा मृत्यू झाला. या घटनेस कनिष्ठ अभियंता अरुण गुलाबराव खरात, विद्युत सहाय्यक उषा गावीत आणि संबंधित देखभाल दुरुस्ती व जोडणी करणारे ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप अभिषेक यांनी केलाआहे. घटनेच्या दिवशी मानसिक स्थिती ठीक नसल्याने अभिषेक त्यावेळी तक्रार देऊ शकला नव्हता. मात्र, आता त्यांनी संबंधित लोकांविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

* विजेच्या तारेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू*महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप.�����…

*आठवडी बाजारासाठी निश्चित जागा द्यावी –प्रफुल चटकी यांची नगर परिषदेला मागणी*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती)भद्रावती दि.13 :- शहरातील आठवडी बाजार सध्या मुख्य रस्त्यांवर भरत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे, तसेच चोरीसारख्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने, या बाजारासाठी एक निश्चित व स्थायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रफुल चटकी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रत्येक बुधवारी भद्रावती शहरात आठवडी बाजार भरतो. सध्या बाजारपेठ मुख्य रस्ते, रहदारीचे मार्ग व सार्वजनिक ठिकाणी भरत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या बाजारात ३०० ते ४०० हून अधिक दुकानदार आपला व्यवसाय करतात. त्यामुळे बाजारात प्रचंड गर्दी होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही धोका वाढत आहे. आठवडी बाजार सध्या शहरातील मुख्य रस्ता, जुना बस स्टँड, बाजार वार्ड, किल्लावार्ड, भोजवार्ड, हनुमान नगर, बंगाली कॅम्प, लिंबुनी नगर, सूर्यमंदिर वॉर्ड, साई नगर आदी परिसरांतील रस्त्यांवर भरत असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. यामुळे चारचाकी व दुचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर शहरात एक मोकळी व नियोजित जागा आठवडी बाजारासाठी निश्चित करून सर्व दुकानदारांना तेथे स्थलांतरित करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी माजी उपाध्यक्ष तथा नगर सेवक प्रफुल चटकी आणि माजी नगरसेवक राजु सारंगधर यांनी संयुक्तपणे दिलेल्या निवेदनातून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. बाजारासाठी स्वतंत्र जागा निश्चित झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी, चोरीचे प्रकार आणि नागरिकांचा त्रास यावर प्रभावी उपाय होऊ शकतो, असा विश्वास या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

*आठवडी बाजारासाठी निश्चित जागा द्यावी –प्रफुल चटकी यांची नगर परिषदेला मागणी*.��������������������…

जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी, लघुळ ग्रामपंचायतचा आदर्श निर्णय. मारोती एडकेवारसर्कल:प्रतिनिधी सगरोळी सगरोळी : जिल्हा परिषद शाळेत आपल्या,मुला -मुलींचा प्रवेश घ्या ग्रामपंचायत कर माफ करण्यात येईल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाचवण्यासाठी लघुळ ग्रामपंचायत कार्यालयाचा आदर्श निर्णय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पीयल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, त्याच हेतूने जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, कमी होत असल्यामुळे लघुळ ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांना आव्हान करण्यात आले, जे ग्रामस्थ आपले पाल्यांना, मुला-मुलींना,गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतील,त्यांना त्यांच्या नावावरील मिळकतीचे, घराची,घरपट्टी व पाणी पट्टीचा कर, पूर्णपणे माफ करण्यात येईल. असे आवाहन करण्यात आले आहे, लघुळ ग्रामपंचायत चे, सरपंच सौ सपना अजयगोड मल्लेवार, उपसरपंच गंगाधर प्रकाशराव बामणे यांनी ग्रामपंचायत, कार्यालयातील सर्व सदस्य त्यांना सोबत घेऊन हा ठराव पास करण्यात आला. त्यामुळे, बिलोली तालुक्यातील, व सगरोळी सर्कल मधील, शिक्षण प्रेमी, व सामाजिक कार्यकर्त्यांकडून, पत्रकाराकडून व शिक्षक संघटनेकडून, लघुळ ग्रामपंचायतचा आदर्श निर्णयाचे स्वागत, करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी, लघुळ ग्रामपंचायतचा आदर्श निर्णय.���������������������…

Load More
That is All