Read more

View all

पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल काँग्रेसचे शहराध्यक्ष यांची हकालपट्टी करावी :- मुदस्सर नज़र.... फैजपूर नगरपालिका निवडणूकीचा निकाल नुकतीच लागला त्यात काँग्रेसचे आठ पैकी पाच नगर सेवक निवडुन आले तिन उमेदवार अल्पमताने पराभूत झाले प्रभाग क्रमांक तीन मधून काँग्रेसच्या उमेदवार सुमय्या नाज मुदस्सर नज़र उमेदवार असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख रियाज शेख साबीर यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष असताना सुद्धा पक्षाचे उमेदवार विरुद्ध काम केले त्या बद्दल त्यांची काँग्रेस पक्षातुन हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी प्रभाग क्रमांक तीन च्या उमेदवार सुमय्या नाज यांचें पति मुदस्सर नज़र यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या कडे दुरध्वनी करुन केली आहे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाचे जळगाव जिल्हा प्रभारी मिर्जा आरीस बेग यांना तात्काळ या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देऊ असे आश्वासन दिले आहे तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार हे जिल्हा बाहेर असल्याने लेखी तक्रार करण्यासाठी सांगितले आहे व चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे

पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल काँग्रेसचे शहराध्यक्ष यांची हकालपट्टी करावी :- मुदस्सर नज़र....��…

*निवडणूक कामी सर्व कर्मचारी व पत्रकार बांधवांसह सहकार्याचे आभार* *@) निवडणूक अधिकारी, पांडूरंग माचेवाड. (*मानवत / प्रतिनिधी).दिनांक चार नोव्हेंबर रोजी सुरू झालेली मानवत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ही आज मतमोजणी होऊन यशस्वीरित्या संपलेली आहे. या संपूर्ण कालावधीमध्ये ,या संपूर्ण प्रक्रिये वेळी सर्व पत्रकार बांधव यांनी वेळोवेळी निवडणूक कामाचे प्रसिद्ध देऊन सर्व नागरिक, उमेदवारांपर्यंत, मतदारांपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष यांच्याकडून वेळोवेळी दिलेली माहिती पोहोचवली. त्यामुळे सर्व पत्रकार बांधवांचे निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश गायकवाड व संजय खिल्लारे त्यांच्याकडून सर्वांचे आभार मानले.🙏?

निवडणूक कामी सर्व कर्मचारी व पत्रकार बांधवांसह सहकार्याचे आभार*     *@) निवडणूक अधिकारी, पांडूरंग…

रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी त्यांची नावे अतिक्रमणातून वगळले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अतिक्रमण काढण्यास ग्रामपंचायतीची टाळाटाळ .. नांदगाव ! तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाटमाथ्यावरील बोलठाण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण केलेले असून देखील ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांनी अतिक्रमण रजिस्टर मध्ये नोंदी करण्यास हेतू पुरस्कार टाळाटाळ केली असून त्यांचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल होऊन देखील अद्याप पर्यंत ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई केली नाही. उलट ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रकार रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत करत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कर्मचारी यांना संपूर्ण गावातील अतिक्रमणधारकांचा सर्वे करण्यास सांगितला होता‌. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडे ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देविदास पवार व ग्रामपंचायत अधिकारी आर एम मगर यांनी हे काम दिल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण केलेली असताना व त्यांचा चुलत भाऊ ग्रामरोजगार सेवक यांनी देखील अतिक्रमण केलेली असून त्यांची दोघांची नावे अतिक्रमण सर्वे मधील यादीत न दिल्याने ग्रामपंचायत ने त्यांच्या नोंदी अतिक्रमराष्ट्रमध्ये केल्या नाहीत. हेच काम ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतः केली असती किंवा बाहेरील शासकीय व्यक्तीला काम दिले असते तर हुकूमशाहीने काम न होता ही पक्षपाती अतिक्रमण यादी चा सर्वे झाला असता. सदरचे अतिक्रमण सर्वे करण्याची काम ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला दिल्यामुळे त्यांनी गावात राजकारण करून हुकूमशाही पद्धतीने सर्व लोकांची नावे अतिक्रमण सर्व मधी घेतले आणि स्वतःचे नाव घेतली नाही.त्यामुळे रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये रोहिले बुद्रुक गावठाणात असलेल्या मारुती मंदिराजवळ ग्रामपंचायतींच्या जागेवर वाहने व कृषी अवजारे ग्रामपंचायत कर्मचारी अनिल संताराम अरबुज व ग्रामरोजगार सेवक बाबासाहेब तुकाराम अरबूज यांनी अतिक्रमण करून वाहने उभे करत असल्याने तेथील अतिक्रमण काढण्यात यावे याबाबत रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतला दिला होता परंतु सदर ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देविदास पवार व ग्रामपंचायत अधिकारी आर एम मगर व ग्रामपंचायत सदस्य यांनी कोणत्याही प्रकारची पाहणी न करता अद्याप पर्यंत तेथील अतिक्रमण काढलेले नाही. आणि अतिक्रमण रजिस्टर मध्ये देखील त्यांच्या नोंदी ग्रामपंचायत घेण्यास तयार नाही. तर ही ग्रामपंचायतची हुकूमशाही आहे की काय? लोकशाही प्रमाणे रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, व अधिकारी कामकाज का करत नाही असा सवाल मुक्ताराम बागुल यांनी उपस्थित केला आहे. जर ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अतिक्रमणे काढायची नसतील आणि ग्रामपंचायतीची हद्दीतील जागा कर्मचाऱ्यांना वापरण्यासाठी द्यावयाची असेल तर त्यांची नावे ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण रजिस्टर मध्ये नोंदी करण्यात यावी व त्याची नक्कल मला मिळावी. अन्यथा हुकूमशाही पद्धतीने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विरोधात आठ दिवसात ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे कामकाज चालते त्या कार्यालयासमोर अर्ध नग्न आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, व ग्रामपंचायत सदस्य राहतील. असा इशारा रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य मुक्ताराम बागुल यांनी दिला आहे.

रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी त्यांची नावे अतिक्रमणातून व…

*बनावट कागदपत्रांवर जमीन हडप; ६ जणांवर गुन्हा*. अकोला:अकोला जुने शहर पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे ४, ३५६ चौ. फुट जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका महिलेसह सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ डिसेंबर रोजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या वडिलांनी जमीन विकलेली नसल्याचे नोंदींनी स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

बनावट कागदपत्रांवर जमीन हडप; ६ जणांवर गुन्हा *.

जातीवाचक शिवीगाळ करत विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल*. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)अकोला: तेल्हारा शहरात ३२ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बेलखेड येथील नरेश सीताराम पालीवाल (४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार, २१ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता फटाके फोडण्यास हटकले असता आरोपीने जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करत हात पकडून लोटल्याचा आरोप आहे. आरोपी पळून गेला असून, या प्रकरणी तेल्हारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज २३ डिसेंबर रोजी दिली.

जातीवाचक शिवीगाळ करत विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल*.�������������������������������������������…

*पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी जाता जाता केल्या १० ठाणेदारांच्या बदल्या*. (वर्धा:- प्रतिनिधी (मोहम्मद दानिश ) पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची काल सोमवारी नागपूरला बदली झाली. मात्र या शेवटच्या दिवशी त्यांनी एक महत्वाची फाईल हातावेगळी केली. ही फाईल काही ठाणेदारांच्या बदल्यांची आहे.महाराष्ट पोलीस अधिनियम अंतर्गत जिल्हा आस्थापना मंडळास अधिकार प्राप्त असतात. निःशस्त्र पोलीस पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस हे नव्याने घटकात हजर झाले असल्याने त्यांची घटकांतर्गत प्रशासकीय कारणास्तव व विनंतीने प्रशासकीयदृष्ट्या पुढील आदेशापर्यंत नेमणूक करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे.त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांची सेलू ठाणेदार म्हणून बदली झाली आहे. तर सेलूचे ठाणेदार मनोज गभणे यांना आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळाली आहे. वर्धा नियंत्रण कक्षातील अनिल मेश्राम यांना वर्धा पोलीस शहर ठाण्यात गुन्हे शाखा देण्यात आली आहे. जिल्हा विशेष शाखेतील यशवंत कदम यांना दहेगाव येथील ठाणेदार म्हणून नियुक्ती मिळाली आहे. कारंजा येथील ठाणेदार नागेशकुमार चतारकर यांना सेवाग्रामचे ठाणेदार करण्यात आले आहे. वर्धा नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांना जिल्हा विशेष शाखेत नियुक्ती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक व दहेगाव येथील ठाणेदार प्रल्हाद मदन यांना कारंजा ठाणेदार म्हणून नियुक्ती मिळाली.सहाय्यक पोलीस निरीक्षक व सेवाग्रामचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांना वर्धा नियंत्रण कक्षात सायबर ठाणे देण्यात आले आहे. जिल्हा विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंह ठाकूर यांना वर्धा स्थानिक गुन्हे शाखा देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील एनडीपीएस पथक मिळाले आहे.प्रशासकीय सोयीचा भाग म्हणून या बदल्या आहेत. पालिका निवडणुकीची आचार संहिता लागू असल्याने त्या बदल्या थांबल्या होत्या. आता आचार संहिता निर्बंध उठल्याने त्या मार्गी लागल्या असल्याचे सांगण्यात आले. वरील सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना नवीन नेमणूकीच्या ठिकाणी त्वरित रुजू होण्याचे निर्देश आहेत. कारंजा घाडगे येथील मादक पदार्थ उत्पादन कारखाना उजेडात आल्यानंतर तेथील ठाणेदारांना वर्धा मुख्यालयी पाठविण्यात आले होते. आता त्या ठिकाणी पण नव्या ठाणेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण या दहा बदल्या झाल्या आहेत. तर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना नागपूर येथे नियुक्ती मिळाली आहे. नवे पोलीस अधीक्षक लवकरच रुजू होण्याची शक्यता व्यक्त होते.

पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी जाता जाता केल्या १० ठाणेदारांच्या बदल्या*.������������������������…

धोंडगाव दिनांक 23 डिसेंबर मीडीया पोलीस टाइम प्रतिनिधी यश राऊत धोंडगाव येथे समस्त गावकरी तसेच शाळेकरी विद्यार्थी व पालक वर्ग यांची ब्रेकर संदर्भात मागणी समुद्रपूर ते गिरड मार्ग धोंडगाव या गावांमध्ये रोड लगतच शाळा असून येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी संपूर्ण गाववासी तसेच पालक वर्ग यांनी ब्रेकरची व्यवस्था करून देण्यात यावी जेणेकरून अपघाताला आळा बसेल व येणाऱ्या जाणाऱ्या शाळेकरी विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना सुरक्षेची एक कवच मिळेल आज एक ट्रक कोळसा घेऊन जात असताना अचानक मोठा कोळशाचा गडा रोडवर पडला जेणेकरून कोणती हानी झाली नाही पण तो घडा लगतच साईराम पान सेंटरच्या खुर्चीला जाऊन पडला असता खुर्ची मोडली कोणती हानी झाली नाही येथे ब्रेकरची व्यवस्था करून द्यावी असे गावकऱ्यांचे व पालकांचे म्हणणे आहे

हिंगणघाट भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर नयनाताई तुळसकर यांचा 18हजार 75 इतक्या मताधिक्याने विजय हिंगणघाट नगर परिषदेच्या 2 डिसेंबरला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज 21 डिसेंबरला उपविभागीय अधिकारी कार्यालय पार पडली असून निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर नायना ताई तुळसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शुभांगी ताई डोंगरे यांचा 18 हजार 75 इतक्या मताधिक्याने पराभव करून दणदणीत विजय संपादन केला आहे आमदार समीर भाऊ कुणावर यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्षाच्या वतीने लढविण्यात आलेल्या या नवीन निवडणुकीत भाजपने 40 पैकी 30 नगरसेवक पदावर विजय संपादन केला आहे पोलिस टाईम्स अब्दुल कदिर शेख

हिंगणघाट नगरपरिषद निवडणूक निकाल : प्रहार संघटनेचा ऐतिहासिक विजयहिगणघाट नगरपरिषद निवडणुकीत प्रहार संघटनेने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. प्रभाग क्रमांक 4 मधून प्रहार संघटनेचे उमेदवार सूरज कुबडे यांनी दणदणीत विजय मिळवला असून, ते हिंगणघाट नगरपरिषदेतून निवडून येणारे प्रहार संघटनेचे एकमेव नगरसेवक ठरले आहेत.या विजयामुळे शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, मोठ्या पक्षांच्या तुलनेत मर्यादित साधनसंपत्ती असतानाही प्रहार संघटनेने जनतेचा विश्वास संपादन केल्याचे स्पष्ट झाले आहे. सूरज कुबडे यांनी प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, युवकांचे प्रश्न व सर्वसामान्यांच्या अडचणींवर ठोस भूमिका मांडली होती. त्याचाच कौल मतदारांनी दिल्याचे चित्र निकालातून समोर आले आहे.प्रभाग क्रमांक 4 मधील मतदारांनी बदलाला संधी दिल्याने प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शहरात विजयाचे जल्लोष पाहायला मिळाले. हा विजय प्रहार संघटनेसाठी केवळ एक जागा नसून, हिंगणघाटच्या राजकारणात प्रभावी उपस्थितीची नांदी मानली जात आहे.नवनिर्वाचित नगरसेवक सूरज कुबडे यांनी मतदारांचे आभार मानत, “हा विजय जनतेचा आहे. प्रभागातील प्रत्येक प्रश्नासाठी प्रामाणिकपणे लढा देईन,” असा विश्वास व्यक्त केला आहे पोलीस टाईम्स अब्दुल कदिर शेख

Load More
That is All