Read more

View all

*के. के.एम. महाविद्यालया मध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यी अमोल साळवे यांचा गूण गौरव*. (मानवत / अनिल चव्हाण.*)————————*मानवत येथील के. के. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री.अमोल साळवे यांची रेल्वे स्टेशन मास्तर पदी नियुक्ती झाल्याबद्दल मानवत येथील के. के.एम. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.पंडित मोरे, डॉ.प्रदीप गिरासे, स्वामी विवेकानंद सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री. अनंत गोलाईत ( गहिलोत ) के.के. महाविद्यालयाचे कार्यालयीन प्रमुख श्री. गणेशजी उबाळे, प्रा अनिलजी सोळंके, प्रा बालासाहेब भिसे पाटील, तसेच विद्यालयातील प्राध्यापक वर्ग व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. अमोल साळवे यांनी के. के.एम. महाविद्यालया मध्ये शिक्षण घेत असताना *१शिस्त, परिश्रम आणि चिकाटीच्या* जोरावर आपली शैक्षणिक वाटचाल यशस्वी केली. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पुन्हा एकदा प्रचिती आली असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.यावेळी सत्काराला उत्तर देताना *अमोल साळवे* यांनी महाविद्यालयाने दिलेले मार्गदर्शन, शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान आणि संस्थेचे संस्कार यामुळेच मी आज हे यश मिळाविले असल्याचे सांगून सर्व उपस्थित आदरनिय गूरूजन वर्गासह सर्वांचे आभार व्यक्त करूण शतक्षा ॠणी असल्याचे भाव व्यक्त केले.***

के. के.एम. महाविद्यालया मध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यी अमोल साळवे यांचा गूण …

*ए बी फॉर्म* चुकीचा निघाल्याने (जोडला )वंचितच्या उमेदवाराला पक्षापासून वंचित राहणाची पाळी*. (मानवत / प्रतिनिधी.*)————————————*. मानवत* तालुक्यातील ताडबोरगाव गटात वंचित बहुजन आघाडी कडून अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराने पक्षाचा *ए.बी. फॉर्म* तपासणीत चुकीचा निघाल्याने यूवा उमेदवाराला आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याची पाळी आली आहे. उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत करणार असल्याची चर्चा सुरु आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी साठी उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मानवत तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार, सहाय्यक निवडणूक अधिकारी पांडुरंग माचेवाड यांच्या उपस्थितीत पार पडली. छाननी दरम्यान ताडबोरगाव गटातून विनोद मकासरे यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र उमेदवाराने पक्षाचा *ए.बी. फॉर्म* ताडबोरगाव *गटा* ऐवजी ताडबोरगाव *गणाचा* जोडला यामुळे विनोद मकासारे हे पक्षाचे अधिकृत उमेदवार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र उमेदवारी अर्ज विहित नमुन्यात भरण्यात आल्याने अर्ज वैध ठरवण्यात आला असल्याने *विनोद मकासरे* यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यां मध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. असे असले तरी *विनोद मकासरे* यांना पक्षाकडून पुरस्कृत केले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान तालुक्यातील उर्वरित तीन गटात वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार रिंगणात असणार आहेत.***

ए बी फॉर्म* चुकीचा निघाल्याने (जोडला )वंचितच्या उमेदवाराला पक्षापासून वंचित राहणाची पाळी*.�������…

कुसुमाग्रज प्रतिष्ठान याठिकाणी कविराज राधेशाम अशोक कंडारे यांना काव्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा या मंचाच्या नाशिक शाखेच्या वतीने आज झालेल्या संमेलनाचे आयोजन कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात करण्यात आले आहे. या समरसता संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द कीर्तनकार आणि कवी ह. भ. प. श्री. शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ कवयित्री सौ. हेमलता गिते यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाची संयोजन समिती व संयोजक श्री. शिवराज पाटील हे आहेत.विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा यांच्या कडुन हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 51 कवींची निवड करण्यात आली असुन त्यांना गौरवपदक, महावस्त्र, श्रीफळ व मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.कवी-लेखकांचा खुला परिसंवाद आयोजित करण्यात आला असून परिसंवादाचा विषय "मराठी साहित्याने मला काय दिले?" असा आहे. या संमेलनाच्या समारोप सत्रात "कविमनाची आरोळी .... विश्वात्मक चारोळी" अशी उत्स्फुर्त चारोळी सादरीकरण स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.काव्यरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वडती गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावातील नागरिक, पुज्य साने गुरुजी माध्य.विद्यालय वडती येथील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी, व मित्र परिवार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कार्यवाही नाकेबंदी करून देशी दारूने भरलेल्या 150 पेट्या व चार चाकी वाहनासह 22,10,000/-रु चा मुद्देमाल जप्त केल्याबाबत* .................................. दिनांक 21/01/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक वर्धा तर्फे अवैद्य धंदयावर कारवाई संबंधाने पो. स्टे. सावंगी (मेघे) परीसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहिती वरून आरोपी नामे राहुल प्रकाश पवार हे त्याचे ताब्यातील बुलेरो पिकप मालवाहू क्रमांक MH 52 0026 चारचाकी वाहनाने देशी दारूचा माल तुळजापूर हायवे नि वर्धा कडे घेऊन येत आहे. अश्या माहिती वरून पंछी धाब्या जवळ नाकेबंदी करून त्यांचेवर प्रो रेड केला असता आरोपी व आरोपीच्या वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता वाहनांमध्ये 150 खरड्याच्या खोक्यात देशी दारूने भरलेल्या राकेट संत्रा कंपनीचे प्लास्टिक शिशी मध्ये 90 एम एल चे 15,000 शिश्या तसेच नगदी पैसे व मोबाईल सह असा एकुण जु. कि. 22,10,000/-चा मुद्देमाल माल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त केला. आरोपीयास दारू माल कुठून आणला याबाबत विचारणा केली असता भूषण पाटील रा. मुकटी जि. धुळे (पसार) याने दारू माल दिल्याचे सांगितले वरून सदर दोन्ही आरोपीविरुध्द पो. स्टे. सावंगी मेघे येथे गुन्हा नोंद केला. पुढील तपास करीत आहे*सदरची कार्यवाही* मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि प्रकाश लसूण्ते पोलीस अंमलदार शेखर डोंगरे विकास मुंडे, सुगम चौधरी, शुभम राऊत,राहुल लुटे यांनी केली आहे.मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

चोपडा जळगाव जाण्यासाठी शॉट कट सुखकर आसा रस्ता म्हणजे गोरगावले खु गोरगावले बु खेडी भोकरी जळगाव तालुक्यातील भोकर हा मार्ग आहेयाच मार्गावर गोरगावले खू ते खेडी भोकरी या गावांना जोडणारा गुड नदी चा जुना पूल हा उंचीने कमी होती हे लक्षात घेऊन माननीय माजी आमदार लताताई सोनवणे व * आमदार प्रॉ . चंद्रकांत सोनवणे* यांच्या विशेष प्रयत्नातून अंदाजित रक्कम सुमारे *५ कोटी रुपये* अधिक उंचीचा पूल मंजूर करून प्रवास अधिक सुखकर करून दिल्यामुळे पंचक्रोशीतील लोकांनी आभार व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त करत आहेत तरी आज ह्या कामातला भेट देण्यासाठी चोपड्याचे शिवसैनिक नंदू भाऊ गवळी गोरगावल्याचे उपसरपंच नरेंद्र बाविस्कर व माजी सरपंच अरुण भाऊ कोळी जितू कोळी विठ्ठल कोळी लहान गोरगावल्याचे गजू पाटील शिवसैनिक तसेच खेडीभोकरीचे मंगल पाटील नारायण पाटील आदी उपस्थित होते तरी हा पूल लवकरात लवकर तयार करून देऊ असेही सांगण्यात आले .

जहाजपुर कोटडी विधानसभा क्षेत्र के लिए गर्व का क्षण है पूरे प्रदेश से हजारों कार्यकर्ता पदभार ग्रहण में रहे शामिल विधायक गोपीचंद जी मीणा अनुसूचित जनजाति प्रदेश अध्यक्ष ने सभी कार्यकर्ताओं का जताया आभार और आने वाले समय में संगठन को मजबूत करने की बात कही कार्यक्रम में पंडेर क्षेत्र से कार्यकर्ताओं में सुरेश जी माली विक्की सोनी, देशराज भाट, गोपाल रेगर, गणपत रेगर, सोहनलाल रेगर, निर्मल हरिजन, कालू भाट, राजेश जी जैन, ओमप्रकाश भाट, रामपाल जी कटारिया, लक्ष्मण जी माली, गोपाल जी रेगर, देवराज जी भट्ट ठेकेदार, आदि कार्यकर्ताओं ने जयपुर भाजपा कार्यालय में पहुंच कर विधायक गोपीचंद जी मीणा का माला और गुलदस्ता और साफा बंधवाकर स्वागत किया विधायक जी ने सभी कार्यकर्ताओं का आभार जताया जहाजपुर भीलवाड़ा से खास रिपोर्ट गणपत लाल

*"अकोल्यात महिलांचे राज्य! इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी राखीव महापौरपद"* ‌. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान) अकोल्यासह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी महापौरपदाचे आरक्षण नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या सोडतीत निश्चित करण्यात आले.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत (१६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झालेले निकाल), अकोल्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.भाजप: ३८ जागा (सर्वात मोठा पक्ष, परंतु बहुमतासाठी ४१ च्या जादुई संख्येपेक्षा ३ जागा कमी).काँग्रेस: ​​२१ जागा.इतर: शिवसेना यूबीटी (६), वंचित बहुजन आघाडी (५), राष्ट्रवादी-सपा (३), एआयएमआयएम (३).ओबीसी महिला आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर, भाजप आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) या दोन्ही पक्षांनी या प्रवर्गातील महिला उमेदवारांचा शोध आणि युतींबद्दल चर्चा तीव्र केली आहे.आता अकोल्याची पुढची "प्रथम नागरिक" (महापौर) ही ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेली महिला असेल.

अकोल्यात महिलांचे राज्य! इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी राखीव महापौरपद"*               ‌

ध्येयपूर्तीसाठी आत्मविश्वास व परिश्रमाची गरज - तालुका कृषी अधिकारी अजय वाढे..**दि न्यू इरा हायस्कूलमध्ये दहावी–बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न..*. ‌ ‌‌. (अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान ) विद्यार्थ्यांना जीवनात ध्येयपूर्ती करायची असेल तर प्रत्येकाने आपला आत्मविश्वास वाढवून कठोर परिश्रम केले पाहिजे असे मौल्यवान मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी अजय वाढे यांनी स्थानिक दि.न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या निरोप समारंभात विद्यार्थ्यांना केले...दि न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव जामोद येथे वर्ग दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन बुधवार, 21 जानेवारी रोजी अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात करण्यात आले होते... शाळेच्या शैक्षणिक वाटचालीतील हा एक महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण ठरला.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुळकर्णी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा तालुका कृषी अधिकारी बुलढाणा अजय नामदेव वाढे हे उपस्थित होते. तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक शेख सलीम, पर्यवेक्षक ओंकारराव तायडे व पर्यवेक्षक प्रा. सुहास वाघमारे हे मान्यवर म्हणून मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत व दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या प्रयोगशाळेसाठी आवश्यक वैज्ञानिक उपकरणे व रसायने तसेच ग्रंथालयासाठी उपयुक्त शैक्षणिक व संदर्भ पुस्तके भेट देण्यात आली. ही भेट विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, कृतज्ञता आणि ऋणानुबंध जपण्याची भावना दर्शविणारी होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक शेख सलीम यांनी केले त्यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची प्रमुख अतिथी यांचा परिचय तसेच सराव परीक्षेमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रमुख अतिथी तथा शाळेचे माजी विद्यार्थी अजय नामदेव वाढे तालुका कृषी अधिकारी बुलढाणा यांनी विद्यार्थ्यांना आगामी दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी सखोल मार्गदर्शन केले...कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगेश गिऱ्हे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका सौ. भुजबळ यांनी केले....

ध्येयपूर्तीसाठी आत्मविश्वास व परिश्रमाची गरज - तालुका  कृषी अधिकारी अजय वाढे..**दि न्…

अकोला जागतिक स्तरावर रामदेव बाबा यांचे भक्त असून आपल्या सामाजिक समरसता एकता मानवता धर्म पारायण यामुळे सर्वांशी एकत्रित करण्याचे काम राजस्थान तिथे बाबा रामदेव यांनी साडेपाचशे वर्षांपूर्वी केले आणि आज सर्वात जास्त फक्त लोक देवता म्हणून राजस्थानचे पूज्य म्हणून मानल्या जातात आणि अकोल्यात रामदेव बाबाचे बारा मंदिर हे भक्ती आणि श्रद्धा विश्वासाचे प्रतीक असल्याचे भजन सम्राट राधेश्याम शर्मा रजपूत पुरेवाले यांनी केले. स्थानिक गजानन महाराज यांच्या पाऊस स्पर्शाने पवित्र मोठ्या राम मंदिरात रामदेव बाबा मंदिरात आयोजित रामदेव बाबा माघ उत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रामदेव बाबाचे 24 परचे, त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून कशा पद्धतीने सामाजिक समरसता विश्वास श्रद्धा भक्ती चा त्यांनी भगवान श्रीकृष्णाची भक्ती सांगितलं त्यामुळे ते राजस्थान मधील लोक देवता प्रसिद्ध आहे मनोकामनापूर्ती सोबत जिवंत समाधी घेणारे देशातील मोजक्याच महापुरुषात त्यांचा समावेश आहे. यावेळी राधेश्याम शर्मा नारियल वाले यांनी सुद्धा आपल्या मधुर वाणी मध्ये सुद्धा भजन प्रस्तुत केले. यावेळी विशेष पूजा अर्चना रामदेव बाबा पादुका यांचा अभिषेक प्रकाश पुरोहित खुशबू पुरोहित कुंजबिहारी जाजू अनुसया जाजू जया पुरोहित महेंद्र पुरोहित प्रमोद अग्रवाल मनीषा अग्रवाल आशा गोयंका रमेश लड्डा अमित लड्डा, धनंजय आढाव विनय जोशी विकी झुंजुन वाला, प्रकाश भुसारी विजय अग्रवाल यांच्या हस्ते विशेष पूजा अर्चना करण्यात आली यावेळी वेदपाठी पंडित जितेंद्र छान गाणी महेश जोशी संतोष शुक्ला, सौरभ छागाणी, अशोक छान गाणी दिलीप छान गाणी, विनय जोशी वेदपाठी ब्राह्मण होते. यावेळी स्वर्गीय सुरज करण जोशी यांनी 90 वर्षांपूर्वी केलेली परंपरा अविरतपणे सुरू असून स्वर्गीय सत्यनारायण बजाज स्वर्गीय बालकिसन चांडक, स्वर्गीय छगनलालजी शर्मा ओमप्रकाश जोशी, स्वर्गीय तुळशीराम गोयंका, स्वर्गीय नारायण सरकी वाले यांच्या परंपरेला किसन गोपाल पुरोहित एडवोकेट महेंद्र पुरोहित , गिरीश जोशी, आशिष बनवारीलाल बजाज, किशोर खंडेलवाल ओम प्रकाश खत्री कृष्णा राठी पेढे वाले, ओम प्रकाश गोयंका सतीश गोयंका राजू बालाजी शर्मा यांनी अविरतपणे सुरू असून या परंपरेला आज सर्व सामाजिक सर्व वर्गाच्या लोकांना घेऊन हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये प्रकाश भुसारी नितीन ढोले सुमित्रा निखाडे, दीपक शर्मा ज्योती चव्हाण किशोर खंडेलवाल दीपक तिवारी यांनी या परंपरा ला नमन केले व रामदेव बाबा श्याम बाबा यांच्या भजनाने भक्तांना मंत्रमुग्ध केले.प्रतिनिधि रामचंद्र नावकार

Load More
That is All