जाति सूचक शब्दों का मामला आया सामने किशनगढ़ भीमपुरा भीलवाड़ा से बड़ी खबर.. जिला भीलवाड़ा तहसील जहाजपुर अंतर्गत ग्राम पंचायत किशनगढ़ की ग्राम भीमपुरा गांव में रेगर समाज के लोगों पर अत्याचार का मामला सामने आया है पीड़ित का आरोप है कि गुर्जर समाज की कुछ लोगों द्वारा उन्हें लगातार धमकाया जा रहा है और जाति सूचक शब्दों का प्रयोग किया जा रहा है पीड़ित छोटू लाल रेगर ने बताया कि आरोपी द्वारा उन्हें जान से मारने की धमकियां दी गई अनुसूचित जातीगत शब्दों का प्रयोग का किया गया अपमान किया गया उन्होंने कहा कि इस कारण गांव में आना-जाना भी असुरक्षित हो गया वहीं पीड़ित डाली देवी ने आरोप लगाया कि कुछ लोगों ने उनकी बहू बेटियों को बुरी नजर से देखते हैं और गलत भाषा का प्रयोग करते हैं जिन्हें पूर्व परिवार भय का माहौल है जिस पर जिन्हें वह घर से बाहर नहीं निकाल पाते हैं मजबूर हैं पीड़ित ने जिन लोगों पर आरोप लगाया है उनमें नाम रामदेव गुर्जर रामलाल गुर्जर ओमप्रकाश गुर्जर भोजा गुर्जर रामेश्वर गुर्जर रावता गुर्जर रंग लाल गुर्जर के नाम शामिल है और रेगर समाज के लोगों ने मीडिया द्वारा प्रशासन से मांग की है कि मामले की निरपेक्ष जांच करें और आरोपियों के खिलाफ अनुसूचित जाति एवं जनजाति अत्याचार निवारण अधिनियम सहित साहिबंदी धाराओं में सख्त कार्रवाई करें ताकि पीड़ित परिवार को न्याय मिल सके कब देखना यह होगा प्रशासन कार्रवाई करता है या नहीं भीलवाड़ा से भेरूलाल रेगर की खास रिपोर्ट जाति सूचक शब्दों का मामला आया सामने किशनगढ़ भीमपुरा भीलवाड़ा से बड़ी खबर..… byमीडीया पोलीस टाईम -January 02, 2026
रावेर-पुनखेडा–पातोंडी रस्त्याचे काम करता करता ठेकेदार झाला गायब. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने ठेकेदार ला शोधुन काढण्याची गरज. (विशेष जिल्हा प्रतिनिधी जळगाव विनोद कोळी). रावेर तालुक्यातील रावेर-पुनखेडा–पातोंडी हा महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर टाकलेला खळी मुरूम व सैल मातीमुळे वाहनांची वर्दळ वाढताच मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून परिसर धुरकट झाल्याचे चित्र आहे.या उडणाऱ्या धुळीचा मोठा फटका रस्त्यालगत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. पिकांवर धूळ साचत असल्याने पिकांची वाढ खुंटत असून उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.“रस्त्याचे काम सुरू केले पण पूर्ण केले नाही. आमच्या शेतातील पिकांवर सतत धूळ बसत आहे. यामुळे पिके खराब होत असून कोण जबाबदार आहे?”तर दुचाकीस्वार नागरिक श्री.कौशल पाटील म्हणाले,“धुळीमुळे समोरचे काहीच दिसत नाही. डोळ्यांना जळजळ होते आणि अपघात होण्याची भीती कायम असते.”पुनखेडा पातोडी महिला ग्रामस्थ यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले,“लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना धुळीमुळे श्वसनाचा त्रास होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.”अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे ना सुरक्षित वाहतूक होत आहे ना शेतकऱ्यांचे नुकसान थांबत आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करून डांबरीकरण करावे व धुळीचा त्रास थांबवावा, अशी जोरदार मागणी पुनखेडा, पातोंडी व परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. रावेर-पुनखेडा–पातोंडी रस्त्याचे काम करता करता ठेकेदार झाला गायब. रस्त्याचे काम अपूर्… byमीडीया पोलीस टाईम -January 02, 2026
तिकीट वरस ठरतं आता फुकट सतरंज्या झेंडे उचलणाऱ्यां ची भरती सुरू होणार आजचा आपल्या आवडत्या पक्षांच्या कार्यालयाशी संपर्क साधा . (जिल्हा मुख्य प्रतिनिधी प्रवीण मेघे )निवडणुकीचा खेळ रंगत आला आता सतरंज्या उचलण्याचा हंगाम अधिकृत सुरू महानगरपालिका निवडणुकीतील तिकीट वाटपाचा तमाशा अखेर आपल्या कळसावर पोहोचला आहे गेले काही दिवस राजकीय वर्तुळात जे रणक नंदन सुरू होते त्याच्या आज शेवटचा बंडा पडतोय उमेदवारी अर्ज भरणे एबी फॉर्म साठी पायाला भिंगरी लावून धावपळ करणे पक्ष कार्यालयाभोवती गर्दी आमदार खासदारांना घेराव घ**** रडा रड मन धरणे नाराजी तक्रारी हा सारा लोकशाही नाट्यप्रयोग आता तात्पुरता गुंडाळला जात आहे आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस म्हणजेच निवडणूक प्रक्रियेचा पहिला अंक संपन्न मात्र राजकारणात पंडे कायमचे पडत नसतात नाटकाचा दुसरा अंक आता सुरू होतो प्रचाराचा आणि प्रचार म्हटला की अचानक आठवण होते ती निष्ठावंत कार्यकर्त्याचे हे तेच कार्यकर्त्याचे आहेत ज्यांच्याकडे नगरसेवक होण्याची पात्रता होती निवडणूक लढवण्याची त्रीव इच्छा होते ज्यांनी पक्षासाठी वर्षं वर्षे झेंडे उचलले सभा फिरवल्या कार्यकर्त्याची फौज उभी केली पण तिकीट वाटपाच्या वेडे मात्र त्याचं नाव यादीत बसत नव्हतं काहींची तिकीट कापली गेली काहींना माघार घ्यायला भाग पाडलं गेलं तर काहींना थांबा पुढच्या वेळी मोठे संधी देऊ आमदारकीपर्यंत पोहोचलो अशी गोड आश्वासनाचे गोडी दिली गेली आणि गंमत म्हणजेच हेच नाकारलेले कार्यकर्ते आता पुन्हा मैदानात उतरवले जाणार आहेत सतरंज्या उचलण्यासाठी त्याच कार्यकर्त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध ज्यांना तिकीट दिल गेलं अशा उमेदवाराचा प्रचार करायचा आहे ज्यांना स्वतःची उमेदवारी नाकारली गेली त्यांनीच आता दुसऱ्यांच्या विजयासाठी राबायचं हीच खरी राजकीय निष्ठा कालपर्यंत पक्ष कार्यालयाच्या पायऱ्या झिंजवणारे आमदार खासदारांच्या भेटीसाठी तासन्तास वाट पाहणारे चेहरे आता नव्या भूमिकेत अवतरतील सभा मेळावे झेंडे खुर्च्या सतरंज्या बॅनर घोषणा आणि त्यासाठी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर फुकट मंजुराचे भरती सुरू होणार आहे विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतेही जाहिरात लागत नाही फुकट क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आपल्या आवडत्या पक्षाच्या कार्यालयात हजेरी लावावी मंत्री आमदार खासदार नगरसेवक यांच्या जवळच्या माणसाशी सलंगी वाढवावे एवढेच आलेखित नियम आहे निवडणूक आली की निष्ठेला अचानक प्रचंड महत्व प्राप्त होत उमेदवाराच्या यादीत नाव नसलं तरी सतरंज्या उचलण्याच्या यादीत नाव हमखास असतं आणि ही सेवा फक्त निवडणूक काळापूर्ती नसते तर पुढील पाच वर्षाच्या आश्वासनावर चालणारी असते हे लक्षात ठेवायला हवं निवडणूक संपेल निकाल लागेल सत्तेची समीकरण बदलतील पण सतरंज्या झेंडे आणि खुर्च्या उचलणारे चेहरे मात्र तेच राहतील हेच या लोकशाही उत्सवाचा कंटू उपरोधिक आणि वास्तव चित्र आहे तिकीट वरस ठरतं आता फुकट सतरंज्या झेंडे उचलणाऱ्यां ची भरती सुरू होणार आजचा आपल्या आवडत्या पक्षांच्… byमीडीया पोलीस टाईम -January 02, 2026
जिद्द आणि चिकाटीने ६६ व्या वर्षी निवृत्त उपप्राचार्यांनी मिळवली 'आयुर्वेदिक आहार व पोषण' पदविका. (नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक)शहादा, दि.०२ शिकण्याला वयाचे बंधन नसते हे शहादा येथील ६६ वर्षीय निवृत्त उपप्राचार्य प्रा. डी. सी. पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आयुष्यभर विज्ञान विषयाचे धडे देणाऱ्या या सेवानिवृत्तांनी वयाच्या उत्तरार्धात 'आयुर्वेदिक आहार आणि पोषण' (Ayurvedic Diet & Nutrition) या विषयात पदविका (Diploma) मिळवून नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.प्रा. डी. सी. पाटील हे शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे जीवशास्त्र (Biology) विषयाचे तज्ज्ञ शिक्षक, ज्येष्ठ पत्रकार आणि विविध विषयांचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे.हा पदविका अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त N.S.D.C. (National Skill Development Corporation) आणि केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (Skill India) अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या आयुर्वेद इन्स्टिट्यूटतर्फे राबवण्यात आला होता. प्रा. पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीने हे कठीण प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त केले. विज्ञान शिक्षकाने निवृत्तीनंतर आयुर्वेदासारख्या शास्त्रात अशा प्रकारची व्यावसायिक पदविका मिळवण्याचे हे जिल्ह्यातील बहुधा पहिलेच आणि एकमेव उदाहरण मानले जात आहे.या पदविकेमुळे त्यांना आता आयुर्वेद अंतर्गत आहार आणि पोषण या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करण्याची तसेच या क्षेत्रात व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदाची सांगड घालत त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.ते गत सुमारे तीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रातही कार्यरत आहेत. जिद्द आणि चिकाटीने ६६ व्या वर्षी निवृत्त उपप्राचार्यांनी मिळवली 'आयुर्वेदिक आहार … byमीडीया पोलीस टाईम -January 02, 2026
.*एका कठोर शब्दाने महाभारत घडले तेव्हा अमृतमय शब्दांचा वापर करा...**@)>स्वामी रामदयालजी महाराज*. (मानवत / अनिल चव्हाण.)———————————आपल्या व्यवहारांमध्ये नेहमी अमृतमय शब्दाचा वापर करा एका कठोर शब्दाने महाभारत घडले असे विचार आंतरराष्ट्रीय रामस्नेही संप्रदाय शहापुरा धाम राजस्थानचे चौदावे पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी 1008 श्री रामदयालजी महाराज यांनी मानवत येथील रामस्नेही संप्रदायाच्या रामबाडामध्ये सप्तदिवशीय आध्यात्मिक सत्संग महोत्सव आयोजन प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.*रामस्नेही* संप्रदाया बद्दल युवकांना वयोवृद्धांना चांगली माहिती होणे आवश्यक आहे. रामस्नेही संप्रदायाचे जन्मदाता स्वामी श्री रामचरणजी महाराज यांनी आपल्या अनुभवावरून अनुभव वाणी ग्रंथाची रचना केली. अनुभववाणी हे अलौकिक ग्रंथ आहे.ज्या ग्रंथाचे स्वाध्याय प्रबळ आहे ते शक्तिशाली ग्रंथ आहे. ग्रंथ हे अज्ञानरूपी ग्रंथीचे खंडन करणारे अवलोकिक ग्रंथ आहे. स्वामी रामचरणजी महाराज यांनी आपल्या अनुभववाणी ग्रंथातून आपल्या गुरुपुढे जाताना शिष्याने नम्रतेने व अहंकाराचा त्याग करून नतमस्तक होऊन जावे याची शिकवण दिली.हे आमच्या महापुरुषांचे संस्कार आहे. हा एक प्रकारचा भाव आहे आपण आपल्या आराध्य देवतांना जसे नतमस्तक होऊन प्रणाम वंदन करतो तसेच प्रणाम वंदन आपल्या गुरूंना आई-वडिलांना करा गुरु समोर जाताना आपल्यातील अहंकार काढूनच मग जा. आपल्या पवित्र संस्कृतीमध्ये पाच प्रकारचे वंदन प्रणाम आहे. ही आपली परंपरा आहे. परंतु आपण जाणून बुजून टाळत आहोत. आपल्यातील अज्ञानाने व अहंकाराने हेतू पुरस्फर टाळत आहोत. आपल्या गुरूच्या माघारी कठोर शब्दाचा वापर करू नका. आपल्या उत्पन्न होणाऱ्या भाव ने आपण जगाकडे पाहत नाही. आपण आपल्यातच पाहत आहोत. आपले कार्य इमानदारीने करत नाहीत. तन- मनाने गुरूंना शरण जा वंदन करा त्यांच्यापुढे नतमस्तक व्हा हात जोडा अहंकाराचा त्याग करूनच गुरूच्या चरणी जा. सौंदर्याचा, संपत्तीचा, सत्तेचा, व शक्तीचे,अहंकार करू नका.जो पर्यंत आपले शरीर सशक्त आहे. तो पर्यंत ईश्वराचे नामस्मरण करा देवदर्शनासाठी मंदिरात जा आपण या अवस्थेमध्ये विसरत आहोत. ज्यावेळी आपले शरीर साथ देत नाही तेव्हा आपणाला देवाची आठवण येते. आपल्या गुरूंच्या प्रति अनन्य भाव उत्पन्न करा त्यांचा आदर करा. आपल्या अहंकाराने व स्वार्थीपणा मुळे आपल्या शरीराला धोका देत आहोत. आपली चिंता न करता दुसऱ्यांची चिंता करा यातच आपले कल्याण आहे. आपल्या स्वार्थासाठी समाजात आपली प्रतिष्ठा वाढावी यासाठी आपण प्रयत्न करतो यासाठी पैशाचा उधळपट्टी करतो. आपल्या मनाला दुःख देऊ शकतो परंतु त्यांची वेदना काय आहे हे आपण समजू शकत नाही. राजाने प्रजेचे दुःख आणि प्रजेने राजाचे दुःख जाणावे.त्या दिवशी एक इतिहास निर्माण होईल. आपल्या स्वार्थाच्या पूर्ततेसाठी आपण मोठे अनर्थ कार्य करतो.कार्य करण्यासाठी व्यक्ती स्वतंत्र आहे. याचे परिणाम भोगण्यासाठी व्यक्ती परतंत्र आहे. आपल्या व्यवहारात नेहमी अमृतमय वाणी शब्दांचा वापर करा. एका कठोर अपमान जन्य शब्दाने महाभारताला जन्म दिला. द्रोपदी ने दुर्योधनाचा अपमान करताना अंधे का बेटा अंधा ही होता है. या कठोर शब्दावरून महाभारत घडले. संत कबीर यांनी आपल्या वाणीतून. अशा शब्दा चा वापर करून जे मधुरमय विनम्र खरे आणि हितकारी असावे. ज्या शब्दाने ऐकणाऱ्याना सुख आणि शांती मिळावी.**हैसी वाणी बोलिये. मन का आपा खोल. औरंण को शितल करे आप हो शीतल होय...**कारण या शब्दाने स्वतःच्या मनाला शांती मिळते आणि दुसऱ्यांच्या मनाला शांती मिळून चांगले संबंध निर्माण होतात. कटू आणि कठोर शब्दाने एक प्रकारची जखम देत सामाजिक क्षेत्रा पासून दूर लोटल्या जातो. काय आहे गीता. गीता ही परमात्म्याच्या हृदयातून निर्माण झालेली पवित्र गीता आहे.मानवत च्या पवित्र रामबाडाच्या संतश्री ब्र. भगतरामजी महाराज सत्संग भवनातून गीताचे महत्त्व सांगताना अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेमध्ये सर्व प्रवासी जळून खाक झाले होते. परंतु या विमान दुर्घटनेमध्ये एक छोटीशी गीता जशीच्या तशी आढळून आली.इतकी महान आहे. परमात्म्याच्या हृदयातून निघालेली गीता. असे विचार आंतरराष्ट्रीय रामस्नेही संप्रदायाचे शहापुरा धाम के पीठाधीश्वर जगद्गुरु 1008 श्री रामदयालजी महाराज यांनी येथील राम शिंदे संप्रदायाच्या रामबाडा मधील ब्र..संतश्री भगत राम जी महाराज सत्संग भवन मध्ये आयोजित सप्तदिवशीय आध्यात्मिक प्रवचन महोत्सवाच्या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.*** एका कठोर शब्दाने महाभारत घडले तेव्हा अमृतमय शब्दांचा वापर करा...**@)>स्वामी रामदया… byमीडीया पोलीस टाईम -January 02, 2026
केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा स्व. गंगाधर शिवराम आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विशाल प्रांगणात उत्साहात पार पडल्या नांदगाव ! या वर्षीच्या केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा सन 2025/26 या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील स्वर्गीय गंगाधर (अण्णासो) शिवराम आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विशाल अशा प्रांगणात अतिशय उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये कला, क्रीडा आणि सांस्कृतीक कार्यक्रमांची रेलचेल या पहावयास मिळाली. केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा सन 2025/26 या स्पर्धांचे उद्घाटन "अध्यक्ष चषक चे जनक" व शनि महाराज मंदिर संस्थान नस्तनपुरचे अध्यक्ष कथा नांदगाव तालुक्याचे माजी आमदार एडवोकेट अनिलकुमार गंगाधर आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव पंच समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री दिलीप नाईकवाडे हे होते. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, कै. एडवोकेट वि. शी. आहेर हायस्कूलच्या प्राचार्य सौ. पल्लवीताई आहेर, शनी मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष हृदय आप्पा पवार, जनरल सेक्रेटरी खासेराव सुर्वे, केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील, पत्रकार जगन पाटील यांच्यासह न्यायडोंगरी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी क्रीडा, चित्रकला,वकृत्व आणि विविध सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने एडवोकेट अनिलदादा आहे हे नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मधून या अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धांचे आयोजन दरवर्षी केले जाते त्यात प्रथम प्रत्येक शाळा स्तरावर नंतर केंद्र, बीट, तालुका व शेवटी जिल्हास्तरावर स्पर्धा घेऊन विजेत्या शाळेस हा मानाचा चषक दिला जातो. गेल्या 30 वर्षापासून या स्पर्धा अव्याहत सुरू आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विविध स्पर्धांमधून विजयी झालेल्या 38 विद्यार्थी, संघ यांना शनी मंदिर संस्थान नस्तपूनपुर यांच्याकडून आकर्षक असे स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन केंद्रप्रमुख श्री राजेंद्र पाटील आणि न्यायडोंगरी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाने यशस्वीरित्या पार पाडले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष चव्हाण यांनी केले. शरद पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. byमीडीया पोलीस टाईम -January 02, 2026
शायरी के शहंशाह अमरावती जिले के मशहूर शायर अहमद रजा 80 साल की उम्र में भी अल्लाह ने उनकी आवाज को नवाज उनकी शायरी सुनने के लिए चाहने वालों का टांडा लगा रहता है उनको मिलने का समय 5:00 बजे असर के बाद पठान चौक पर मिल सकते हैं🌹🌹🤲🏼👌 अब सुनिए उनकी शायरी इलेक्शन के ऊपर में फिर इलेक्शन है करीब शहर के हालात होते जा रहे हैं अजीब फिर कोई फितना उठेगा इलेक्शन है करीब गली चौराहे पर हर मोड़ पर हर चौक पर मंडप सजे हुए हैं फिर इलेक्शन है करीब हर गली हर चौक को दुल्हन की तरह सजाया गया है फिर इलेक्शन है करीब अपने-अपने शान में गाने बजाए जाएंगे किसने कितना तीर मारा बताया जाएगा फिर इलेक्शन है करीब नसीब अपने आज मांगे खोटे खरे सभी आएंगे मैदान में नसीब आजमाएंगे फिर कोई फितना उठेगा इलेक्शन है करीब🌹👌 अहमद रजा अमरावती byमीडीया पोलीस टाईम -January 02, 2026
नेरी कडून जळगाव कडे जाणाऱ्या मोटरसायकलचा अपघात, (जामनेर/ प्रतिनिधी )नेरी कडून जळगाव कडे जाणाऱ्या एम एच 19 बी एफ 79 90 नंबरच्या मोटरसायकलचा चिंचोली जवळच्या पुलावरून खाली कोसळून अपघात झाला, त्या पुलाची खोली वीस फूट असेल व खाली कोसळली त्या जागी दगडे होती, व मोटर सायकल डबल सीट असल्याकारणाने फुल वेगामध्ये गाडी पुलावरून वीस फूट खोल नाल्यामध्ये कोसळली ,या मोटरसायकल वरती एक पुरुष व महिला असल्याचे स्थानिक नागरिकांनी माहिती दिली, ज्यावेळेस घटना स्थळाचे दृश्य बघितले तर तेथील दृश्य भयानक होते, मोटर सायकल वीस फूट खोल नाल्यात पडलेली गाडीचे हेड लाईट फुटलेले शोकप बेंड झालेले कपड्यांच्या पिशव्या फाटून कपडे व साड्या ,रक्ताने भरलेला लेडीज रुमाल ,व गाडीच्या बाजूला पसरलेले रक्त, हे दृश्य बघून सर्व येणाऱ्या जाणाऱ्यांचे हृदय पिढवून टाकणार हे दृश्य होतं, सर्व लोक कुतूहलाने एकमेकांना विचारणा करीत होते की हे गाडीवरील स्त्री पुरुष वाचले असतील का, काही लोक म्हणत होते की गाडी चालक दारू तर पिलेला नसेल, स्पॉट अपघात होण्यासारखा नाही ,तरी गाडी पुलाच्या खाली कशी पडली कारण काहीही असो मात्र अपघात ग्रस्त व्यक्ती जिवंत असावेत असे सर्वांना वाटत होते, घटनास्थळ व गाडीच्या आजूबाजूला पडलेला वस्तू बघता असे वाटत होते की ,अपघात ग्रस्त व्यक्ती गरीब घरचा असेल, असे घटनास्थळावरून वाटत होते, अपघाताचे कारण काहीही असो, मात्र गरिबीची परिस्थिती आणि दवाखान्याचा खर्च व दवाखान्याचा खर्चही करून आलेले अपंगत्व त्यातच घरातील एकमेव कमावणारे व्यक्ती, अपघाताने सर्वसाधारण माणसाच्या पूर्ण कुटुंब उध्वस्त होतो ,ते लहान मुले ,म्हातारे आई-वडील, आणि गरिबीची परिस्थिती या अपघातामुळे अपघात झालेल्या व्यक्तीचा पूर्ण संसार उध्वस्त होतो, त्यामुळे सर्व वाहन चालकांनी व्यवस्थित वाहन चालवायला हवे, कारण आपल्या एका चुकीमुळे समोरच्या वाहन चालकाचा मृत्यू होऊ शकतो, किंवा त्याला कायमचे अपंगत्व येऊ शकते, त्यामुळे सर्व वाहनधारकाने जबाबदारीने वाहन चालवावीत जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्या व्यक्ती वरती दुःख येऊ नये पत्रकार अंबादास संतोष जाधव mo 97670 22719 नेरी कडून जळगाव कडे जाणाऱ्या मोटरसायकलचा अपघात,… byमीडीया पोलीस टाईम -January 01, 2026
नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्या दिवसीच पंचसूत्री योजना सुरू करणार---- शंकर बोल्लमवाड पत्रकार परिषदेत दिली सविस्तर माहिती. (धर्माबाद(वार्ताहर ) नगरपालिका २०२५ च्या निवडणुकीचा निकाल दिनांक २१ डिसेंबर २०२५रोजी लागला. या निवडणुकीत नवीन स्थापन झालेल्या मराठवाडा जनहित पार्टीने नगराध्यक्ष व १५ नगरसेवक यांना प्रचंड मताने निवडूण आल्यानंतर मजपा पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शंकर बोल्लमवाड यांनी दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्याच्या आधीच नगर विकासासाठी हाती घेतलेल्या योजनेची माहिती दिली आहे. या परिषदेत मजप पार्टीचे मार्गदर्शक मोईजोद्दिनसेठ बिडीवाले करखेलीकर, व सचिव ताहेर पठाण यांची उपस्थिती होती.मजप पार्टीचे संस्थापक महेश उर्फ शंकर बोल्लमवाड यांनी पत्नी संगीता बोल्लमवाड यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देऊन सर्व अधिक५७१६ आणि विजय करून नऊ पैकी सात नगराध्यक्ष पदाचे महिला उमेदवारांची डिपॉझिट जप्त करून विजय झाले आहेत.२२ नगरसेवकापैकी स्वतः सह १५ नगरसेवक प्रचंड मतांनी विजयी करून बहुमत सिद्ध केले आहे.हा धर्माबाद च्या इतिहासातील ऐतिहासिक विजय समजला जातो. धर्माबाद नगरपालिकेवर पहिलाच मजपाचा झेंडा नवीन पार्टीने रोवला आहे.नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणे आधीच दि.३० डिसेंबर २०२५ रोजी येथील गोदावरी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद बोलावून नगरपालिकेचा विकास कसा करणार? यासाठी दिलखुलास माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेस पक्षाचे मार्गदर्शक मोईजोद्दीन सेठ बिडीवाले करखेरीकर उपस्थित होते.मजप पार्टीचे संस्थापक अध्यक्ष महेश उर्फ शंकर बोल्लमवाड यांनी विजयानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराचे शब्द सुमनाने स्वागत व अभिनंदन केले आहे तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पुढील प्रमाणे पत्रकार परिषदेत त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.मराठवाडा जनहित पार्टी ही भाजप ची बी टीम नसून हा स्वतंत्र पक्ष आहे. धर्माबाद शहराचा विकास हा आमचा एकच ध्यास एवढ्यासाठीच पक्षाची स्थापना केलेली आहे. माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी आमच्या पक्षाला सहयोगी पक्ष म्हटलेले आहे पण भाजपची बी टीम नाही पहिले स्पष्ट केले आहे.नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलेल्या दिवशीच आम्ही पंचसूत्री योजना सुरू करणार असे यांनी जाहीर केले आहे.नगर उपाध्यक्ष पद हे मजप पार्टीचाच राहील. एक स्वीकृत सदस्य मजपाचा व एक भाजपाचा स्वीकृत सदस्य राहील.मजप नी दिलेला नगर विकासाचा जाहीरनामा तंतोतंत अमलात आणणार असून त्यात तडजोड होणार नाही तसेच धर्माबाद करांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे अभिवचन दिले आहे.कुणावरही टीकास्त्र न करता विकास कामाचे नियोजन करून राहिलेल्या समस्या पूर्ण करणार , सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.नवीन योजनेपैकी ,टोल फ्री नंबर दिला जाईल, एक खिडकी योजना सुरू केली जाईल, इनामी व अवकाफ, वन विभागाच्या जागेवर बांधलेल्या घरांना सेवाशुल्क पावती देणार, बेरोजगारासाठी एमआयडीसी या योजनेचा पाठपुरावा करणार, आठवडी बाजाराचा प्रश्न सोडवणार, रस्ते, नाली बांधकाम करून शहर स्वच्छता अभियान योजना जोमाने राबविणार, वीज पुरवठा नियमित करण्यासाठी योजना राबविणार, आवश्यक असलेल्या नगरात बालवाडी सुरू करणार, शासनाने दिलेल्या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार. गुंठेवारी पद्धतीचा नियमाने प्रकरण सोडविणार. आमचा पक्ष नवीन असून काही उनिवा वाटल्यास मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा केली आहे. . बैठकीनंतर सुरुची जेवणाची व्यवस्था केली होती.पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक व आभार पार्टीचे सचिव ताहेर पठाण यांनी केले आहे. पत्रकारांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.धर्माबाद च्या इतिहासात कोणत्याही नगराध्यक्षांनी पत्रकार परिषद बोलावलेली नव्हती. निवडणुकीपूर्वी तसेच निवडणुकीनंतर पदभार स्वीकारणे आधी अशा दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती देणारे पक्षाचे अध्यक्ष महेश उर्फ शंकर बोल्लमवाड हे एकमेव ठरले आहेत. नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्या दिवसीच पंचसूत्री योजना सुरू करणार---- शंकर बोल्लम… byमीडीया पोलीस टाईम -January 01, 2026