वर्धा... श्रीकृष्ण मंदिर तडस लेआउट रघुजी नगर वर्धा मोफत आयुर्वेदिक तपासणी शिबीर संपन्न. (वर्धा.. ग्रामीण प्रतिनिधी विपुल पाटील ) आज दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी श्रीकृष्ण मंदिर येथे महानुभाव पंथातील साधुसंत भिक्षुक वासनिक यांना मोफत आयुर्वेदिक मेडिसिन तपासणी करून 150 साधुसंतांची सेवा करण्यात आली. प. पू. म. श्री. से वतकर बाबा श्रीकृष्ण मंदिर येथील मुख्य मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. मोफत आयुर्वेदिक आरोग्य सेवा डॉ. विनोद विनायकराव देशमुख महानुभाव पंथ सेवक नाडीतज्ञ, आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर व आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी आपली सेवा प्रदान केली. सोबत सौ छाया विनोद देशमुख महानुभाव पंथ सेवक. कू. नंदिनी पाटभाजे नर्स श्री अनिल कराळे श्री प्रमोद धवड mr वर्धा, श्री साहिल काळे mr यवतमाळ यांनी खूप परिश्रम घेतले. त्यानंतर वर्धा यवतमाळ नागपूर अमरावती येथील आयुर्वेदिक मेडिसिन विक्रेते यांनी या कार्यक्रमाकरिता मोफत मेडिसिन दिली त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद मानले. तसेच श्रीकृष्ण मंदिराचे संस्थापक. प. पू. म. श्री. से व त्कर बाबा यांनी डॉ विनोद देशमुख यांना शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला व त्यांना आशीर्वाद देऊन असेच तुमच्या हातून कार्य घडत राहो ही बाबांनि आशीर्वाद दिला तसेच तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. शेवटी डॉ विनोद देशमुख यांनी सर्वांचे आभार मानून व महानुभाव पंथातील साधुसंत भिक्षुक वासनिक यांची सेवा करण्याचा जो मला प्रभू चरणी आशीर्वाद दिला त्याबद्दल त्यांनी असेच माझ्या हातून कार्य होत राहो ही प्रभू चरणी प्रार्थना केली. व आभार प्रदर्शन करून सर्वांचे साधुसंतांचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला. .. श्रीकृष्ण मंदिर तडस लेआउट रघुजी नगर वर्धा मोफत आयुर्वेदिक तपासणी शिबीर संपन्न.… byमीडीया पोलीस टाईम -January 12, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं -१ शाळेत आनंददायी रविवार उपक्रमांतर्गत आनंदी आठवडा बाजाराचे आयोजन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ शाळेत आनंददायी रविवार उपक्रमांतर्गत आज आनंदी आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक सखाराम शेंडकर यांनी दिली.पुणे जिल्ह्यामध्ये बेल्हे हे गाव आठवडा बाजारासाठी प्रसिद्ध गाव आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना बाजारातील व्यवहाराचे खूप चांगले ज्ञान आहे.त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंदी आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले . ग्रामपंचायत सदस्या पल्लवी ताई भंडारी,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ,यांच्या शुभहस्ते शालेय बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. बाजारामध्ये मुलांनी मेथी ,पालक ,भोपळा, मिरची ,वांगी, भेंडी असा अनेक प्रकारचा भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. त्यासोबत विविध प्रकारची फळे,खाऊ गल्ली, कडधान्य,किरकोळ विक्रीच्या वस्तू ,मनोरंजक खेळ बाजारामध्ये आणले होते. या प्रसंगी उपसरपंच राजेंद्र पिंगट,सावकार पिंगट,कैलास औटी,स्वप्नील भंडारी,गणेश चोरे,मनुआप्पा भोरे, मा.अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले,स्वप्निल शिंदे, शालेय व्यवस्थापन सदस्य ईश्वर पिंगट, प्रशांत औटी,विलास पिंगट,स्वाती कोकणे,गोरक्ष शिरतर, पायल सोनवणे, नसरीन पठाण, सुवर्णा कदम यांनी यावेळेस उपस्थित राहून आंनदी बाजारात खरेदी करत प्रतिसाद दिला. पालकांनी बाजाराला उत्कृष्ट प्रतिसाद देत आनंदी बाजारामध्ये सहभाग घेत बाजारात खरेदी केली. सर्वांच्या सहकार्यामुळे बाजारामध्ये पंचवीस हजार रुपयांची उलाढाल बाजारात झाली. सर्व उपस्थित मान्यवरांनी ,पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .इतर वेळी आपल्या आई वडिलांबरोबर बाजार आणण्यासाठी जाणारे बालचमु आज स्वतः वस्तूंची देवाण-घेवाण करत होते व व्यवस्थित पैशाचा हिशोब करत होते हे पाहून शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी पालकांनी समाधान व्यक्त केले.शाळेच्या उपशिक्षिका मीरा बेलकर , उपशिक्षिक हरिदास घोडे,अशोक बांगर,रोहिदास साळवे,संतोष डुकरे,नूरजहाँ पटेल,प्रविणा नाईकवाडी , सुषमा गाडेकर ,अंजना चौरे या सर्व शिक्षकांनी या आनंदी बाजाराचे नियोजन केले. केंद्रप्रमुख वनिता हांडे ,विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे, गटशिक्षण अधिकारी अशोक लांडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं -१ शाळेत आनंददायी रविवार उपक्रमांतर्गत आनंदी आठवडा बाजाराचे … byमीडीया पोलीस टाईम -January 12, 2026
अनुष्का तुझ्या पेक्षा आमचा इगो व तलबी खुप मोठ्या आहेत बाळा, तुच काय आणखी तुझ्यासारख्या कित्येक गेल्या तरी आम्हाला फरक पडत नाही. त्यामुळे तु गेल्याने फक्त औपचारिकता पुर्ण करुन आम्ही आमचे बैदफैली संदेश पाठवत आहोत. खुप दळभद्री आवस्थेत आहोत परंतु बाळा आम्हाला माफ कर आम्ही देखील फकिरा सारखे आतून बाहेरुन घेरल्या गेलोत. अनेक प्रकरणात आवाज उठवणारे आम्ही अगदी त्या नटरंग मधल्या सम्राटासारखे खोट्या आरोपांनी इतके बदनाम झालोत की, त्यामध्येच आमचा शेवट निश्चित आहे. कारण या समाजातल्या शिक्षीत, धनवंतानी तसा विडा उचलला आहे. तरी जसे जमेल, जितके जमले तसे लढू तुझ्या आई, वडिलांना भेटलो. तुझे घर, तुझा भाऊ यांची विचारपुस केली. मनसुन्न झाले, घालमेल झाली, पोलिस अधिक्षक यांना तब्बल अर्धा तास चर्चा केली. यामध्ये अनेक प्रश्न, शंका या दृष्टीने तपासाची दिशा, लावण्यात आलेले सेक्शन, याचा आढावा घेतला. स्व:ता यंत्रणेतील उच्चधिकारी हत्येची शंका मान्य करतात परंतु बिएनएस सेक्शन 103 अद्याप लागले नाही. पोलीस अधिक्षकासोबत चर्चा, आई वडिलासोबत चर्चा व किरण गायकवाड सोबत चर्चेवरुन या प्रकरणात खुप मोठा कट सुनियोजीत पध्दतीने शिजत असल्याचा अंदाज आला आहे. पोलीस अधिक्षक व पोलीस यंत्रणा यांनी दाखल सेक्शन 108 चे समर्थन करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. यासाठी त्यांनी पिएम रिपोर्ट तसा बणवत तो पुरावा तयार केला आहे. यामध्ये जिल्हाधिकारी देखील आतून सहभागी असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अता पोलीस यामध्ये हत्येचे सेक्शन दाखल करणार नाहीत जर त्यांना ते दाखल करायचे असते तर त्यांनी दोण अटक आरोपीला एमसिआर मिळू दिला नसता. दिनांक 2 ते 4 पर्यंत बाहेरील सिसिटीव्ही फुटेजमधले सर्व संशयीत ताब्यात घेऊन तपास केला असता. परंतु तसे न करता पोलीस फक्त सारवा सारव करत दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचे लक्षात येत आहे. एकतर झोपलेला समाज, आवसरवादी समाज, बुजदील व आत्मकेंद्री समाज व कर्मचारी संघटना मदमस्तीत आहे. त्यामुळे आम्ही तिथे गेलो असता तो हल्लाकल्लोळ सोशल मिडीयावर आहे त्यादृष्टीने स्थानिक वातावरण अगदी शांत वाटले. खोलवर चर्चेतून असे समजते की, लातूर एलसिबीने स्थानिक कार्येकर्त्याना दुर राहण्याचा इशारा दिला आहे व तो पैत्रा काम करत आहे. वरील हे सर्व स्थिती ही मातंग समाजासाठी आव्हाणात्मक आहे स्विकारायचे का आमच्या तलबी दुनियेत मदमस्त रायचे ते प्रतेकाने ठरवले पाहिजे. समाजाला शिस्त लावता लावता आम्ही बदनाम झालो परंतु शिस्त लागली नाही. परंतु या बेशिस्तीचा, मग्रुरीचा, संधिसाधू वृत्तीचा, राजकीय चापलूसीचा हा भयानक परिणाम आहे जर इथे आत्मभान पेटले नाही तर हा समाज नाही हेच सिध्द होईल. " *येतील वादळे, खेटेल तुफान,तरी वाट चालतो..अडथळ्यांना भिवून अडखळणे,पावलांना पसंत नाही..* " *अनुष्का हम शर्मिंदा हैं, पर लढेंगे ऐ वादा हैं "* ॲड. विलास साबळे(संस्थापक अध्यक्ष मातंग युथ फेडरेशन महाराष्ट्र राज्य) byमीडीया पोलीस टाईम -January 12, 2026
अकोला:- दि. 12/012026 रोजी जिल्हाधिकार्यालय अकोला येथे लातुर जिल्ह्यातील, औसा तालुक्यातील टाका गावच्या अनुसूचित जातीतील, मातंग समाजातील विध्यार्थीनीचे लातूर जवाहर नवोदय विद्यालय येथे स्व.अनुष्का किरण पाटोळे या 12 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला असुनहे प्रकरण अतिशय संशयास्पद आहे, लातूर नवोदय विद्यालय प्रशासनाने या प्रकरणाला आत्महत्याच स्वरूप दिले असून स्वर्गीय अनुष्काचे मागील काळातील वागणूक, शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग, एकंदरीत धाडसी स्वभाव/ व्यक्तिमत्व पाहता एवढी हुशार व मुलगी तेही फक्त 12 वर्षाची असताना आत्महत्येचा निर्णय कसा घेऊ शकते? असे अनेक प्रश्न अनुष्काचे कुटुंब व समाज बांधव या नात्याने आम्हाला सर्वांना पडले आहे, अनुसूचित जातीतील एका गुणवंत 12 वर्षीय विद्यार्थिनीचा जवाहर नवोदय विद्यालय मध्ये पद्धतीने मृत्यू होणे ही बाब अत्यंत गंभीर असून याबाबत सर्व समाज बांधवांच्या वतीने आपण या संदर्भात त्वरित एसआयटी स्थापन करून प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश द्यावे व दोषींना कठोर शिक्षा द्यावी याकरिता अकोला जिल्हा समस्त मातंग समाजावतीने निवेदन देत आहोत.. याप्रसंगी, युवा नेते परिमल कांबळे, रामदास तायडे, प्रकाशजी तायडे, विष्णू भाऊ शेलारकर, जयदेवजी इंगळे, यशोदाबाई गायकवाड, सुभेदार रमेशजी खंडारे, विजयजी बांगर, प्रकाशभाऊ तायडे, राहुल तायडे, ऋत्विक बोरकर, सागर नाटेकर, गिरीश बांगर, श्रीकृष्ण चव्हाण, रुपेश बोरकर, सौ छाया अंभोरे, संगीता वानखडे, राजेश खंडारे, श्याम तायडे, सुनील धुरदेव, विनोद खवेकर सुभाष वानखेडे, अनिकेत तायडे, गोविंदा साबळे, गोदावरीताई भटके, विमलताई वानखडे, संगीताताई वानखेडे, पुष्पाताई अंभोरे, अनिल सपकाळ, अमर इंगळे, इत्यादी प्रमुख कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते. byमीडीया पोलीस टाईम -January 12, 2026
वाशिम रेलवे स्टेशन परिसर में महिला की नृशंस हत्या, आरोपी गिरफ्तार.. वाशिम।रेलवे स्टेशन परिसर में एक बार फिर सुरक्षा व्यवस्था पर गंभीर प्रश्नचिह्न खड़ा हो गया है। वाशिम रेलवे स्टेशन के विश्राम कक्ष के पास एक अज्ञात महिला की अत्यंत नृशंस हत्या किए जाने की सनसनीखेज घटना शुक्रवार (9 जनवरी) की सुबह उजागर हुई। पुलिस जांच में यह स्पष्ट हो गया कि महिला की हत्या की गई है, वहीं त्वरित कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है।प्राप्त जानकारी के अनुसार, रेलवे स्टेशन अधीक्षक कार्यालय से सूचना मिलते ही वाशिम शहर पुलिस तत्काल घटनास्थल पर पहुंची। विश्राम कक्ष के सामने सुरक्षा दीवार के पास लगभग 45 से 50 वर्ष आयु वर्ग की महिला अर्धनग्न अवस्था में पड़ी हुई मिली। उसके माथे और सिर पर गंभीर चोटों के निशान थे तथा अत्यधिक रक्तस्राव के कारण उसकी मौके पर ही मृत्यु हो चुकी थी।घटनास्थल का सूक्ष्म निरीक्षण करने पर पुलिस को एक नुकीला पत्थर, पुरुषों का बेल्ट, खाने-पीने का सामान तथा देशी और विदेशी शराब की खाली बोतलें बरामद हुईं। इन साक्ष्यों से प्रथम दृष्टया यह मामला संदिग्ध प्रतीत हुआ और हत्या की आशंका और प्रबल हो गई।पुलिस ने तत्काल स्टेशन परिसर और आसपास लगे सीसीटीवी कैमरों की जांच शुरू की। फुटेज के आधार पर संदेह एक व्यक्ति पर केंद्रित हुआ। इसके बाद अमरावती जिले के दर्यापुर तालुका स्थित अडूला बाजार निवासी संतोष रामराव खंडारे को अकोला रेलवे स्टेशन परिसर से हिरासत में लिया गया।पुलिस पूछताछ के दौरान आरोपी ने चौंकाने वाली स्वीकारोक्ति की। उसने पहले महिला के साथ दुष्कर्म किया और उसके बाद पत्थर से कुचलकर उसकी हत्या करने की बात कबूल की। इस मामले में वाशिम शहर पुलिस थाने में आरोपी के विरुद्ध हत्या सहित गंभीर धाराओं में मामला दर्ज कर लिया गया है तथा आगे की जांच जारी है।रेलवे स्टेशन जैसे अत्यंत भीड़भाड़ वाले स्थान पर इस प्रकार की घटना सामने आने से नागरिकों में भय और आक्रोश का माहौल है। विशेष रूप से महिलाओं की सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है। नागरिकों ने रेलवे प्रशासन और पुलिस से स्टेशन परिसर में सुरक्षा व्यवस्था और अधिक सुदृढ़ करने, निगरानी बढ़ाने तथा रात्रि गश्त को प्रभावी बनाने की मांग की है। वाशिम रेलवे स्टेशन परिसर में महिला की नृशंस हत्या, आरोपी गिरफ्तार..… byमीडीया पोलीस टाईम -January 12, 2026
कुठे आणि का होत आहेत सरकारचे तक्तापालट, (जामनेर /प्रतिनिधी) पूर्ण विश्वामध्ये भरपूर देशांमध्ये तक्तापालट होताना आपण बघितले, तक्ता पालट देशांमध्ये श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, अशा अनेक देशांमध्ये सरकारचा तक्तापालट जनतेने केलेला आहे, जनता का तक्ता पालक करीत असेल, हा विचार करणे महत्त्वाचे आहे, कारण तक्तापालट करणे म्हणजे मिळालेल्या स्वातंत्र्याचे व जनतेने निवडून दिलेल्या सरकारला विरोध करून किंवा सरकारच्या विरोधात लढून त्या सरकारला हरवून इतर व्यक्तीला त्या खुर्चीवरती बसवणे, व आपल्या देशाचा सर्व अधिकार त्या व्यक्तीला द्यायचा एवढे कार्य करण्यासाठी जनतेला आपला जीव धोक्यात घालावा लागतो, आपल्या देशातील नेत्यांच्या विरोधात आंदोलने करणे, रस्ता रोको आंदोलने करणे, कार्यालय टाळे ठोक आंदोलने करणे, सरकारच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणे ,हे सर्व लढाई जीवघेणी असून देखील जनता सरकारच्या विरोधात लढाई लढत आहे, आपण श्रीलंका मध्ये तक्तापालट का झाला याचे मुद्दे बघू, 1) शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, 1)रोजगारांना योग्य मजुरी वेतन नाही२) शिक्षण विद्यालयांमध्ये मोठी फी वसुली ( डोनेशन) ३) मागासलेल्या जमातींच्या राखीव निधी मध्ये भ्रष्टाचार ,4) शासकीय कार्यालयांमध्ये असविधानिक पद्धतीने पैशाची मागणी करणे, 5) नेत्यांमध्ये राष्ट्रप्रेम नसणे, नेत्यांची संपत्ती सुख सोयी हाय लेवलच्या असणे, 6) देशाचा विकास होत नसल्याने, 7) सरकारने मोठमोठे घोटाळे केल्यानेअशा अनेक कारणाने श्रीलंकेमध्ये तक्तापालट झाले आहे ,कारण तक्ता पालट करण्यासाठी ज्या देशातील नागरिकांमध्ये देश प्रेम ,आपुलकी व देशाचा विकास व्हावा अशी दृढ इच्छाशक्ती असणारी जनताच तक्ता पालट करून ,योग्य शासक निवडून ,सरकारी खुर्चीवरती बसवतील ,तोच देश विकास करेल, श्रीलंकेची जनता क्रांतिकारी आहे ,व त्यांच्यामध्ये त्यांच्या देशाबद्दल प्रेम आहे ,आज ना उद्या श्रीलंकेचा विकास होणारच परंतु ज्या देशांमध्ये भ्रष्टाचार आणि देशाचा विकास झालेला नाही, शेतीमालाला, रोजगारांना ,नोकरदारांना, योग्य वेतन नाही ,अशा देशांनी सुद्धा सरकारच्या विरोधात आंदोलने करून सरकार जवळून आपला अधिकार घ्यायला हवा, तरच आपली राष्ट्रभक्ती सिद्ध होईल ,नाहीतर हम जिये भी तो क्या और हम मरे भी तो क्या या म्हणीप्रमाणे आपले हाल होतील ,विश्वातील प्रत्येक देशाच्या मंत्र्यांनी ज्या त्या देशाच्या जनतेला, जातीभेद मध्ये अटकवून ठेवलेले आहे, फोडा आणि राज्य करा ,या पद्धतीने नेते देशातील जनतेचे शोषण करीत असतात ,त्यांच्या राखीव निधी खात असतात ,जर (अ)समुहाचा पैसा नेत्यांनी खाल्ला तर (ब)समूहाला माहिती जरी मिळाली तरी तो (ब) समूह आवाज उठवत नाही (क) समूहाचा निधी गडप केला आणि( अ)समुहाला माहिती जरी असली तरी (अ)समूह आवाज उठवीत नाही अशाप्रकारे सरकार मधील नेते सर्व जाती धर्माच्या लोकांच्या पैसे निधी गडप करतात ,व आपण म्हणतो की माझ्या समूहाचे पैसे थोडी खाल्ले, आपण जर प्रत्येक समूहाच्या निधीचा योग्य वापर करण्यास सरकारला भाग पाडले तर, आपला देश नक्कीच विकास करेल, पत्रकार अंबादास संतोष जाधव 9767022719 कुठे आणि का होत आहेत सरकारचे तक्तापालट, byमीडीया पोलीस टाईम -January 12, 2026
वर्धा शहरात अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी आणि ठोस कारवाई करत मॅफेडॉन (MD) तस्करी करणाऱ्या एका आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹2,28,550/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या दारूबंदी पथकाने धुनीवाले चौक परिसरात नाकाबंदी करून पंचासमक्ष सापळा रचला. या दरम्यान संशयित आरोपीकडून अवैध मॅफेडॉनची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले.जप्त मुद्देमालाचा तपशील :मॅफेडॉन (MD) – 41.07 ग्रॅम(प्रति ग्रॅम ₹5,000/- प्रमाणे) किंमत ₹2,05,350/-CMT कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मोबाईल – ₹10,000/- हिरो कंपनीचा मोबाईल – ₹3,000/-रेडमी कंपनीचा मोबाईल – ₹10,000/-हिरवट रंगाची सॅग बॅग – ₹200/-एकूण जप्त मुद्देमाल : ₹2,28,550/-आरोपींची माहिती :शुद्धोधन मुकुंद माटे, वय 36 वर्षेरा. नागसेन नगर, नालवाडी, ता. जि. वर्धातसेच या प्रकरणात एक अल्पवयीन मुलगी सहभागी असल्याचे उघड झाले आहे.आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम 8(क), 21(ब), 29 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईही संपूर्ण कारवाई सौरभ कुमार अग्रवाल (पोलीस अधीक्षक, वर्धा),सदाशिव वाघमारे (अप्पर पोलीस अधीक्षक)आणि मा. प्रमोद मकेश्वर (उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा)यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.प्रभारी पोलीस निरीक्षक टाले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक टोपले तसेच दारूबंदी पथकातील अंमलदार अवि बनसोड, मुकेश वांदिले, विकी अणेराव, मनोज भोमले, नितेश वैद्य व महिला अंमलदार कुंदा तूरक यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.अमली पदार्थांविरोधात पोलिसांचा इशारावर्धा जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे...मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक वर्धा शहरात अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी आणि ठोस कारवाई करत मॅफेडॉन (MD) तस्करी करणाऱ्… byमीडीया पोलीस टाईम -January 12, 2026
दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशिय संस्था पिंपरूड, ता.यावलजिल्हा जळगाव द्वारा आयोजित ६ जानेवारी मराठी पत्रकारदिन हा राष्ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ जयंती १२जानेवारी २०२६ वार सोमवार रोजीच्या * दिव्यांगांसाठीउत्कृठ कार्य करणा-या शासकीय अधिकारी / कर्मचारी वपत्रकार बंधुंचा सन्मान कार्यक्रमात *दिव्यांग मित्र #* म्हणुनमला मा. बबनरावजी काकडे साहेब उपविभागिय अधिकारीफैजपुर भाग यांचे हस्ते मा.श्री.डॉ. मारोती पोटे साहेब, दिव्यांगमंडळ अध्यक्ष जळगाव, मा.श्री. प्रा. शैलेश पाटील सर DIETअधिव्याख्याता यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊनसन्मानित करण्यात आले दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशिय संस्था पिंपरूड, ता.यावलजिल्हा जळगाव द्वारा आयोजित ६ जानेवारी मराठी… byमीडीया पोलीस टाईम -January 12, 2026
*ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा* (यावल तालुका विभागीय उपसंपादक फिरोज तडवी:- ) ज्योती विद्या मंदिर, सांगवी बुद्रुक (ता. यावल) येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजामाता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी रेड रिबन क्लब व ग्रामीण रुग्णालय, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने NCC कॅडेट्ससाठी १०० मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात NCC अधिकारी श्री. पी. एम. भंगाळे यांनी राष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व विशद केले. युवकांमध्ये आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती, चारित्र्यनिर्मिती व सेवाभाव निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.“उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” हा स्वामी विवेकानंदांचा संदेश आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.धावण्याच्या स्पर्धेचे उद्घाटन सांगवी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. अतुल फिरके यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.स्पर्धेच्या निकालातमुलींच्या गटात वैष्णवी प्रकाश कोळी हिने प्रथम, हेमांगी सुपडू कोळी हिने द्वितीय तर नेहा विकास चौधरी हिने तृतीय क्रमांक पटकावला.मुलांच्या गटात प्रणय भूषण पाटील प्रथम, अंश दिनकर सोनवणे द्वितीय व ज्ञानेश खिलचंद चौधरी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.विजेत्या व सहभागी NCC कॅडेट्सचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. भंगाळे यांनी केले. यावेळी श्री. वसंत संदानशिव (समुपदेशक, ICTC विभाग), श्री. पवन जगताप (लिंक वर्कर), श्रीमती कांचन चौधरी (समुपदेशक, RKSK), ग्रामीण रुग्णालय यावल पर्यवेक्षक श्री. सी. पी. फिरके तसेच भाऊसाहेब सतीश सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व विजेत्या कॅडेट्सना ट्रॉफी व प्रमाणपत्र, तर सहभागी कॅडेट्सना सहभाग प्रमाणपत्र रेड रिबन क्लबच्या वतीने देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.कार्यक्रमाचे आभार NCC कॅडेट तौसिफ तडवी यांनी मानले. ज्योती विद्या मंदिर सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त धावण्याची स्पर्धा*… byमीडीया पोलीस टाईम -January 12, 2026