मानवतकरांना दिलेला शब्द पूर्ण केला. *@} डाॅ. अकूंशराव लाड.* (मानवत ( अनिल चव्हाण )——————————नगरपरिषद निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण;नवा मोंढा परिसरातील रोड व नाली कामाचा शुभारंभ मानवत शहरातील प्रभाग क्रमांक १ अंतर्गत नवा मोंढा पंचशील नगर येथील रोड व नाली कामाचा शुभारंभ आज डाॅ. अकूंशराव यांच्या श्री,हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, महिला व मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.मोंढा व पंचशील नगर या भागातील सदर रस्ता प्रलंबित असल्याने नागरिकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत होता. मानवत नगर पालिका निवडणुकीत शब्द दिला होता. हा रस्ता तात्काळ पूर्ण करून देण्यात येईल. त्यानुसार निधी मंजूर करून आज या रस्त्याचे व नाल्याच्या कामाची प्रत्यक्षात सुरुवात केली. लवकरच याठिकाणी सुसज्ज व चांगला रस्ता नागरिकांना दळण वळणासाठी उपयुक्त ठरेल.याप्रसंगी उपस्थितांनी माझा सत्कार करत आभार मानले. या आभाराला उत्तर देताना मी सांगितले की, 'केवळ रस्ताच करून थांबणार नाही, तर प्रभाग क्रमांक १ मधील कुठलेही काम प्रलंबित राहू देणार नाही. तसेच स्वच्छ व सुंदर असा हा प्रभाग सर्वांच्या सहकार्याने बनवून दाखवू.'कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक प्रकाशजी पोरवाल, संजयजी बांगड, रामनिवासजी सारडा, गोपालजी मंत्री, मोहनराव लाड, दत्ताभाऊ चौधरी, अँड.अनिरुद्ध पांडे सर, अभिषेक आळसपुरे, स्वप्निल शिंदे, गणेश मोरे, संतोष सपाटे, रहीम भाई आडतवाले, चंदनसिंग ठाकूर, आनंद जाधव, जुगलकिशोर काबरा, नगरसेवक राजूभैया खरात व राजेश वासुंबे, गणेशतात्या वासुंबे, कांताबाई गवळी, विनायक कोरडे, श्रावण गायकवाड, रवी शहाणे, नितीन अवचार, अशोक खंदारे, बापूराव वाकळे, अविनाश रोकडे, राहुल चिंचलवाड, दिनेश बोईनवाड, पिरण भाई, विठ्ठल निर्वळ, सिद्धार्थ ढाले, दादा भदर्गे, रत्नदीप बोराडे, श्याम वाकळे, प्रधान कांबळे, सोनु अवचार, करीम भाई, साद भाई, रामा पवार, अक्षय खरात, विक्रमबाबा शिंदे, अविनाश धापसे, पापणराव फुलारी यांच्यासह प्रभागातील नागरिक व महिलांची उपस्थिती होती.** मानवतकरांना दिलेला शब्द पूर्ण केला. *@} डाॅ. अकूंशराव लाड.*… byमीडीया पोलीस टाईम -March 14, 2026
सगरोळी ते शिंगणापूर महादेव काठी,पदयात्रा 300 वर्षाची परंपरा. (मारोती एडकेवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड) नांदेड : बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील 300 वर्षाची परंपरा कायम ठेवत, दर वर्षी प्रमाणे याही वर्षी महादेव काठी पदयात्रा सगरोळी येथून, दिनांक 13/03/2026 रोजी सकाळी महाआरती व सर्व गावकऱ्यांनी आशीर्वाद घेऊन हार हार महादेव च्या घोषणा देत निघाली आहे बिलोली,तालुक्यातील सगरोळी हे मोठे गाव असून या गावांमध्ये याठिकाणी शिक्षण, व धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात, यातच महादेव काठी पदयात्रा मोठ्या उत्साहात निघाली आहे ,महादेव काठी सोबत हजारो शिव भक्त पदयात्रा करतात,पंचकोशीतील अनेक खेडेपाडीतील भक्त सुद्धा महादेव काठी शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी निघालेली प्रचंड अशी लोकसंख्या, दिसायला लागली महादेव काठी पदयात्रा हे दिनांक 13 /3/2026 रोजी सगरोळी येथून निघाली असून अनेक, खेडोपाडी व मोठे शहर करत,दौलतापूर,हिप्परगा थडी,शहापूर,गोजेगाव, हाळणी,शेळकीं शेकापूर, भाकलीवाडी,जावळी, करजखेड फाटा,सारोळा,दहीतना, उपळाई खुर्द,टेंभुर्णी, बावडा पार्वती पायरी, नातेपुते, व दिनांक 27/03/2026 रोजी, शिखर शिंगणापूर येथे पोहोचते,व प्रतीच्या नंतर सगरोळी, येथे मोठ्या उत्साहामध्ये महादेव काठी यात्रा भरवल्या जाते, तीन दिवसाची यात्रा मोठ्या उत्साहात,सगरोळी येथील गावकरी व पंचक्रोशीतील गावकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. सगरोळी ते शिंगणापूर महादेव काठी,पदयात्रा 300 वर्षाची परंपरा.… byमीडीया पोलीस टाईम -March 14, 2026
*नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आनंददायी शनिवार साजरा.** (मानवत / अनिल चव्हाण.*)—————————— येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात आज आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला. या वेळी विद्यालयाचे उपमूख्याध्यापक विश्वनाथ बुधवत, धनंजय गरूड, सदाशिवराव होगे पाटील, केलासचंद्र सारडा यांच्या सह शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. विविध उपक्रमाबरोबरच आज दिनांक 14 मार्च शनिवार रोजी सर्वांसमक्ष तक्रार पेटी उघडण्यात आली. यावेळी तक्रार निरंक निघाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमामुळे , शाळेत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होत असल्याचे दिसून येत आहे.शैक्षणिक दर्जा उंचवावा यासाठी शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविण्याचे आदेश दिल्यामूळे त्यांची अमलबजावणी होत असल्यामुळे विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यां मध्ये नवचेतन्य निर्माण होत आहे.. नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आनंददायी शनिवार साजरा.**… byमीडीया पोलीस टाईम -March 14, 2026
जन्मदिन की दिली मुबारकबाद युवा सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार तथा शांतता कमेटी के सक्रिय सदस्य मक़सूद बाबा को उनके जन्मदिन के अवसर पर दिल से हार्दिक मुबारक बाद, और ढेरों शुभकामनाएँ। मक़सूद बाबा एक ऐसे युवा हैं जो हमेशा समाजसेवा के कार्यों में अग्रणी भूमिका निभाते रहे हैं। समाज के गरीब, जरूरतमंद और पीड़ित लोगों की मदद के लिए वे हर समय तैयार रहते हैं। अपने सामाजिक दायित्वों को निभाते हुए उन्होंने अनेक लोगों की सहायता कर समाज में एक अच्छी मिसाल कायम की है।पत्रकार के रूप में भी वे समाज के महत्वपूर्ण मुद्दों को सामने लाने का कार्य करते हैं और सामाजिक जागरूकता बढ़ाने में अपना योगदान देते हैं। साथ ही शांतता कमेटी के सदस्य के रूप में वे समाज में आपसी भाईचारा, सामाजिक और धार्मिक सद्भाव बनाए रखने के लिए लगातार प्रयासरत रहते हैं।उनकी समाज के प्रति लगन, सेवा भावना और सकारात्मक सोच निश्चित ही युवाओं के लिए प्रेरणादायक है। हम दुआ करते हैं कि अल्लाह तआला उन्हें अच्छी सेहत, लंबी उम्र और समाजसेवा के लिए और अधिक ताकत अता फरमाए, ताकि वे आगे भी इसी तरह समाज की सेवा करते रहें।एक बार फिर उन्हें जन्मदिन की ढेर सारी मुबारकबाद और उज्ज्वल भविष्य के लिए दिल से शुभकामनाएँ।शुभेच्छुक :एड. इब्राहिम बख्श आज़ाद हिंगणघाट जन्मदिन की दिली मुबारकबाद युवा सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार तथा … byमीडीया पोलीस टाईम -March 14, 2026
हिंगणघाट तहसील मध्ये अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड... आज दिनांक 13 मार्च रोजी अश्विनी अमृततुल्य, अजित बिर्याणी, जय महाराष्ट्र पाव भाजी नांदगांव चौक हिंगणघाट घरगुती गॅस सिलेंडर वापर करणाऱ्या हॉटेल वर कारवाई 1955,2000, अनुसार करण्यात आली आहे या माहितीनुसार करून 14.2 kg चे एकूण 7 सिलेंडर जप्तीची करण्यात आली. कार्यवाही मा.नेमाजी देवणे परिविक्षाधीन तहसीलदार, व गौरव भांडेकर निरीक्षण अधिकारी हिंगणघाट यांनी मा तहसीलदार योगेश शिंदे व जिल्हा पुरवठा अधिकारी वर्धा राजू रणवीर यांचे मार्गदर्शनात करण्यात आलेल्या आहे..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक हिंगणघाट तहसील मध्ये अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड...… byमीडीया पोलीस टाईम -March 14, 2026
शेवाळा येथे वीज केबिनमुळे नागरिकांना, धोका... (मारोती एडकेवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड) नांदेड : देगलूर तालुक्यातील शेवाळा महावितरण कडून गावातील अनेक रस्त्यांवर वीज केबिन उभारण्यात आले आहेत. याच केबिनमधून घराघरांमध्ये वीजपुरवठा केला जातो.सुरुवातीच्या काळात सुरक्षित वाटणारे हे केबिन आता धोकादायक बनले आहेत. मागील काही वर्षभरापासून या केबिनमध्ये दुसऱ्या विभागाला वीजपुरवठा करण्यासाठी चक्क बाहेरून थेट तारा केबिनमध्ये सोडल्या जात आहेत. यामुळे येथील स्थानिकांची सुरक्षिततात धोक्यात आल्याचे नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे.विजेच्या तारा या भूमिगत टाकल्या जातात. मात्र, गावातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या व येथील गल्लीबोळातील घरांमध्ये वाढलेला विजेचा पुरवठा यामुळे विज वितरण प्रशासनावर ताण पडत आहे. येथील वाढती विजेची मागणी पाहता अनेकदा वीज यंत्रणेवर ताण पडून शॉर्टसर्किटच्या घटना घडत आहेत. अशात एका ठिकाणचा वीजपुरवठा खडीत झाल्यानंतर चक्क दुसऱ्या विभागातील केबिनमधून वीजपुरवठा केला जातो. मात्र, असे करताना चक्क विजेच्या तारा या जमिनीत खड्डा खणून न करता, थेट बाहेरूनच केबिनमध्ये सोडल्या जात असल्याचा प्रकार येथे घडत आहे. महत्त्वाचे हा तात्पुरता प्रयोग असतो. मात्र, अनेकदा हे प्रकार कायमचे होऊन जातात.दरम्यान, या अशा प्रकारच्या उघड्यावरील वीज केबलमुळे आग लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. या केबिन मुख्य रस्त्यांवर असून येथे नेहमीच मोठी वर्दळ असते. अशात एखादी घटना घडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीशेवाळा मुख्य रस्त्यावरील वीज केबिनमध्ये अशाप्रकारे तारा सोडण्यात आल्या आहेत.जर काही अनर्थ घटना घडल्यास याला जबाबदार कोण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेवाळा येथे वीज केबिनमुळे नागरिकांना, धोका... byमीडीया पोलीस टाईम -March 14, 2026
बोरावल येथे यावल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राबविला व्यसनमुक्तीचा जागर शैक्षणिक व्यसनमुक्ती घडामोडी. (जळगाव जिल्हा खान्देश उपसंपादक प्रवीण मेघे )दि 13 मार्च 26 शुक्रवार तालुक्यातील बोरावल येथे कला वाणिजय आणि विज्ञान महाविद्यालय यावल आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यामाने वयसनमुक्ती जागर कार्यक्रमाचे नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले बोरावल खुर्द गावच्या मध्यवर्ती भागात असलेल्या श्री विठ्ठल मंदिर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधीन असलेल्या नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या जळगाव जिल्हा संघटक तसेच नाशिक विभागीय संघटक प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा डॉ दयाघन एस राणे हे उपस्थित होते आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत असताना प्रा डॉ दयाघन राणे यांनी व्यसनासाठी कापल्या जाणाऱ्या अमली पदार्थाचे प्रकार आणि त्याचे शरीरावर कसे दुष्परिणाम होतात हे सांगून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारे कशा पद्धतीने समाजाची फसवणूक करतात हे उदाहरणासहित स्पष्ट केले तसेच कोणत्याही अमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठीचा चार पायऱ्यांची पद्धती स्पष्ट केली या प्रसंगी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेने पुरवलेल्या पोस्टर्स चे प्रदर्शन ही ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले मार्गदर्शन सत्राच्या नंतर महाविद्यालयीन तरुण तरुणींनी गटागटाने प्रत्येक घरी जाऊन अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती देऊन सुखी संपन्न आणि निरामय जीवनासाठी व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या विषयावर सखोल आणि समाधानकारक माहिती मिळवल्यामुळे व्यसनाच्या संदर्भात जागृती झालेली आहे त्यामुळे आता गावातील तरुणांना, व्यसनापासून दूर राहून, स्वतःच्या विकास साध्य करता येईल असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रामुख्या मार्गदर्शक प्रा डा दयाघन राणे यांचे स्वागत महाविद्यालयाच्या कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ आर डी पवार यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ आर डी पवार यांनी केले प्रा आर एस शिरसाठ सूत्रसंचालन केले तर आभार प्रा पी व्ही मोरे यांनी मानले कार्यक्रम प्रसंगी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संस्थेने उपस्थित होते बोरावल येथे यावल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राबविला व्यसनमुक्तीचा जागर शैक्षणिक व्यसनमुक्ती … byमीडीया पोलीस टाईम -March 13, 2026
एन बी ठाकूर लॉ कॉलेजच्या वतीने मनपा शाळेत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम! नाशिक : शहरातील एन बी ठाकूर विधी महाविद्यालयाच्या वतीने विधी साहाय्य व कायदेविषयक जनजागृती करण्यानिमित्त नाशिक मनपा शाळा क्र-47, आगर टाकळी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्देश्य म्हणजे ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची तसेच विविध शासकीय विधी, योजनांची माहिती देणे हा होता.एन बी ठाकूर विधी महाविद्यालय प्राचार्य डॉ.हरून रशीद कादरी, उपप्राचार्य डॉ.संजय मांडवकर तसेच डॉ.हेमा बुरंग आणि डॉ.मनीष सोनावणे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात भुवनेश्वरी खंबायत यांचे नेतृत्व मिळाले. याप्रसंगी मनपा शाळेतील मुख्याध्यापक श्रीमती गवारे व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.विद्यार्थ्यांनी विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन केलेभुवनेश्वरी खंबायत व पल्लवी पाटील यांनी महिलांचे हक्क, संरक्षण आणि कौटुंबिक कायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली.आयशा मनियार व पल्लवी उदावंत यांनी सायबर गुन्हे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय तसेच लोक अदालत यांचे महत्त्व विशद केले.राजनंदिनी महाले व मनीषा वाकचौरे यांनी बालहक्क आणि मुलांच्या सुरक्षिततेबद्दल मार्गदर्शन केले.संदीप सोनवणे व पवन गुट्टे केसर कृष्णा यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व आणि नागरिकांचे मूलभूत हक्क यावर प्रकाश टाकला.शुभम कासार व अर्जुन चौधरी यांनी कामगारांचे हक्क, FIR दाखल करण्याची प्रक्रिया आणि वाहतुकीचे नियम व दंड प्रक्रिया याबद्दल माहिती दिली.या कार्यक्रमा वेळी उपस्थित टाकळी परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढली. सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रिया सोप्या पद्धतीने समजून सांगणाऱ्या अशा कार्यक्रमांचे भविष्यातही आयोजन व्हावे, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. एन बी ठाकूर लॉ कॉलेजच्या वतीने मनपा शाळेत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम!… byमीडीया पोलीस टाईम -March 13, 2026
महाराष्ट्र की धरती पर पहली बार ‘कर्वी ग्लैमर’ का भव्य आयोजनमिस्टर-मिस-मिसेज इंडिया प्लस साइज ब्यूटी पेजेंट 2026 (सीज़न 2) का ग्रैंड फिनाले संपन्न.दै. मुंबई हलचल के संपादक दिलशाद एस. खान को किया गया सम्मानित.मुंबई। महाराष्ट्र की भूमि पर पहली बार देश का सबसे बड़ा और अनोखा मिस्टर, मिस और मिसेज इंडिया प्लस साइज ब्यूटी पेजेंट फैशन शो 2026 (सीज़न 2) का भव्य आयोजन 17 फरवरी 2026 को किया गया, जिसमें पूरे भारत से आए प्रतिभागियों ने आत्मविश्वास और प्रतिभा का शानदार प्रदर्शन किया। इस कार्यक्रम का आयोजन कर्वी ग्लैमर इवेंट के अंतर्गत किया गया, जिसकी प्रमुख आयोजक एवं मेघना चैरिटेबल ट्रस्ट की संस्थापिका समाज सुधारक मेघना शेंडगे ने इसे बॉलीवुड स्टाइल में प्रस्तुत किया। कार्यक्रम का मुख्य उद्देश्य था सुंदरता को आत्मविश्वास के साथ उजागर करना और यह संदेश देना कि हर व्यक्ति के भीतर कुछ कर दिखाने की क्षमता और पहचान बनाने की ताकत होती है, क्योंकि आज की भागदौड़ भरी जिंदगी में लोग अक्सर अपने सपनों को दबाकर स्वयं को कम आंकने लगते हैं, ऐसे में बॉडी शेमिंग के खिलाफ बॉडी पॉजिटिविटी और मोटिवेशन का संदेश देने के लिए इस मंच की शुरुआत की गई।सीज़न 2 में देशभर से बड़ी संख्या में प्रतिभागियों ने भाग लिया, जिनमें दै. मुंबई हलचल के संपादक दिलशाद एस. खान को सम्मानित किया गया और मिसेज इंडिया मॉडल का खिताब अर्पिता ठाकुर कोठारी (आर्किटेक्ट) ने जीता, प्रथम रनरअप मोनिका तिवारी (शिक्षिका) रहीं और द्वितीय रनरअप दीपाली वसंत (फाइनेंशियल एडवाइजर) रहीं; मिस्टर इंडिया मॉडल का खिताब पुष्पक पाटील (कॉमेडी कलाकार) ने जीता, प्रथम रनरअप अरविंद कुमार सिन्हा (कंट्री क्लब मैनेजर) और द्वितीय रनरअप पंकज शर्मा (फिटनेस ट्रेनर) रहे; वहीं मिस इंडिया मॉडल का खिताब सई शेंडगे (हिप-हॉप डांसर) ने अपने नाम किया और प्रथम रनरअप विभूषा कांदळकर (लावणी नृत्यांगना) रहीं। सबटाइटल विनर्स में सरिता गुप्ता को फोटोजेनिक फेस, रीना सोबती को इंटेलेक्चुअल आइकॉन, अश्विनी जोशी को कॉनजेनियलिटी आइकॉन और रेश्मी मुन्सी को कॉन्फिडेंटल क्वीन का सम्मान दिया गया। विजेताओं को कर्वी ग्लैमर की ओर से सुंदर क्राउन, सैश, ट्रॉफी, सर्टिफिकेट और आकर्षक उपहार प्रदान किए गए, जिसमें 1 ग्राम सोने की चेन (आर के गोल्ड) भी शामिल थी; गिफ्ट पार्टनर कपिल सिंह और क्राउन पार्टनर समीर मेहता रहे। सभी प्रतिभागियों ने तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण में कड़ी मेहनत की, जिसकी बदौलत उन्होंने यह मुकाम हासिल किया और उनकी मेहनत रंग लाई। कार्यक्रम की आयोजन समिति में मैनेजिंग डायरेक्टर भारत शेंडगे, इंक्योरमेंट मैनेजर रेनाल्डो रोजारियो, मॉडल ट्रेनिंग ग्रूमर प्रशांत जाधव (सेलिब्रिटी ग्रूमर), मेकअप पार्टनर लेक्मे मालाड वेस्ट, कॉस्ट्यूम डिज़ाइनर रिया जरसानिया, सतीश नाशित और झिनल खान, बिग सपोर्टिंग पार्टनर नेविल करवाना (नेकझेड इंटरप्राइजेज) तथा प्रेजेंट्स विशिक (राहुल शर्मा) शामिल रहे। इस भव्य समारोह में महाराष्ट्र शासन के मंत्री आशीष शेलार, महाराष्ट्र के मुख्यमंत्री की पत्नी एवं गायिका अमृता फडणवीस, पूर्व मंत्री एवं विधायक असलम शेख, सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल, अभिनेता गोविंदा तथा फिल्म My Friend Ganesha के निर्देशक राजीव रुइया सहित कई फिल्मी कलाकार उपस्थित रहे और सभी ने प्रतिभागियों को शुभकामनाएं दीं। कार्यक्रम को सफल बनाने में सभी सहयोगियों और प्रतिभागियों का महत्वपूर्ण योगदान रहा, जिसके लिए आयोजकों ने सभी का आभार व्यक्त किया। महाराष्ट्र की धरती पर पहली बार ‘कर्वी ग्लैमर’ का भव्य आयोजन.मिस्टर-मिस-मिसेज इंडिया प्लस साइज ब्य… byमीडीया पोलीस टाईम -March 13, 2026