Read more

View all

मंगनी रस्म की मुबारकबाद देने पहुचे रायगढ़ स्वाभिमान के वर्धा जिला पत्रकार,एवं मीडीया पुलिस टाइम के, वर्धा जिला विभागीय संपादक अब्दुल कदीर सर ,पहुंचे अमरावती जिला तहसील रेलवे चांदूर कस्बा में नौशा अब्दुल साजिद को मुबारकबाद देने, इस वक्त मौजूद शेख बशीर शेख रफीक शेख रशीद अब्दुल मजीद मौजूद थे,

मंगनी रस्म की मुबारकबाद देने पहुचे रायगढ़ स्वाभिमान के वर्धा जिला पत्रकार…

"अखिल भारतीय प्रतिभा खोज स्पर्धेचे आयोजन". (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती- स्थानिक 'साईप्रकाश कला अकादमी भद्रावती' द्वारा व 'सुरो भारती कला केंद्र, कोलकाता' आयोजित" अखिल भारतीय प्रतिभा खोज 2025" या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन दिनांक 13 व 14 डिसेंबरला स्थानिक हुतात्मा स्मारक, नाग मंदिर समोर येथे करण्यात येत आहे. यामध्ये गाव- शहर पातळीवरील योगा, गायन, नृत्य, वादन, चित्रकला यांमध्ये पारंगत बाल, युवा, प्रौढ कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर कलेचे प्रदर्शन करता येणार असून वय वर्षे चार ते समोर कुठल्याही वयोगटातील व्यक्तींना सहभाग दर्शविता येईल. वर्षे चार ते 11 व वर्षे 12 ते खुला अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार असून सहभागी प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र व पदक मिळणार आहे. केंद्रातून सर्वोच्च गुण प्राप्त स्पर्धकास सुरो भारती कला केंद्राच्या पदवीदान समारंभात मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेचे प्रवेश अर्ज व अधिक माहिती करिता विनोद ठमके ९९६००५५४००व क्षितिज शिवरकर८००७३६४९४९ यांच्याशी दहा तारखेपर्यंत संपर्क साधावा असे स्पर्धा जिल्हा संयोजकांनी सांगितले.

अखिल भारतीय प्रतिभा खोज स्पर्धेचे आयोजन".

श्री तिरुपती बालाजी देवस्थान, चुनाळा तह.राजुरा यांच्या वतीने आयोजित विसावा ब्रम्होत्सव सोहळा*. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.6:- श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा आयोजित भव्य विसावा ब्रम्होत्सव सोहळा कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर चे अध्यक्ष मा. रवींद्र शिंदे तसेच भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. राजू डोंगे यांचा सत्कार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चे संचालक तथा माजी आमदार मा. सुदर्शन निमकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.याप्रसंगी देवस्थान समितीचे पदाधिकारी, निशांत देवगडे व मान्यवरासह अनेक भाविक उपस्थित होते.श्री तिरुपती बालाजी देवस्थान, चुनाळा पदाधिकारी व भाविकभक्तांचे मनपूर्वक आभार.

श्री तिरुपती बालाजी देवस्थान, चुनाळा तह.राजुरा यांच्या वतीने आयोजित विसावा ब्रम्होत्सव सोहळा*.���…

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी धर्माबाद पोलिसातर्फे मोफत टेस्ट सिरीज पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांचा स्तुत्य उपक्रम.. (धर्माबाद (वार्ताहर) स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या धर्माबाद तालुका व शहरातील अनेक होतकरू, सुशिक्षित युवकांना योग्य मार्गदर्शनाची आणि संधीची आवश्यकता आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणपिढी मागे पडू नये, तसेच मटका, जुगार, व्यसनाधीनता यांसारख्या घातक प्रवृत्तींपासून दूर राहावे, हा सामूहिक समाजहिताचा उद्देश लक्षात घेत धर्माबादचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी एक वेगळा स्तुत्य सामाजिक उपक्रम हाती घेतला असून धर्माबाद तालुक्यात प्रथमच एक प्रशासकीय अधिकारी तालुक्याचे भविष्य सुधारन्या सोबतच तरुणांचे भवितव्य उज्वल करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.धर्माबाद शहरातील एलबीएस कॉलेज येथे सातत्याने विद्यार्थ्यांसाठी ऑपरेशन सिंदूर मध्ये यशस्वी कामगिरीकेलेले सेवानिवृत्त सैनिक चरण बुद्धीवंत हे मैदानी चाचणी ची उत्कृष्ट तयारी करून घेत आहेत याच सामाजिक दायित्वाचा एक भाग म्हणून धर्माबाद पोलीस स्टेशनच्यावतीने मोठी जबाबदारी उचलत पुणे येथील जी. के. पब्लिकेशनचे गणेश काळे सर यांच्या सहकार्याने तालुका व शहरातील स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत टेस्ट सिरीज आयोजित करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सदाशिवयुवकांना रोजगाराच्या संधीसाठी सक्षम करणे, स्पर्धा परीक्षेतील गुणवत्ता वाढवणे, युवकांना चुकीच्या प्रवृत्तींपासून दूर ठेवणे, समाजात सकारात्मक बदल घडविणे असा सकारात्मक उद्देश यात आहे. विद्यार्थ्यांसाठी मोफत टेस्ट सिरीज उपलब्ध तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या उज्ज्वल भवितव्याचा पाया मजबूत करावा असे आवाहन धर्माबाद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी केले आहे.भडीकर यांचा हा उपक्रम धर्माबाद तालुक्यातील युवकांना दिशा देणारा ठरणार आहे. यापूर्वी कोणत्याही अधिकाऱ्यांनी असा उपक्रम राबविला नव्हता पहिल्यांदाच असा प्रेरणादायी, उपक्रम कृतीत येत आहे.तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी धर्माबाद पोलिसातर्फे मोफत टेस्ट सिरीज पोल…

दिनांक : ७ डिसेंबर २०२५स्थान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हिंगणघाट (जि. वर्धा)बोधिसत्वास समर्पित आदरांजली कार्यक्रम संपन्न— अश्विन तावाडे मित्र परिवार आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद६ डिसेंबर २०२५, शनिवार — विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य “बोधिसत्वास आदरांजली कार्यक्रम” अत्यंत श्रद्धाभावाने पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात अश्विन तावाडे मित्र परिवार यांच्या हस्ते बोधिसत्वांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर प्रबोधनात्मक संगीत कार्यक्रमाद्वारे बोधिसत्वांच्या विचारांचा संदेश संगीताच्या माध्यमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.---🎤 प्रबोधनकारांचे प्रेरणादायी सादरीकरणप्रबोधनकारांनी आपल्या संगीत व विचारसंपन्न शब्दांद्वारे बोधिसत्वांना शब्दरूपी आदरांजली वाहिली. समाजपरिवर्तनाची दिशा कशी असावी, युवांनी कोणता मार्ग स्वीकारावा, समाजाची उन्नती कोणत्या विचारांवर आधारित असावी, यावर प्रभावी संदेशातून प्रकाश टाकण्यात आला.---🕯️ मुख्य आयोजक अश्विन तावाडे यांचे अध्यक्षीय भाषणया कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, युवकांचे प्रेरणास्रोत व हिंगणघाट विधानसभा येथील तिसरे क्रमांकावर असलेले उमेदवार मा. अश्विन तावाडे यांनी आपल्या भाषणातून बोधिसत्वास अभिवादन करून समाजस्थितीवर थेट भाष्य केले.आपल्या थेट व विद्रोही शैलीत त्यांनी पुढील मुद्दे मांडले :🔹 “समाजातील उच्च शिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम व नोकरदार वर्गाने समाजाकडे दुर्लक्ष केले आहे.”समाजातील विषमता, दोन गटातील आर्थिक दरी, आणि समानतेच्या तत्त्वांपासून झालेली दूरावस्था यावर त्यांनी जोरदार प्रश्न उपस्थित केला.🔹 “ज्यांना बाबासाहेबांनी कमाईचा २०% समाजाला दान करायला सांगितलं— त्या वर्गाने आजपर्यंत काय योगदान दिलं?”समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक योगदानाची आवश्यकता त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडली.🔹 “समस्या सर्वांनी सांगितल्या, पण समाधान कोणीच दिलं नाही.”गेल्या १०–१५ वर्षांत संविधान धोक्यात, आरक्षण संपणार, शिक्षण-आरोग्याचे खासगीकरण, युवक बेरोजगार… यासारख्या अनेक समस्या वाऱ्यासारख्या सांगितल्या गेल्या परंतु कोणतेही ठोस समाधान दिले गेले नाही, अशी त्यांनी टीका केली.---⚡ आर्थिक क्रांतीचा संकल्प – “Economic Revolution Movement”आपल्या भाषणात अश्विन तावाडे यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली—🔹 “आर्थिक क्रांती मोर्चा” सुरू करण्याचा संकल्पत्यांनी मांडले की —समाजातील उच्च शिक्षित, व्यापारी व नोकरी वर्गातील फक्त ५,००० कुटुंबांनी प्रत्येकी १ लाख रुपये दिल्यास एक वर्षात ५० कोटींची भांडवली ताकद समाज उभी करू शकतो.या रकमेतील उद्योजकता, रोजगारनिर्मिती, महिलांसाठी उद्योग, युवकांच्या करिअर निर्मितीसाठी नवीन कंपन्या उभ्या करता येतील.SC घटकांसाठीच्या सरकारी योजनांचा योग्य लाभ घेऊन एक भक्कम, स्वावलंबी आंबेडकरी समाजव्यवस्था उभी करता येईल.🔹 “२०२६ मध्ये याच दिवशी पूर्ण लेखाजोखा समाजासमोर ठेवेन”असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.---आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी जाहीर केले—“मी नामदेव ढसाळांचा छावा आहे. *मी मुळद्याला चंदन लावणारा नाही तर**विचाराला वंदन करणारा विद्रोही आहे.!”*“व्यवस्थेविरोधात बोलू काही” या भूमिकेतून समाजाची आर्थिक गुलामी संपवण्यासाठी आंदोलनाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.---🛠️ स्वावलंबी समाज हीच खरी आदरांजलीअश्विन तावाडे यांनी यावर विशेष भर दिला :आपले शिक्षणसंस्था असाव्यातआपले आरोग्य क्षेत्र असावेआपले रोजगार क्षेत्र असावेयुवकांचे शोषण संपले पाहिजेसमाजाला भीक मागावी लागू नये---✨ कार्यक्रम शांतपणे पार पडलाहिंगणघाट व परिसरातील युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला व विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोधिसत्वांच्या योगदानाला व विचारांना अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली..!---— हिंगणघाट प्रतिनिधी

जनसंग्राम न्यूज चे समुद्रपूर तालुका प्रतिनिधी मनवरशेख यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले यावेळेस पत्रकार सुरेश जी भगत पत्रकार गौतम शेळके पत्रकार प्रमोद झिबड पत्रकार अब्दुल कदीर बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते

जनसंग्राम न्यूज चे समुद्रपूर तालुका प्रतिनिधी मनवरशेख यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार  महामानव …

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या परिनिर्वाण दिनी "एक वही - एक पेन" अभियान घेऊन अनोखे अभिवादन.. (भद्रावती चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महेश निमसटकर) भद्रावती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ व्या परिनिर्वाण दिनी भद्रावती शहरांमधील स्थानिक एनजिओ 'हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी, भद्रावती' यांच्या वतीने दि. ०६ डिसेंबर ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुना बस स्टॉप, भद्रावती येथे "एक वही, एक पेन" हा उपक्रम राबवून बाबासाहेबांचा कार्यास आणि स्मृतीस अभिवादन करण्यात आले.महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती दि.6:- शहरांमधील जनतेने व आंबेडकरी अनुयायांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व मोठ्या प्रमाणात वह्या आणि पेनी दान स्वरूपात स्वीकारण्यात आल्या. जमा झालेले वही आणि पेन गरजू विद्यार्थ्यांपर्यंत गावाखेड्यात-घरोघरात पोहोचून वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमा मार्फत गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक छोटीशी मदत तर होणारच आहे शिवाय त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची जाणीव व्हावी व बाबासाहेबांसारखे विद्यार्थी तयार व्हावे, हा हेतू हेल्पिंग हँड्स एनजीओ चा या उपक्रमामागे आहे. "एक वही एक पेन" या उपक्रमाला हेल्पिंग हँड्स एनजीओ भद्रावती मधील सतत योगदान व सहकार्य करणारे कृतांत सहारे, वैभव रामटेके, राजरतन पेटकर, सोनू सिंग, प्रशांत सातपुते, सागर निरंजने, वैभव पाटील, प्रणय कांबळे, स्नेहा सातपुते, सुकेशनी मानकर, किरण कवाडे, सोनल उमाटे, प्राची वेल्हेकार, अनिकेत बांबोडे, रीता सहारे, मनोज पेटकर, वैभव मानकर, तुषार दुर्गे, पंकज शेंडे, आदर्श मेश्राम, भाग्यश्री शेंडे, सोनू सिंग, संकेत चीमुरकर, स्वप्निल बनकर, हर्षदा हिरादेवे, दीपक कावटे, जया सपाटे, पवन दासलवार, स्वप्निल मत्ते, अंकित तोडे, कैश शेख, निखिल उंबरकर, श्वेता उंबरकर, आशिष मल्लेलवार व इतर सर्वांनी मोलाचे योगदान दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या परिनिर्वाण दिनी "एक वही - एक पेन" अभियान घेऊन अनो…

विद्यार्थ्यांनी दीपज्योत लावून महामानव,बाबासाहेबांना केले अभिवादन. (मारोती एडकेवार जिल्हा/ प्रतिनिधी नांदेड )नांदेड : बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथे डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे,अभ्यासिका व वाचनालयात विद्यार्थ्यांनी,दीपज्योत लावून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना, महापरिनिर्वाण दिनानिमित्त, अभिवादन केले.भारतरत्न,बोधिसत्व, परमपूज्य ,दीनदलिताचे कैवारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या दिनानिमित्त, डॉ अण्णा भाऊ साठे,अभ्यासिका वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार मारोती जकोजी एडकेवार,व समिती तर्फे अभिवादन कार्यक्रम संध्याकाळी 6:00 वाजता, आयोजित करण्यात आले,यावेळी उपस्थित वाचनालयाचे सचिव राजू भूमाजी अंजनीकर,व सहसचिव दीपक एडकेवार,व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी, प्रेरणादायी विचार मांडले, व 500 वर्षाची गुलामी 50 वर्षात बाबासाहेब आंबेडकर यांनी,कसे संपुष्टात आणले.याविषयी विद्यार्थ्यांना पत्रकार मारोती एडकेवार यांनी मार्गदर्शन केले.एक विद्यार्थी व एक दीपज्योत लावून अभिवादन करण्यात आले.व छोट्या चिमुकले सर्व विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या विषयी डिजिटल टीव्ही च्या माध्यमातून,6 डिसेंबर 1956 ची चित्र ग्राफी दाखवण्यात आले.बाबासाहेबांना अभिवादन करून बाबासाहेबांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, असे वाचनालयाचे सचिव राजू भूमाजी अंजनीकर यांनी मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी दीपज्योत लावून महामानव,बाबासाहेबांना केले अभिवादन.�������������������������������…

जांब येथील शेतकऱ्यांना पाणी फाउंडेशन तर्फे गट शेती प्रीमियर लीग २०२५ चा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. _______________________________________________संजय भरदुक प्रतिनिधी (मंगरुळपीर वाशिम ) _______________________________________________________दिंनाक -०६/१२/२०२५ शनिवार _____________________________मंगरूळपीर---तालुक्यातील शेलूबाजार जवळील नागी (ईचा) येथे ६ डिसेंबर शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक,सार्वजनिक सभागृह, येथे सन्मान सोहळा चे पाणी फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत श्री योगेश कुंभेजकर (जिल्हाधिकारी वाशिम), डॉ.अविनाश पौळ (मुख्य सल्लागार पाणी फाउंडेशन),आरिफ शहा (जिल्हा कृषी अधिकारी वाशिम),अनिसा महाबळे (आत्मा संचालक)), श्री सचिन कांबळे (तालुका कृषी अधिकारी मं.पीर), अश्विनी भोसले (तालुका कृषी अधिकारी कारंजा) यांच्या शुभहस्ते जांब येथील डॉ.पंजाबराव देशमुख शेतकरी गटाला व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी नैसर्गिक साधनसंपत्ती वापरून गटामार्फत सेंद्रिय शेती करतात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमामध्ये सहभागी अनेक शेतकरी गट व शेतकऱ्यांची उपस्थिती होती सर्व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी सहकारी, कृषी सहायक , पाणी फाउंडेशन टीम, आत्मा संचालक कॄषी विभाग यांचे मोलाचे मार्गदर्शन सहकार्य लाभले.तसेच गावातील शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले.

जांब येथील शेतकऱ्यांना पाणी फाउंडेशन तर्फे गट शेती प्रीमियर लीग २०२५ चा सन्मानपत्र देऊन गौरविण्या…

Load More
That is All