Read more

View all

पाल वृंदावन धाम आश्रमात संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींच्या पुण्यतिथी निमित्त दोन दिवसीय महोत्सव* (पाल ता रावेर) :-रावेर तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागातील श्री वृंदावन धाम पाल आश्रमात अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे आराध्य सदगुरु परम पूज्य ब्रम्हलीन संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या सोळाव्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त दि २४ ते २५ डिसेंबर रोजी विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या प्रेरणेने दोन दिवसीय कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात येत असून यामध्ये परम पूज्य बापुजींचे गुरुवर्य संत श्री महादेव चैतन्य उर्फ दगडू जी बापू यांची जयंती तसेच पाल आश्रमात स्थित भव्य आणि दिव्य श्री हरिधाम मंदिर वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून दि.२४ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून १० वाजेपर्यंत दीपोत्सव व भजन संध्या चे आयोजन केले जाणार असून दि. २५ डिसेंबर रोजी परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत श्री हरिधाम मंदिर स्थित पूज्य बापुजींच्या समाधी मंदिरात चरण पादुका पूजन व अभिषेक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ७ ते ८ वाजेपर्यंत ध्यान, प्रार्थना आणि त्यानंतर १० ते १ वाजेपर्यंत या महोत्सवात उपस्थित संत,महंत,महामंडलेश्वर यांचे श्रद्धावचन आणि महाआरती नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. तरी या भव्य महोत्सवानिमित्त सर्व भक्तांनी उपस्थित राहून परम पूज्य बापुजी यांना श्रद्धाजंली अर्पण करावी असे आवाहन अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार समिती तर्फे करण्यात येत आहे.

पाल वृंदावन धाम आश्रमात संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींच्या पुण्यतिथी निम…

*"जाहीर सूचना"* नाचणगाव-पुलगाव परिसरातील समस्त धनगर बंधू भगिनींना सुचित करण्यात येते की, *पुलगाव नगर परिषद च्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. कविताताई सुनील ब्राह्मणकर* यांचा *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय धनगर समाज संघ नाचणगाव-पुलगाव जिल्हा वर्धा* तर्फे उद्या *दि. २३डिसेंबर 2025 मंगळवार ला सायंकाळी ०६.३० वा.* त्यांचे राहते घरी *लक्ष्मी सेलिब्रेशन जवळ आर्वी रोड पुलगाव* येथे *सत्कार* करण्याचे ठरलेले आहे.करिता आपण सर्वांनी वरील वेळेत दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे ही नम्र विनंती.🙏🏽 *विनीत*:- कार्यकारी मंडळ धनगर समाज संघ नाचणगाव पुलगाव

जाहीर सूचना"*   नाचणगाव-पुलगाव परिसरातील समस्त धनगर बंधू भगिनींना सुचित करण्यात येते की, *पु…

राज्यस्तरीय महाराष्ट्र पुरस्कार २०२५ ने मुकेश कडाळे पाटील यांचा सन्मान*. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)खामगाव:राज्यस्तरीय महाराष्ट्र पुरस्कार – २०२५ खामगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मुकेश कडाळे पाटील यांना प्रदान करण्यात आला. पुणे येथील शिव प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य व कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.हा पुरस्कार स्वीकारताना मुकेश कडाळे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरव नसून समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा अत्यंत भावनिक क्षण आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, हा पुरस्कार त्यांच्या एकट्याचा नसून त्यांच्या कार्यामागे सातत्याने उभे राहणारे मार्गदर्शक, सहकारी, मित्र, कुटुंबीय आणि समाजातील सर्व घटकांचा सामूहिक सन्मान आहे.समता, सेवा आणि विकास या मूल्यांवर विश्वास ठेवून केलेले कार्य जेव्हा राज्यस्तरावर ओळखले जाते, तेव्हा पुढील काळात अधिक प्रामाणिकपणे व निष्ठेने समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले. तसेच आजच्या तरुण पिढीला सकारात्मक दिशा, आत्मविश्वास आणि प्रेरणा देणारे कार्य उभे राहावे, हीच या सन्मानामागील खरी भावना असल्याचे त्यांनी सांगितले.या सन्मानासाठी त्यांनी शिव प्रतिष्ठान, पुणे यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला पाठिंबा देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे, सहकाऱ्यांचे व शुभेच्छुकांचे आभार व्यक्त केले.“आपल्या सर्वांच्या सहकार्याने समाजहिताचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेत राहण्याचा माझा निर्धार आहे,” असे प्रतिपादन मुकेश कडाळे पाटील यांनी यावेळी केले.

राज्यस्तरीय महाराष्ट्र पुरस्कार २०२५ ने मुकेश कडाळे पाटील यांचा सन्मान*.�������������������������…

*अकोला वन विभागावर गंभीर आरोप, नारायण राठोड आमरण उपोषणावर*. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)अकोला वन विभागावर कामगारांचे शोषण आणि फसव्या भरतीचे गंभीर आरोप होत आहेत. कामगार प्रतिनिधी नारायण राठोड हे २२ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. १२,९९१ वनसेवकांच्या भरतीत केवळ "सांख्यिकीय डेटा" सादर करण्यात आला, ज्यामुळे पात्र कामगारांची नावे लपवून बनावट कामगारांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला, असा आरोप आहे. पातूर वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने, उच्चस्तरीय चौकशी समितीची मागणी करण्यात आली आहे. वसंत राठोड यांच्या प्रकरणात, विभागावर न्यायालयाचे सात निर्णय आणि उच्च न्यायालयाच्या अल्टिमेटम असूनही आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. कामगारांना सात महिन्यांपासून त्यांचे वेतन मिळालेले नाही, तर विभागाने वकिलांच्या शुल्कावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. कामगार न्यायालयाच्या आदेशानंतरही नारायण राठोड यांची नियुक्ती करण्यात आली नाही, जी न्यायालयाचा अवमान मानली जाते.प्रमुख मागण्या :सर्व पात्र कामगारांच्या नावांसह प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवावेत.पातूर घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.७ महिन्यांचा पगार व्याजासह द्यावान्यायालयाचे सर्व आदेश तात्काळ लागू करावेत आणि न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील.

अकोला वन विभागावर गंभीर आरोप, नारायण राठोड आमरण उपोषणावर*.���������������������������������������…

अकोला जिल्हाधिकारी मा. मीना मॅडम यांना अमरावती शिक्षक मतदार संघातील प्रारूप मतदार याद्या मधील इंग्लिश कॉन्व्हेन्ट च्या कर्मचाऱ्यांची बी.एड किंवा डी. एड शैक्षणिक अहर्ता नसलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव यादीतून रद्द करा या बाबतचे निवेदन शिक्षक आघाडी पदाधिकाऱ्यांना कडून देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी मॅडम कडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असा विश्वास दर्शवला...(अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)

अकोला जिल्हाधिकारी मा. मीना मॅडम यांना अमरावती शिक्षक मतदार संघातील प्रारूप मतदार याद्या मधील इंग…

*पंचायत समिती एरंडोल येथे निशुल्क पिरॅमिड धानाचे आयोजन*. ( एरंडोल जिल्हा जळगाव प्रतिनिधी) _आंतरराष्ट्रीय ध्यान दिन दरवर्षी 21 डिसेंबर रोजी जगभर साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी पंचायत समिती एरंडोल येथील हॉलमध्ये , श्री भगवती क्लासेस, एरंडोल यांच्यावतीने निशुल्क पिरॅमिड धानाचे आयोजन करण्यात आले होते. ध्यान मास्टर देवयानी कृष्णा महाजन यांनी सुरुवातीला पिरॅमिड ज्ञानाचे महत्त्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गाला सांगितले. ध्यानामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होते .मन एकाग्रतेची क्षमता वाढवते. सदर कार्यक्रमाप्रसंगी श्री दादाजी एकनाथ जाधव (गट विकास अधिकारी पंचायत समिती एरंडोल), श्रीमती प्रतिभा भीमराव सुर्वे (सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती एरंडोल) तसेच श्री.डी.एस. माळी(सहा.प्रशासन अधिकारी),श्री.योगेश पाटील(कनि.प्रशासन अधिकारी), सर्व विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, व सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पंचायत समिती एरंडोल येथे निशुल्क पिरॅमिड धानाचे आयोजन*.������������������������������������������…

सावदा पोलीस स्टेशन च्या आशिर्वादाने लोहारा येथील दुरक्षेत्र पोलीस चौकीची दुरावस्था परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता ? तात्काळ पोलीस चौकी दुरुस्त करण्याची परिसरातील जनतेची मागणी. (जळगाव जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी फिरोज तडवी ) जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सातपुडा पायथ्याशी वसलेल्या लोहारा पोलीस चौकीची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन ही पोलीस चौकी सध्या स्थितीत जीवितहानी होण्यास कारणीभूत ठरत आहे ही पोलीस चौकी अनेक वर्षांपासून पडक्या अवस्थेत आहे आणि सध्या स्थितीत जीर्ण झाली असल्याने या पोलीस चौकी परिसरात लहान मुले.महिला नागरिक ये.जा करीत असतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील ह्या पोलीस चौकी पासुन खुप मोठा धोका निर्माण झाला आहे तसेच ह्या पोलिस चौकीचे छप्पर हे जुन्या काळातील कौलारू छप्परचे असल्याने ह्या पोलीस चौकीच्या भिंतीसह कौलारू छप्पर केव्हाही कोसळु शकते.आणि या ठिकाणी खुप मोठी जीवीतहानी होऊ शकते व जिवीतहानी होण्याची दाट संभावना भासत आहे.त्याचबरोबर ह्या पोलीस चौकी मध्ये आतील खोल्यांमध्येही घाणीचे साम्राज्य देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. यामुळे देखील परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्याचबरोबर ह्या पोलीस चौकीच्या भिंती देखील तुटुन पडलेल्या अवस्थेत आहेत.आणि पोलीस चौकीच्या आतमध्ये खाली देशी दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत आहेत यावरुन असे समजते की परिसरात अवैध धंदे देखील बोकाळले असल्याचे चित्र आहे.हा सगळा प्रकार सावदा पोलिस स्टेशन च्या अधिकारी आणि कर्मचारी यांना माहिती असल्यावरही जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे परिसरातील जनतेकडून बोलले जात आहे.तेरी भी चुप और मेरी भी चुप अशी अशी सावदा पोलिसांची परिस्थिती असल्याने परिसरातील जनतेला लोहारा येथील पोलीस चौकी पासुन खुप मोठा धोका निर्माण झाला आहे..तरी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी साहेब यांनी या लोहारा दुरक्षेत्र पोलीस चौकी कडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ पोलिस चौकीची सुधारणा करावी आणि परिसरातील जनतेला जीवीतहानी होण्यापासून वाचवावे. अशी रास्त स्वरुपाची मागणी लोहारासह परिसरातील जनतेने जिल्हा पोलिस प्रशासनाकडे केली आहे..

सावदा पोलीस स्टेशन च्या आशिर्वादाने लोहारा येथील दुरक्षेत्र प…

तळोदा नगरपरिषद नगराध्यक्षपदी भाग्यश्री ताई चौधरी विजयी.. (कैलास शेंडे विभागीय संपादक नंदुरबार )तळोदा नगरपरिषदेची नगराध्यक्ष निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली होती. तब्बल १९ दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना अखेर आज पूर्णविराम मिळाला असून नगराध्यक्षपदी भाग्यश्री ताई चौधरी यांनी विजय मिळवला आहे.निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय वातावरण तापले होते. विशेषतः योगेश चौधरी यांनी बंडखोरी केल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी जाहीर करत त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरली.अखेर झालेल्या मतदान व निकाल प्रक्रियेनंतर भाग्यश्री ताई चौधरी यांनी बाजी मारत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले. त्यांच्या विजयामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात जल्लोष पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.विजयानंतर प्रतिक्रिया देताना भाग्यश्री ताई चौधरी यांनी नागरिकांचे आभार मानत, तळोदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन दिले. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.तळोदा नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्क बसला असून या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा निकाल म्हणजेकाँग्रेस मधून भाजपात आलेल्या आयाराम गयाराम छाप नेत्यांना एकनिष्ठ भाजपच्या मतदारांनी नाकारले व भाजप ला हिसका दाखवला यात ऐकनिष्ठांना डावलून भाजपाचे शहर अध्यक्ष बनलेले व काँग्रेस मध्ये असतांना उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती व नगराध्यक्ष प्रभारी, तसेच सलग दोन पंचवार्षिक निवडून येणारे श्री. गौरव वाणी यांचा भाजपात आल्यावर झालेला पराभव. त्यांच्या विरोधात उभे असलेले तरुण व तडफदार नेते अल्प कारकीर्दीत समाजसेवा करणारे श्री कपिल भाऊ कर्णकार यांनी शिवसेना (शिंदे गट) तर्फे दणदणीत विजय मिळवला.या निकालामुळे तळोदा शहराच्या राजकारणात मोठा बदल होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले या निकालामुळे तळोदा नगरपरिषदेच्या राजकारणाला नवे वळण मिळाले असून आगामी काळात शहराच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तळोदा नगरपरिषद नगराध्यक्षपदी भाग्यश्र…

प्रभाग क्रमांक 7 अ मध्येशिंदेसेनेचे शेख बाबू शेख भिकन (विजयी)7 ब मध्ये शिंदेसेनेचे सविता मनोज झंवर (विजयी)प्रभाग क्रमांक 8 अ मधून भाजपच्या रेखा गणेश भूमकर (विजयी)प्रभाग क्रमांक 8 ब मधून भाजपचे कमलेश कटारिया (विजयी)===========एकूण 8 प्रभागाचा निकाल लागला त्यात भाजपचे 3तर शिंदेंसेनेचे 13 उमेदवार विजयी झाले.शिंदेंसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर आघाडीवर

Load More
That is All