**मतदार दिना निमित्त मानवत शहरात जणजागर रॅली*. (मानवत / प्रतिनिधी. ). ——————————— परभणी येथील *मेरा युवा भारत* व येथील नगर परिषद कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक २५ जानेवारी मतदार दिवस साजरा करून शहरात जणजागर पदयात्रा काढण्यात आली. हि पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक ते मानवत नगर पालिका कार्यालया पर्यंत काढण्यात आली. यावेळी मतदार जनजागर रॅली मध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विदयार्थीनी पदयात्रेत सामील झाल्या.मानवत तहसिलचे तहसिलदार मा.श्री. पांडुरंग माचेवाड व मानवत नगर परिषदच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमलताई सावरे यांनी *हिरवा झेंडा* दाखवला. कार्यक्रमाचा समारोपात मानवत नगर परिषद मध्ये नवीन नोंदणी केलेले मतदारांचे यावेळी स्वागत करण्यात आले तसेच मतदार दिनाची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवराचे आभार प्रदर्शन जिल्हा युवा अधिकारी *शशांक रावुला* यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती स्नेहाताई वाघमारे, मैथिलीताई जोशी, सुनिताताई वाकळे, स्वप्ना माथवाले, सुनीताताई नाईक, संगीताताई राऊत, सय्यद वसीम , एस. आय. गवारे यांनी परिश्रम घेऊन प्रयत्न केले.. मतदार दिना निमित्त मानवत शहरात जणजागर रॅली*. byमीडीया पोलीस टाईम -January 25, 2026
राजीव गांधी हायस्कूल ताडबोरगाव येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साही वातावरणात साजरा... (अनिल चव्हाण / मानवत.)———————————आपण आपल्या जिवनामध्ये परिवाराच्या विकासासाठी, आपल्या समाजाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहातो. त्याच प्रमाणे राष्ट्रीय एकता-एकात्मता व मानवता जपण्यासाठी हि सतत प्रयत्नशील राहावे असे आवाहन आझाद एज्युकेशन ॲंड वेलफेयर सोसायटी, परभणी चे संस्थापक सचिव मा श्री अलीशाह खान यांनी केले. राजीव गांधी हायस्कूल ताडबोरगाव ता. मानवत येथील माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष मा श्री इमरान खान, माजी मुख्याध्यापक मा श्री शेख एजाज अहेमद, वर्तमान मुख्याध्यापक मा श्री नवघरे श्रीकृष्ण उपस्थित होते. राजीव गांधी हायस्कूल ताडबोरगाव ता. मानवत या शाळेतील इ. स. २०१० च्या विद्यार्थ्यांनी मनिषा अवचार, अनिल पवार यांच्या पूढाकाराने स्नेह मेळावा कार्यक्रम आयोजित करुन आपल्या शालेय जिवनातील शिक्षण, शिस्त, संस्कार, आनंद आदि गोष्टींना उजाळा देत अनिल पवार, विलास अवचार, बालाजी जोगदंड, सविता कोसे, कल्पना खरवडे अदि विद्यार्थी-विद्यार्थिंनी आपल्या भावना व्यक्त केले. शिक्षकांच्या वतीने शेख महेमुद, लोखंडे राजू, सय्यद मुनिर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन, स्वागत केले. सुत्रसंचलन कृष्णा पिंपळे यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे जेष्ठ लिपिक जोगदंड बाबासाहेब यांनी केले. विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थीस्नेह मेळाव्यास राणी खरवडे, मीरा अवचार,ज्योती आवचार, कल्पना खरवडे, मिनाक्षी जाधव, ज्योती निर्वळ, ज्योती गोरे, अंबिका हरणे, दयमती मगर, भाग्यश्री अवचार, संगीता हरणे, अंबिका हरणे, सावित्रा बोंबले, अश्विनी चिंचाने रेणुका चिंचाणे, उषा अवचार, रेखा अवचार, माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या, तर विलास अवचार, विशाल पठाडे, विशाल गुंगाणे, गोविंद जोगदंड, बालाजी जोगदंड, राधाकिशन अवचार, अंकुश अवचार, धनंजय खरवडे, अनिल पवार, प्रद्युम्न अवचार, संतोष अवचार, नारायण रासवे, इ. विद्यार्थी उपस्थित राहुल कार्यक्रमाची शोभा वाढवली. आनंददायी कृती कार्यक्रमानंतर राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.*** राजीव गांधी हायस्कूल ताडबोरगाव येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साही वातावरणात साजरा...… byमीडीया पोलीस टाईम -January 25, 2026
*ध्येय निश्चिती हेच यशाचे खरे गमक**@)> – बालासाहेब कच्छवे.*. (मानवत / वार्ताहर)———————————— मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयामध्ये आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त ध्वजारोहन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून नांदेड येथील *मा.श्री. बालासाहेब कच्छवे* यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चिती, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाचे महत्त्व प्रभावी पणे पटवून दिले. आपल्या अमोघ रसाळवाणीतून परखड पणे मार्गदर्शन करताना त्यांनी जिवनातील अनेक प्रसंग सांगितले, यावेळी ते बोलतांना म्हणाले की ध्येय निश्चिती हेच यशाचे खरे गमक असून आयुष्यात मोठे होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने सर्वप्रथम स्वतःचे ध्येय ठरवले पाहिजे, कारण एकदा ध्येय ठरले की त्या दिशेने वाटचाल आपोआप सुरू होते. बुद्धिमत्ता ही कोणाकडे कमी- जास्त नसून ती सर्वांकडे जवळपास समान प्रमाणात असते, मात्र तिचा उपयोग आपण कशा प्रकारे व कशा पद्धतीने करतो यावर यश अवलंबून असते, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट पणे मांडून मत व्यक्त केले. यशस्वी होण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘तीन टी’चा फॉर्म्युला समजावून सांगितला, *ज्यामध्ये ट्राय, टॅक्ट आणि टॅलेंट* हा तीन T चा फॉर्म्युल आहे. सतत ट्राय (प्रयत्न) केल्यावर टॅक्ट (अनुभव व सराव) मिळतो आणि एकदा टॅक्ट आली की टॅलेंट आपोआप विकसित होते, असे त्यांनी व्यासपीठावरून मार्गदर्शन करतांनी सांगितले. यावेळी त्यांनी *थॉमस एडिसन* यांना बल्बचा शोध लावताना ९९९ वेळा अपयश आले तरी त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत, हे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना चिकाटीचे महत्त्व पटवून दिले. आपण केवळ नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण न घेता भविष्यात नोकरी देणारे बनावे, स्वतःचा उद्योग- व्यवसाय उभारून इतरांनाही रोजगार द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. एक टक्का टॅलेंट आणि ९९ टक्के परिश्रम करण्याची तयारी असेल तर जीवनात कोणते ही ध्येय साध्य करता येते, असा ठाम विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या धाडसी व प्रेरणादायी जीवन प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच इंग्रजांच्या नजर कैदेतून सुटका करून घेत देशासाठी केलेले त्यांचे कार्य आज ही प्रत्येक भारतीया साठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. जगात मोठी झालेली माणसे ही जाती-पैशांच्या पलीकडे जाऊन फक्त माणूस म्हणून जगली असून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अशा अनेक महान विचारवंतांची उदाहरणे देत त्यांनी समाज व राष्ट्र घडवण्यात अशा व्यक्तींचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट केले. “मनी वसे ते स्वप्न दिसे” या उक्ती प्रमाणे विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस, आयपीएस, वैज्ञानिक, पायलट होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा मोलाचा सल्ला देत त्यांनी आई-वडील, गुरुजन व समाज यांच्याशी प्रामाणिक राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आज मी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळे मधिल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळाली, याचा मला विशेष आनंद असून या शाळेने मला घडवले आणि आता या शाळेच्या विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे भाग्य मला लाभले, असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी बोलतांना व्यासपीठावरून व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयजी लाड होते तर प्रमुख उपस्थितीत माजी मुख्याध्यापक मा.श्री. जी. एस. शिकवाल, ॲड. अंकुशरावजी कच्छवे, अल्काताई सोळंके, सोरेकर, संपादक गोपाळराव लाड, शाळेतील शिक्षक, पालक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते; कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमूख मा.श्री. सदाशिवराव होगे पाटील यांनी केले. तर उपस्थित सर्व मान्यरांचे आभार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मा.श्री. विश्वनाथजी बुधवंत यांनी मानले.** ध्येय निश्चिती हेच यशाचे खरे गमक**@)> – बालासाहेब कच्छवे.*.… byमीडीया पोलीस टाईम -January 25, 2026
शोक संदेश चोपडा ( संजीव शिरसाठ ) येथे बोरोले नगर नं . २ येथील आज श्री . राजाराम भिला सपकाळे रि . वनपाल यांच्या धर्मपत्नी कै .सौ . सरस्वतीबाई राजाराम सपकाळे यांचे आज दिनांक : - २५ / ०१ / २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता निधन झाले त्यांची आज अंत्य यात्रा ठिक ५ वाजता संपन्न झाली . अंत्य यात्रेत नातेवाईक ' मित्रपरिवार ' समाज कार्यकर्ते ' शासकिय कर्मचारी मोठ्या संख्येने अस्थित होते .त्या ग्रामसेवक भाऊसाहेब श्री . रामचणर सपकाळे ' व श्री . कृष्णाकांत उर्फ विनोद सपकाळे यांच्या मातोश्री होत्या . शोक संदेश चोपडा ( संजीव शिरसाठ ) येथे बोरोले नगर नं . २ येथील आज श्री . राजाराम भिला सपकाळे रि . वनपाल यांच्… byमीडीया पोलीस टाईम -January 25, 2026
परमहंस श्री पुंडलिक महाराज विद्यालय देऊळगाव येथे क्रीडा सप्ताह अंतर्गत विविध स्पर्धा उत्साहात संपन्न.... (अकोला जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) परमहंस श्री पुंडलिक महाराज विद्यालय देऊळगाव तालुका पातुर येथे दिनांक 19 जानेवारी 2026 ते 24 जानेवारी 2026 या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहात लिंबू चमचा शर्यत संगीत खुर्ची चित्रकला स्पर्धा धावण्याची धावण्याची स्पर्धा तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेण्यात आल्या सर्व स्पर्धा विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडल्या क्रीडा सप्ताह बरोबरच आनंद मेळाव्याची सुद्धा आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल खेळ उपक्रमांमधून सहभाग घेत आनंद मेळाव्याचा मनमुराद आनंद लुटला दरम्यान दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री रविंद्रजी सोनवणे सर यांनी विद्यालयास सदिच्छा भेट दिली निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत विद्यालयातील इयत्ता पाचवीचा 94 टक्के 53 पॉईंट उत्कृष्ट निकाल लागल्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे अभिवादन करण्यासाठी त्यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्या समवेत पातुर पंचायत समिती शिक्षण विभागातील श्री उके .सर हेही होते उपस्थितीत होते विद्यालयाच्या वतीने मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आनंद मेळाव्याचे उद्घाटन श्री रवींद्रजी सोनवणे सर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचवण्यासाठी प्रेरणा देत काही उपयुक्त सूचना दिल्या श्री सोनवणे सर यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर तपासला व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले तसेच त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पोलीस टाईम मीडियाचे.श्री संतोष भाऊ उपर्वट यांची भेट घेऊन शाळेचा प्रगती बाबत व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत सविस्तर माहिती दिली ही शाळेसाठी निश्चितच अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पोलीस टाईम मीडियाचे जिल्हा प्रतिनिधी संतोष भाऊ उपर्वट विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुरवसे सर तसेच आढाव सर खराब सर मसने सर सांगळे सर इंगळे मॅडम गणेश राऊत श्री रेवाळे भाऊ आधी शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रीडा सप्ताह व आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यालयाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे परमहंस श्री पुंडलिक महाराज विद्यालय देऊळगाव येथे क्रीडा सप्ताह अंतर्गत वि… byमीडीया पोलीस टाईम -January 25, 2026
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती वर विविध कार्यक्रमाचे आयोजन.,.. हिंगणघाट:शिवसेना हिंगणघाट विधानसभा मतदार संघ च्या वतीने स्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाष चंद्र बोस ची जयंती निमित्त विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी बालासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. तर सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. आणि बाळासाहेब साठी घोषणा करण्यात आल्या तर सुभाष चंद्र बोस चा जय जयकार करण्यात आला.याप्रसंगी बाळासाहेब यांच्या कार्याचा आणि शिवसेना स्थापना विषयी माहिती देण्यात आली. तर नेताजी यांच्या आझाद हिंद सेना चे भारतीय स्वतंत्र संग्रामातील अभूतपूर्व योगदान बद्दलची जाणीव आजच्या पिढीने लक्षात ठेवली पाहिजे असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. आणि रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्कीट चे वाटप करण्यात आले.याप्रसंगी नगराध्यक्षा नयना तुळसकर ची प्रमुख उपस्थित होती. तर पक्षाचे पदाधिकारी सतीश चौधरी, विलास हांडे, सोनू लांजेवार, प्रतीक चाफले, अनिकेत लासटवार, गणेश कोल्हे, विशाल पूर्णाके, संतोष तांबोली, तुलसीराम डफ, धीरज सिडामें, गणेश बावने, भारत बने, मंगेश बावने, कुलभूषण वासनिक, संजय कोपुलवार, सुनिता तांबोली, रजनी गोस्वामी , कांता झोरे, विधि चौहान, गुफा रोठे और शिवसेनिक बड़ी संख्या में उपस्थित थे।कार्यक्रम में राजू हिंगमारे ने आभार व्यक्त किया। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती वर विविध कार्यक्रमाचे… byमीडीया पोलीस टाईम -January 24, 2026
निवडणूक अधिकारी, कर्मचारी याचे पहिले प्रशिक्षण संपन्न*निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वबाबी समजून घ्याव्यात.*@)> निवडणूक निर्णय अधिकारी }श्रीमती अरूणा संगेवार.*. (मानवत / प्रतिनिधी.)———————जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने आज दिनांक 24.01.2026 रोजी सकाळी 10 वाजता सामाजिक सभागृह आठवडी बाजार मानवत येथे एकूण 557 मतदान अधिकारी कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांच्या उपस्थितीत पार पडले मतदान अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रिये बाबत सखोल मागदर्शन मा.तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड यांनी केले असून प्रशिक्षणास नायब तहसीलदार संजय खिल्लारे, नायब तहसीलदार स्वप्ना अंभूरे, संतोष वायकोस निवडणूक ऑपरेटर राहुल खाडे व तहसील कार्यालयाचे तसेच तालुक्यातील सर्व कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.*{{ गैर हजर कर्मचारी }}**557 पैकी 52 निवडणूक कर्मचारी गैरहजर**—{{ चौकट टाकणे}} ——————————**01 ) PRO 133 पैकी 13 गैरहजर}**02 ) PO 1- 140 पैकी 12 गैरहजर }**03 ) PO -2,- 117 पैकी 13 गैरहजर-**03) PO-3-167 पैकी 14- गैरहजर निवडणूक कर्मचारी राहिले आहे.*जे मतदान अधिकारी कर्मचारी अनुपस्थित होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येतील असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. *----------* निवडणूक अधिकारी, कर्मचारी याचे पहिले प्रशिक्षण संपन्न*निवडणूक अधिकारी व क… byमीडीया पोलीस टाईम -January 24, 2026
*मानवत तालुक्यातील 19 विद्यार्थ्यांचे टंग टाय शस्त्रक्रिया यशस्वी संपन्न.*. (मानवत / प्रतिनिधी.) ———————————————— {{ पिएमश्री जि प मानवत शाळेचे माणिक घाटुल यांच्यातर्फे मुलांना आईस्क्रीम व पालकांना अल्पऊपहाराचे वाटप. }}दर वर्षाप्रमाणे या ही वर्षी देखील समावेशित शिक्षण विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणारे जिभेचे शस्त्रक्रिया (टंग टाय) ग्रामीण रुग्णालय मानवत येथे यशस्वीरित्या पार पडली. मानवत तालुक्यातील एकूण 30 विद्यार्थ्यापैकी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 19 विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आले. सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाले असून मुलांना चार तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवून औषध गोळ्यां देऊन मुलांना घरी पाठविण्यात आले. या कामी तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ तेजस तांबोळी व डॉ शेख आशिक हुसेन यांनी शस्त्रक्रिया पार पाडले. या शिबीरासाठी विद्यार्थी उपस्थित ठेवण्यासाठी समावेशित शिक्षण अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षक *ज्ञानेश्वर जलशिंगे,* दत्ता शहाणे, संतोष पांचाळ व मल्लिकार्जुन देवरे यांनी उत्कृष्ट नियोजन करून सर्व मुलांना शस्त्रक्रियेसाठी पालकांना समुपदेशन करून मुलांना उपस्थित ठेवले या वेळी शस्त्रक्रियेसाठी शाळा स्तरावर होणारे आरोग्य तपासणी दरम्यान आढळणारे वाचादोष विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ग्रामीण बाल स्वास्थ्य अभियान अंतर्गत कार्यरत *NRHM* डॉक्टरांच्या टीमने मुलांची तपासणी करून त्यांना ग्रामीण रुग्णालय मानवत येथे रेफर करण्यात येतात. शस्त्रक्रिया शिबिरा दरम्यान संपूर्ण ग्रामीण रुग्णालय मानवाच्या टीमसह NRHM, RBSK, समावेशित शिक्षण विभाग पूर्ण वेळ कार्यरत होते.शस्त्रक्रिया शिबिरासाठी मानवत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मंगेशजी नरवाडे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नीलू पवार, केंद्रप्रमुख ओम मुळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे आरोग्याची विचारपूस केली. तर या बरोबर केंद्रप्रमुख प्रकाशजी मोहकरे, उमाकांतजी हाडोळे, विनोदजी गायकवाड, साधन व्यक्ती राजकुमारजी गाडे, आत्मारामजी पाटील, दिगंबरजी गिरी, प्रतोदजी बोरीकर, सीमाताई सिसोदे, गजाननजी वांबुरकर यांनी परिश्रम घेऊन सर्व शालेय विद्यार्थ्यांना या वेळी शुभेच्छा दिले.संपूर्ण शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी पार पडल्यानंतर पी.एम.सी. शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ यांच्या तर्फे सर्व पालकांना अल्पउपहार व मुलांना आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले. सोबतच सीमाताई सिसोदे व सपनाताई राऊत यांच्यातर्फे मुलांना बिस्किट खाऊचे वाटप करण्यात आले. असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी मल्लिकार्जुन देवरे यांनी बोलतांना दिली.** मानवत तालुक्यातील 19 विद्यार्थ्यांचे टंग टाय शस्त्रक्रिया यशस्वी संपन्न.*.… byमीडीया पोलीस टाईम -January 24, 2026
नारणाला उत्सव म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ -आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर**झरी बाजार-येथे आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर यांची सभा संपन्न* (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)सातपुडा पायथ्याशी वसलेल्या गावात हिंसक वन्य प्राण्यामुळे दहशत पसरलेली आहे. गावागावात हिंसक प्राणी वाघ,बिबट,अस्वल शिरकाव करीत आहेत. ग्रामीण नागरिकांवर हमले करत आहेत. शेतात जाण्याकरिता शेतकरी, शेतमजूर घाबरत आहेत.पिकाला पाणी देण्याकरिता एक मजूर जात असताना त्याला संरक्षण करिता चार माणसे लागत आहेत.याकडे दुर्लक्ष करून वण्याविभाग आणि प्रशासन नरनाळा महोत्सव या भागात उत्सव साजरा करीत आहे.हे चिंतेची बाब आहे. खरं तर त्यांनी आधी मानव प्रजाती व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता उपाययोजना करायला हव्या होत्या परंतु मागील एक महिन्यापासून *मानव प्रजाती वाचवा* आंदोलन सुरू असून प्रशासन पूर्ण दुर्लक्ष करून उत्सव साजरा करते हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखे आहे.दरवर्षी महाराष्ट्रात10हजार कोटी ते40हजार कोटी या वन्यप्राण्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.ही संपत्ती राष्ट्रीय संपत्ती असून राष्ट्रीय संपत्ती चे नुकसान होत आहे.या कडे प्रशासन गंभीरतेने बघत नसल्याने ग्रामीण, आदिवासी,शेतकरी वर्गाची चेष्टा करून उत्सव साजरा करण्यात धन्यता मानत आहे. वन्यजीव संरक्षण कायदा अस्तित्वात येऊन 47 वर्ष झाली.या वर्षात प्राण्यांची वाढ झपाट्याने झाली. यांचा प्रजनन चा दर लक्षात घेतला गेला नाही. त्यामुळे हिंसक प्राणी नागरी वस्तीत येऊन शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी गोठ्यातून पळवून नेत आहेत.येणाऱ्या पिढी वर वन्य प्राणी एक संकट आहे.यावर तातडीने उपाययोजना प्रशासनाने कराव्यात कारण वन्यप्राणी हे वण्याविभागाची जबाबदारी आहे. त्यांनी आपली जबाबदारी करावें पार पाडावी. या पासून पर्यटनाला संधी उपलब्ध होते. यातून प्रशासन कडे पैसे गोळा होतात. जंगल सफरीत एका गाडीकडून 3800 रुपये घेण्यात येतात.शेकडो गाड्या रोज शहानुर येथे जंगल सफरीला जात असतात.आपण पैसे मिळवावे व त्रास आम्हाला द्यावा की बाब न्यायला धरून नाही. पर्यटन वाढलं पाहिजे यात दुमत नाही पण त्याचा स्थानिकांना फायदा मिळायला हवा होता पण तसं न घडता उलट वन्यप्राण्यामुळे नुकसान,दहशत,हमले हे शिकारी प्रवृत्तीचे प्राणी करीत आहेत. या मुळे ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त झालेला आहे.येणाऱ्या 30 जानेवारी पर्यंत वण्याविभाग व प्रशासन यांनी आमच्या आंदोलनाची गंभीर दखल न घेतल्यास 30 जानेवारी ला आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा सर्व ग्रामिंणी एकमताने ठराव सभेत पास केला.जास्तीत जास्त संख्येने सहपरिवार या आंदोलनात लोकांनी शामिल होण्याचे आवाहन आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर यांनी सभेत केले.अफजल भास्कर,मोहन खिरोडकार, दिनेश गिर्हे,रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व बहुसंख्य शेतकरी,शेतमजूर, ग्रामस्थ उपस्थित होते.*एकीकडे ग्रामीण शेतकरी व शेतमजूर याच्यावर हिंसक प्रवृत्तीचे प्राणी हमला करीत आहेत.वन्यप्राणी देशाची 10 हजार ते 40 हजार संपत्ती नष्ट करीत आहेत.तरीही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.यांना मानव प्रजाती व देशाच्या संपत्ती ची काजळी नसल्याने डॉलर ची किंमत वाढून रुपयात घसरण आलेली आहे. शेतकरी व ग्रामिनांवर हमले होत असतांना,वण्याविभाग व प्रशासन या भागात उत्सव साजरा करीत आहे. हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे.म्हणून आम्ही येणाऱ्या 30जानेवारी ला मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन करणार आहोत.-आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर* नारणाला उत्सव म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ -आंदोलक लक्ष्मीकांत कौठकर**झरी बाजार-ये… byमीडीया पोलीस टाईम -January 24, 2026