प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा अपमान!*पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी*यावलमध्ये आंबेडकरी संघटनांचा संतप्त एल्गार*. (✒️ यावल तालुका प्रतिनिधी रविंद्र आढळे ✒️)नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याच्या निषेधार्थ यावल तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ व भारतीय दंडसंहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.या संदर्भात यावलचे तहसीलदार मोहनमाला नाझिरकर व यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांना आंबेडकरी चळवळीतील संघटना, बौद्ध समाज बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सविस्तर निवेदन देण्यात आले.“हा विसर नाही, हा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे!”निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, बाबासाहेबांचे नाव न घेणे हा केवळ भाषणातील अपघात किंवा विसर नसून, तो संविधानाचा, बाबासाहेबांचा आणि कोट्यवधी आंबेडकरी अनुयायांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे.प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी संविधाननिर्मात्याचे नाव टाळणे म्हणजे दलित-वंचित समाजाच्या आत्मसन्मानावर घाला घालण्यासारखे आहे, अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली.“भीमकन्यांचे धैर्याला सलाम!”या घटनेविरोधात वनविभागातील कर्मचारी माधवी जाधव व दर्शना सौपुरे यांनी कार्यक्रमस्थळी निर्भीडपणे जाब विचारत आवाज उठवला. या दोन्ही भगिनींच्या धैर्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “या भीमकन्यांना संपूर्ण आंबेडकरी समाजाचा पाठिंबा आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.राज्यभर आंदोलनाचा इशाराजर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.“बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही… संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही!” अशी आक्रमक भूमिका संघटनांनी जाहीर केली आहे.मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष भगवान मेघे, ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुका अध्यक्ष सतीश अडकमोल यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत इंगळे, लक्ष्मी ताई मेंढे, भिम टायगर्स सामाजिक संघटनेचे मुख्य सचिव सुपडू संदानशिव, नसीर खान, विकी वानखेडे, अरुण गजरे, मिलिंद जंजाळे, किरण तायडे, नितीन बोरेकर, विजय बाविस्कर, विनोद सोनवणे, सिद्धार्थ अडकमोल, बाळू अडकमोल, नरेंद्र अडकमोल यांच्यासह समता सैनिक दलाच्या महिला कार्यकर्त्या व यावल तालुक्यातील असंख्य आंबेडकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशासनाची भूमिका काय?या गंभीर प्रकरणावर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा अपमान!*पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गु…

यावल येथे पेसा क्षेत्रातील विकास कांमाचा आढावा बैठक झाली... (यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)यावल येथिल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागातर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील गावांच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या हक्काचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यावल पंचायत समितीच्या समितीच्या सभागृहात एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालीयाव बैठकीस आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील विविध विभागाचे परिष्ठ अधिकारी उपस्थित होते प्रामुख्याने यावल रावेर आणि चोपडा या तालुक्यातील पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गांवाच्या प्रलंबित शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी यावेळी चर्चा झालीबैठकिमधे अदिवासी बांधवाचे हक्क अधिकार आणि गावांमध्ये होणाऱ्या विविध शासकिय विकासकामांचा आढावा घेण्यात आला पेसा कायद्यांतर्गत मिळणाऱ्या निधीचा विनियोग आणि त्यातून होणारी गावांमधील पायाभूत कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आले

यावल येथे पेसा क्षेत्रातील विकास कांमाचा आढावा बैठक झाली...��������������������������������������…

दि.२८ चोपडा ( संजीव शिरसाठ ) तालुक्यात झालेले गारपिट,वादळ व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करण्याचे आ.प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी दिल्या सूचना....चोपडा तालुक्यातील आडगाव, विरवाडे, विष्णापुर तसेच नागलवाडी, तसेच पुणऀ आदिवासी परिसरातील गावांमध्ये काल सायंकाळी अचानक अवकाळी पाऊस व गारपीट व वादळ झाल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्या अनुषंगाने चोपडा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आडगाव,विरवाडे,व विष्णापुर परिसरात शेतकरी व नागरिकांची विचारपूस करुन धिर दिला व उपस्थित तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंखे,गटविकास अधिकारी एन. आर. पाटील व कर्मचारी यांना अवकाळी पाऊस व गारपिट झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शेती पिकांचे पंचनामे करण्याची सूचना आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दिल्या.

"भाऊ आपला दादा आपले सोडी ग्या हो"चोपड्यात सुनिल पाटील (वाळकी चोपडा) मा.जि.प सदस्य ह्यांचा टाहो.. चोपडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रहास गुजराती ह्यांना पाहताच टाहो फोडला.खांद्यावर डोक्यावर ठेवून ओक्साबोक्शी रडले.प्रतिक्रिया देताना सुनिल पाटील म्हटले माझा बाप हयात नाही, भाऊ नाही अजित दादा हेच माझे सर्वकाही होते.सुन्न झालेल्या महाराष्ट्रातील मी ही एक सुन्न..दादा अमर रहे

देऊळगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा... ( अकोला जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी ). ‌. ‌ प्रजासत्ताक दिनी आज 26 जानेवारी 2026 रोजी स्वतंत्र भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतात आनंदाने साजरा. करण्यात आला त्यानिमित्ताने. पुंडलिक महाराज विद्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री पुंडलिक महाराज विद्यालय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रल्हाद रावजी बोचरे साहेब होते तसेच ज्येष्ठ समाजसेवक श्री पांडुरंग जी गोळे यांच्या हस्ते विद्यालयातील ध्वजारोहण संपन्न झाले याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले तसेच याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पोलीस टाईम मीडियाचे अकोला जिल्हा प्रतिनिधी संतोष भाऊ उपर्वट यांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच बक्षीस वितरण सुद्धा.संतोष उपर्वट यांच्या हस्ते करण्यात आले क्रीडा स्पर्धे अंतर्गत प्रमाणपत्राचे वितरण देऊळगाव मधील मान्यवरांच्या हस्ते सुद्धा.करण्यात आले 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी रोजी शाळा महाविद्यालय तंबाखूमुक्त गाव.परिसर असा संकल्प करण्यात आला. त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहेसंपूर्ण कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे शिक्षक श्री सांगळे सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरणसे सरांनी केले संपूर्ण कार्यक्रम मुख्याध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तसेच देऊळगाव मधील प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक मान्यवर मंडळी.मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते आणि शालेय पोषण आहार मदतनीस सुद्धा या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होत्या अशा रीतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला

देऊळगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...

भराड़ी पंचायत समिति गंन के अपक्ष उम्मीदवार,का जारी है प्रचार *हर समाज का इनको मिल रहा है पाठिंबा* *कबाट यह निशानी पर बटन दबाकर विजय करो पक्ष उम्मीदवार शेख प्रवेस* हिमंत मेरी ताकत आप की के नाम से अपक्ष उम्मीद वार शेख परवेज़ के कार्यकर्ता कर रहे काम भराड़ी पंचायत समिति गण सीट पर शिंदे सेना वह बीजेपी के उम्मीदवार की तरफ से अब तक उम्मीदवार तय हुँचूके है। इस सीट पर अपक्ष उम्मीदवार प्रवेस शेख और शिंदे सेना के भराड़ी पंचायत समिति गण के उम्मीदवार महाजन लवराज सुरेश व बीजेपी के पंचायत समिति गण के उम्मीदवार नारायण सर के बीच मैदान में उतरे है। वहीं, अपक्ष उम्मीदवार प्रवेस शेख ने चुनावी चेहरा बनाते हुए एक तरह से प्रचार शुरू कर दिया है। पदाधिकारी मेलावा आयोजित कर रहे हैं और कार्यकर्ताओं को काम पर लगने का निर्देश भी दे रहे हैं। हालांकि, यहां अपक्ष उम्मीदवार प्रवेस शेख का दवाव बढ़ता जा रहा है। अब्दुल सत्तार ने शिंदे सेना की ओर से भराड़ी पंचायत समिति गंन से महाजन लवराज सुरेश की उम्मीदवारी की घोषणा कर दबाव और बढ़ा दिया है। अपक्ष उम्मीदवर शेख परवेज़ ने एक तरह से भराड़ी पंचायत समिति सीट के लिए यह दांव खेला वो प्रचार भी शुरू कर चुके हैं। वहीं, शिदे गुट की सबसे बड़ी मुश्किल यह है कि सीट भी हाथ से नहीं जाने देना चाहते है और दमदार उम्मीदवार भी नहीं है। हालांकि, शिंदे सेना विधायक अब्दुल सत्तर, हाथ आजमाना चाहते है। वहीं, बीजेपी पूर्व सांसद राहु सहाब दानवे के कट्टर समर्थ्यक नारायण खुमने सर को भराड़ी पंचायत समिति गंन से मैदान में उतारा है महाजन लवराज सुरेश शिवसेना की और से मैदान में है । पक्ष उम्मीदवार प्रवेस शेख के पदाधिकारी-कार्यकर्ता का भराड़ी में एक और पंचायत समिति गण में दो मेलावा कर चुके है।सिर्फ अबकी बार नया चेहराः अब्दुल सत्तर के चेहरे के सहारे शिंदे सेना दम भर रही है। उसका कहना है कि जब भराड़ी जिला परिषद पंचायत समिति गण में ही अब्दुल सत्तार चेहरा है, तो सीट भी शिंदे सेना को मिलनी चाहिए ऐसा दवा शिंदे सेना के कार्यकरते पदाधिकारी उम्मीदवार कर रहे हैं अपक्ष उम्मीदवार परवेज़ जोरों पर चुनाव प्रचार में लगे हैं। उन्हें वोटरों से ग्रीन सिग्नल भी मिल रहे हर बुड़े जवान बच्चों के मुंह पर सिर्फ प्रवेस प्रवेस कबाट कबाट कपाट है, राजनीति के लिए बहुत असहज होगा।

दिनांक 26 1 2026 पुलिस स्टेशन गिरड 77 वा गणतंत्र दिवस मोटया उत्सवात साजरा कन्यातआला👇ध्वजारोहण माननीय थानेदार विकास जी गायकवाड यानी केले व,झेंडेला सलामी देण्यात आलीध्वजारोहण झाले व त्यानंतर देश भक्ति गीता वर आधारित कवायत सादर कन्यात आलि,याकवायातिला गावातील असंख्या नागरिक उपस्थित होते🙏

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर. (.महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती दि.28:- चंद्रपूर राज्यभर १ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान राबविण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा अभियान, २०२६ अंतर्गत दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी चंद्रपूर येथे आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत म. पो. केंद्र, चंद्रपूर येथे हे शिबिर पार पडले. हे शिबिर","महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (One Stop Centre) तसेच राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस (कावीळ) नियंत्रण दिन यांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. श्रीनिवास कुंभारे, डॉ. विद्या धोबे व त्यांच्या वैद्यकीय पथकाने नागरिकांची विविध प्रकारची आरोग्य व रक्त तपासणी केली. यामध्ये रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, वजन तपासणी, एड्स तपासणी, हार्ट व कॅन्सर प्रोफाइल तसेच विविध आजारांवरील रक्त तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा लाभ ड्रायव्हर, मजूर, टोल नाक्यावरील कर्मचारी, शेतकरी, टॅब परिसरातील गावांचे पोलीस पाटील, सरपंच, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच टॅबवरील अधिकारी व कर्मचारी यांनी घेतला. यावेळी महामार्गावरील दुचाकी, चारचाकी व अवजड वाहन चालकांना वाहन चालविताना हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे, वेगमर्यादा पाळणे तसेच इतर वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतात, असे सांगून चालकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमासाठी नंदुरी टोल नाका मॅनेजर प्रवीण चौरे, इंजिनीयर कुणाल बोदे, टोल नाक्यावरील कर्मचारी, ड्रायव्हर, मजूर, शेतकरी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. सदर आरोग्य तपासणी शिबिराची संपूर्ण जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक माया चाटसे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर.

अजित दादा चा अकालमूर्ती हे सर्वांच्या डोळ्यासमोर राहील आजचा दिवस महाराष्ट्रासाठी फार मोलाचा होईल (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.28:- मराठमोळी महाराष्ट्राचा हिरा गमावला आज! जळूनी खाक झाले उपमुख्यमंत्राचे स्वप्न आज!मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे. तो कुणाला कधी, कुठे आणि कसा भेटेल याचा काहीही नेम नाही. सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते. तरीही आपण हे सत्य विसरून रोजच्या धावपळीत, ताणतणावात आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत राहतो. उद्याची चिंता, भविष्याची भीती आणि “अजून मिळवायचं आहे” या विचारात आजचा क्षण निसटून जातो.आजूबाजूला घडणाऱ्या दु:खद घटना आपल्याला क्षणभर थांबवतात. मन सुन्न होतं, डोळे पाणावतात आणि आयुष्य किती नाजूक आहे याची जाणीव होते. त्या वेळी लक्षात येतं की पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता या सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात. माणसासोबत जातं ते फक्त त्याने कमावलेलं प्रेम, केलेली माणुसकी आणि लोकांच्या मनात उरलेली आठवण.म्हणूनच नात्यांकडे दुर्लक्ष करू नका. आई-वडिलांशी बोला, मित्रांशी मन मोकळं बोला. मनात राग, मत्सर, अहंकार साठवू नका. माफ करणं शिका, कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. भौतिक सुख क्षणिक आहेत—सगळी मोहमाया आहे; पण समाधान, प्रेम आणि शांतता हीच खरी कमाई आहे.उद्या काय होईल माहित नाही, पण आज आपल्या हातात आहे.म्हणून आजचा दिवस जगा, मनापासून जगा, प्रामाणिकपणे जगा.आज अजित दादा पवार यांनी अकाली निरोप घेतला, त्यांच्या आत्म्यास शांती लाभोआणि जे आज आपल्या सोबत आहेत, त्यांना आपलं प्रेम आजच दाखवा. "भावपूर्ण श्रद्धांजली अजित दादा!

अजित दादा चा अकालमूर्ती हे सर्वांच्या डोळ्यासमोर राहील आजचा दिवस महाराष्ट्रासाठी फार मोलाचा होईल�…

अजीत पवार के निधन पर ठाकुर संजीव कुमार सिंह ने जताया गहरा शोकविमान हादसे को बताया संदिग्ध, सुप्रीम कोर्ट की निगरानी में निष्पक्ष जांच की मांग... (नई दिल्ली।) महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजीत पवार के विमान हादसे में निधन पर कांग्रेस के राष्ट्रीय नेता और मंत्री पद के दाबेदार वरिष्ठ समाजसेवी एवं सुप्रीम कोर्ट के अधिवक्ता ठाकुर संजीव कुमार सिंह ने गहरा शोक व्यक्त किया है। उन्होंने इस घटना को महाराष्ट्र की राजनीति के लिए “एक काला दिन” बताते हुए इसे संदिग्ध, कहा और सर्वोच्च न्यायालय की निगरानी में निष्पक्ष जांच की मांग की। उन्होंने कहा कि 28 जनवरी का दिन राज्य की राजनीति के इतिहास में दुखद अध्याय के रूप में दर्ज हो गया है। आज जब देश का एक उपमुख्यमंत्री सुरक्षित नहीं है, तो आम नागरिकों की सुरक्षा की कल्पना कैसे की जा सकती है?”उन्होंने दावा किया कि दो दिन पहले ही उन्हें जानकारी मिली थी कि अजीत पवार पार्टी से अलग होने और अपने चाचा शरद पवार के साथ पुनः राजनीतिक रूप से सक्रिय होने की योजना बना रहे थे। ऐसे में यह हादसा कई सवाल खड़े करता है। उन्होंने स्पष्ट शब्दों में कहा कि उन्हें केवल सर्वोच्च न्यायालय पर ही भरोसा है, अन्य किसी एजेंसी पर नहीं। उन्होंने आरोप लगाया कि देश में हर स्तर पर समझौते हो रहे हैं और सच्चाई को दबाने की कोशिश की जा सकती है।18 महीने पहले भी टला था बड़ा हादसायह पहली बार नहीं था जब अजीत पवार किसी हवाई हादसे का शिकार होते-होते बचे हों। जुलाई 2024 में वे गढ़चिरौली में एक स्टील प्रोजेक्ट के उद्घाटन के लिए हेलीकॉप्टर से जा रहे थे। खराब मौसम और कम दृश्यता के कारण हेलीकॉप्टर रास्ता भटक गया था और कुछ समय के लिए बादलों में खो गया। उस दौरान अजीत पवार बेहद चिंतित नजर आए थे, हालांकि पायलट की सूझबूझ से सभी सुरक्षित बच निकले थे।जयपुर में एयर इंडिया विमान की आपात स्थिति, सभी यात्री सुरक्षितअजीत पवार के हादसे के कुछ ही घंटों बाद विमान सुरक्षा को लेकर एक और गंभीर स्थिति सामने आई। दिल्ली से जयपुर जा रहा एयर इंडिया का विमान AI-1719 पहली बार लैंडिंग में असफल रहा और पायलट को ‘गो-अराउंड’ करना पड़ा। विमान में राजस्थान कांग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा भी सवार थे। दूसरी कोशिश में विमान की सुरक्षित लैंडिंग कराई गई और सभी यात्री सुरक्षित हैं। विशेषज्ञों के अनुसार, गो-अराउंड एक मानक सुरक्षा प्रक्रिया है, जिसे यात्रियों की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए अपनाया जाता है।राजनीतिक हस्तियों से जुड़े प्रमुख हवाई हादसेभारत में यह पहला मामला नहीं है जब किसी वरिष्ठ राजनीतिक नेता की हवाई दुर्घटना में मृत्यु हुई हो—2026 – अजीत पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र (Learjet 45 दुर्घटना)2025 – विजय रूपाणी, पूर्व मुख्यमंत्री गुजरात2021 – जनरल बिपिन रावत, CDS2011 – दोरजी खांडू, मुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश2009 – वाई.एस. राजशेखर रेड्डी2001 – माधवराव सिंधिया1980 – संजय गांधीहालांकि अधिकांश हादसों को मौसम या तकनीकी कारणों से जोड़ा गया, लेकिन अजीत पवार की मृत्यु ने इसे केवल दुर्घटना नहीं, बल्कि हत्या-समान हादसा मानने की बहस को जन्म दे दिया है।निष्पक्ष जांच की मांग तेजअजीत पवार की असामयिक मृत्यु ने देशभर में शोक और चिंता का माहौल पैदा कर दिया है। ठाकुर संजीव कुमार सिंह सहित कई नेताओं और संगठनों ने इस हादसे की सुप्रीम कोर्ट की निगरानी में उच्चस्तरीय जांच की मांग की है, ताकि सच्चाई सामने आ सके और भविष्य में ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति रोकी जा सके।हादसे की निष्पक्ष जाँच शुरू इस हादसे के प्रत्यक्षदर्शियों के अनुसार मिनट-दर-मिनट घटनाक्रम: शुरुआती जांच में क्या सामने आया विमान दुर्घटना जांच ब्यूरो (AAIB) और DGCA द्वारा की जा रही प्रारंभिक जांच में हादसे की मुख्य वजह खराब मौसम और कम दृश्यता बताई जा रही है। सुबह करीब 8:48 बजे लैंडिंग के समय विजिबिलिटी लगभग 3000 मीटर थी। पायलट ने ATC को सूचित किया था कि रनवे स्पष्ट रूप से दिखाई नहीं दे रहा है। दो बार लैंडिंग की कोशिश असफल रही। तीसरी बार रनवे दिखने की सूचना देने के बाद ATC ने लैंडिंग की अनुमति दी, लेकिन इसके कुछ ही मिनट बाद विमान क्रैश हो गया। बारामती एक अनियंत्रित हवाई अड्डा है, जहाँ पूर्णकालिक एयर ट्रैफिक कंट्रोल यूनिट नहीं है। यहाँ उड़ान संबंधी सूचनाएँ पायलट और प्रशिक्षण संस्थानों के माध्यम से साझा की जाती हैं। इस पहलू को भी जांच का अहम हिस्सा माना जा रहा है।

अजीत पवार के निधन पर ठाकुर संजीव कुमार सिंह ने जताया गहरा शोकविमान हादसे को बताया संदिग्ध, सुप्री…

सर सैयद अहमद खान लायब्ररीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा**देशभक्ती, संविधानिक जाणीव व बालकांचा उत्स्फूर्त सहभाग*. (रावेर / शेख शरीफ)सर सैयद अहमद खान लायब्ररीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य व सन्माननीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास जळगाव शहरातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, युवक तसेच मोठ्या संख्येने बालकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मुजाहिद शेख यांनी अत्यंत शिस्तबद्ध, सुबक व प्रभावी शैलीत केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.कार्यक्रमाची सुरुवात श्री. नोमान आसिफ मलिक यांच्या पवित्र कुरआन पठणाने झाली. त्यानंतर श्री. अबुबकर इद्रीस शेख यांनी राष्ट्रीय गीत सादर करत उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली.यानंतर खन्सा इद्रीस शेख यांनी सादर केलेली देशप्रेमावर आधारित कविता उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत गौरवली.पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक श्री. अब्दुर्रऊफ शेख यांनी केले.यावेळी वसीम खान साहेब (सामाजिक सेवक) यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व चांगले नागरिक बनण्याचे महत्त्व समजावून सांगितले.तसेच सलीम इमानदार साहेब यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट करत संविधानिक कर्तव्ये, देशाच्या प्रगतीमध्ये मुस्लिम समाजाचे सकारात्मक योगदान यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे अध्यक्ष कय्यूम असर साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात 26 जानेवारीचे ऐतिहासिक महत्त्व, भारतीय संविधान, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यावर सविस्तर व मुद्देसूद मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी लायब्ररीचे सचिव अब्दुर्रऊफ शेख गनी साहेब यांनी मुलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान व प्रजासत्ताक दिनाची खरी भावना समजावून सांगत शिक्षण, ज्ञान व जाणीवेचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाच्या समारोपापूर्वी लायब्ररीच्या वतीने उपस्थित सर्व मुलांना चॉकलेट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.शेवटी मुबश्शिर शेख व इद्रीस शेख यांनी सर्व मान्यवर पाहुणे, नागरिक व आयोजकांचे आभार मानून प्रार्थनेसह कार्यक्रमाची सांगता केली.हा कार्यक्रम केवळ प्रजासत्ताक दिन साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, मुलांच्या व युवकांच्या मनात देशभक्ती, संविधानिक जाणीव व राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणारा ठरला

सर सैयद अहमद खान लायब्ररीत प्रजासत्ताक दिन उत्साह…

रावेर तहसील कार्यालयातून जप्त ट्रॅक्टरची चोरी; रावेर पोलिसांकडून दोन ट्रॅक्टरसह दोघे ताब्यात.. (रावेर (शेख शरीफ)रावेर तहसील कार्यालयाच्या आवारातून अवैध गौण खनिज प्रकरणी जप्त करण्यात आलेले सुमारे ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र रावेर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, अवैध गौण खनिज वाहतूक करत असलेले एम.एच. १९ ए.एन. ४४५२ व एम.एच. १९ पी. ३४४० क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह महसूल विभागाने जप्त केले होते. हे ट्रॅक्टर रावेर तहसील कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आले होते.दि. २७ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास, दोन व्यक्तींनी सदर ट्रॅक्टर चोरी करून नेल्याची बाब निदर्शनास आली. याप्रकरणी मंडळ अधिकारी निंभोरा श्री. रवीशंकर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संदीप हिरामण कोळी व महेंद्र पंजाब तायडे (दोघेही रा. सिंगनूर, ता. रावेर) यांच्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर रावेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन लाख ७५ हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर जप्त करून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नकाते (जळगाव), एच.डी.पी.ओ. फैजपूर श्री. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, पोलीस हवालदार ईश्वर चव्हाण, पोलीस शिपाई प्रमोद पाटील, सुकेस्ट तडवी व श्रीकांत चव्हाण यांनी केली.

रावेर तहसील कार्यालयातून जप्त ट्रॅक्टरची चोरी; रावेर पोलिसांकडून दोन ट्रॅक्टरसह दोघे ताब्यात..���…

वसा प्लाॅस्टिक मुक्तीचा* पर्यावरण रक्षण व हिंगणघाट शहर प्लाॅस्टिक मुक्तीचा वसा घेतलेल्या *वृक्षमित्र परीवार हिंगणघाट* चे वतीने प्रजासत्ताक दिनाच्या,26/1/2026 शुभमुहूर्तावर पर्यावरण रक्षणार्थ , हिंगणघाट शहराच्या सुदृढ आरोग्यासाठी प्लास्टिक न वापरण्याबाबत व ते इतरत्र न टाकता योग्य ठिकाणी जमा करण्याबाबतची जनजागृती करण्यासाठी संपूर्ण हिंगणघाट शहरातील प्रमुख मार्गाने सायकल रॅलीचे आयोजन या रॅलीत सहभागी व मार्गदर्शन करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित हिंगणघाट शहरातील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमी *डॉ निर्मेशजी कोठारी सर नगरसेवक धनंजयभाऊ बकाने, बंटीभाऊ वाघमारे, सुरजभाऊ कुबडे, माजी नगरसेवक उमेशभाऊ तुळसकर, वसंतराव पाल सर, समाजसेवक सुनिलभाऊ डोंगरे,नगर परिषद हिंगणघाट चे अधिकारी विशालजी ब्राम्हणकर* , कपडा, मेडीकल, धान्य, व किराणा असोसिएशनचे पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात वृक्षमित्र परिवार हिंगणघाटचे सदस्यगण व सर्वसामान्य हिंगणघाटकर.....🪴🪴🌳🌴🌎🌎...मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा MIDIA POLICE TIME विभागीय उपसंपादक

मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थाची तस्करी करणा-या सराईत गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही."* माननीय श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 27 जानेवारी 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकाने पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील मौजा कारला चौक वर्धा येथे सापळा रचुन होन्डा सिटी कार क्रमांक MH-29/AB-7117 वर रेड केला असता, आरोपी राजेंद्रसिंग उर्फ गुड्डु लखनसिंग जुनी, वय 32 वर्ष, रा. हनुमानगड गिरीपेठ कारला चौक वर्धा हा मेफेड्रॉन (एम.डी.) अमली पदार्थाची वाहतुक करतांना मोक्कावर रंगेहाथ मिळुन आल्याने, त्याचेवर कार्यवाही करीत त्यांचे ताब्यातुन निव्वळ 07 ग्रॅम 65 मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अमली पदार्थ, मोबाईल व कारसह जु.कि. 10,41,775 रू चा मुद्देमाल जप्त करून, आरोपी व त्यास अमली पदार्थाचा पुरवठा करणारा नागपुर येथील एका ईसमाविरूध्द पो.स्टे. रामनगर येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, स.पो.नि.निशांत फुलेकर,पो.उपनि. विजयसिंग गोमलाडु, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थाची तस्करी करणा-या सराईत गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक का…

वाहतूक शाखेतील अंमलदार यांना शासकीय डॉक्टरा कडून देण्यात आले प्रथमोपचाराचे प्रशिक्षण** दि 28/01/26 रोजी 11/00 वा मा, पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सर यांच्या संकल्पनेतून प्रथमउपचार कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले होते. वाहतूक नियंत्रण शाखेचे अंमलदार नेहमीच रोडवर ड्युटी करीत असतात व रोडवर होणारे अपघात ठिकाणी त्यांना माहिती मिळालेवर पोहचत ही असतात अपघात स्थळी पोहचलेवर जखमी व्यक्तीचे प्राण वाचविणेस डायल 108 वर कॉल केलेवर घटनास्थळी अंबुलेन्स येई पर्यत जखमीतास वैद्यकीय मदत मिळे पर्यंत हजर असलेले वाहतूक पोलिसांनी अपघातात जखमीतावर प्रथमोपचार करून त्याचा प्राण कसां वाचेल, यासाठी काय काय पाहणी करावी काय कार्यवाही करावी काय दक्षता घ्यावी याचे मार्गदर्शन सह त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी सर्वांना प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखविले ज्यात जखमीतास अगोदर रोडचे बाजूला हलवीताना 3/4 इसमानी एकत्र सोबत सारखे उचलावे, मान डोके सुरक्षित पणे आधार द्यावे, रक्तस्ट्राव कमी होणेस बेंडेज पट्टीने जखमच्या वरील बाजूस दाब दयावे, जखमी चे श्वासोश्वास चालू आहे कि नाही खात्री करावे, तो बोलत असेल तर त्यास धीर द्यावे, त्याला मानसिक शारीरिक आधार द्यावा, अंबुलेन्स ला कॉल करून घटनास्थळी बोलावून घ्यावे, तसेच शासनाने नवीन लौच केलेले **Good samaritan एप** मध्ये अपघात स्थळ चे फोटो व्हिडीओ ही अपलोड केल्यास ही जवळून शासकीय मदत आपणास मिळू शेकते, अपघातांनतर जखमीतास**गोल्डन हवर्स ** मध्ये जखमीतास लवकर उपचार मिलनेकरिता शासकीय / खाजगी जवळ असलेल्या दवाखान्यात भरती करावे, डॉक्टर व पोलीस यांनी ही जास्त चौकशी वगैरे न करता अगोदर दवाखान्यात नेऊन जखमी वर उपचार करावे, जखमी व्यक्तीस सामान्य व्यक्ती ही उपचारासाठी दवाखान्यात भरती करू शेकतो, जे व्यक्ती जखमीतास उपचार करिता लवकर भरती करेल त्या व्यक्तीस शासकीय **राहवीर योजना** अतर्गत 25000 रुपये बक्षीस शासनाने जाहीर केलेले आहे, तसेच जि एखादी संस्था/ टीम अपघाती व्यक्तीस उपचार करिता दवाखान्यात भरती करून त्यांचे प्राण वाचवतील त्यांना ही 1.50000/. रुपयांचे बक्षीस शासनाने जाहीर केलेले आहे, प्रथमउपचार दरम्यान श्वास चालू नसेल तर CPR पद्धतीने त्यास श्वासोश्वास कृत्रिम रीतीने देवून त्याच्या हृदय फुफफूस मध्ये श्वास भरावे याबाबतचे प्रशिक्षण वैद्यकीय अधिकारी श्री, डॉ,श्रद्धा पटेल डॉ,योगेश चांदुरकर डॉ. प्रणय तड्स CPR इमरजेन्सी मॅनेजमेंट सेवाग्राम हॉस्पिटल तसेच डॉ सुबोधकुमार डॉ पवन भगत जिल्हा शासकीय रुग्णालंय वर्धा यांनी ही डायल 108 अंबुलेन्स चे कामकाज पद्धती व उपचार पद्धती बाबत प्रात्यक्षिक वाहतूक पोलिसांनl करून दाखविले, सदर कार्यक्रम मध्ये सर्व वाहतूक शाखेतील अंमलदार पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोउपनि अमोल लगड, ASI रियाज खान, दिलीप कामडी, संजय भांडेकर, मुन्ना तिवारी किशोर पाटील यांनी परिश्रम घेतले पो नि. विलास पाटील वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

वाहतूक शाखेतील अंमलदार  यांना शासकीय डॉक्टरा कडून देण्यात आले प्रथमोपचाराचे प्रशिक्षण…

शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या वतीने माझा वर्ग मूल्यवर्धित वर्ग उपक्रम साजरा* (मानवत / अनिल चव्हाण)———————जिल्हा परिषद प्रशाला हादगाव (बु) तालुका पाथरीचा उपक्रम *"माझा वर्ग -मूल्यवर्धित वर्ग "* आजच्या पिढीमध्ये संविधानिक मूल्य तसेच काळानुरूप मूल्य नष्ट होण्याच्या मार्गावर दिसत आहेत. याची कारणे शोधून शांतीलाल मुथा फाउंडेशन व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांनी मूल्यवर्धन 3.0 साठी सामंजस्य करार केलेला आहे.या कराराअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मूल्यवर्धन 3.0 प्रकल्प सुरू केलेला आहे.या अंतर्गत जिल्हा परिषद प्रशाला हादगाव (बु) तालुका पाथरी येथील राज्य प्रशिक्षक सुधीर पाटील यांनी आपला स्वतःचा वर्गासाठी " माझा वर्ग - मूल्यवर्धित वर्ग "या उपक्रमाचे आयोजन आज प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.या उपक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती हादगाव (बु) यांनी केले. या उपक्रमात शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी शाळेबरोबर आपले गाव देखील मूल्यवर्धित करण्यासाठी सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त केली. या नवो उपक्रमास समितीने शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी तालुका समन्वयक प्रवीण नरवाडे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व शालेय व्यवस्थापन समिती यांना मूल्यवर्धन ची प्रतिज्ञा दिली. या उपक्रमास शाळेतील सर्व शिक्षक वृंद व मुख्याध्यापक यांचे अनमोल सहकार्य लाभले.***

शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या वतीने माझा वर्ग मूल्यवर्धित वर्ग उपक्रम साजरा*������������������������…

* *निधनाची वार्ता कळताच आमदार राजेश विटेकर ढसढसा रडले*. (मानवत / प्रतिनिधी.)——————————मानवत तालूक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील ताडबोरगाव सर्कल मधील खरबा येथे प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी गेलेले पाथरी मतदार संघाचे आमदार राजेश विटेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची वार्ता कळताच प्रचार अर्थावर थांबवून मानवतच्या दिशेने जात असतानाच गाडीत बसून आपल्या भावना आवरणे त्यांना शक्य झाले नाही. दादांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, राजकीय मार्गदर्शन आणि वैयक्तिक ऋणानुबंध आठवताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. चालत्या गाडीतच त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.मानवत येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांच्या निवासस्थानी पोहोचल्या नंतर जिल्हा व मानवत तालुक्यातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अजित दादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना आमदार राजेश विटेकर पुन्हा भावुक झाले. बंधू श्रीकांत विटेकर यांच्या गळ्याला पकडून आपल्या अश्रूंना वाट करून देत होते. त्यांच्या तोंडून शब्द निघत नव्हते, मात्र डोळ्यांतून वाहणारे अश्रू त्यांच्या दुःखाची तीव्रता व्यक्त करत होते. अजित दादा पवार यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, राजकीय मार्गदर्शन आणि वैयक्तिक ऋणानुबंध यामुळे हा धक्का अधिक तीव्र असल्याची भावना यावेळी व्यक्त होत होती..

निधनाची वार्ता कळताच आमदार राजेश विटेकर ढसढसा रडले*.���������������������������������������������…

*महाराष्ट्र ब्रेकिंग....*धक्कादायक.. विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारसह 6 जणांचा मृत्यू.. (बारामती (प्रतिनिधी) आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. ताज्या अपडेटनुसार, या विमान अपघातापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दादांन घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे. बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचं दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे पवार कुटुंबियांवार शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्र ब्रेकिंग....*धक्कादायक.. विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारसह  6 जणांचा मृत्यू..���…

वंचित बहुजन आघाडी चे नेते अश्विन तावाडे यांनी केली मुख्यमंत्र्या कडे महाजन वर कारवाई ची मागणी... नाशिक येथील 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव आपल्या भाषणात कुठे न घेता ज्या संविधान मुळे भारत प्रजासत्ताक झाले त्या महामानवाचे नाव न घेऊन केले अपमान अशी प्रतिक्रिया दिलीहिंगणघाट | दि. 27/01/2026नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून, संविधान, संविधाननिर्माते व संपूर्ण बहुजन समाजाचा थेट अपमान आहे.या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा हिंगणघाट विधानसभा उमेदवार अश्विन तावाडे यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) हिंगणघाट यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्यावर SC/ST Atrocities Act अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची, तसेच या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही. दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन संविधानाचा सन्मान राखण्याची ठाम मागणी केली आहे..! वर्धा जिल्हा शहर प्रतिनिधी फैमोद्दीन शेख

वंचित बहुजन आघाडी चे नेते अश्विन तावाडे यांनी केली मुख्यमंत्र्या कडे महाजन वर कारवाई ची मागणी... नाशिक येथील 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव आपल्या भाषणात कुठे न घेता ज्या संविधान मुळे भारत प्रजासत्ताक झाले त्या महामानवाचे नाव न घेऊन केले अपमान अशी प्रतिक्रिया दिलीहिंगणघाट | दि. 27/01/2026नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून, संविधान, संविधाननिर्माते व संपूर्ण बहुजन समाजाचा थेट अपमान आहे.या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा हिंगणघाट विधानसभा उमेदवार अश्विन तावाडे यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) हिंगणघाट यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्यावर SC/ST Atrocities Act अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची, तसेच या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही. दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन संविधानाचा सन्मान राखण्याची ठाम मागणी केली आहे..! वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख

वंचित बहुजन आघाडी चे नेते अश्विन तावाडे यांनी केली मुख्यमंत्र्या कडे महाजन वर कारवाई ची मागणी...�…

Load More
That is All