वर्धा पोलिसांची मोठी कामगिरी; आंतरराज्यीय चेन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश११ गुन्ह्यांचा उलगडा; २०.९० लाखांचा मुद्देमाल जप्त................ .{मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक} वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तांत्रिक विश्लेषण व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या मदतीने आंतरराज्यीय चेन स्नॅचिंग करणाऱ्या शातिर टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत गुन्हे करून दहशत निर्माण केली होती.या कारवाईत पोलिसांनी एकूण ११ गुन्ह्यांचा उलगडा केला असून त्यामध्ये १० चेन स्नॅचिंग व १ दुचाकी चोरीचा समावेश आहे. सुमारे २० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात १२६ ग्रॅम ३७० मिलीग्राम सोने, एक आयफोनसह दोन मोबाईल फोन आणि बजाज पल्सर दुचाकीचा समावेश आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी हसनैन उर्फ हसन अली जाफर अली (वय २१, रा. भुसावल) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर महाराष्ट्र व मध्य प्रदेशात अनेक गुन्हे दाखल आहेत.तपासाची दिशा आणि गुन्ह्याची पद्धतपोलिसांनी वर्धा कंट्रोल रूमच्या मदतीने विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून धूसर फुटेजमधून आरोपीची ओळख पटवण्यात आली. आरोपीने जून २०२५ मध्ये भोपाल येथील चुनाभट्टी पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या पल्सर दुचाकीचा वापर सर्व चेन स्नॅचिंग गुन्ह्यांत केला होता.तपासादरम्यान आरोपीची पत्नी सुखैना अली व बहीण सना अली या चोरीचे दागिने ग्वाल्हेर येथील ज्वेलर्सकडे गहाण ठेवण्यास मदत करत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, आतिश उर्फ सादिक इबादत अली हा दुसरा साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.नोंद गुन्ह्यांचा तपशीलरामनगर (वर्धा) – ६ गुन्हे (२०२५ ते मार्च २०२६),वर्धा शहर – १ गुन्हा, सावंगी (मेघे) – १ गुन्हा,पुलगाव – २ गुन्हे (२०२४),यवतमाळ (अवधूतवाडी) – १ गुन्हा,मंडला (मध्य प्रदेश) – १ गुन्हा (फेब्रुवारी २०२६),भोपाल (चुनाभट्टी) – १ गुन्हा (दुचाकी चोरी, जून २०२५).पोलिस पथकाचे कौतुकही कारवाई वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अतिरिक्त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद चौधरी व त्यांच्या एलसीबी तसेच सायबर पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.विशेष : आरोपी हसन अली हा जळगाव जिल्ह्यातील पाच गंभीर गुन्ह्यांतही फरार होता. या कारवाईमुळे वर्ध्यासह इतर जिल्ह्यांतील अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

वर्धा पोलिसांची मोठी कामगिरी; आंतरराज्यीय चेन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश११ गुन्ह्यांचा उलगडा; २०.९०…

23 मार्च ला होणाऱ्या मोर्चात वंचित आघाडी कार्यकर्त्यांनी, सहभागी व्हावे.जिल्हाध्यक्ष शंकर महाजन. (मारोती एडकेवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड )नांदेड : चलो नागपूर, चलो नागपूर, चलो नागपूर.हजारो - लाखो लोकांच्या बलिदानातून, अनेक वर्ष चाललेल्या स्वातंत्र्य लढ्यातून मिळालेले स्वतंत्र आणि सार्वभौमत्व हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गहाण ठेवल्याचे दिसत आहे.देशाला गुलामीकडे घेऊन जाण्याचा डाव मोदींनी आखला आहे की काय अशी शंका यावी अशी निर्णय प्रक्रियेतून देशात राबवली जात आहे. अमेरिका म्हणेल त्याच देशाकडून खरेदी करायची अमेरिका म्हणेल त्याच देशाकडून खरेदी नाही करायची. अमेरिका म्हणेल ते निर्णय देशात घेतले जात आहे. अमेरिका धर्जिण धोरणे आखली जात आहे. त्यामुळे देशाचे सार्वभौमत्व मोदींनी अमेरिकेकडे गहाण ठेवले आहे की काय अशी शंका येत आहे.एपस्टीन फाईल बाहेर आल्यामुळे याचा दबाव मोदींवर असावा असे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा आणि देशाला पारतंत्र्यापासून रोखावे यासाठी २३ मार्च रोजी नागपूर आरएसएस मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे या साठी नांदेड जिल्ह्यातुन हजारो कार्यकर्त्यासह आजी माजी पदआधिकारी नगरसेव उपस्थती रहावे असे अव्हान जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यानी केली आहे.तसेचवंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्यासाठी नांदेड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड येथे बैठक घेण्यात आले या वेळी प्रदेश उपाध्याक्ष फारुक अहमदसर, प्रदेश सदस्य,अविनाश भोसीकर,मराठवाड सदस्य डाॅ.संघरत्न कुर्‍हे, जिल्हाध्यक्ष नांदेड ( दक्षिण) शंकर महाजन जिल्हाध्यक्ष (उत्तर) राज आटकोरे, जिल्हा महासचिव (दक्षिण) रवि जिल्हा महासचिव( उत्तर) दीपक मगर, विठ्ठल गायकवाड महानगराध्यक्ष संजय टिके जिल्हा संघटक डॉक्टर राम वनंजे, विनायक गजभारे जिल्हा उपाध्यक्ष, रंगनाथ गजले जिल्हा सचिव, अरुण भद्रे जिल्हा उपाध्यक्ष, जयकुमार ढवळे जिल्हा सल्लागार, विद्यानंद पवळे जिल्हा उपाध्यक्ष, गौतम डुमणे, प्रकाश कोल्हे, गणपत सवयी सोनकांबळे जिल्हा उपाध्यक्ष, के. एच. वने जिल्हा उपाध्यक्ष, दीपक कसबे प्रसिद्धीप्रमुख, बालाजी सूर्यतळ जिल्हाउपाध्यक्ष, धाराजी इंगोले जिल्हा उपाध्यक्ष, उत्तम वाढवे सह संघटक, प्रल्हाद इंगोले जिल्हा सल्लागार, यासह खूप मोठ्या संख्येने नांदेड उत्तर व दक्षिणचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

23 मार्च ला होणाऱ्या मोर्चात वंचित आघाडी कार्यकर्त्यांनी, सहभागी व्हावे.जिल्हाध्यक्ष शंकर महाजन.

*श्रीराम नवमीनिमित्त नागरी सुविधा पुरवण्याची रामभक्तांची मागणी...* मालेगाव शहरातील रामभक्त बांधवांनी श्रीराम नवमी उत्सव समिती, मालेगावच्या वतीने महानगर पालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक तेघवीर सिंग संधू यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करून श्रीराम नवमी उत्सवाबाबत विविध मागण्यासाठी सोयी सुविधा पुरवण्याची मागणी केली.श्रीराम नवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावर स्वच्छता करून सुशोभीकरण करण्याबरोबर अतिक्रमण काढण्यात यावे व रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात यावी आणि श्रीराम जन्मोत्सवातील श्रीराम मूर्ती 18 फूट उंच असल्याने मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्याची छाटणी करून रस्त्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग दूर करून मुबलक प्रकाशाची व्यवस्था करण्यात यावी व शोभायात्रा मिरवणुकीला उपस्थित असलेल्या रामभक्तांसाठी महानगरपालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णवाहिका व अग्निशामक दलाची व्यवस्था करण्यात यावी. अशा स्वरूपाच्या मागण्या करत श्रीराम नवमीच्या दिवशी मालेगाव शहरातील कत्तलखाने व मद्यविक्री दुकाने देखील बंद ठेवण्याबाबत सांगण्यात आले. श्रीराम नवमी उत्सवाच्या मालेगाव कॅम्प भागातून रामसेतू पुलापर्यंत नियोजित मिरवणूक मार्गावर मिरवणुकीच्या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. यामुळे मिरवणूक विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होते. हे टाळण्यासाठी मोसम पूल सह मोची कॉर्नर, राष्ट्रीय एकात्मता चौक, महात्मा फुले रोड व रामसेतू पुल या ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मागणी करण्यात आली.याप्रसंगी रामदास बोरसे, हरिप्रसाद गुप्ता, अजय वाघ, दीपक बच्छाव, सारंग बोरसे, मच्छिंद्र शिर्के, दिनेश सोनजे, विनोद निकम, शुभम पवार, निकेतन प्रमाणे आदी उपस्थित होते.

श्रीराम नवमीनिमित्त नागरी सुविधा पुरवण्याची रामभक्तांची मागणी...*��������������������…

आदिवासी विकास मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांची राज्यपालांशी चर्चा

मुंबई: आदिवासी कलाकार, लेखक, पर्यावरण कार्यकर्ते यांना लोकभवन येथे घेऊन येण्याची राज्यपालांची आदिवासी विकास म…

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे निर्देश

पुणे :  ऊसतोड महिला कामगारांसाठी आरोग्य सुविधा, मुलांना शैक्षणिक सुविधा, कायदेविषयक साहाय्य पुरविण्यासह त्या…

पाठ्यक्रम से बाहर की पुस्तकों की जबरदस्ती बर्दाश्त नहीं – शिक्षण सभापति सौ. पल्लवी सुशांत बाराहाते की चेतावनी”

(मो मकसूद बावा ) हिंगणघाट शहर की कुछ निजी तथा सीबीएसई से संबद्ध स्कूलों में विद्यार्थियों को पाठ्…

पाडळसे शिवपुराण कथेच्या आयोजकांचा क्रूर चेहरा; वीटभट्टीवर २५ मजूर कुटुंबासह उपाशी! धर्माचा इव्हेंट करणाऱ्या रतन धोंडू भोईच्या भट्टीवर मजुरांवर अत्याचार; मजुरांनी ११२ नंबर फिरवून मागितली पोलिसांची मदत

पाडळसे (ता. यावल)  लाखो भाविकांच्या उपस्थितीत 'शिवमहापुराण' कथेचा सोहळा रंगला असताना, द…

`इकरा पब्लिक स्कूलचा 'कोहिनूर' चमकला; माजी विद्यार्थी सय्यद शोएबची सीए परीक्षेत गगनभरारी!` (रावेर / शेख शरीफ)देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही परीक्षा उत्तीर्ण होऊन सय्यद शोएब सय्यद फारूक याने इकरा पब्लिक स्कूल, मोहाडीच्या यशाच्या परंपरेत एक सुवर्ण पान जोडले आहे. मार्च महिन्याच्या निकालात शोएबने आपल्या बौद्धिक कौशल्याची चुणूक दाखवत हे यश संपादन केले.मूळचे संभाजीनगरचे रहिवासी असलेले सय्यद शोएब यांच्या जडणघडणीत इकरा पब्लिक स्कूलचा मोठा वाटा आहे.शाळेत घालवलेल्या ५ वर्षांच्या काळात त्यांना मिळालेले शैक्षणिक वातावरण आणि शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांच्या यशाचा पाया ठरले. हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सीए होण्याचे ध्येय समोर ठेवले आणि आज ते पूर्ण करून दाखवले.इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार यांनी शोएबच्या यशावर आनंद व्यक्त करताना म्हटले की, "शोएब हा इकराचा खऱ्या अर्थाने कोहिनूर आहे. त्याची मेहनत आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती (Never Give Up Attitude) आजच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दीपस्तंभ आहे.जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्ट कशी शक्य करता येते, हेच त्याने सिद्ध केले आहे."या देदीप्यमान यशाबद्दल शाळेचे प्राचार्य शेख शकील व सर्व शिक्षक वृंदांनी शोएबचे अभिनंदन केले आहे. "आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी आज देशाच्या आर्थिक क्षेत्रातील उच्च पदावर पोहोचला आहे, ही आमच्यासाठी सर्वात मोठी गुरुदक्षिणा आहे," अशा भावना प्राचार्य शेख शकील यांनी व्यक्त केल्या.

इकरा पब्लिक स्कूलचा 'कोहिनूर' चमकला; माजी विद्यार्थी सय्यद शोएबची सीए परीक्षेत गगनभरारी!`…

भद्रावती एमआयडीसीत दोन मोठ्या हरीत पोलाद प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन; रोजगार व गुंतवणुकीला चालना..

( तालुका प्रतिनिधी   महेश निमसटकर ) भद्रावती एमआयडीसी परिसरात उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरणा…

मारूळ येथील तीन वर्षाच्या मुनिफानुर अफसार अली ने पहिला रोजा पुर्ण केला (मारूळ प्रतिनिधी राजू भाई सैयद)यावल तालुक्यातील मारुळ येथील तीन वर्षाची मुनिफाानुर अफसार अली हिने रमजान महिनाचा 27 वा पहिला रोजा ठेवल्याने आई वडीलां सह सर्व गावातील नागरिकांकडुन ह्या तीन वर्षीय नबीहानुर चिमुकलीचे खुप मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे, गावातच नव्हे तर सर्वत्र स्तरातून ह्या तीन वर्षाच्या मुनिफाानुर चे सर्वत्र कौतुक केले जात आहे..

मारूळ येथील तीन वर्षाच्या नबीहानुर अफसार अली ने पहिला रोजा पुर्ण केला����������������������������…

मारूळ येथील तीन वर्षाच्या मुनिफाानुर अफसार अली ने पहिला रोजा पुर्ण केला.

(मारूळ प्रतिनिधी राजू भाई सैयद) यावल तालुक्यातील मारुळ येथील तीन वर्षाची मुनिफानुर अफसार अली हिने…

यावल शहरातील रहिवासी शेख हसनेन चुलबुल वय आठ वर्ष याचे पुर्ण महिनाचे रमजान चे रोजे

यावल (विशेष प्रतिनिधी) यावल शहरातील रहिवासी शेख हसनेन चुलबुल वय आठ वर्ष याचे पुर्ण महिनाचे रमजान…

उमरी खरेदी विक्रीसंघ निवडणूक 2026 प्रचार दौरा संत दासगणू महाराज जन्मभूमी गोरठा भूमीत.

उमरी  (विशेष प्रतिनिधी) खरेदी विक्रीसंघ निवडणूक 2026 प्रचार दौरा संत दासगणू महाराज जन्मभूमी गोरठा भूमीत…

महागाईचा 'तडाखा' अन् सणांचा 'धडाका'देगलूरच्या बाजारपेठेत गुढीपाडवा व ईदची विक्रमी गर्दी..

तालुका प्रतिनिधी देगलूर  (पिंजारी माहेमूद ) मराठी नववर्षाची नवी उमेद घेऊन येणारा गुढीपाडवा आणि पव…

पातूर येथे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी भव्य रोजा इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न... हॉटेल ग्रँड मेहफिल येथे विविध समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग; बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश.. (पातूर | प्रतिनिधी : ) राष्ट्रीय एकात्मता, मानवी एकता, बंधुत्व आणि समानता या उदात्त मूल्यांचा संदेश देण्यासाठी पातूर शहरात भव्य रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. पातूर येथील हॉटेल ग्रँड मेहफिल येथे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि बंधुभावाच्या वातावरणात पार पडला.या इफ्तार पार्टीचे आयोजन डॉ. साजिद शेख व मोहम्मद फरहान अमीन यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात विविध समाजघटकांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रमजान महिन्याच्या पवित्र वातावरणात सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत रोजा इफ्तार केला. यावेळी परस्पर संवाद साधत सामाजिक सलोखा, एकोप्याची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी अशा कार्यक्रमांमुळे समाजात आपुलकी, परस्पर आदर आणि बंधुभाव अधिक दृढ होतो, असे मत व्यक्त केले.या प्रसंगी प्रा. सलमान अहमद व जहूर अहमद यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कृष्णा अंधारे, शंकरराव नाभरे, सुरेंद्र उगले, हिदायत खान रूम खान, हाजी सय्यद बुरहान, सय्यद मुजाहिद इकबाल, डॉ. नंदकिशोर राऊत, डॉ. अभय भुस्कुटे, पत्रकार उमेश देशमुख, मोहन जोशी, अॅड. विजय बोरकर, निर्भय पोहरे, निखिल उपरवट, अब्दुल करीम सर, डॉ. वकार अन्सारी, पत्रकार नातीक शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनंजय मिश्रा यांनी केले तर डॉ. साजिद शेख यांनी आभार प्रदर्शन केले.

पातूर येथे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी भव्य रोजा इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न...          …

न्यायमूर्ती बदर समितीचा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अहवाल मुख्यमंत्र्यांनी देवेंदजी फडणवीस साहेब यांनी स्विकारला.. गेल्या 40 वर्षांपासून सुरु असलेल्या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण लढ्यातील सर्व नेते, सर्व संघटना विशेषतः अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचे प्रणेते लोकनेते मधुकरराव कांबळे साहेब आणि क्रांतिसूर्य बाबासाहेब गोपले साहेब यांच्या व आमच्या तीन हुतात्म्याच्या संघर्षाचे फलित आहे.जस्टिस अनंत बदर समितीने आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यांच्याकडे अ ब क ड वर्गीकरणाचा अहवाल सादर केला. त्याप्रसंगी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार अमित गोरखे, श्रीकर परदेशी(सचिव मुख्यमंत्री) प्रविण परदेशी, अश्विनी भिडे मॅडम, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेब आदी उपस्थित होते.येणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला घेऊन लवकरच राज्यांमध्ये अ ब क ड वर्गीकरण लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिली. सर्व उपेक्षित म्हणजे समाज मनःपूर्वक बांधवांतर्फे धन्यवाद🙏🌹आपला परिमल मधुकरराव कांबळे अध्यक्ष, राष्ट्रीय लहुशक्तीDevendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan BJP Maharashtra Madhukarrao Kamble

न्यायमूर्ती बदर समितीचा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अहवाल  मुख्यमंत्र्यांनी देवेंदजी फडणवीस  सा…

घरकुल लाभार्थ्यांचे तातडीने हप्ते जमा करा: (पिंजारी माहेमूद (समाज सेवक)पिंजारी & तालुका } प्रतिनिधी देगलूर) देगलूर. महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यासह तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गरजु लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत.मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून घरकुल लाभार्थ्यांचे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अघापही रोजगाराचे पैसे बॅक खात्यात जमा झालेले नाही रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास कोट्यवधी रुपये मंजुर होऊनही लाभार्थ्यांना कोणताही याचा लाभ मिळालेला नाही.त्यामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांमधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.त्याच बरोबर अनेक घरकुल लाभार्थ्यांनी कर्जबाजारी काढुन घरकुलाच्या जोत्याचे बांधकाम पूर्ण केले आहेत त्यांचे हप्ते मिळत नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे बांधकाम रखडले आहेत.जसेतसे चौकट लेवल बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांचे जिओ टाॅकीग होवूनही जवळपास दोन ते तीन महिन्यांनंतरहि घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने प्रधानमंत्री आवास योजना हि कागदावरच नियमित असल्याचे चित्र दिसून येत आहे.अनेक घरकुल लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार हि योजना राबवित आहे मात्र या योजनेला आता कुठेतरी जंग लागल्याचे दिसून येत आहे.घरकुल योजनेच्या अल्पशा निधीमध्ये घर बांधने शक्य नाही परंतु आपणास घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून अनेक घरकुल लाभार्थ्यांनी कर्जबाजारी, व्याज दराने सोने,चांदी काढून घरकुलाचे बांधकाम सुरू केले आहेत मात्र शासनाकडून वितरीत होणाऱ्या निधीत विलंब होत असल्याने घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांमधुन नाराजीचे सूर छेडले जात आहे घरकुलाच्या अनुदानाचे हप्ते कधी येणार म्हणून रोज रोज पंचायत समिती तर कधीं कधीं जिल्हा परिषदेच्या पायऱ्या नागरिकांना जिझवाव्या लागत आहेत त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असुन केंद्र सरकारने व राज्यसरकारने तातडीने घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ते वितरीत करण्याची मागणी (समाज सेवक) पिंजारी माहेमूद वाकान यांनी केली आहे.

घरकुल लाभार्थ्यांचे तातडीने हप्ते जमा करा:

दिनांक.१६/३/२०२६, ला दुपारी १२, वाजता वेळा येथे “संवाद उपक्रम" अंतर्गत बैठक संपन्न...................................... वेळा (ता. हिंगणघाट) : महाराष्ट्र शासन व पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा यांच्या निर्देशानुसार “संवाद उपक्रम” अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, वेळा येथे गाव पातळीवरील बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गावातील कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या विविध समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. अनमोल फुलझेले (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा वेळा), श्री. चंदू तपासे (ग्रामसेवक), श्री. दीपक वैरागडे (वनरक्षक), श्री. पंकज चौधरी (कृषी सहाय्यक), श्री. आशिष मेश्राम (महावितरण – J.E.), श्री. सतीशभाऊ सायंकार (सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, भा ज पा), श्री. चंद्रभानजी सायंकार (माजी ग्रामसेवक), श्री. तुकारामजी सायंकार (ज्येष्ठ नागरिक), श्री. मनोज आसोले (शिक्षक – जि.प. शाळा), श्री. आसिफ हुसैन (भाजपा - अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष) तसेच श्री. अमीन अहमद (पोलीस पाटील) उपस्थित होते.बैठकीत नागरिकांनी गावातील विविध समस्या व सूचना मांडल्या. त्यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत आश्वासन दिले. यावेळी हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री.अनिल राऊत साहेब यांचे मनोगत विशेष महत्त्वाचे ठरले. त्यांनी नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच सायबर गुन्हे, वाहतूक नियम व सामाजिक सलोखा याबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास गावातील इतर मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आले.. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

दिनांक.१६/३/२०२६, ला दुपारी १२, वाजता वेळा येथे “संवाद उपक्रम" अंतर्गत बैठक संपन्न..........…

Load More
That is All