अल्पजन जिंकतो!बहुजन हारतो! भाजप सतत तीन वेळा लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणूक जिंकले.काहींनी कयास केला .ईव्हिएम मधे हेराफेरी केली असेल.म्हणून तर कांग्रेस नेते भाजपात जात आहेत.शक्यता आहे.कारण मतदान आधीच भाजप नेते विजयी संख्या जाहीर करून टाकतात.जितकी सेटींग झाली तितके आकडे जाहीर करणे म्हणजे चोरांनी चोरी बरळणे. काहींचे निरीक्षण आहे कि,हे पैसा वाटतात.हे जग जाहीर आहे.आता मताचे पैसे देणे आणि घेण्यात कोणालाही लाज लज्जा शरम वाटत नाही.चक्क मतदार यादी आणि तितकी रक्कम खुले आम घेऊन पक्षाचे कार्यकर्ते फिरतात. तिसरा शोध लावला कि, यांनी बोगस मतदार वाढवून ठेवले.एका प्रभागात सुरूवात तीन हजार वरून होते.त्यामुळे मतदान संख्येचा स्कोअर भराभर वाढतो. भाजपचे हे बळ आहे.सामर्थ्य आहे.ते दुर्लक्ष करून चालणार नाही. विरोधकांचे काय?विरोधक वारंवार निवडणूक का हारतात?वाटते ,आता जनमत आपल्या बाजूने आहे.पण परिणाम मात्र उलटेच निघतात.तर विरोधकांची चूक सुद्धा अभ्यासली पाहिजे. भाजप हा उच्चवर्णिय लोकांचा पक्ष आहे.त्यात व्यापारी, कारखानदार यांचा मोठा वाटा आहे.ते सरकार ला कर तर देतातच पण फंडींग सुद्धा देतात.त्यामुळे तो पक्ष आर्थिक मजबूत होतो.माध्यमे, पोलिस, निवडणूक अधिकारी यांना आधीच पैसा देऊन खिशात घालतो.म्हणजे माध्यमे, पोलिस आणि निवडणूक अधिकारी सुद्धा भाजप साठी काम करतात.आता तर निवडणुक आयुक्त आणि मुख्य न्यायाधीश सुद्धा! या उलट दान, अनुदान,राशन, घरकुल , शौचालय असे सर्वच फुकट घेणारी माणसे आपले राजकीय मत बनवत नाहीत.भिक्षांदेहिला मत नसते.मत बनवू शकते असे मन नसते.जो देईल त्याला आशिर्वाद देतात.म्हणून जो पैसा देईल त्यालाच मत देतात. अशी माणसे विचार करतच नाहीत कि हे मत महत्वाचे आहे.एकदा बटन दाबले तर हजार,दोन हजार मिळतात यामुळे ते इतके खुष होतात कि,हे मत विकायचे नसते हेच कळत नाही.मत विकून पैसा मिळवून देण्याची संधी ज्यांनी दिली त्याला देव मानतात.येथेच संपले सारे! काही लोक याच्या पलिकडे अजून तरी विचार करीतच नाहीत.त्यामुळे पांच वर्षे भाजप विरोधात मोर्चा काढणारी माणसे,भाजपला दुषणे देणारी माणसे भाजप सहज खरेदी करून घेतो.मताचा पैसा वाटप करणारा कधी येणार?याची वाट पाहातात.एकमेकांना विचारतात.तुमचे पैसे मिळालेत का?आमचे का आले नाही अजून? या अशा मतदारांच्या भरोशाने भाजप विजयी होत आहे.हे असेच चालले तर भाजप कधीच पराजित होणार नाही.लोकशाहीच्या अपयशाचे खरे कारण यात दडलेले आहे."बिका हुआ इन्सान! " अशी विकली जाणारी माणसे परकिय आक्रमकांनी विकत घेतली होती.पैसा घेऊन यांनी आपल्या राजाची कमजोर भींत दाखवली होती.म्हणून शे दोनशे हल्लेखारांनी लाख लाख सैन्याला हरवले होते.आजही तेच होत आहे.अल्पसंख्यांक लोकांवर अवलंबून असलेला भाजप विकली जाणारी माणसे खरेदी करून विजयी होत आहे. या मत विक्री चे परिणाम घातक होणार आहेत.या आधी मनुस्मृती जाळली होती. आता भारतात हुकुमशाही लादली जाणार आहे.संविधान जाळले जाणार आहे. गांधी नेहरू यांच्या काळात मनुस्मृती जाळली असेल.ते उदारमतवादी होते.आता शक्य नाही.आता संविधान जाळले जाणार आहे.याला कारणीभूत हेच मत विकणारे ठरणार आहेत. हजारो वर्षांपासून आतापर्यंत तिसऱ्या व चौथ्या वर्णातील वर्ग खितपत पडला होता.याची कारणे या स्वभावात दडलेली आहेत.या आचरणात दडलेली आहेत.परिस्थिती बदलली,संधी मिळाली तरीही तो स्वभाव,ते आचरण बदलले नाही तर पुन्हा तेच होणार जे हजारो वर्षांपासून आतापर्यंत होत आले आहे. आजतरी एखाद्या अन्याय विरोधात मोर्चा काढतात.काढू शकतात.पण पुढे ते सुद्धा शक्य होणार नाही.याची सुज्ञ लोकांनी नोंद घ्यावी.नाही घेतली तर , माझ्यावर अन्याय का करीत आहात?असे विचारण्याची संधी पुन्हा मिळणार नाही..... शिवराम पाटील ९२७०९६३१२२महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव

*मुख्यमंत्री नीतीश कुमार द्वारा मुस्लिम महिला का हिजाब जबरन हटाने पर जावेद जकरिया का कड़ा विरोध*. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)अकोला।बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार द्वारा एक सरकारी कार्यक्रम के दौरान मुस्लिम महिला डॉक्टर का हिजाब अपने हाथों से जबरदस्ती हटाने का मामला सामने आया है। यह पूरी घटना कैमरे में कैद हो गई है और इसका वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। इस घटना को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के प्रदेश संगठक सचिव जावेद ज़करिया ने कड़ा विरोध जताया है।यह घटना पटना में आयोजित एक सरकारी कार्यक्रम के दौरान हुई, जहाँ मुख्यमंत्री 1283 नवनियुक्त चिकित्सकों को नियुक्ति पत्र सौंप रहे थे। मंच पर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी और विजय कुमार सिन्हा भी मौजूद थे। इसी दौरान डॉक्टर नुसरत परवीन नियुक्ति पत्र लेने मंच पर पहुँचीं। तभी मुख्यमंत्री नीतीश कुमार ने अपने हाथों से उनका हिजाब जबरदस्ती हटाया और कहा,“आप तो डॉक्टर हैं, चेहरा क्यों ढंक रही हैं।”मुख्यमंत्री की इस हरकत से कार्यक्रम स्थल पर कुछ देर के लिए सन्नाटा छा गया। यह कृत्य महिला की गरिमा और उसकी धार्मिक स्वतंत्रता पर सीधा हमला है।इस पर प्रतिक्रिया देते हुए जावेद ज़करिया ने कहा कि मुख्यमंत्री का व्यवहार असंवेदनशील, अपमानजनक और निंदनीय है। उन्होंने कहा कि हिजाब मुस्लिम महिला की धार्मिक पहचान और सम्मान से जुड़ा हुआ है। सार्वजनिक मंच पर किसी महिला का इस तरह अपमान करना न केवल अनैतिक है, बल्कि संवैधानिक मूल्यों के भी खिलाफ है।उन्होंने कहा कि भारत एक धर्मनिरपेक्ष देश है, जहाँ हर नागरिक को अपने धर्म और पहनावे की स्वतंत्रता है। मुख्यमंत्री जैसे संवैधानिक पद पर बैठे व्यक्ति से ऐसी हरकत की उम्मीद नहीं की जा सकती।जावेद ज़करिया ने मांग की कि मुख्यमंत्री नीतीश कुमार इस घटना के लिए सार्वजनिक रूप से माफी माँगें

मुख्यमंत्री नीतीश कुमार द्वारा मुस्लिम महिला का हिजाब जबरन हटाने पर जावेद जकरिया का कड़ा विरोध*.�…

अकोला:आज रोजी अकोला शहर वाहतूक शाखेमार्फत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान शहरात रॉंग साईड वाहन चालवणाऱ्या एकूण 113 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहन वाहतूक शाखेत जमा करून मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून एकूण ₹59,500 इतका दंड आकारण्यात आला आहे.यापैकी 54 वाहनचालकांकडून ₹27,000 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच संबंधित वाहनचालकांना भविष्यात रॉंग साईड वाहन चालवू नये, याबाबत समज देऊन वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी समुपदेशन करण्यात आले आहे. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)

बाल ब्रह्मचारी तपस्वी साध्वी डॉ. कपिला गोपाल सरस्वती दीदींची चोपड्यात पाच दिवसीय "भव्य गौ कृपा कथाडिसेंबर १०, २०२५ बाल ब्रह्मचारी तपस्वी साध्वी डॉ. कपिला गोपाल सरस्वती दीदींची चोपड्यात पाच दिवसीय "भव्य गौ कृपा कथा " (चोपडा,दि.११( संजीव शिरसाठ) चोपडा शहर व पंचक्रोशीत पहिल्यांदाच पाच दिवसीय "भव्य गौ कृपा कथा"चे आयोजन करण्यात आलेले आहे. ही कथा दिनांक 21/ 12/ 2015 ते 25 /12/ 2025 घ्या दरम्यान दुपारी २ ते ५ या कालावधीत होईल. कथा कृषी उत्पन्न बाजार समिती आवार चोपडा येथे होत असून कथेच्या प्रवक्त्या बाल ब्रह्मचारी तपस्वी साध्वी डॉक्टर कपिला गोपाल सरस्वती दीदी उर्फ आस्था दीदी ह्या असून त्यांच्या सुश्राव्य वाणीत कथा ऐकावयास मिळणार आहे .कथेच्या प्रथम दिवशी म्हणजे 21 रोजी सकाळी 11:३० वाजता विद्याविहार कॉलनी मधील हनुमान मंदिरापासून ते कथासळापर्यंत भव्य कलश यात्रा निघणार आहे तसेच त्या कथेचे प्रसारण धेनू टीव्ही व youtube वर प्रसारित देखील होणार आहे .विशेष म्हणजे या कथेद्वारे गो कृपा पासून श्रावण बाळासारखी संतान प्राप्ती, गर्भस्थ बाळाला चांगले संस्कार देणे ,विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास तात्काळ कायम स्वरुपी स्मरणात कसा ठेवावा तसेच कुमारी कन्याला नऊ सोमवारच्या आत सुयोग्य पती कसा मिळणार? सासू-सासरे व पतीची सेवा करणारी सून कशी मिळेल? राधाकृष्ण सारखे प्रेम पती-पत्नीमध्ये कसे स्थापित होईल आदि बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तरी या कथा श्रवणाचा लाभ मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कथा आयोजक ज्ञानेश्वर पाटील, नंदलाल पाटील, सतीश पाटील, लखन भैय्या व कामधेनु गोसेवक समूह गोपाल परिवारातर्फे करण्यात आले आहे.

बाल ब्रह्मचारी तपस्वी साध्वी डॉ. कपिला गोपाल सरस्वती दीदींची चोपड्यात पाच दिवसीय "भव्य गौ कृ…

रायगड स्वाभिमान वृत्तपत्राचा तिसरा वर्धापन दिन सोहळा रोहा येथे यशस्वीपणे संपन्न. (वर्धा जिल्हा प्रतिनिधीअब्दुल कदीर.)**रोहा:** रायगड स्वाभिमान वृत्तपत्राच्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्याने रोहा शहरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. १४ डिसेंबर २०२५ रोजी तांबडी रोड येथील श्रीकृष्ण हॉटेल अँड फॅमिली गार्डन येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मुख्य संपादक रघुनाथ कडू यांच्या हस्ते गणेश पूजन, दीप प्रज्वलन आणि श्रीफळ फोडून झाली. या सोहळ्यात पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन माणुसकी आणि अन्यायाविरुद्ध लढा ही रायगड स्वाभिमानाची ओळख असल्याचे मुख्य संपादक रघुनाथ कडू यांनी प्रास्ताविकेत ठणकावून सांगितले.कार्यक्रमात राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी बसवेकर, नायब तहसीलदार राजेश थोरे, संविधान अभ्यासक नूरखा पठाण, वाईस ऑफ मीडियाचे कोकण विभाग अध्यक्ष अरुण ठोंबरे, आयुर्वेदिक सल्लागार प्रदीप, ची भेकरे माजी नगरसेवक दीपक शेठ तेंडुलकर, कृषी तज्ञ मांडवकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. नूरखा पठाण यांनी संविधानाची ताकद आणि नागरिकांचे हक्क यावर मार्गदर्शन केले, तर भारतीय संविधानाचे उद्योग विषयाचे सामूहिक वाचन करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून १५० ते २०० प्रतिनिधी-पत्रकार उपस्थित असून, राज्यभरात २५० हून अधिक प्रतिनिधी रायगड स्वाभिमानशी जोडले गेले आहेत.वर्धा जिल्ह्यातील पत्रकार अब्दुल कदीर मामु (जेष्ठ पत्रकार) आणि विपुल पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.तसेच 40 ते 50 पत्रकारांना सन्मानित करून सन्मानचिन्ह देण्यात आले उपस्थित मान्यवरांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष टेंबे यांनी केले, तर पत्रकार कैलास राजे घरत यांनी आभार मानले; शेवट वंदे मातरम या सामूहिक राष्ट्रीय गीताने झाला. उपसंपादक रोहन रघुनाथ कडू, सहसंपादक अरविंद मगर, आवृत्ती संपादक किरण मोरे, सर्व प्रतिनिधी-पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी विकास प्रतिष्ठान रोहा आणि तालुका अध्यक्ष गणेश भगत यांचे मोलाचे योगदान लाभले.

रायगड स्वाभिमान वृत्तपत्राचा तिसरा वर्धापन दिन सोहळा रोहा येथे यशस्वीपणे …

महाराष्ट्र पोलीस विशेष पोलीस वार्तापत्र पोलीस अधीक्षक कार्यालय, यवतमाळदिनांक १५/१२/२०२५पोलीस ठाणे वडकी हद्दीतुन नागपुर हैद्राबाद हायवेवरुन गोवंशीय बैल तस्करी करणाऱ्या दोन ट्रक मधुन ६५बैलांची सुटका करुन केला ३०,००,०००/- रु चा मुद्देमाल जप्तस्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाईदिनांक १५/१२/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा उपविभागात अवैध धंदे विरुध्द कारवाई व अ उघड गुन्हेउघडकीस आणन्याचे दृष्टीने पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपणीय माहिती मिळाली की, ट्रक क्रमांक एम.एच. ४० वाय ०९५१ वएम.पी ०४ एच ई ३५१५ या वाहनांमध्ये कत्तलीकरीता अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करणार आहेत अशा माहिती वरुनपथकाने क्षणाचाही विलंब न करता सदर रोडवरील ग्राम सिंधोडा गावाजवळ सापळा रचला असता पथकास समजले की, सदर वाहतुककरणारे ट्रक हे भारत पेट्रोल पंपजवळील खाली जागेत जय बजरंग बली राजस्थानी धाब्या जवळ असलेल्या पाकींग मध्ये लपुन आहेत.त्यावरुन सदर ठिकाणी जावुन माहिती प्रमागे वर्णन व क्रमांकाचे ट्रक ड्रायव्हर व त्यासोबतचे १) शेख शहनवाज शेख महेबुब वय ३१वर्ष, रा. यशोधरा नगर शारदा चौक नागपुर, २) शेख अरबाज शेख कलीम वय २५ वर्ष, भाजीमंडी नागपुर, ३) मो. नसरुद्दीन दुरशाद्दीनकुरेशी वय २८ वर्ष, मदन चौक, कामटी नागपुर, ४) मो. हसन रोशन अंसारी वय २६ वर्ष, रा. बन्ते आनंद कौशल नगर, पिली नदीनागपुर, यांना ताब्यात घेवुन वाहनांची झडती घेतली असता दोन्ही वाहनातुन ६५ जिवंत बैल व १ मयत गोरा असा एकुण ६६ जनावरेकिमंत ९,८०,०००/- रु चे कोणतीही चारापाण्याची व्यवस्था न करता, असुरक्षीतरित्या दाटीवाटीने कोंडुन आणल्याचे दिसुन आले तसेचत्यातील एक गोरा मयत असल्याचा आढळुन आल्याने नमुद आरोपीतांकडे विचारणा केली असता सदरचा माल हा ५) वकार कुरेशीरा. कामठी नागपुर यांचा असल्याचे सांगीतले व त्यांचेच सांगण्यावरुन ते सदर जनावरे हेद्राबाद येथे घेवुन जात असल्याचे सांगीतले.वरुन ६५ बैलांची सुखरुप सुटका करुन वैद्यकिय तपासणी करुन नमुद गोवंशाची चारापाणी व्यवस्था व सुश्रुशे करीता गोकुलम गोसंरक्षण संस्था ग्राम पहापळ ता. केळापुर येथे ठेवण्यात आले असुन आरोपोतांकडुन दोन ट्रक, मोबाईल व ६५ जिवंत व एक मृत असे६६ गोवंश असा एकुण ३०,००,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी १) शेख शहनवाज शेख महेबुब वय ३१ वर्ष, रा. यशोधरानगर शारदा चौक नागपुर, २) शेख अरबाज शेख कलीम वय २५ वर्ष, भाजीमंडी नागपुर, ३) मो. नसरुद्दीन दुरशाद्दीन कुरेशी वय २८वर्ष, मदन चौक, कामटी नागपुर, ४) मो. हसन रोशन अंसारी वय २६ वर्ष, रा. बन्ते आनंद कौशल नगर, पिली नदी नागपुर, ५) पाहिजेआरोपी वकार कुरेशी रा. कामठी नागपुर यांचे विरुध्द पोलीस ठाणे वडकी येथे प्राणी निर्दयतेने वागविणे अधि. व प्राणी संरक्षण अधि.व भान्यासं चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस ठाणे वडकी यांचेकडुन सुरु आहे.सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, श्री.यांचे मार्गदर्शनात श्री. सतिश चवरे, पोलीस निरीक्षक स्था.ग.शा. यवतमाळ, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके, पोलीसअंमलदार सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, रजनिकांत मडावी, सलमान शेख सर्व स्था.गु.शा. यवतमाळयांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

*राष्ट्रिय कार्याध्यक्ष डाॅ. भिमराव आंबेडकर यांच्या वाढ दिवसा निमित्त विविध कार्यक्रमासह अन्नदान कार्यक्रम संपन्न.*. मानवत / वार्ताहर.मानवत येथे दि:-१४/१२/२०२५ रविवार रोजी भारतीय बौध्द महासभा शहर शाखा मानवतराष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमा बरोबर अन्नदान कार्यक्रम घेण्यात आले.सविस्तर वृत्त असे की,दि १४/१२/२०२५ रविवार रोजी वेळ दुपारी २:०० वाजता नालंदा बुद्ध विहार लूंबिनी नगर मानवत येथे भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अन्नदान करण्यात आले , भा. बौ. महासभा नवीन जिल्हा कार्यकारणी (उत्तर ) यांचा सत्कार कार्यक्रम तसेच धम्म सहल पर्यटन करून आलेले उपासक उपासिका यांचा देखील सत्कार करणे, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी यावेळी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करून, त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष :- नामदेव सहादू आठवणे कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून भा. बौध्द. महासभा जिल्हा अध्यक्ष :- एम. एम. भरणे सर.भा. बौध्द. महासभा जिल्हा सरचिटणीस :- के. वाय. दवंडे सर भा. बौध्द. महासभा जिल्हा संस्कार उपाध्यक्ष :- डी. आय. खेडकर सर भा. बौध्द. महासभा जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष :- व्ही. व्ही. वाघमारे भा. बौध्द. महासभा समता सैनिक उपाध्यक्ष :-आनंदा भेरजे सर भा. बौध्द. महासभा समता सैनिक :-शिवाजी वाव्हळे भा. बौध्द. महासभा पर्यटन सचिव :-राजकुमार येंगडे सर भा. बौध्द. महासभा मा. ता. अध्यक्ष -राजेश गायकवाड भा. बौध्द. महासभा मा. सरचिटणीस -जि. बी. बनसोडेभा. बौध्द. महासभा शहर शाखा सरचिटणीस :-नाथा भदर्गे भा. बौध्द. महासभा शहर शाखा कोषाध्यक्ष :- अशोक लाटे भा. बौध्द. महासभा शहर शाखा संस्कार उपाध्यक्ष :- सारिपूत खरात भा. बौध्द. महासभा पर्यटन सचिव :- भिमा कसारे भा. बौध्द. महासभा संरक्षण सचिव :- नितीन धबडगे भा. बौध्द. महासभा संरक्षण सचिव :- रवि शहाणे भा. बौध्द. महासभा पर्यटन सचिव :- अशोक भदर्गे भा. बौध्द. महासभा कार्यालयीन सचिव :- ऍड भूषण दवंडे भारतीय बौद्ध महासभा संघटक साधुजी खरात, तुकाराम बोराडे, सीताराम, अंभुरे,ज्ञानोबा वाघमारे, अक्षय खरात. नालंदा बुद्ध विहार कमिटी चे अध्यक्ष- सुदाम राक्षे, विष्णू भदर्गे, शाहीर रसूल, व बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाला मार्गदर्शन एम एम भरणे साहेब, के वाय दवंडे सर, डी वाय खेडकर, व्ही व्ही वाघमारे आनंद भेरजे, शिवाजी वाव्हले राजकुमार येंगडे यांनी मार्गदर्शन केले पर्यटन स्थळ पर्यटन करून आलेले शारदाताई बलखंडे नामदेव आठवणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाथा मुंजाजी भदर्गे यांनी केले आभार प्रदर्शन अशोक राघोजी लाठे यांनी केले शेवटी सरणतय घेऊन अन्नदान करण्यात आले.***

राष्ट्रिय कार्याध्यक्ष डाॅ. भिमराव आंबेडकर यांच्या वाढ दिवसा निमित्त विविध कार्यक्रमा…

सावदा होमगार्ड उपपथक वर्धापनदिन निमित्त सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विशाल पाटील पोलीस स्टेशन सावदा, समादेशक अधिकारी श्री. दीपक खाचणे, पलटण नायक श्री. संतोष काटोले, पलटण नायक श्री.भास्कर जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सावदा होमगार्ड उपपथकातील सर्व पुरुष आणि महिला होमगार्ड यांनी सहकार्य केले.

सावदा होमगार्ड उपपथक वर्धापनदिन निमित्त सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विशा…

सावदा येथे ५३ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा; माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात.. (सावदा | प्रतिनिधी) सावदा येथील नगरपालिका संचलित आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी १९७१–७२ मध्ये जुनी एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला. तब्बल ५३ वर्षांनंतर सुमारे ७५ माजी विद्यार्थी मित्र पुन्हा एकत्र आल्याने शाळा परिसरात आनंद, आपुलकी व आठवणींचे वातावरण निर्माण झाले होते.या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेच्या वर्गात बेंचवर बसून बालपणातील व शालेय जीवनातील आठवणींमध्ये रमले. शाळेतील खोड्या, अभ्यासाचे दिवस, शिक्षकांचे मार्गदर्शन व त्या काळातील अनुभव कथन करताना अनेक क्षण भावूक करणारे ठरले.या ऐतिहासिक स्नेहमेळाव्यासाठी कोचूर येथील सुधाकर चौधरी, मुंबई येथील चंद्रकांत पाटील व सावदा येथील प्रकाश पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी अनेक वर्षांपासून संपर्क तुटलेल्या मित्रांचा शोध घेऊन त्यांची सध्याची नावे, पत्ते व मोबाईल क्रमांक मिळवून संपर्क साधला आणि हा रम्य स्नेहमेळावा यशस्वीपणे घडवून आणला. या निमित्ताने मुंबई, नाशिक, जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूर तसेच सावदा व कोचूर येथून माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सुधाकर चौधरी, वाय. एम. पाटील (बाबा), प्रकाश पाटील, माजी नगरसेवक श्याम पाटील, भानुदास भारंबे व माजी विद्यार्थी चंद्रकांत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आ. गं. हायस्कूलचे कलाशिक्षक नंदू पाटील यांनी प्रभावीपणे केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश भालेराव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रविंद्र भंगाळे व डॉ. अजितकुमार पाटील उपस्थित होते. मान्यवरांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून शाळेने दिलेले संस्कार व मूल्ये आयुष्यभर उपयोगी पडत असल्याचे मत व्यक्त केले.या स्नेहमेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांना आठवणींच्या स्वरूपात स्मरणिका व एक दिवा भेट म्हणून देण्यात आला. विशेष म्हणजे सर्वांनी एकत्र बसून पुन्हा शालेय दिवस जगण्याचा अनुभव घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नंदकिशोर पाटील सर, एस. एम. महाजन सर, अनिल नेमाडे सर, अतुल सपकाळे, संजू न्हावी, उदय कोळी, श्रेयस जैन व अमित बेंडाळे यांनी मोलाचे सहकार्य केले.स्नेहमेळाव्याचा समारोप पुन्हा भेटीच्या आश्वासनाने, आनंदी आठवणी व समाधानाने करण्यात आला.

सावदा येथे ५३ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा; माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात..�������…

कान्हेरी सरप येथे मोफट भव्य आरोग्य तपासणी शिबिराला उत्साही प्रतिसाद* (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)बार्शीटाकळी : कान्हेरी (सरप) येथे मोफत भव्य आरोग्यतपासणी शिबिराचे आयोजन करणारण्यात आले. शिबिरात सुमारे ५०० ते ६०० नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभघेतला. गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटण्यात आले आणि आवश्यक गोळ्या आणि डोळ्यांचे ड्रॉप्स मोफत देण्यात आले.हृदयरोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ आणि संधिवात तज्ञ अशा विविध क्षेत्रातील अनुभवी डॉक्टरांनी मोफत सेवा दिली.आणि आरोग्य शिबिराला गोरवा, एरंडा, परंडा, कातखेड, सुकळी, पैसाळी, आळंदा इत्यादी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.संतोष मदन क्षीरसागर (जनसेवक) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कान्हेरी (सरप) मधील सर्व गावकरी मंडळींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

कान्हेरी सरप येथे मोफट भव्य आरोग्य तपासणी शिबिराला उत्साही प्रतिसाद*�����������������…

चोपडा प्रतिनिधी (ज्ञानेश्वर बाविस्कर) चोपडा कोळंबा रस्त्यावर भरताव वेगाने येणाऱ्या एसटी ने एकास चिरडले मयत मगल कृष्णा साळुंखे वय 20 वर्ष रा कोळन्हावी ह मु.माजरोद या शिरपुर जि.धुळे.यास बाप कुष्णा देवराम साळुंखे व दोन बहिणी असा परिवार आहे तरी त्यांच्या वर सर्व कुठुबाची जबाबदारी होती तो घरातला करता होता.

चोपडा प्रतिनिधी (ज्ञानेश्वर बाविस्कर) चोपडा कोळंबा रस्त्यावर भरताव वेगाने येणाऱ्या एस…

रायगढ़ स्वाभिमान तृतीया वर्धापन दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला रूपरेषा सुंदर होती कार्यक्रमात ऑलेल्यापाहुन्याचे प्रबोधन अतिशीमोलाचे होते संविधान विशेषण जागृतिवह मार्गदर्शन केले माहिती अधिकार विषय जन जागृति वह मार्गदर्शन केले शेति विषयावर कृषि विभाग का कडुन मार्गदर्शन में जन जागृतिकेले नंतर लंच टाइम,जेवनाचा प्रोग्राम झाला,जेवन नॉनवेज मध्य होता जेवन अति रुचकर व,स्वादिष्ट होता पूर्ण कोकण व महाराष्ट्र मधुन पत्रकार मानवाईक मुंबई महाराष्ट्रा मधुन आले होते अंदाजेपास से लोग उपस्थित होते प्रोग्राम अति सुंदर शांतिपूर्वक पळला प्रोगामचचे मुख्य सूत्रधारमुख्य संपादक रोहन रघुनाथ कडु सर होते वर्धा जिलातुन आलेल्या, रायगढ़ स्वाभिमान चे,संपादक अब्दुल कादिर देवली तालुका पत्रकार विपुल पाटिल रानी रायगढ़ स्वाभिमान मुख्य संपादक रोहन कडु सर यांना फुल गुच्छा संम्मानित केले नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा दिल्ली🌹🌹🌹🙏👍

जय बजरंग क्रीडा मंडळ, पाटाळा तर्फे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन... (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.15:- जय बजरंग क्रीडा मंडळ, पाटाळा यांच्या वतीने पुरुषांसाठी भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हंसराजभैय्या अहिर (अध्यक्ष – राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, भारत सरकार, नवी दिल्ली) होते.कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मा. करणजी देवतळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माझ्यासह विधानसभा प्रमुख मा. रमेशजी राजूरकर साहेब, विधानसभा संघटक मा. किशोरजी बावणे, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मा. दिवाकरराव पावडेजी, मा. उमेशजी बोडेकर, सौ. अमृताताई सुर, मा. रवींद्रजी धोटे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.या कबड्डी स्पर्धेचे आयोजन जय बजरंग क्रीडा मंडळ, पाटाळा यांच्या सर्व सदस्यांनी अत्यंत उत्कृष्ट व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले. आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा

जय बजरंग क्रीडा मंडळ, पाटाळा तर्फे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन...��������������������������������…

महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटलांसाठी लढणारी कार्यरत राहून पाटलांच्या सदैव सोबत असणारी एकमेव संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघ.राज्याध्यक्ष आदरणीय श्री बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाला तोड नाही दांडगी नेतृत्व शैली शासनस्तरावर असलेला दबदबा आणी मागणी रेटून लावून ती शासन स्तरावर पूर्णत्वास नेण्याची क्षमता असलेलं एकमेव नेतृत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब म्हणून अशा व्यक्तिमत्वासोबत त्यांच्या लढ्यात सहभागी होऊन पोलीस पाटील या पदाला न्याय मिळून देण्याची क्षमता ज्या संघात आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघ. आज दिनांक 14 ला समुद्रपूर तालुक्याची कार्यकारिणी स्थापन करण्याच्या अनुषंगाने वर्धा जिल्हा गाव कामगार संघाच्या वतीने समुद्रपूर येथील शासकीय विश्राम गृह येथे छोट्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेच्या अध्यक्ष स्थानी आपल्या वर्धा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री अमितजी लुंगे पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे जिल्हा सचिव श्री जनार्धनजी भगत हे प्रामुख्याने उपस्थित होते त्याचप्रमाणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री संजयजी वाघमारे पाटील,नवनियुक्त जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्री त्रंबक जी गोहणे पाटील,उपाध्यक्ष श्री भालचंद्र जी डफ पाटील, श्री कृष्णाजी वादाफळे पाटील, श्री जयंतजी वाकडे पाटील,श्री नरेशजी वांढरे पाटील, वर्धा जिल्हा सहसंघटक श्री गणेशजी धोटे पाटील आणि श्री साचिन महाकाळे पाटील, सेलू तालुका उपाध्यक्ष श्री निलेशजी मूडे पाटील, सेवा निवृत्त पोलीस पाटील श्री यज्ञपाल जी छोयले आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री सचिनजी ठवरी यांच्या प्रमुख उपस्थित होते.आज याठिकाणी समुद्रपूर तालुका अध्यक्ष आणि समुद्रपूर स्टेशन अध्यक्ष या पदावर खैरगावं येथील उच्चशिक्षित कर्तबगार तरुण पोलीस पाटील श्री कुंदनसिग छोयले पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.तालुका सचिव पदी श्री राजूभाऊ दांडेकर तर सहसचिव म्हणून श्री अतुलजी भटे यांची निवड करण्यात आली.तालुका उपाध्यक्ष पदी श्री चंद्रकांत बहाद्दूरे आणि श्री विनोदजी बोरकुटे यांची निवड करण्यात आली.कोषाध्यक्ष म्हणून श्री बाबाराव शंभरकर यांची तर सहकोषाध्यक्ष म्हणून श्री शंकरराव वैद्य यांची निवड करण्यात आली. तालुका समन्वयक पदी श्री मारोती हुलके यांची निवड करण्यात आली.सदस्य पदी सर्वश्री राजू मडावी,प्रकाश भगत,किसनाजी कोल्हे,प्रतीक घाडगे, राजू बारई,विजय थुटे, विनोद बोरेकर,रोशन बाभडे,सेविन चाफले,महेंद्र उपासे,केशवरावं वैद्य यांची निवड करण्यात आली.तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी सौ प्रगतीताई मंगरुडकर,उपाध्यक्ष पदी सौ वंदना ताई तडस आणि अर्चना कुबडे यांची निवड करण्यात आली.सचिव पदी सौ शारदाताई घाडगे तर कोषाध्यक्ष पदी सौ प्रियाताई आडकीने यांची तर सहकोषाध्यक्ष पदी सौ अंकिता ताई क्षीरसागर यांची तर सदस्य म्हणून सौ सुनीता ताई चाफले,सौ वैशाली ताई बुरडकर, सौ उषाताई सिडाम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या प्रसंगी सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांना सनद पत्राचे वाटप करण्यात आले. सेवानिवृत्त पोलीस पाटील श्री यज्ञपाल छोयले यांचा शाल श्रीफळ देऊन जिल्हाध्यक्ष आणि सचिव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सभेला समुद्रपूर स्टेशन अंतर्गत येणारे पाटील हजर होते तर या कार्यकारिणी निवड प्रसंगी हिंगणघाट स्टेशन, गिरड स्टेशन, वडनेर स्टेशन आणि सिंदी स्टेशन चे पदाधिकारी हजर होते.सभेची सांगता जेवणाचा आस्वाद घेऊन करण्यात आली. यश राऊत समुद्रपुर

"ऑपरेशन प्रहार अंतर्गत पो.स्टे. डाबकी रोड पोलीसांनी बकरी चोरी प्रकरणात १२ तासांचे आत आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हयातील चोरीचा मुददेमाल केला जप्त "(**अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान*)सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशाप्रकारे आहे की, पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला येथे दिनांक १४/१२/२०२५ रोजी अप नं ४१०/२०२५ कलम ३०३ (२) बी.एन.एस. चा गुन्हा दाखल असुन फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला ला जबानी रिपोर्ट दिला की, त्यांचे कडील तसेच त्याचे शेजारी राहणारे लोकांचे बक-या नेहमीप्रमाणे चारण्यासाठी सोडल्या होत्या सदर बक-यांमधील फिर्यादी यांची एक बकरी तसेच शेजारी राहणारे साक्षीदार यांचे ०२ बक-या त्या नेहमीप्रमाणे घरी परत आल्या नाहीत म्हणून त्यांचा आजुबाजुचे परीसरात तसेच अकोला शहरामध्ये शोध घेतला असता मिळुन आल्या नाहीत. सदरच्या ०३ बक-या कि.अं. २८,०००/रु. च्या कुणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेल्या आहेत अशा फिर्यादी यांचे जबानी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा दाखल करुन तपासात घेण्यात आला.सदर गुन्हयाचे तपासाचे कामकाज गुन्हे शोध पथकातील अंमलदार नापोकों राजेश ठाकुर, पोकों मंगेश गिते यांनी तात्काळ हाती घेवुन मा. ठाणेदार साहेब तसेच पोउपनि अनिल चव्हाण साहेब यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयातील चोरी मुददेमाल तसेच अज्ञात आरोपी याचे शोध कामी रवाना होवुन त्यांना प्राप्त बातमीदार यांचे बातमीवरुन संशयीत इसम १) मोहम्मद शाबाज मोहम्मद आरीफ २) अफजल खान अब्दुल खलील खान यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडे विश्वासात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. गुन्हयातील चोरी मुददेमाल ०३ बक-या कि.अं. २८,०००/रु. हया आरोपी यांचे कडुन दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या.ऑपरेशन प्रहार संकल्पने अंतर्गत सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधिक्षक श्री रेडडी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील साहेब, ठाणेदार श्री. दिपक कोळी पो.स्टे. डाबकी रोड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अनिल चव्हाण, एएसआय दिपक तायडे, पोहेकों प्रेम कश्यप, नापोकों राजेश ठाकुर, पोकों मंगेश गिते, सर्व पो.स्टे. डाबकी रोड अकोला यांनी केली.

" ऑपरेशन प्रहार अंतर्गत पो.स्टे. डाबकी रोड पोलीसांनी बकरी चोरी प्रकरणात १२ तासांचे आत आरोपीत…

*अकोला पश्चिममध्ये विकासाचा एक नवा अध्याय सुरू करताना आमदार साजिद खान पठाण यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले.**. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान*)अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत भव्य विकास प्रकल्पांचा उद्घाटन आणि लोकार्पण समारंभ रविवार, १४ डिसेंबर रोजी उत्साही वातावरणात पार पडला. या प्रसंगी, परिसरातील लोकप्रिय आमदार साजिद खान पठाण यांनी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. आमदार निधीतून मंजूर झालेल्या या कामांचा उद्देश रस्ते, सभागृह, पेव्हर, सुरक्षा भिंती, सुशोभीकरण आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आहे.प्रभाग क्रमांक १५ मध्ये, विदर्भ ट्रॅक्टर ते ओबेरॉय बिल्डिंगपर्यंत काँक्रीट रस्त्याचे बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. प्रभाग क्रमांक १९ मध्ये, कौलखेड स्मशानभूमी आणि बंजारा कॉलनीतील सभागृहाचे पेव्हरिंग कामाचे उद्घाटन करण्यात आले.प्रभाग क्रमांक १ मध्ये, अकोट फैल येथील सिलाटर हाऊस आवारची सुरक्षा भिंत, इराणी स्मशानभूमी आवारची भिंत आणि नायगाव परिसरातील नवनिर्मित सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. शिरोडा इमामवाडा रोड परिसराचाही विकास झाला.प्रभाग क्रमांक १० मध्ये, काला मारुती आवार भिंतीचे बांधकाम, प्रभाग क्रमांक ८ मधील भगतवाडी रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि प्रभाग क्रमांक १७ मधील चिश्तिया मशीद (सोनटक्के प्लॉट) रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू करण्यात आले.प्रभाग क्रमांक १८ मध्ये, मेहबूब का दरबार ते पातूर रोड पर्यंत काँक्रीटीकरण रस्ता, पायल बंगल्यामागील वाशिम बायपासवरील बौद्ध विहार येथे फरसबंदीचे काम, यमुनाबाई खेडकर शाळेजवळील रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि गीता नगर अकोली खुर्द (गोयंकाजींच्या घरासमोर) येथे रस्ता बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले.त्याचप्रमाणे, प्रभाग क्रमांक ७ मध्ये, मुसा कॉलनी मशीद रस्त्याचे काँक्रीटीकरण, गवळीपुरा मानारकाना प्लॉट सभागृहाचे उद्घाटन, रैली जिन परिसरातील सभागृहाचे उद्घाटन, मासूम शाह कब्रस्तानचे टिन शेड आणि सुशोभीकरण, एपीएमसीच्या मागे रस्ता आणि जाम मोहल्ला सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. विकास निधी देऊन प्रदेशाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी आमदार साजिद खान पठाण यांच्या सततच्या प्रयत्नांबद्दल सर्वांनी कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त केले. अकोला पश्चिम भविष्यात विकासाच्या मार्गावर आणखी वेगाने प्रगती करेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला

अकोला पश्चिममध्ये विकासाचा एक नवा अध्याय सुरू करताना आमदार साजिद खान पठाण यांनी अनेक …

दि. 14 डिसेंबर तृतीय वर्धापन दिनानिमित्त दैनिक रायगड स्वाभिमांचे विदर्भ संपादक सुरेश जी भगत व वर्धा जिल्हा संपादक शेख मनवर राजू कांबळे उपसंपादक वर्धा जिल्हा यांचा उत्कृष्ट पत्रकारिता म्हणून रोहा येथे संपादक रघुनाथजी कडू रोहन कडू यांच्या हस्ते शाल श्रीफळप्रमाणपत्र व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दैनिक रायगडचे वर्धा यवतमाळ नांदेड परभणी पुलगाव नागपूर पुणे येथून सर्व पत्रकार यावेळी उपस्थित होते व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या 2026 चे नवीन कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले सर्व पत्रकारांना कॅलेंडर पुस्तकाचे वाटप करण्यात आले करण्यात आले मीडीया पोलीस टाईम प्रतिनिधी यश राऊत समुद्रपुर..

डबकी रोड पुलिस स्टेशन ने एक अवैध गुटखा विक्रेता पर छापा मारा और कुल 42,030 रुपये मूल्य का सामान जब्त किया।". *मामले के संक्षिप्त तथ्य इस प्रकार हैं: माननीय पुलिस अधीक्षक के आदेशानुसार, पुलिस स्टेशन की सीमा के भीतर गुटखा की अवैध बिक्री करने वालों के खिलाफ कार्रवाई की जानी चाहिए, जो मानव स्वास्थ्य के लिए हानिकारक है और सरकार द्वारा प्रतिबंधित है। 13/12/2025 को, जब डबकी रोड पुलिस स्टेशन के पुलिस सब-इंस्पेक्टर अनिल चव्हाण और उनके कर्मचारी डबकी रोड पुलिस स्टेशन परिसर में गश्त कर रहे थे, तभी एएसआई दीपक तायडे को एक मुखबिर से सूचना मिली कि गोरोबा काका मंदिर के द्वार के पास एक व्यक्ति सफेद बोरियों में गुटखा ले जा रहा है और उसे बेचने के लिए ले जा रहा है। विश्वसनीय सूचना मिलने पर, दो पंचायतों को बुलाया गया और पंचायत के समक्ष उपस्थित होकर अकोला के डबकी रोड निवासी आशीष हरिश्चंद्र वासेकर नामक संदिग्ध को गिरफ्तार किया गया। उसे हिरासत में लेकर पंचायत के समक्ष पूछताछ की गई और उसके पास से 42,030 रुपये मूल्य का गुटखा जब्त किया गया, जो मानव स्वास्थ्य के लिए हानिकारक था और बिक्री के लिए रखा गया था। इसमें विमल पान मसाला, वी-1 तंबाकू, मस्तानी, बाहुबली गुटखा, अस्सीबी पान मसाला जैसी कंपनियों के गुटखा पैकेट शामिल थे। यह पाया गया कि उक्त व्यक्ति के पास मानव स्वास्थ्य के लिए हानिकारक और महाराष्ट्र सरकार द्वारा बिक्री के लिए प्रतिबंधित वस्तुएं थीं। इसके आधार पर अकोला के डबकी रोड पुलिस स्टेशन में विभिन्न धाराओं के तहत उसके खिलाफ मामला दर्ज किया गया और उसे तुरंत गिरफ्तार कर लिया गया।.

डबकी रोड पुलिस स्टेशन ने एक अवैध गुटखा विक्रेता पर छापा मारा और कुल 42,030 रुपये मूल्…

*सावरगाव येथे सभापती पंकज आंबेगावकर यांच्या हस्ते सभागृह बांधकामाचे भूमिपूजन. (मानवत प्रतिनिधी.)—————————मानवत तालूक्यातील सावरगाव येथील खंडोबा देवस्थान, व धोंडीआबा देवस्थान यांच्या सभामंडपाचे आज भुमी पूजन सभापती पंकज भैय्या आंबेगावकर तसेच पाथरी विधान सभेचे आमदार राजेश दादा विटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पंकज आंबेगावकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तथा जिल्हा परिषद सदस्य, सुरज पाटील काकडे , गोपाळराव सुरवसे व गजाननराव घाटुळ संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती , गोपाळ आबा काळे उपसरपंच सावळी यांच्या सह सावरगाव व सावळी येथील ग्रामस्थ व नागरिक यावेळी भूमिपूजन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.***

सावरगाव येथे सभापती पंकज आंबेगावकर यांच्या हस्ते सभागृह बांधकामाचे भूमिपूजन.���������������������…

*'खाकी'तील कुकर्मी ने खात्याला फासला काळिमा! हॉटेलच्या खोलीत नर्ससोबत रंगरेलियां साजरा करणाऱ्या पोलिसाची नर्सच्या पतीनेच जिरवली*. यवतमाळचा हायव्होल्टेज ड्रामा: 'नाईट शिफ्ट'चा बहाणा करून प्रियकराला भेटायला गेली पत्नी; पतीने रंगेहाथ पकडून घेतला पी सी आरयवतमाळ पोलिस सध्या वेगवेगळ्या करणाऱ्याने सतत चर्चेत राहत आहे,कधी अवैध्य व्यावसायिकान सोबत हात मिळवणी,तर कधी लाच,तर कधी गुंडगिरी,आणि आता चक्क आता तर दुसऱ्याच्या पत्नी सोबतच प्रेम प्रकरण सध्या यवतमाळ पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयात तैनात असलेल्या एका पोलीस शिपायाला एका विवाहित परिचारिकेसोबत हॉटेलच्या खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले.या बाबत पतीला अगोदरच संशय असल्याने आपली पत्नी खरोखरच हि कर्तव्यावर जाते की कुठे जाते म्हणून त्याने तिचा पाठलाग केला आणि ती बिनधास्त हॉटेल मध्ये गेल्याचे निदर्शनास आले आणि काही वेळ थांबून पतीही तिथे गेला आणि पत्नीला परपुरुषासोबत पाहताच संतापलेल्या पतीने पोलिसाच्या वर्दीचा कोणताही धाक न बाळगता त्याची हॉटेलमध्येच यथेच्छ धुलाई केली. विशेष म्हणजे, या शिपायाला बदडण्यासाठी पोलिसांच्याच दंडुक्याचा वापर करण्यात आल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. ८ डिसेंबरच्या रात्री घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.रुग्णालयातून सुरू झाली 'प्रेमकथा', हॉटेलमध्ये झाला 'द एन्ड'मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला शहरातील एका शासकीय मिनी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहे. साधारण सहा महिन्यांपूर्वी पोलीस मुख्यालयातील एका शिपायाशी तिची ओळख झाली. हॉस्पिटल परिसरातून सुरू झालेल्या या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमसंबंधात झाले. गेल्या काही काळापासून दोघेही सुट्या काढून किंवा ड्युटीवर असल्याचे सांगून एकमेकांना भेटत होते. मात्र, पत्नीच्या वागण्यातील बदल पाहून पतीला संशय आला आणि त्याने तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली.'नाईट शिफ्ट'चा बनाव आणि पतीची 'फिल्डिंग'८ डिसेंबर रोजी परिचारिकेने रात्री रुग्णालयात 'नाईट शिफ्ट' असल्याचे घरी सांगितले. ती दोघांसाठी जेवणाचा डबा घेऊन घराबाहेर पडली. मात्र, पती आधीच सावध होता, त्याने तिचा पाठलाग केला. परिचारिका रुग्णालयात न जाता थेट शहरातील एका हॉटेलमध्ये पोहोचली, जिथे तो पोलीस शिपाई आधीच तिची वाट पाहत होता. दोघेही खोलीत जाताच, पाळतीवर असलेल्या पतीने आपल्या एका मित्राच्या मदतीने खोलीचा दरवाजा उघडला आणि दोघांनाही रंगेहाथ पकडले.हॉटेलमध्ये पोलिसाचा 'राडा'; पोलिसांच्याच काठीने दिला प्रसादआपला संसार उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून पतीचा संयम सुटला. त्याने आपल्या मित्राच्या मदतीने शिपायाला खोलीतच कोंडले आणि त्याला बेदम चोप दिला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, त्या शिपायाला मारण्यासाठी पोलिसांच्याच अधिकृत दंडुक्याचा वापर करण्यात आला. हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या गदारोळामुळे कर्मचाऱ्यांची एकच पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी धाव घेतली, परंतु प्रकरण आपल्याच विभागाशी संबंधित असल्याने आणि बदनामी टाळण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.पतीचा आक्रमक पवित्रा: "माझा संसार मोडला, आता यांची नोकरी घालवणार"या घटनेनंतर पतीने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. त्याने पत्नीला घरातून हाकलून दिले असून तो आता कायदेशीर कारवाईसाठी ठाम आहे. अधीक्षकांकडे तक्रार: पतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना पत्र लिहून संबंधित शिपायाला सेवा मुक्त करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल करण्याची तयारी आरोपी शिपाई आणि पत्नी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पतीने प्रस्ताव तयार केला आहे. पतीचा दावा आहे की, त्याच्याकडे हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर महत्त्वाचे पुरावे उपलब्ध आहेत.त्या मुळे पोलिस अधीक्षक पोलिस शिपायास पाठीशी घालणार की एका सामान्य व्यक्तीला न्याय देणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विवादित हॉटेल्स पुन्हा चर्चेतशहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या हॉटेलमध्ये विना ओळखीचा पुरावा किंवा संशयास्पद हालचालींना खतपाणी घातले जात असल्याचा आरोप होत आहे. अशा हॉटेल्सवर प्रशासन कधी कारवाई करणार, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. शिस्तीचे धडे देणाऱ्या 'खाकी'मधील काही कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण विभागावर नामुष्की ओढवल्याची भावना प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

खाकी'तील कुकर्मी ने खात्याला फासला काळिमा! हॉटेलच्या खोलीत नर्ससोबत रंगरेलियां साजरा करणाऱ्या…

Load More
That is All