रावेर तालुका प्रतिनिधी (रशीद तडवी) तालुक्यातील लोहारा येथील सुकी नदीच्या घाटाला अनेक वर्षांपासून उतरती कळा लागल्याने, हा सुकी नदीचा घाट दिवसेंदिवस खड्यात गेल्याने, ह्या घाटात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. याकडे मात्र बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची जाणिव पूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा लोहारा येथील गावकऱ्यांचा आरोप आहे. जर लोहारा येथील सुकी नदीच्या घाटाचे तात्काळ डांबरीकरण न झाल्यास. गावकरी मिळुन येणाऱ्या निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संबंधितांना या बातमी द्वारे देण्यात आला आहे.