परभणी जिल्हाला मंत्रीपद मिळेल का? ( शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)चार पैकी तीन आमदार सत्तारूढ पक्षाचे; श्रेष्ठींकडे लक्ष.परभणी : दि.25 विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना या तीन प्रमुख पक्षांच्या महा युतीने सर्वदूर प्रचंड यश पटावल्याने व या जिल्ह्यातील चार पैकी तीन मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने राजकीय वर्तूळासह जिल्हावासीयांच्या मंत्रीपदाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. गेल्या पाच वर्षात या जिल्ह्यास महायुती असो, महाविकास आघाडीने मंत्री मंडळात स्थान दिले नाही. त्याआधीसुध्दा तब्बल पाच वर्षे महायुतीने जिल्ह्यास मंत्री पदाबाबत झुलवत ठेवले होते. त्यामुळेच जिल्हा वासीयांच्या अपेक्षांचा भंग झाला. त्यातच अन्य जिल्ह्याच्या मंत्र्यांना या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सात त्याने सुपूर्त केल्या गेल्याने व त्या पालक मंत्र्यांनी या जिल्ह्या कडे,विकास प्रश्नांकडे ढूंकूनसुध्दा न पाहिल्या ने जिल्हावासीयांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त होवू लागला होता. परंतु, महायुती असो, महाविकास आघाडी सरकारने जिल्हावासीयांची याही स्थितीत दखल घेतली नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने श्रेष्ठींवर या अनुषंगाने दबाव टाकण्याची धमक सुध्दा दाखविली नाही.या पार्श्वभूमीवर आता पुन्हा या जिल्हा वासीयांना मंत्रीमंडळा त तीघा नवनिर्वाचित आमदारांपैकी एकास सामावून घेतले जाईल, अशी अपेक्षा आहे. विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांना मंत्रीपद निश्चितच भेटेल, अशी अपेक्षा जिल्हावासीय बाळगून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून नवनिर्वा चित आमदार राजेश विटेकर यांची वर्णी लागेल, असे त्यांचे समर्थक अपेक्षा करु लागले आहेत. तर राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार म्हणून डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह समर्थकांच्या सुध्दा अपेक्षा पल्लवी त झाल्या आहेत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एकंदरीत दिग्गज मंडळींच्या स्पर्धेत विटेकर यांचे नाव मंत्रीपदासाठी टिकेल का? हा प्रश्नच आहे. तर महायुतीतील तीन्ही घटक पक्षांच्या मंत्री पदाच्या हिश्शे दारीत राष्ट्रीय समाज पक्षास मंत्री पदाचा हिस्सा मिळेल का? हाही प्रश्नच आहे. यामुळेच आमदार सौ. साकोरे-बोर्डीकर यांचे नाव आघाडीवर आहे. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यां सह कार्यकर्त्यांना त्याअनुषंगाने मोठ्या अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे सौ. साकोरे या दुसर्यांना निवडून आल्या आहेत. फडणवीस यांच्या वर्तूळातील आमदार म्हणून त्या सुपरिचित आहेत. त्यामुळेच समर्थकांना खात्री वाटू लागली आहे.दरम्यान, मुंबई व दिल्लीतील एकंदरीत राजकीय घडामोडींवर संपूर्ण जिल्हावासीय लक्ष ठेवून आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0