**वझूर खूर्द परिसरात शेती पिकाला पाणि सोडा ; शेतकर्‍यांची मागणी.*. (मानवत // प्रतिनिधी.मानवत तालूक्यातील वझूर खूर्द येथील शेकडो शेतकर्‍यांनी आज उपविभागी मुख्य कार्यकारी अभियंता पाथरी यांच्याकडे एका निवेदनाद्बारे करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की, मानवत तालूक्यातील वझूर खूर्द येथील शेतकर्‍यांनी उपविभागी अभियंता पाट बंधारे विभाग पाथरी-6 यांच्याकडे केली.चारी क्र 59 ला कुंभारी वझुर खु चारी ला पिकासाठी पाणी मिळण्याची मागणी करण्यात आली. वझुर खु येथील गहु हरभरा भईमुग ज्वारी या पिकासाठी पाणी सोडण्यात यावे जेणे करुण शेतातील पीकाला पाणी मिळुन शेतकरी पिक काढु शकतील व चारी दुरुस्त करुण देण्यात यावी व वझुर खु ला पाणी सोडण्यात यावे अशी विनंती वजा मागणी केली आहे. पाठ बंधारे विभागाणे पाणी नाही सोडले तर अमर उपोषण करण्यात येईल. असा ईशारा शेतकर्‍यांनी उपविभागीय अभियंता कार्यालय उपविभाग क्रमांक 6 पाथरी यांनामाणिक शामराव शिंदे , रमेश आत्माराम शिंदे , मारोती गंगाधर शिंदे यांनी दिली आहे. या वेळी दिलेल्या निवेदनावर परमेश्वर शिंदे,सदाशिव शिंदे, विशाल शिंदे, समाधान शेळके, रमेश शिंदे, मारोती शिंदे, माउली सूरवसे , गणेश हारगूडे , पाडूरंग हारगूडे ,भिमराव भांड , अशोक भांड, भगवान हरगूडे, राजेश गवळी, नृसिंह गवळी, मारोती सूरवसे , सुभाष चव्हाण, वसंत शिंदे , उध्दव शिंदे , नारायण शेळके , सुनिल चव्हाण, माणिक शिंदे यांच्यासह शेतकर्‍यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत...,

वझूर खूर्द परिसरात शेती पिकाला पाणि सोडा ; शेतकर्‍यांची मागणी.*.                                                     
Previous Post Next Post