क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्र यांचे अध्यक्षतेखाली दत्त मंदिर प्रांगणात सभेचे आयोजन ( कासोदा तालुका एरंडोल).... येथील वसंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी रवींकांत तुपकर संस्थापक अध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्र यांचे अध्यक्षतेखाली दत्त मंदिर प्रांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादक संघटनेचे अध्यक्ष निळकंठ पाटील,ऍडव्होकेट विश्वासराव भोसले, शिवराम पाटील,उमेश पाटील छावा संघटना तालुकाध्यक्ष, अमोल बडगुजर,ईश्वर पाटील उत्तर महाराष्ट्र प्रमूख, पांडुरंग हरी पाटील, अनिल पवार, योगेश ठाकूर, तालुका अध्यक्ष किशोर पाटील, संतोष पाटील पाचोरा, यांचेसह असंख्य शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात निळकंठ पाटील यांनी वसाका बाबत गरजा व पूर्तता याबाबत सखोल माहिती दिली.प्रास्ताविक व सूत्र संचालन उमेश पाटील यांनी केले त्यात त्यांनी वसाका विषयी महिती देताना सभासद, कारखान्याचे कर्मचारी,मशिनरी, व डीस्टलरी, पाण्याची उपलब्धता याविषयी सर्व माहिती दिली. उसाचे कार्यक्षेत्र, सभासद संख्या, आणि आजदेखील कारखान्याची असलेली अवस्था याविषयी सखोल माहिती दिली.तसेच एडवोकेट भोसले यांनी वसाका सुरू करण्यासाठी २००७ आठ मध्ये शर्तीचे प्रयत्न केले व त्यात त्यांना यश मिळाले सदर कारखाना त्यावेळी एक वर्षासाठी भाडे तत्वाने देण्यात आला त्यावेळी पहिल्यांदा सदर कारखान्याची साखर जर्मनीत गेली ही विशेष बाब देखील त्यांनी आवर्जून भाषणात सांगितले.जळगाव येथील शिवराम पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील नेतेमंडळी सदर कारखाना सुरू करण्याबाबत उदासीनता दाखवतात त्यांना या कारखान्याची काहीच घेणं देणं नाही अशी भूमिका ते करतात निवडणुकीच्या वेळीच फक्त ते या मंदिरावर नारळ फोडण्यासाठी येतात त्यानंतर पाच वर्षे ते विसरून जातात असेही आपल्या भाषणात सांगितले.रविकांत तुपकर यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की बाळ रडल्याशिवाय देखील आई दूध पाजत नाही त्यामुळे या कारखान्यासाठी शेतकरी व कामगार यांनी आवाज उठवल्याशिवाय शासन जागे होणार नाही तसेच या कारखान्याविषयी शासन दरबारी पाठपुरावा केल्याशिवाय शासन मदत करणार नाही त्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे आहे येणाऱ्या काळात या कारखान्यासाठी आपल्याला खूप मोठा लढा द्यावा लागणार आहे त्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे म्हणून तुम्ही मला सहकार्य करा साथ द्या. व शाखा सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील मंत्री आमदार खासदार यांनी जर खरोखर प्रयत्न केले तर सदर कारखाना सुरू होण्यास कोणतीही अडचण येणार नाही.जिल्हा बँक हा कारखाना सुरू होऊ नये यासाठी मूग गिळून बसली आहे. राज्यातील जवळपास २२ कारखान्यांना शासनाने २०० ते ३०० कोटी रुपयांपर्यंत थक हमी कर्ज दिले व ते आज सुरू केलेले दिसून येत आहेत तसाच २३ वा  नंबर या कारखान्याचा लावावा आणि याच कारखान्याला मदत का करण्यात येत नाही हे देखील समजू शकत नाही. मला या भागात कोणतीही निवडणूक लढवायची नाही किंवा राजकारण करायचं नाही त्यामुळे मला फक्त हा कारखाना कसा सुरू होईल यासाठी प्रयत्न करायचे असून सदर कारखान्याला जर शासनाने मदत केली नाही तर मी स्वतः शेतकरी व कामगार सभासद यांचे बरोबर आंदोलन किंवा लढा करून सदर कारखाना सुरू केल्याशिवाय गुपचूप बसणार नाही. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात निम्मेपेक्षा जास्त मंत्री महोदय खानदेशातील असून त्यांना या कारखान्याविषयी कोणतीही आस्था दिसून येत नाही किंवा त्यांच्या तोंडात   वसाकाचे साधे नाव येत नाही ही शरमेची बाब आहे.असेही त्यांनी शेवटी भाषणात सांगितले. वसंत सहकारी साखर कारखाना सुरू झालाच पाहिजे अशा घोषणा देऊन सभा संपवली. शेवटी आभार प्रदर्शन अमोल बडगुजर यांनी मानले.

क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्र यांचे अध्यक्षतेखाली दत्त मंदिर प्रांगणात सभेचे आयोजन                                                    
Previous Post Next Post