शेतकरी व नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावा – मा.आ.विजयराव भांबळे. शिवाजी शिंदे. जिल्हा प्रतिनिधी परभणी. जिंतूर : २८ मे रोजी जिंतूर-सेलू तालुक्यात सन २०१८ पासून असलेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस, पीकविमा, दुष्काळ इ. शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिंतूर-सेलू च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्या त येईल असा इशारा मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी परभणी यांना दिला.त्यात जिंतूर- सेलू तालुक्यात मागील वर्षी दि.२६/११/२०२३ या एक दिवशी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. सदर अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तसेच पुराच्या पाण्यामुळे विहिरी कोसळल्या होत्या. विहिरीतील वीजपंप व इतर साहित्य गाळात दबून प्रंचड नुकसान झाले होते, अनेक जनावरे सुद्धा दगावली होती, तसेच अनेक नागरिकांची घरे पडली होती, अशा प्रकारचे अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले होते. तसेच खरीपातील पिके तूर, कापूस, हरभरा, गहू, ज्वारी, फळबागा ई. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले होते, अत्यंत महागामोलाचे बी-बियाणे, खते व इतर खर्च करून शेतातील पिके वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक आडचनीत सापडला आहे. हि अतिवृष्टी जिंतूर-सेलू तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळामध्ये झालेली होती. त्यामध्ये तसेच अशाप्रकारे शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सदर अतिवृष्टीचे पंचनामे करून देखील शासनाने अतिवृष्टी जाहीर केली नाही. परंतु, त्यातील काही शेतकऱ्यांनाच तुटपुंजी मदत केलेली आहे, त्यामध्ये खरे नुकसान झालेले शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे सदरच्या अतिवृष्टीमध्ये बाधित सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत मंजूर करून वाटप करण्यात यावी.तसेच सन २०२२ मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसान भरपाई साठी प्रति हेक्टरी १३,६००/- रु प्रमाणे देण्याच्या बाबत शासन निर्णय झालेला होता, परंतु, झालेल्या नुकसानाचे शासनाने प्रति हेक्टरी ६,८०० /- रु प्रमाणे मदत दिलेली आहे. ती संपूर्ण रक्कम देण्यात यावी. व जिंतूर तालुक्यात अतिवृष्टीने व सततच्या पावसाने सरसकट १००% नुकसान झालेले असताना शासन काही मंडळातील मोजक्याच गावामध्ये अनुदान देत आहे त्यासाठी सरसकट नुकसान असल्याने सर्वांना अनुदान देण्यात यावेत. मागील तीन वर्षा पासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकविमा भरून देखील शासनाने ऑनलाईन तक्रार करण्याची जाचक आट घातल्याने अशिक्षित शेतकरी बांधव पिक विमापासून वंचित राहिलेले आहेत. शासनाच्या पंचनामे व झालेले नुकसान बघता जिंतूर-सेलू तालुक्यात सर्व शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा मंजूर करून तो तात्काळ वितरीत करण्यात यावा.जिंतूर- सेलू तालुक्यात ग्रामीण भागामध्ये सन २०२४ वर्षामध्ये प्रचंड कोरडा दुष्काळ पडला असून पाण्याचे भिषण टंचाई निर्माण झालेली आहे. नागरिकांना व पशु-प्राण्यांना पिण्या च्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. शासनाकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाणीटंचाई निवारण करण्यासाठी बैठक घेणे अपेक्षित होते परंतु, शासनाच्या उदाशीन धोरणामुळे पाणीटंचाईसाठी शासन स्तरावर कसलेही उपाय योजना करण्यात आलेली नाही. तसेच जिंतूर व सेलू शहरात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर झाली असून १० ते १५ दिवसामध्ये एकदा पाणी सोडण्यात येते. दोन्ही तालुक्यातील नागरिक वारंवार आवाज उठवून देखील पाणी प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जिंतूर व सेलू शहर तसेच ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात. जिंतूर- सेलू तालुक्या तील दुष्काळी परिस्थिती मध्ये १३२ के.व्ही. तसेच ३३ के.व्ही. नादुरुस्त असून त्यामुळे विजेचा लपंडाव, ट्रान्सफार्मर जळणे, अनेक ठिकाणी विजेच्या तारा व खांब तुटने अशा प्रकारच्या घटना होत आहेत. या प्रश्नाकडे MSEB प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक होरपळून निघत आहेत. त्यातच MSEB कडून शेतीपंपांची व गावठाणची वीज तोडणी करण्यात येत आहे. त्यावर उपाय योजना म्हणून शेती पंपाची व गावठाणची वीज तोडण्यात येऊ नये, पुरेसा कर्मचारी वर्ग वाढवून इतर उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. जिंतूर-सेलू तालुक्यात खते व बी-बियाणे यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला असून त्यामध्ये काळा बाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बी-बियाणे मिळण्या साठी आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करण्यात यावी.वरील दुष्काळी परिस्थिती पाहता अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत आल्यामुळे शेतकऱ्यां ना पिक पेरणीसाठी 7 जून पूर्वी पिककर्ज तातडीने पुरवठा करण्यासाठी संबंधित बँकांना आपल्या स्तरारून आदेश देण्यात यावेत. तरी वरील प्रमाणे जिंतूर-सेलू तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या विविध मागण्या तात्काळ मान्य करून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन वरील प्रश्न सोडवण्यात यावेत असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी प्रसादराव बुधवंत, विश्वनाथ राठोड, अशोकराव काकडे, आप्पासाहेब डख, गणेशराव इलग, विजय खिस्ते, प्रकाशराव मुळे, सुधाकर रोकडे, नंदकिशोर अंभूरे, राजेभाऊ खिस्ते, विशाल देशमुख, कैलास मोगल, कल्याण जोगदंड, सुरेश राउत, राहुल घुले इत्यादीसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post