महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करा.आंबेडकर व्हॉइस मीडिया फोरम यांचे रावेर तहसीलदार यांना निवेदन! (रावेर/प्रतिनिधी )_दि.23 रावेर तालुक्यातील आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने 22 जुलै 2025 मंगळवार रोजी मा.तहसीलदार रावेर यांना जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले.सविस्तर वृत्त असे की _या निवेदनाद्वारे आंबेडकर फोरमने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली की, सरकारद्वारे प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक हे पूर्णतः संविधानविरोधी असून, देशातील लोकशाही मूल्यांचा आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा भंग करणारे आहे.अशा प्रकारचे कायदे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असून,ते स्वीकारार्ह नाहीत,असे निवेदनात नमूद करण्यात आले. सदरचे विधेयक रद्द करून नागरीकांचे मुलभुत अधिकार कायम ठेवावे.या निवेदनप्रसंगी उपस्थित प्रमुख ता.पदाधिकारी बाळू शिरतुरे, संतोष कासोदे, महेश लोखंडे, विनायक जहुरे, साहेबराव वानखेडे,प्रशांत गाढे, प्रमोद गायकवाड,प्रशांत सावरणे, राहुल गाढे, प्रदीप कोचुरे, राजेंद्र वाघ, तोलन कुमार भाट,यांचा समावेश होता. यावेळी उपस्थितांनी विधेयकाच्या संभाव्य धोके, त्याचे नागरिकांच्या जीवनावर होणारे परिणाम, आणि यामुळे निर्माण होणाऱ्या लोकशाही विरोधी परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. निवेदनाद्वारे प्रशासनाकडे विधेयकाच्या रद्दबाबत शासन दरबारी ठोस पावले उचलण्याची मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली. फोरमची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, संविधानातील मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे हे प्रत्येक शासनव्यवस्थेचे कर्तव्य आहे.मात्र सदर विधेयक हे सरकारला अनियंत्रित शक्ती प्रदान करते आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे अधिकार बाधित होतात. सदरचे निवेदन मा.तहसीलदार यांनी स्वीकृत करत पुढील कार्यवाहीसाठी मा.मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठविण्यात येईल याची नोंद घेतली असल्याची माहिती फोरमच्या प्रतिनिधींनी दिली.

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करा.आंबेडकर व्हॉइस मीडिया फोरम यांचे रावेर तहसीलदार यांना निवेदन!                                                                             
Previous Post Next Post