महावितरणकडून सक्तीची स्मार्ट मीटर बसवणे बंद करा. (यावल प्रतिनिधी (रविंद्र आढाळे) महावितरण कंपनीकडून डोंगर कठोरा गावात सामान्य नागरिकांच्या घरांमध्ये पोस्टपेड स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जात असून, हे नागरिकांच्या विरोधात अन्यायकारक असून आर्थिक पिळवणूक करणारे पाऊल असल्याचा आरोप केला आहे. या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत, दिसून येत आहे की, राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितले होते की, पोस्टपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी कोणतीही सक्ती केली जाणार नाही. नागरिकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसवले गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. महावितरणच्या कंत्राटी कामगारांकडून नागरिकांवर दबाव टाकला जात आहे. नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवण्यास नकार दिल्यास जुन्या मीटरचे रीडिंग घेण्यास येणार नाही, अशी धमकी दिली जात आहे. ही पद्धत म्हणजे थेट नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा भंग आहे.स्मार्ट मीटर बसवल्यानंतर नागरिकांना येणाऱ्या विजेच्या बिलात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यापूर्वी ज्या ग्राहकांना दोन महिन्यांचे फक्त २००-३०० रुपयांचे बिल येत होते, त्यांना आता महिन्याला तब्बल १२००-१३०० रुपये इतके बिल येत आहे. काही ठिकाणी पाचपट अधिक रीडिंग दाखवले जात असल्याच्या तक्रारी देशभरातून येत आहेत. त्यामुळे नागरिकांचे मासिक बिल ४,००० ते ५,००० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे., स्मार्ट मीटर लावण्याचा हा प्रकार म्हणजे 'गोरखधंदा' असून, तो तात्काळ थांबवावा. असे डोंगर कठोरा गावकरी आपली नाराजी व्यक्त करत आहेत

महावितरणकडून सक्तीची स्मार्ट मीटर बसवणे बंद करा.     
Previous Post Next Post