अजित दादा चा अकालमूर्ती हे सर्वांच्या डोळ्यासमोर राहील आजचा दिवस महाराष्ट्रासाठी फार मोलाचा होईल (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.28:- मराठमोळी महाराष्ट्राचा हिरा गमावला आज! जळूनी खाक झाले उपमुख्यमंत्राचे स्वप्न आज!मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे. तो कुणाला कधी, कुठे आणि कसा भेटेल याचा काहीही नेम नाही. सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते. तरीही आपण हे सत्य विसरून रोजच्या धावपळीत, ताणतणावात आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत राहतो. उद्याची चिंता, भविष्याची भीती आणि “अजून मिळवायचं आहे” या विचारात आजचा क्षण निसटून जातो.आजूबाजूला घडणाऱ्या दु:खद घटना आपल्याला क्षणभर थांबवतात. मन सुन्न होतं, डोळे पाणावतात आणि आयुष्य किती नाजूक आहे याची जाणीव होते. त्या वेळी लक्षात येतं की पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता या सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात. माणसासोबत जातं ते फक्त त्याने कमावलेलं प्रेम, केलेली माणुसकी आणि लोकांच्या मनात उरलेली आठवण.म्हणूनच नात्यांकडे दुर्लक्ष करू नका. आई-वडिलांशी बोला, मित्रांशी मन मोकळं बोला. मनात राग, मत्सर, अहंकार साठवू नका. माफ करणं शिका, कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. भौतिक सुख क्षणिक आहेत—सगळी मोहमाया आहे; पण समाधान, प्रेम आणि शांतता हीच खरी कमाई आहे.उद्या काय होईल माहित नाही, पण आज आपल्या हातात आहे.म्हणून आजचा दिवस जगा, मनापासून जगा, प्रामाणिकपणे जगा.आज अजित दादा पवार यांनी अकाली निरोप घेतला, त्यांच्या आत्म्यास शांती लाभोआणि जे आज आपल्या सोबत आहेत, त्यांना आपलं प्रेम आजच दाखवा. "भावपूर्ण श्रद्धांजली अजित दादा!
byमीडीया पोलीस टाईम
-
0