महाराष्ट्र राज्य शिवपानंद रस्ता चळवळीच्या माध्यमातून. जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या माध्यमातून निवेदन शिवपानंद रस्ते लवकरात लवकर मोकळे करून पानंदशेत रस्ता विकास मंत्रालय स्थापन करा. विकास पाटील जळगांव : राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी वर्षानुवर्षे नकाशावरील पानंद रस्त्यावरून हाल अपेक्षा सहन करावे लागत आहे शेतकऱ्यांचा पानंद रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी स्वतंत्र शिवपानंद रस्ता स्थापन करावे अशी मागणी शिवपानंद शेत रस्ता चळवळ समितीने केली आहे पावसाळ्यात चिखलात रुतत जाणे बैल ट्रॅक्टर नेणे अशक्य होणे रुग्णांना दवाखान्यात वेळेत पोहोचवताना येणे आणि सामाजिक वाद उद्भवणे शेतकऱ्यांचा नाशवंत माल दूध भाजीपाला अशा शेकडो समस्या या रस्त्यांमुळे निर्माण झाले आहेत ही दखल घेत महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेता रस्ता चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शिव पानंद विकास मंत्रालय या स्वतंत्र मंत्रालयाच्या स्थापनेसाठी निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की नकाशावरील शिवपानंद रस्त्यावर 70 वर्षापासून आज पर्यंत अतिक्रमण झालेले आहेत त्यामुळे रस्त्याची रुंदी 5 ते 10 फुटावर आली सुमारे 70 ते 80 टक्के रस्त्यात वापरण्यायोग्य नाहीत परिणामी शेतकऱ्यांना शेतीची साधने घेऊन जाणे म** नेणे आणि जीवनाशक बाबींसाठी हा लप्या होत आहेत महसूल विभाग कडे अधिकार असूनही अद्याप हजारो प्रकरणी प्रलंबितच आहेत प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात शिवपालन क्षेत्राचा विकास मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली समित्या स्थापन करून रस्त्याचे काम हाती घेण्यात यावे अशी मागणी समितीने केली आहे असे निवेदन आज जळगाव जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य शेत रस्ता चळवळ जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यांना देण्यात आले यावेळेस जिल्ह्यातून सचिन चौधरी तांदलवाडी, किशोर पाटील पारोळा. भीमराव पाटील दोघे नीलकंठ चौधरी, अहिरवाडी नामदेव पाटील धुरखेडा महेश पाटील चिनावल नंदकिशोर राजपूत जामनेर युवराज पाटील बोदवड प्रेमराज पाटील धरणगाव अरुण मेढे रावेर कल्याण पाटील मुक्ताईनगर शिवराम पाटील जळगाव इत्यादी शेतकरी उपस्थित होते
byमीडीया पोलीस टाईम
-
0